भारतातील विमा उद्योग प्रामाणिक नाही. क्लेम पास होईलच अन किती होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रिमीअम भरूनही पैसे मिळतील की नाही अन किती याची काळजी असते.
माझी सुरुवातीची अठरा वर्षांपासूनचा आरोग्य विमा होता.
कोरोनात त्याच कंपनीचा दुसरा अधिकचा विमा प्रत्येकाचा वेगळा कोरोना कवच नावाचा घेतला. कुटूंबात कोरोना झाला झाल्यानंतर, दावा टाकला तरी देखील मिळत नव्हता. विमा कंपनीच्या कार्यालयात आकांडतांडव केले तेव्हा काय ते १२ हजार की काय दोन जणांचे मिळाले.
साध्या आजारांचे एका दिवसाचे (त्यांच्या भाषेत डे केअर) पैसे मिळतच नाहीत. साखळी व्यवसाय फोफावला आहे. डॉक्टर प्रामाणिक असू शकतात पण इस्पितळांचे व्यवस्थापन करणारे नोकरशाही पैसा कसा जास्तीचा मिळेल याकडे पाहतात.
साधं काल परवाच आईला डोळ्यांच्या दवाखान्यात नेले तर नाव नोंद करतांना स्वागतीकाने दोन वेळा आरोग्यविमा आहे का असे विचारले.
वाहनांचा विम्याबाबतीतही असाच प्रकार होत असतो. एखादा अपघात झाला तर आधीच्या दुरुस्त्याही करवून घेता येतात. हा फायदा आहे की तोटा? मग त्यामुळे आपलाला जास्तीचा हप्ता द्यावा लागतो याचा ग्राहक विचार करत नाही.
आयुर्विमा अगदी कोटींत आहे अन त्याचा दावा कुणाला मिळाला आहे (अर्थातच नातेवाईकांना) असा अनुभव कुणाचा आहे काय? इतर देशांत या व्यवसायाचा काय अनुभव आहे?
मिसळपाव
प्रतिक्रिया
कार आणि आरोग्य विमा यांचे…
कार आणि आरोग्य विमा यांचे फायदे घेतले आहेत. तरीदेखील आतापर्यंत भरलेल्या रकमेपेक्षा कमी खर्चातच निपटारा झालेला आहे. अचानक खर्च उद्भवून शॉक नको एवढाच काय तो फायदा.