Skip to main content

किडकी प्रजा!

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 21/06/2025 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, साधारण ७ वर्षांपूर्वी माझा अधिजनुक शास्त्राशी परिचय झाला. अधिजनुकशास्त्राचे मला जे आकलन झाले त्यावर आधारित एक लेख समाजमाध्यमावर लिहीला होता (https://www.misalpav.com/node/42260) या लेखात मी माझा "किडक्या प्रजेचा" सिद्धान्त मांडला होता. ज्यांना अधिजनुकशास्त्राचे महत्त्व कळते त्या सर्वाना "किडकी प्रजा" ही संकल्पना पटली आणि तसे कबूल ही अनेक जण करतात. त्यानंतर संकल्पनेला पुष्टी देणारे संशोधन वाढतच गेले. अलिकडेच मी "मेंदूचे आरोग्य आणि विवेक" या विषयावर एक लेख इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता (https://www.misalpav.com/node/52557). अलिकडेच काही दिवसापूर्वी लॅन्सेट या अत्यंत प्रतिष्ठेच्या जर्नलमध्ये प्रदूषणाने मेंदूच्या जडणघडणीवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. याचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध असल्याचे सदर स्पष्ट लिहीले आहे. https://www.thelancet.com/journals/lanplh/article/PIIS2542-5196(25)0009… या अभ्यासातील पुढील मजकूर फार महत्त्वाचा आहे - "Air pollution has various adverse effects on human health, including impairing fetal growth and development. The placenta, serving as the interface between maternal and fetal circulation, plays a vital role in supporting and regulating fetal development. Air pollutants might either directly penetrate the placenta into fetal circulation and the brain,4 or indirectly disrupt the placental function and overactivate the maternal immune system.5,6 " प्रदूषण हे मस्तिष्कदाहाचे मुख्य कारण आहे, आणि या दाहामुळे मेंदूच्या आरोग्यावर, कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो, हा त्याचा मथितार्थ आहे. सदर अभ्यासाठी वापरलेले संदर्भ या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करण्यास पुरेसे आहेत. सध्याच्या परिस्थितीत याचा रेलेव्हन्स काय? असा प्रश्न बर्‍याच जणाना पडेल. माझे उत्तर अनेकांना आवडणार नाही, पण अशा कीडक्या प्रजेवर ३ भाषांच्या सक्तीचा भार टाकून मा०मु० समाजाचे आणि देशाचे नुकसानच करत आहेत. त्यांना विज्ञान कळत नाही, हे ते वारंवार सिद्ध करत असतात. टीप - कर्नल तपस्वी, सुबोध खरे आणि तत्सम लोकांच्या प्रतिसादांना अजिबात उत्तरे दिली जाणार नाहीत.

वाचने 13473
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

एमबीबीएस एमडी पिएचडीच्या समकक्ष पदव्या काढून घेण्या बद्दल विचार का करत नाही. हायला ज्यांच्या हाताखाली दोनचार होतकरू तरुण एम बी बी एस, एम डी, पी एच डी करतील त्यांना तुम्ही पीएच डी करायला सांगताय? कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?

In reply to by सुबोध खरे

जनुक ब्रह्मज्ञान घेऊनही युयुत्सुंकडे संबंधीत विषयांमधल्या डिग्र्या नसत्या तर काही फरक पडला नसता, पण विरोधात डिग्री असलेले डॉ.खरे असल्यामुळे वाचकांना संभ्रम होतोना. युयुत्सुंनी मी सुचवल्या प्रमाणे डिग्र्या मिळवल्या तर त्यांच्या दाव्यांवर अधिकृत शिक्का मुर्तबही होऊ शकले असते आणि मिपा वाचकही संभ्रमात पडले नसते. पण वरच्या प्रतिसादातून युयुत्सुंनी होतकरू तरुण एम बी बी एस, एम डी, पी एच डी स्पाँन्सर करण्याच्या मधल्या मार्गाबद्दल विचार करण्याचे ठरवले आहे.

In reply to by माहितगार

श्री० माहितगार डिग्री हा जर ज्ञानाचा निकष मानायचा ठरवला तर तोच निकष खर्‍याना पण लावावा लागेल. माझ्या माहितीप्रमाणे ते रेडीओलॉजिस्ट आहेत, जनुकशास्त्रज्ञ नाहीत. अन माझ्या माहितीप्रमाणे असंख्य डॉ०ना जनुकशास्त्र कळत नाही. जाता जाता- कुणी काय करायचं आणी काय करायच नाही याचे अभेद्य कप्पे पाडायचे दिवस आता संपले आहेत. नुकताच संजीव सन्याल (मोदींचे आर्थिक सल्लागार) यांची एक मुलाखत बघितली. त्यात ते म्हणाले की संशोधन/इनोव्हेशन करण्यासाठी पी०एच्०डी० पाहिजे हा हट्टाहास आता सोडायला हवा. जो क्षमता दाखवेल त्याला उत्तेजन मिळायला हवे. पण हे विचार अजून आपल्याकडे पुरेसे झिरपलेले नाहीत. डीग्री म्ह० पाठांतराची परिक्षा ज्ञानाची नाही. त्यामुळे पारंपारिक डीग्रीने मी कदाचित सडलोच असतो. वेगळा विचार करायची क्षमता पारंपरिक शिक्षणपद्धत मारते. ज्ञानाची परिक्षा वास्तवातील प्रश्न सोडविण्याच्या वेळी होते...

In reply to by युयुत्सु

खरय सर्व विषयात सामान्य ज्ञान कुणिही मिळवू शकतं. विशीष्ट औषधांची चर्चा तुम्हीही करु शकता औषध सल्ला देण्यासाठी शेवटी लायसन्स्ड डॉक्टर आणि दुकानातून काढून देण्यासाठी लायसन्स्ड फार्मसिस्ट ही लागतोच ना. इतर कुणि औषद सांगितल तर औषध डॉक्टर कडून तपासून घे हाच अधिकृत सल्ला असतो. जिथे डॉक्टर उपलब्ध नाही तिथे लायसन्स्ड फार्मसिस्टवर विश्वास आधी ठेवतात तोही उपलब्ध नसेल तर रसायनशास्त्र जीवशास्त्रातील बीएससी ला विचारून चालवले जाते. तेही नसतील तर घरातला दहावी ते आणि आय आय टीएन जो जास्त शिकलेला त्याला विचारतोच ना आपण. घरा जवळच्या चौकात ट्रॅफिक जाम झाल्यावर एक उच्च शिक्षीत म्हातारा चौकात शिट्टी आणि लाल दिवा घेऊन उभा टाकाला आणि ट्रॅफीक पोलीसचा अनुभव नाही पण पोलीस हवालदार होऊन रिटायर झालेला हवालदार त्या उच्च शिक्षीत म्हातार्‍याला थांब तुझ चुकतय अस म्हणतो तुम्ही सांगा ट्रॅफीकने कुणावर विश्वास ठेवायचा?

In reply to by माहितगार

डिग्रीचा अट्टाहास मला कळण्या पलिकडचा आहे. उद्या संगीत विशारद झाल्या शिवाय कुणी मैफली करायच्या नाहीत किंवा जे०जे० ची पदवी घेतल्याशिवाय चित्र-प्रदर्शने काढायची नाहीत, मराठीत बी०ए० असेल तरच कविता करता येतील, हॉटेल मॅनेजमेंट केल्याशिवाय खानावळ टाकायची नाही अशी बंधने टाकता येतील का?

In reply to by युयुत्सु

उद्या संगीत विशारद झाल्या शिवाय कुणी मैफली करायच्या नाहीत किंवा जे०जे० ची पदवी घेतल्याशिवाय चित्र-प्रदर्शने काढायची नाहीत, मराठीत बी०ए० असेल तरच कविता करता येतील, हॉटेल मॅनेजमेंट केल्याशिवाय खानावळ टाकायची नाही अशी बंधने टाकता येतील का? काय भंपक युक्तिवाद आहे? यातल्या कोणत्याही व्यवसायात जीवाला धोका नसतो. बोगदा / पूल बांधायला प्रशिक्षित अभियंता का लागतो

In reply to by सुबोध खरे

प्रशिक्षित वैमानिक नसलेल्या विमानात बसाल का तुम्ही? एल एल बी न झालेला पण भरपूर कायदा वाचलेल्या माणसाला न्यायाधीश म्हणून समाज स्वीकारेल का? आपलीच टिमकी वाजवायचा किती हा अट्टाहास?

In reply to by सुबोध खरे

तुमची चर्चा म्हणजे राईट विंग ऑर्थोडॉक्स आणि लेफ्टी निओ लिबरल वॉक अशी काहीशी चालू आहे =)))))

In reply to by माहितगार

वकीलांसाठी पण आनंदाची बातमी कारण गुंतागुंतीचे कायदे तयार होणार - उदा० एक व्यक्ती ३ जणांची वारस म्हणजे मज्जाच मज्जा!