बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्य संघातील 15 आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी 20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आयपीएल स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने टीकेचा धनी ठरत असलेल्या हार्दिक पंड्या याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
भारतीय संघ खालीलप्रमाणे:
- फलंदाज - ४: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव
- अष्टपैलू - ४: हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल,शिवम दुबे,
- यष्टीरक्षक - २: ऋषभ पंत, संजू सॅमसन
- फिरकीपटू - २: कुलदीप यादव, युजवेंद्र चहल
- वेगवान गोलंदाज - ३: अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज
- राखीव खेळाडू - ४: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.
वर्गीकरण
वाचने
1345
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
बराय संघ.
क्रिकेट हा फालतू खेळ आहे.