2 जूनला संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधल्या बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेगाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. त्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1,100 च्या वर प्रवासी जखमी झालेले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला असून विविध देशांकडून भारताला शोकसंदेशही पाठवण्यात आले आहेत.
नेहमीप्रमाणेच भीषण अपघात झाल्यावर त्याचं वार्तांकन आणि चर्चा आपल्याकडच्या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यात, सर्वात आधी Ground Zero वरून आमचे वार्ताहर कसं सटीक वार्तांकन करत आहेत, हेही सांगितलं जाऊ लागलं. त्याचवेळी हा अपघात कशामुळे झाला आहे, याचा निष्कर्षही ग्राफिक्समधून काढण्याची स्पर्धा या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली. त्या निष्कर्षांमध्ये सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे एकाच मार्गावर दोन गाड्या येऊन त्या आदळल्याचं, मानवी चूक असल्याचं वगैरे वगैरे सांगितलं जाऊ लागलं. तसंच कोरोमंडलला आधी हिरवा सिग्नल दिला होता, पण तो अचानक तिचा सिग्नल लाल केला गेला आणि त्यामुळं ती गाडी शेजारच्या लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली असंही एक तथ्यहिन कारण सांगितलं जाऊ लागलं. माध्यमांमध्ये सांगितलं जात असल्याप्रमाणं अचानक सिग्नल लाल झाल्यानं कोरोमंडलनं इतक्या वेगानं मालगाडीला लूपवर जाऊन मागून धडक दिली असण्याची शक्यता वाटत नाही.
संध्याकाळी 6.55 ला कोरोमंडल बहानगा बाजार स्थानक ओलांडणार होती आणि बेंगळुरूहून हावड्याला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेसही हे स्थानक ओलांडणार होती. त्यामुळे तिलाही डाऊन मेन लाईनचा होम सिग्नल हिरवा मिळाला होता. एकाचवेळी या गाड्या विरुद्ध दिशेनं हे स्थानक ओलांडणार असल्यामुळे स्टेशन मास्तर आणि पॉईट्समन आपापल्या नियोजित जागांवर हिरवे सिग्नल हातात घेऊन दोन दिशांना उभे होते. दरम्यान, स्थानकात शिरल्यावर लगेचच कोरोमंडल रुळावरून घसरली होती, तेवढ्यात विरुद्ध दिशेनं हावडा एक्सप्रेस वेगानं स्थानक सोडत होती. यामध्ये हावडा एक्सप्रेसला थांबवण्यासाठी स्टेशन मास्टरला क्षणभरही वेळ मिळाला असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं ती गाडी कोरोमंडलच्या घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली.
रेल्वेगाड्यांमध्ये न बसवल्या गेलेल्या कवच या धडकविरोधी यंत्रणेचाही मुद्दा प्रसारमाध्यमांनी लावून धरला आहे. पण या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये कवच यंत्रणा जरी बसवलेली असती, तरी अशा प्रकारचा अपघात ती टाळू शकली असती असं वाटत नाही.
सिग्नल यंत्रणेतील बिघाड किंवा कवचचा अभाव यापेक्षा रुळांच्या, विशेषत: सांध्यांच्या नियमित देखभालीतील अभावामुळे झाला असावा असं वाटत आहे. हा अपघात झाला तो मार्ग दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाच्या अखत्यारित येतो. या विभागात भारतामधली सर्वाधिक मालगाड्यांची वर्दळ होत असते आणि प्रवासीगाड्यांचीही संख्या लक्षणीय आहेच. त्यामुळे लोहमार्गांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेला मोकळा वेळ अतिशय कमी मिळत असतो. त्याचा परिणाम रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर होत आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना सांध्यांवर गाडी कशी हेलकावे खाते ते बऱ्याचदा मलाही प्रवास करताना जाणवतं. अलीकडच्या काळात रुळांची, इंजिनं-डब्यांच्या देखभालीपेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा चकचकीतपणा आणि अनावश्यक बाबींवरील खर्चाचं महत्व वाढलेलं आहे. त्याचा परिणाम अशा प्रकारच्या अपघातांमधून दिसत आहे. गेल्या वर्षभरात गाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातांची संख्या एकूण अपघातांमध्ये 77 टक्के राहिली आहे.
लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2023/06/blog-post.html
वाचने
11096
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिन्क = दुवा.
थांबण्याचे अंतर
In reply to लिन्क = दुवा. by Trump
या धाग्यावर या / इतर रेल्वे
धाग्याच्या केरळ होऊ नये ही
In reply to या धाग्यावर या / इतर रेल्वे by वामन देशमुख
माझा अंदाज असा आहे की लूप
तुमच्या पहिल्या अंदाजाविषयी
In reply to माझा अंदाज असा आहे की लूप by मनो
The Railway Board, while
In reply to तुमच्या पहिल्या अंदाजाविषयी by पराग१२२६३
ही बनवाबनवी वाटते.
In reply to The Railway Board, while by मनो
सिग्नल लॉक झालेले असतात
In reply to ही बनवाबनवी वाटते. by कंजूस
घडलेला अपघात दुर्दैवी आणि दु
चलाख माणसाने केलेला घातपात असावा.
कोरोमंडलचे दोन्ही चालक, LP
In reply to चलाख माणसाने केलेला घातपात असावा. by कंजूस
The condition of injured
In reply to कोरोमंडलचे दोन्ही चालक, LP by पराग१२२६३
रेल्वेमध्ये सिग्नल कसे दिले जातात, रेल्वे लुप लाईन वर कशी टाकली
२०२३ मध्ये अश्या प्रकारचे
सुरक्षा यंत्रणा भरवशाची नाही ??
In reply to २०२३ मध्ये अश्या प्रकारचे by साहना
आता...
In reply to २०२३ मध्ये अश्या प्रकारचे by साहना
मेह ! ३००+ मृत्यू आणि ९००
In reply to आता... by प्रदीप
मूव्हिंग गोल पोस्ट्स?
In reply to मेह ! ३००+ मृत्यू आणि ९०० by साहना
ओहायो अपघातानंतर ओबामा आणि
In reply to मूव्हिंग गोल पोस्ट्स? by प्रदीप
काही (अगम्य) माहिती
प्रदीप, तुम्ही पाठवलेल्या
In reply to काही (अगम्य) माहिती by प्रदीप
प्रवासीगाडी चुकून मालगाडी
In reply to काही (अगम्य) माहिती by प्रदीप
विमानन क्षेत्रात चरखी दादरी
In reply to प्रवासीगाडी चुकून मालगाडी by पराग१२२६३
याबाबत फारसे ज्ञान नाही.
सेफ सीस्टीम
In reply to याबाबत फारसे ज्ञान नाही. by गवि
धन्यवाद.
In reply to सेफ सीस्टीम by बोका
शक्यता
In reply to धन्यवाद. by गवि
बोका यांच्या प्रतिसादात
In reply to धन्यवाद. by गवि
safety Integrity Level 4
In reply to बोका यांच्या प्रतिसादात by तर्कवादी
कवच
In reply to safety Integrity Level 4 by प्रदीप
स्थानकात वा ट्रेनमध्ये जाताना
In reply to बोका यांच्या प्रतिसादात by तर्कवादी
तुमच्या कडे भरपूर वेळ आहे....
In reply to स्थानकात वा ट्रेनमध्ये जाताना by सुबोध खरे
ड्रायव्हर जीवंत आहेत
चुका या सर्वकालीन आहेत
In reply to ड्रायव्हर जीवंत आहेत by कर्नलतपस्वी
आवडते नावडते
In reply to चुका या सर्वकालीन आहेत by सर टोबी
> अशा घटना सर्वत्र होतात.
In reply to ड्रायव्हर जीवंत आहेत by कर्नलतपस्वी
+१
In reply to > अशा घटना सर्वत्र होतात. by साहना
सहमत म्हणालात पण त्यात ही ओळ
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बालासोर जिल्ह्यातील बडागाम
क. तपस्वी,
बादवे.....
मोहक मंगल
सदर रेल्वे घातपात हा दहशतवादी
व्हाॅटस अँप वरुन साभार ...
WhatsApp नुसार
In reply to व्हाॅटस अँप वरुन साभार ... by डँबिस००७
धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल.
उर अभिमानाने भरून आला.