मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चीनवर स्ट्राईक योग्य ठरेल ?

केदार पाटणकर · · काथ्याकूट
चीन अधून मधून भारताची ठाणी बळकावण्यासारखे उद्योग करत असतो. करोनाचा विषाणू त्याच्यामुळेच आला असा प्रवाद आहे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला गेला त्याप्रमाणे चीनवर हल्ला करणे हा चीनला जरब बसविण्याचा मार्ग ठरू शकतो का ?

वाचने 11970 वाचनखूण प्रतिक्रिया 39

चंद्रसूर्यकुमार 17/11/2021 - 15:10
अगदी करायलाच पाहिजे. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करणे हाच एकमेव उपाय आता बाकी राहिला आहे.

आंद्रे वडापाव 17/11/2021 - 17:02
सर्जिकल स्ट्राईक चीनवर आतापर्यंत का झाला नाही ? नेतृत्व भ्याड आहे का ? का फक्त छोट्या देशावर सर्जिकल स्ट्राईक करताना खुमखुमी असते ? नेहरूंना अकला शिकवणारे आता कुठल्या बिळात लपून बसलेत ? ह्याच जागी दुसरा पंप्र असता , तर बिळातून बाहेर येऊन धुमाकूळ घातला असता नुसता ... (हं करा आता हा धागा शंभरी ... )
पाकिस्तानची गोष्ट वेगळी आहे. झुरळाला मारायला चप्पल पुरेशी असते. पण लबाड कोल्ह्याला धडा शिकवण्यासाठी तवा तापवुन बागेत ठेवावा लागतो. सध्या तोच प्रयत्नं चालु आहे. चीन ला मारण्यासाठी सैन्य पाठवण्यापेक्षा तवा तापवुन ठेवुन त्याला त्यावर बसायला बोलावणे चांगले आहे. नंतर काही वर्षे पार्श्वभाग थंड पाण्यात ठेवुन बसायला लागेल. ईतके दिवस ( वर्षे-नव्हे दशके ) आपण बुळ्यासारखे वागलो. यडझव्यासारख्या चुका केल्या त्यामुळे थोडा वेळ लागेल पण ते नक्कीच होईल.

In reply to by सामान्यनागरिक

मुक्त विहारि 17/11/2021 - 17:25
सध्या तरी, चीनच्या विरोधात, अमेरिका, जपान, फिलीपीन्स, ऑस्ट्रेलिया असे देश देखील एकत्र आले आहेत... चीनच्या मालावर 100% बहिष्कार, हा एक अतिशय उत्तम उपाय, सामान्य माणसाच्या हातात आहे...

भागो 17/11/2021 - 18:54
हो हो अगदी अगदी .यू पी निवडणुकीत ही फायदा होईल. त्या आधी अमेरिकेची परवानगी घ्यावी. अशी नम्र सूचना.

मदनबाण 17/11/2021 - 19:40
शी जिनपिंगला रोज, दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल हे गीत रोज ऐकायला सांगायचे आणि या गीताच्या प्रती चीन मध्ये भेट कार्ड म्हणुन पाठवायच्या. जसे आपल्या देशातले लोक इतके वर्ष मूर्ख बनले तसे शी आणि त्याची जनता बनते का ते पहायचे ! अहो गांधीगिरी चा प्रभाव नको का आपण त्यांना सांगायला ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- िी े स न ा ई ा ो ो ..े े े ो े े र ि.

In reply to by मदनबाण

सुबोध खरे 18/11/2021 - 10:38
आणि हिंदी चिनी भाई भाई हे गीत मँडरिन भाषेत मुद्रित करून एखाद्या चिनी अँप मधून सर्व चिनी जनतेला आणि चिनी नेतृत्वाला त्यांच्या फोनवर प्रत्येक कॉल च्या अगोदर आणि नंतर ऐकवू या. हा का ना का ?

In reply to by सुबोध खरे

मदनबाण 18/11/2021 - 20:32
हा का ना का ? आयडियाची कल्पना चांगली आहे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तारीफ़ अपने आप की करना फ़िज़ूल है,ख़ुशबू खुद बता देती है कौन सा फ़ूल है।

दिगोचि 18/11/2021 - 04:08
नेहरूंना अकला शिकवणारे आता कुठल्या बिळात लपून बसलेत ?>>>हे लिहिणार्याना चीनची ताकद महित नसवी क हे उपरोधाने लिहिले आहे? चीनच्या मालावर पूर्ण बहिश्कार टाकणे पण शक्य नाही कारण ते पण आपल्या मालावर पूर्ण बहिश्कार टाकतील. याचा आपल्या उद्योगावर व त्यातल्या कामगारावर परिणाम होईल. या गोश्टीकडे लक्ष द्यायला हवे. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असे बोलु नये.

In reply to by दिगोचि

सामान्यनागरिक 20/11/2021 - 18:17
आपला देश जितक्या लवकर नेहरु / गांधी विसरेल तितक्या लवकर प्रगती करेल. तसंही कोण त्यांचे विचार प्रत्यक्षात आणतं आहे ? आणि ते आजच्या जमान्यात लागु होणारही नाहीत. सगळं बदललंय आता. नेहरु गांधी या विषयावर अगदी हाणामारी होइपर्यंत चर्चा होउ शकते. पण जाउ द्या. तुम्हीही विसरा आणी आम्ही पण. त्यातंच तुमचं आमचं भलं आहे.

रावसाहेब चिंगभूतकर 18/11/2021 - 08:56
कुठल्याही देशाने अलीकडच्या काळात दुसऱ्या देशावर आक्रमण करून ते जिंकल्याचे आणि मग ते ताब्यात ही ठेवल्याचे उदाहरण नाही. अमेरिकेने हा प्रयत्न क्युबा, पनामा, कोरिया, व्हिएतनाम, अफगाणिस्तान आणि शेवटी इराक येथे केला आणि त्यांनी धडा घेतला असावा असे वाटते. भारताचे चीन वर आक्रमण किंवा चीन चे भारतावर आक्रमण या कारणामुळेच शक्य नाही. दोन्ही देश लढाई च्या मैदानासाठी खूप मोठे आहेत. सर्जिकल स्ट्राईक अशाच राष्ट्रविरुद्ध करता येईल ज्याच्याविरुद्ध मर्यादित युद्ध करता येईल आणि ते निर्णायक असेल. नाहीतर कोणताही शहाणा नेता अशी चूक करणार नाही. प्रथम पाकिस्तान. पाकिस्तान हे जरी आपल्याला राष्ट्र वाटत असले तरी प्रत्यक्षात तो एका आर्मी ग्रुप चा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी बनवलेला राष्ट्रासारखा दिसणारा एक बनाव आहे. जर पाकिस्तानकडून काही आगळीक घडली तर नक्की कुणाशी बोलायचे हा प्रश्न असतो. कारण ज्यांच्याशी बोलायचे त्यांना अधिकार नाहीत, आणि ज्यांना अधिकार आहेत त्यांच्याशी लोकशाही राष्ट्रे बोलणी करू शकत नाहीत (साधारण असाच प्रॉब्लेम अफगाणिस्तान बद्दल सुरू होणार आहे). त्यामुळे जर पाकिस्तानी आर्मी समजेल अशा भाषेत त्यांच्याशी चर्चा करायची तर ती साम दाम दंड भेद या चतुःसूत्री पैकी फक्त दंड या सूत्राने करावी लागते. भारताने सर्व उपाय वापरून पाहिल्यावर हा उपाय लागू पडतो हे त्याच्या लक्षात आले आहे. आता चीन. चीन मध्ये सरकार अस्तित्वात आहे. लष्कराला सर्वाधिकार नाहीत. तेव्हा चर्चेच्या मार्गाने प्रश्न सुटू शकतात. मोठ्या शेजाऱ्यांच्यात शक्यतो युद्धे होत नाहीत कारण प्रचंड मोठा भूभाग आणि अनेक स्तरावरची बॅकअप रिसोर्सेस वापरण्याची तयारी. तेव्हा भारत आणि चीन मध्ये सीमेवर चकमकी होत रहातील पण त्या पलीकडे फारसे काही होणार नाही. चीन पाकिस्तान चा वापर करून भारतावर दबाव वाढवू पहातो पण भारताने पाकिस्तान वर मानसिक दबाव कायम ठेवला आहे. अशा स्थितीत कारण नसताना जगाच्या हृदयाचे ठोके वाढवून प्रश्न आणखी जटिल करण्यात कुणालाही काही आवड असेल असे वाटत नाही. जेव्हा चीन वर आंतरराष्ट्रीय दबाव प्रमाणापलीकडे वाढेल किंवा त्यांची आर्थिक सुरक्षितता धोक्यात येईल तेव्हा दोन्ही देश एकत्र बसून बोलणी करून जैसे थे पद्धतीने प्रश्न सोडवू शकतात, पण ती स्थिती सध्या नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

रावसाहेब चिंगभूतकर 18/11/2021 - 09:49
लेखक जोपर्यंत बालबुद्धीचा नाही असे सिद्ध होत नाही तोपर्यंत बेनेफिट ऑफ डाउट द्यावा असे वाटते (अर्थात बऱ्याचदा अपेक्षाभंग होतो) :=) किंवा मग लिहायची हौस कधी कधी उफाळून येते. अर्थात तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. मराठीत लिहावे वाटत नाही ते त्यासाठीच. कारण लोक आपले मर्यादित ज्ञान, आपले biases घेऊन येतात आणि चर्चा अतिशय उथळ होतात. त्या मानाने quora वरच्या इंग्रजी चर्चेत इतक्या प्रकारचे लोक (ब्रिटिश, अमेरिकन्स इत्यादी) इतक्या विविध प्रकारे चर्चा करतात की खरोखर वाचल्यावर समाधान वाटते. अर्थात तिथे युजर बेस मोठा आणि जागतिक असल्याने ते अपेक्षितच आहे.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

सामान्यनागरिक 20/11/2021 - 18:19
मराठीत लिहावे वाटत नाही ते त्यासाठीच. कारण लोक आपले मर्यादित ज्ञान, आपले biases घेऊन येतात आणि चर्चा अतिशय उथळ होतात. या विचारांशी संपुर्ण सहमत.

जेम्स वांड 18/11/2021 - 11:46
चीनवर हल्ला करणे हा चीनला जरब बसविण्याचा मार्ग ठरू शकतो का ?

नाही

कपिलमुनी 18/11/2021 - 11:47
झुल्यावर झुलणे - स्ट्राईक आधी अजून 2-4 वेळा झुल्यावर झुलणे हा उपाय करायला हवा. आणि
कुठल्याही देशाने अलीकडच्या काळात दुसऱ्या देशावर आक्रमण करून ते जिंकल्याचे आणि मग ते ताब्यात ही ठेवल्याचे उदाहरण नाही.
नेहरूंनी असले गैरसमज मनी ठेवले आणि आपण युद्ध हरलो. पूर्ण देश नाही तर काही भाग ताब्यात घेऊन नंतर अणूयुध्द , जागतिक दबाव वगैरे बागुलबुवा दाखवून तेवढी जमीन ताब्यात ठेवता येते

In reply to by कपिलमुनी

जेम्स वांड 18/11/2021 - 12:05
पूर्ण देश नाही तर काही भाग ताब्यात घेऊन नंतर अणूयुध्द , जागतिक दबाव वगैरे बागुलबुवा दाखवून तेवढी जमीन ताब्यात ठेवता येते
ह्या सगळ्या उद्योगाला पाठबळ देण्यासाठी लागणार पैसा, मनुष्यबळ, संसाधने डायव्हर्ट करणे, महागाई, स्वातंत्र्याचा लिमिटेड हक्क इत्यादी खर्चाचे गुणोत्तर त्रैराशिक सोडवल्यास हा उपाय परवडेल का नाही हे ठरावे. अर्थात आकडेमोड काहीही होवो एखाद्याला युद्ध हवे असेल तर तो समर्थन करणारच अन नको वाला विरोध करणारच, त्यामुळे एन्जॉय माडी.

In reply to by कपिलमुनी

मदनबाण 18/11/2021 - 21:05
स्ट्राईक आधी अजून 2-4 वेळा झुल्यावर झुलणे हा उपाय करायला हवा. ह्म्म्म, याला हरकत नाही. शी झोपाळ्यावर बसल्या बसल्या मोदींनी सांगाव... हा मेड इन इंडिया सागवानी झोपाळा आहे ! :) नेहरूंनी असले गैरसमज मनी ठेवले आणि आपण युद्ध हरलो. चच्चा नेहरु आणि त्यांचे गुण वर्णावे तेव्हढे कमीच आहेत म्हणा ! हल्ली चच्चा फार चर्चेत आहेत, बाल दिवस नव्हे काही तर माऊंट बॅटन पेपर्स च्या निमित्त्याने ! अधिक इकडे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तारीफ़ अपने आप की करना फ़िज़ूल है,ख़ुशबू खुद बता देती है कौन सा फ़ूल है।

In reply to by मदनबाण

मदनबाण 18/11/2021 - 23:11
चच्चा आणि गुण वर्णन पहावे म्हंटल तर जालावर एक डॉक्युमेंट इमेज मिळाली [ खरी-खोटी हे मी सांगु शकत नाही. ] P1 जाता जाता :- कंगना कंगना कंगना.... :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तारीफ़ अपने आप की करना फ़िज़ूल है,ख़ुशबू खुद बता देती है कौन सा फ़ूल है।

In reply to by मदनबाण

मदनबाण 19/11/2021 - 20:55
जाता जाता :- धागा हायजॅक केल्या गेल्या आहे ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेशुमार जख्मों की मिसाल हूं मैं, फिर भी हंस लेता हूं कमाल हूं मैं.

तर्कवादी 18/11/2021 - 17:31
पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला गेला त्याप्रमाणे चीनवर हल्ला करणे हा चीनला जरब बसविण्याचा मार्ग ठरू शकतो का ?
नाही. पाकिस्तान आणि चीन यांची तुलना करणे योग्य नाही. पाकिस्तान स्वतः एक अस्थिर राष्ट्र आहे... पाकिस्तानचे अर्थिक व औगद्योगिक सामर्थ्य कमी आहे. लष्करी सामर्थ्यही चीन/अमेरिका यांच्या मदतीवर आहे. चीन अतिबलाढ्य राष्ट्र आहे , चीनचे लष्करी , अर्थिक व औगद्योगिक सामर्थ्य प्रचंड आहे. कदाचित आपल्या दारुगोळा वा शस्त्रनिर्मितीला लागणारा कच्चा माल / यंत्रे ईत्यादीही काही प्रमाणात चीनच्या पुरवठादारांवर अवलंबून असेल (माझ्याकडे विदा नाही पण एक शक्यता असू शकते ). तर चीनला शह देण्याकरिता खूप दीर्घदृष्टीने काम चालू ठेवणे गरजेचे आहे. अशा काही कार्यक्रमाकरिता काही महत्वाचे पल्ले असू शकतात १) चीन व तसेच आणिबाणीच्या प्रसंगात चीनकडे अधिक प्रमाणात झुकू शकतील अशी राष्ट्रे यांवरील अवलंबित्व कमी करावे. फक्त लष्करीच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील. इथे दिवाळीतले आकाशदिवे अभिप्रेत नाही. तर मोबाईल, संगणक, इतर अनेक औगद्योगिक सामग्री ई ई. याकरिता सर्वच मंत्रालयांनी ,केंद्राने तसेच राज्याने एका मोहिमे अंतर्गत काम करणे गरजेचे आहे.. यात चीनचे नाव थेटपणे न घेता हे धोरण अवलंबावे (कदाचित मेक ईन इंडियामागे असा काही हेतू असेलही पण अधिक जलद व प्रभावी अंमलबजावणि हवी) अर्थात सर्व गोष्टींची लगेच भारतात निर्मिती करता येईल असे नाही. पण मग दुसर्‍या कोणत्या राष्ट्रांकडून त्यांची आयात करता येईल याची चाचपणी व्हावी. जपान सारख्या चीनच्या परंपरागत शत्रूशी भारताचे सख्य आहेच. असे परस्पर हिताचे अधिकाधिक द्विराष्ट्रीय अर्थिक संबंध जोडायला हवेते. २) लष्करी सामर्थ्य , टेहळणी वाढवणे - चीनकडून कोणतीही आगळीक , घुसखोरी झाल्यास योग्यरीतीने लगेचच जागतिक मंचावर ती मांडणे. ३) युरोपियन राष्ट्रांचा चीनकडील ओढा, चीनशी असलेला व्यापार कसा कमी होईल ते बघणे. त्याकरिता काही व्यापार भारताकडे व भारताच्या इतर मित्र राष्ट्रांकडे वळवता येईल का ते बघायला हवे. ३) प्रत्यक्ष चीनमध्ये अस्थिरता निर्माण करण्याकरिता इतर राष्ट्रांसोबत (अमेरिक, जपान ई) हातमिळवणी करणे - अर्थात हे सर्व छुपे कार्यक्रम असतात.. कदाचित आताही या आघाडीवर रॉ काही करतही असेल. पण एकंदरीतच शत्रू मोठा आहे, बलाढ्य आहे.. त्याच्याशी दोन हात करण्याआधी आपल्याला मोठे व्हावे लागेल, चतुर व्हावे लागेल. अवांतर - मिपावर मला काही शब्द टंकायला अडचण होते. मग ते तोडून टंकावे व नंतर स्पेस डिलीट करुन तुकडे एकत्र आणावे असे मी करतो. (विंडोज १० ,ब्राउजर - मॉझिला) उदा: "अतिशय" हा शब्द मी इथे तुकड्यात टंकला व मग जोडला. थेट टंकताना तो खालीलप्रमाणे होतो. आणखी कुणाला ही अडचण येत आहे का ? उपाय काय ? अतिशयचे - खरे रुप खालीलप्रमाणे :) function at() { [native code] }इशय

In reply to by तर्कवादी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 20/11/2021 - 11:03
फायरफॉक्स ब्राऊजरला अशी अडचण येते हा माझाही अनुभव आहे. क्रोम ब्राऊजर वापरा. त्यात अशी अडचण येत नाही. पुलेशु. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुषार काळभोर 20/11/2021 - 14:07
विंडोज कॉम्प्युटर वर क्रोम मध्ये मिपावर टाईप करताना at अशी अक्षरे टाईप झाली की तसा एरर येतो. उदाहरण : अतिशय हा शब्द टाईप करताना a आणि t प्रेस केला की लगेच एरर येतो.

मदनबाण 18/11/2021 - 21:12
चीन ने पाकड्यांना हल्लीच एक जहाज दिले आहे,चीन त्यांना शस्त्र देते, विमाने देते, आण्विक तंत्रज्ञानाची मदत देते... मग मला प्रश्न पडतो की आपल्या शेजार्‍याला आपल्या विरोधात काड्या करण्यासाठी आणि आपली क्षती वाढवण्यासाठी चीन जर हे उधोग करतो आहे तर मग आपण ब्राह्मोस, अग्नी इ. मिसाइल्स तैवानला का देत नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तारीफ़ अपने आप की करना फ़िज़ूल है,ख़ुशबू खुद बता देती है कौन सा फ़ूल है।

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 20/11/2021 - 11:43
ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे तैवानला उत्तम सुरक्षा देऊ शकेल. परंतु हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले आहे आणि तैवानच्या संरक्षणाची अमेरिकेने जबाब दारी घेतलेली आहे तेंव्हा रशियाची क्षेपणास्त्रे त्यांना पचतील का हा एक मोठा प्रश्न आहे. https://nationalinterest.org/blog/the-buzz/3-weapons-taiwan-would-love-buy-defend-itself-against-china-26407 चीनच्या विरोधात भारताने हि क्षेपणास्त्रे फिलिपाइन्सला देऊ केलेली आहेत. त्याबाबतचा करार सुद्धा झाला आहे https://eurasiantimes.com/india-signs-1st-export-deal-for-brahmos-cruise-missiles-with-the-philippines-reports/

In reply to by सुबोध खरे

मदनबाण 20/11/2021 - 12:26
ओक्के... देव करो आपली आणि तैवानची कुठुनतरी डिल फिक्स होवो. चीनच्या बुडाखाली जाळ करणारी मिसाईल्स तैवानला दिल्या गेल्यास चीन ची कशी होलसेल मध्ये फाटेल ते मला पहायला लयं आवडेल !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रफ़्तार कुछ इस कदर तेज़ हुई है जिन्दगी की, कि सुबह का दर्द शाम को पुराना हो जाता है।

In reply to by मुक्त विहारि

वामन देशमुख 20/11/2021 - 15:01
भारताला, फंद-फितूरी नवी नाही
कोणत्याही देशाला, राष्ट्राला, समूहाला फंदी-फितुरी कोणत्याही काळात नवी नव्हती. भारतही याला अपवाद नाही, त्याबद्धल single out करून* वाईट वाटून घेण्याचे, स्व-अवमान करण्याचे, न्यूनगंड बाळगण्याचे काही कारण नाही. *तुम्ही तसे करत आहात असे मला म्हणायचे नाही.

In reply to by वामन देशमुख

कोणत्याही देशाला, राष्ट्राला, समूहाला फंदी-फितुरी कोणत्याही काळात नवी नव्हती. -------- ह्या बद्दल अभ्यास करावा लागेल ... चीन बाबत माहिती आहे, कारण त्याशिवाय चहा आसाम पर्यंत पोहोचला नसता आणि अफू युद्ध देखील झाले नसते ----- नेपाळ बाबतीत आहे, वाढता साम्यवाद आणि चीन बरोबर मैत्री हेच दाखवते ------ पाकिस्तान, हो .... आपल्या पेक्षा पण जास्त .... ------- अफगणिस्तान .... अंधाधुंध कारभार, त्यामुळे नक्कीच... फक्त धार्मिक आधारित टिप्पणी टाळायची... ----- बांगलादेश ... नक्कीच असणार ... ----- श्रीलंका, भुतान आणि म्यानमार.... भेट देऊनच नक्की काय ते समजेल ..

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 20/11/2021 - 18:08
आपल्या कडील कम्युनिस्ट आणि डावे लोक उघडपणे चीनची तळी उचलताना दिसतात मग १९६२ चे युद्ध असो कि डोकलामचा प्रश्न असो. पूर्वांचलातील फुटीरता वाद्यांनासुद्धा कम्युनिस्टांचा पाठिंबा असतो त्यासाठी त्यांना चीन कडून मदत घेण्यास लाज वाटत नाही. कम्युनिस्टांसारखी हलकट जमात जगात दुसरी नसेल.

In reply to by सुबोध खरे

सहमत आहे माओ आणि स्टॅलिन आणि लेनिन आणि आता शी जिनपिंग .... तियानमेन चौक,...... कहानी तो सुनी ही होगी ....

चौथा कोनाडा 19/11/2021 - 14:17
चीनवर स्ट्राईक योग्य ठरेल ?
करून बघायला पाहिजे, जमेल का पण ?

😀

वन रॅन्क, वन पेन्शन दोनोळी धागा, दोनोळी प्रतिक्रिया !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 20/11/2021 - 11:51
माझं तर, सध्या तोंड कडू पडलं आहे, आता कोणाकडून काहीही अपेक्षा उरली नाही. काही ठरलं, कोणी असा योद्धा वगैरे सापडला तर कळवा आणि त्यांची छाती किती इंचाची आहे, ते पण कळवा. हर्क्युलस, मॅक्सिमस, पर्सियस आणि किंग लिओनिडास सोडून. -दिलीप बिरुटे
हे लोढणे, कैलासवासी जवाहरलाल नेहरू यांनीच, लाऊन ठेवले आहे... भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे...