महाराष्ट्रातला बौद्ध धर्म (शंका)
वाचत आहे ! बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती.विशेष अभ्यास नाही. पण साहेबांनी स्वीकारलेला धर्म त्यांची अपरिहार्यता होती. त्यांनी आधी त्यांचा मूळ धर्म सुधारित करायचे शक्य ते प्रयत्न केलें पण त्याना तुम्हीं परफेक्ट २ अथवा सदैव गट क्रमांक दोन मधीलच मानण्यात येईल असे निक्षून सांगितले गेले त्यामुळं बहुसंख्य लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे सोडवला.
गौतम बुद्धांनी योग साधनेविषयी खूप चिंतन केले होते आणि ते अनुयायांना सांगितलेही होते. त्याबाबत महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीयांचे मत काय आहेयावर नक्कीचं काही विचार सांगता येतील पण मी बौध्द नसल्याने यावर विचार करून नंतर व्यक्त होईन म्हणतो.
त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही.लोकांना बाबासाहेब पटले होते असे म्हणता येईल.
पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ?याचे अध्यात्मिक आणि सामाजिक कंगोरे आहेत... पण अध्यात्मिक गती असलेला बुध्द मार्गी जगातील कुठलाच धर्म स्वीकारायचा नादाला लागनार नाही हे नक्की. प्रसंगीतो बुध्दालाही सुधारित करेल,आणि निव्वळ अध्यात्मिक साध्य ही एकमेव रुची असणारा कोणताही धर्मीय एकदा बुध्दाने सांगितलेल्या मानसिक क्रियांचा अभ्यास करून अनुभव घेतल्यावर परत कुठलाच धर्म स्वीकारायचा नादाला लागनार नाही हे ही नक्की. वाद, प्रतिवाद हे फक्त बुध्दाच्या साधनेचा अभ्यास प्रत्यक्ष न केलेले लोकं करतात व करत राहतील कारण त्यांनी अभ्यास बुध्दाच्या बाजूच्या अथवा विरोधी मताचा केलेला असतो, साधनेशी त्यांचा गाढा संबंध उरलेला नसतो. पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का ! समजा पोचला असेल अजिंठा वेरूळ परिसरात तरी उद्या तो कोकणात का पोचला नाही असा प्रश्न कोणी विचारेल थोडक्यात प्रश्न विचार करायचा योग्यतेचा नाही हे वैयक्तिक मत.
गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का ,सकृत दर्शनी हो असे म्हणता येईल.
स्वतः गौतम बुद्ध हयात असताना आणि सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती नेमकी कशी होती ?कल्पना नाही, माझीच स्थिती तेंव्हां कशी होती हे ही ठावूक नाही.
गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते कासकृत दर्शनी हो असे म्हणता येईल. जसे पाकिस्तानी अन बांगलादेशी लोक भारतीय होते, आणि अखिल उत्क्रांत मानवजात आफ्रिकन वंशाची होती.
महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जो बौद्ध धर्म फॉलो करतात तो नेमका कसा आहे ? तिबेट, चीन, जपान इथल्या बौद्ध धर्माशी त्याचा कितपत संबंध आहे ? नसेल तर तसे का ?दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध नसावा. अगोदरच्या धर्माचा, जातीचा, मातीचा काही ना काही परिणाम राहतोच. ग्लोबल धर्माच्या लोकलायजेशमुळे काही गोष्टी मुळातूनच बदलून जातात.
महाराष्ट्रातले बौद्ध कुठल्या पंथाचे आहेत वज्रयान की महायान ?कोणताही पंथ म्हणालात तरी मुख्य म्हणजे मुर्तीपुजा करु नका असे बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे मत मात्र त्यास सरसकट हरताळ फासलेला आढळतो. बौद्ध बांधवांच्या घरात बुद्धाच्या / बाबासाहेबांच्या मुर्ती / तसबिरी आढळतात. त्यांची यथासांग पुजा होते. त्यामुळे वज्रयान की महायान याने फारसा फरक पडतो असे मला वाटत नाही.
गौतम बुद्धांनी योग साधनेविषयी खूप चिंतन केले होते आणि ते अनुयायांना सांगितलेही होते. त्याबाबत महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीयांचे मत काय आहे !माझ्या मर्यादित परीचीत वर्तुळातील फारच थोड्या बौद्ध व्यक्तींना योगसाधनेत रस आहे असे जाणवले.
बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती.हा निर्णय केवळ सामाजिक होता. बाबासाहेबांचे मुख्य लक्ष समाजातील पिचलेल्यांना मानसन्मान मिळवून देणे होते. बाबासाहेबांच्या अनुयायांची बाबासाहेबांवर श्रद्धा होती म्हणून बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी इतर कुठला धर्म दिला असता तर तोही अनुयायांनी स्वीकारला असता त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही. मात्र बाबासाहेबांनी देवाधर्माचा त्याग करा आणि नास्तिक व्हा असा सल्ला दिला असता तर तो जनतेला मान्य झाला नसता. थोडक्यात धर्म हा समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा एक खुंटा एवढाच त्याचा अर्थ आहे. मात्र स्वतः बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा अभ्यास गाढा होता एव्हढे सांगता येईल. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माबद्दल लिहिलेले आणि थायलंड (की इंडोनेशिया) येथून प्रकाशित झालेल्या एका पुस्तक मी वाचल्यावर हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्म स्वीकारावा असे माझे स्वतःचे मत झाले होते. मात्र पुढे जाऊन हिंदू धर्माबद्दल अभ्यास केला तेव्हा इथे आणि तिथे फारसा फरक नाही हे लक्षात आल्यावर धर्मपरिवर्तनाचा विचार डोक्यातून काढून टाकला.
बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ?स्वत: बाबासाहेब जरी परत आले तरी आता ते शक्य नाही.
गौतम बुद्धांच्या किंवा अशोकाच्या काळात तो धर्म जगात सर्वत्र गेला. पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का !त्याचा दोष भारतीय रक्तात आहे. त्याला या मातीतला कोणताही धर्म, जात अपवाद नाही. आपल्याकडे दुसरी फळी तयार होत नाही. कोणीतरी एखादे राम / कृष्ण / शिवाजी महाराज / बाबासाहेब तयार होतात. आता त्यांचे वंशज तपासून पहा आणि आडनाव सोडले तर दुसरे काही साम्य, वकुब आढळतो का ते बघा.
गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का , स्वतः गौतम बुद्ध हयात असताना आणि सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती नेमकी कशी होती ?की फर्क पेंदा है ?
In reply to > गौतम बुद्धांनी योग by साहना
अर्थांत बुद्ध ह्यांनी स्वतः सांगितले कि ते रामाचे अवतार आहेत आणि हिंदू धर्मातील अनेक "बुद्ध" लोकांपैकी ते एक आहेत‘गौतम बुद्ध रामाचा अवतार आहे’ असं त्यांनी स्वत: कुठे सांगितले आहे? ह्याचा रेफरंस मिळू शकेल का?
त्यामुळे झाकली मुठ सव्वालाखाची ह्या न्यायाने त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असे वाटते.असं वाटणं हे, काहीतरी करायचं म्हणून बौद्ध धर्मात धर्मांतर केलं, इतकं सुलभीकरण होऊन अतिशयोक्त होतंय. बौद्ध धर्म स्विकारण्याची त्यांची वैचारिक बैठक इतकी उथळ नव्हती. - (वैयक्तिक मतांबद्दल आदर असलेला) सोकाजी
In reply to अर्थांत बुद्ध ह्यांनी स्वतः by सोत्रि
In reply to जातक कथा ४६१. ह्यांत भगवान by साहना
बौद्ध धर्म त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला सर्वात जास्त परिणामकारक टूल होते.धर्मांतराचा निर्णय टूल होता. तसं त्यांनी जाहीर केलं होतं. बौद्ध धर्म टूल नव्हता. तो का स्विकारला ह्याची मिमांसा त्यांनी खालच्या दुव्यावरच्या लेखात केली आहे. तसंच 'Buddha And His Dhamma' ह्या पुस्तकातून अधिक स्पष्ट केलं आहे. https://drambedkarbooks.com/2015/05/31/buddha-and-future-of-his-religion-dr-b-r-ambedkar/ - (अभ्यासू) सोकाजी
In reply to :) by सोत्रि
In reply to त्या न्यायाने कुठलेच साहित्य by साहना
त्या न्यायाने कुठलेच साहित्य स्वतः भगवान बुद्धांनी निर्मित नाही सर्व काही शेवटी त्यांच्या शिष्यानी लिहून काढले आहे.हे बरोबर आहे. सगळं डॉक्युमेंटेशन नंतरच झालेलं आहे.
त्यामुळे बुद्धांनी कुठलीही गोष्ट स्वतः म्हटली असा पुरावा कुठल्याच बाबतीत नसेलआनंद, बुद्धांचा सहाय्यक, त्यांच्याबरोबर सावलीसारखा असायचा. त्याने ह्या डॉक्युमेंटेशनमधे महत्वाची भूमीका बजावली होती. त्रिपिटकात प्रत्येक सुत्ताची सुरुवात 'एवम मे सुतम' म्हणजे मी असं ऐकलं (बुद्ध असं म्हणाले) अशी होते. एक उदाहरण - महासतीपठ्ठाण सुत्त. त्रिपिटकात जे डॉक्युमेंटेशन झालं आहे ते बुद्धांनी स्वतः सांगितलेल्या प्रवचनांचं डॉक्युमेंटेशन आहे. जे अर्हंतांच्या एका समितीने एकमताने केले होतं आणि आनंद त्या समितीचा प्रमुख होता.
जातक कथांत सुद्धा शेवटी कथा लिहीणार्या व्यक्तीची बुद्धाप्रती श्रद्द्धा होती आणि जे काही लिहिले ते भगवान बुद्धांच्या शिकवणुकीला पूरक होते असे आम्ही म्हणू शकतो.म्हणायला कोणीही काहीही म्हणू शकतो, त्यामुळे आपल्या वैयक्तिक मतांचा आदर आहेच!
बुद्ध आणि त्यांचं शिकवणुकीला हिंदू धर्मातून बाहेर काढून बुद्धांना बंडखोर दाखविण्याचा प्रयत्न हा म्हणूनच आंबेडकरवादी वाटतो.एकदा बुद्ध आणि त्याचा धम्म
In reply to जातक कथा ४६१. ह्यांत भगवान by साहना
भगवान बुद्ध "मीच राम होतो" असे सांगतात.आधी खूप हसायचो... पण लोकं हे विधान जोक म्हणुन करत नाहीत वा घेत नाहीत लक्षात आल्यावर कीव वाटू लागली.
In reply to > गौतम बुद्धांनी योग by साहना
In reply to दगडापेक्षा विट बरी by चौकस२१२
अगदी बरोबर , यावर त्यांचे स्वतचे भाष्य काही असेलच! ते कोणास माहित आहे का? म्हणजे" मी बुद्ध धर्मच का स्वीकारला? इतर का नाही ?"वरच्या प्रतिसादात त्यांच्या लेखाची आणि पुस्तकाची लिंक दिली आहे. इथे परत देतो. लेखः https://drambedkarbooks.com/2015/05/31/buddha-and-future-of-his-religion-dr-b-r-ambedkar/ पुस्तकः https://drambedkarbooks.files.wordpress.com/2009/03/buddha-and-his-dhamma.pdf - ('लिंका'ळलेला) सोकजी
In reply to अगदी बरोबर , यावर त्यांचे by सोत्रि
In reply to अगदी बरोबर , यावर त्यांचे by सोत्रि
In reply to बौद्ध च धर्म का निवडला असावा by Rajesh188
बौध्द धर्म आणि हिंदू धर्म हे फार वेगळे नसावेत,बरोबर, ते कधीच न्हवते आणि नाहीत फक्त वैदिक ब्रांच म्हणजेच अखंड हिंदुत्व हा समज जसा रूढ झाला तसे विभाजन दिसणे सुरू झाले.
In reply to इंडोनेशियाला??? by चौकस२१२
In reply to श्रीलंका by सुमित्रा
In reply to भारतात बुद्ध धर्म होता by Rajesh188
In reply to श्रीलंका by सुमित्रा
सातवाहन , मगध अशा राज्यांनी आणि राजांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता.सातवाहन राजे हे वैदिक होते. गौतमी बलश्रीच्या नासिक शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णीचे वर्णन 'एक ब्राह्मणनस' असे आले आहे तसेच त्याची तुलना राम, कृष्ण, अर्जुन, नहुष, नाभाग, अंबरीश अशा राजांशी केली आहे. नाणेघाटातील नागनिकेच्या शिलालेखात सुरुवातीला राम, संकर्ष्ण, इंद्र आदी देवतांना वर्णन केले असून अश्वमेध, राज्सूय अशा श्रौत यज्ञांचे वर्णन आलेले आहे. उत्तरकालीन सातवाहनांच्या लेखांतही देवतांना वंदन करण्यात आलेले आहे. सातवाहन मात्र धार्मिकदृष्ट्या उदार होते व त्यांनी बौद्धांना विपुल राजाश्रय आणि धर्मादाय केला होता इतकेच म्हणता येईल. मगधांबाबत बोलायचे झाले हे सतत वैदिक, जैन, बौद्ध अशा धर्मांना आश्रय देत राहिले तर इकडून तिकडे जात राहिले. मगधांनंतर नंद व त्यानंतर मौर्य सत्तेवर आले. चंद्रगुप्त आयुष्याच्या शेवटी जैन धर्माकडे झुकला होता तर त्याचा मुलगा बिंदुसार हा वैदिक असून त्याचा ओढा नंतर आजीवकांकडे गेला होता. खर्या अर्थाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली ती अशोकाने, अशोकाच्या मृत्युनंतर लवकरच मौर्यांचा र्हास होऊन कट्टर वैदिक असे शुंग घराणे सत्तेवर आले. त्याच सुमारास महाराष्ट्रात सातवाहनांचा उदय झाला.
"सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती" - तेव्हा महाराष्ट्र असं नाव तरी होतं की नाही, शंकाच आहे.मुळात महाराष्ट्र हे स्थलवाचक नाम तेव्हा अस्तित्वातच नव्हते. इकडे तेव्हा अश्मक, भोज, राष्ट्रिक अशी लहानसहान राज्ये होती.
In reply to सातवाहन , मगध अशा राज्यांनी by प्रचेतस
In reply to नाशिकच्या त्रिरश्मी लेणी by सुमित्रा
त्यात लिहिला होतं की सातवाहन राजा बुद्धिस्ट होते,मुळात असा एकही ज्ञात लिखित पुरावा नाही की सातवाहन राजे बौद्ध धर्मीय होते. वर प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे त्यांनी अनेक यज्ञयाग केले होते, विपुल दानधर्म केला होता. नाशिक,नाणेघाट शिलालेख तर ह्याचे उत्तम प्रमाण आहेतच. सातवाहनांची नावे सुद्धा ह्याला प्रमाण आहेत. श्री, श्रीमुख, यज्ञश्री, शिवस्वाती, स्कंदश्री, शिवस्कंदश्री, विष्णूकुंड इत्यादी. अर्थात त्याकाळी बौद्ध धर्म पुष्कळच फोफावला होता ह्यात काहीच शंका नाही. व्यापारी श्रमणांबरोबरच बौद्धांचे तांडे सुद्धा इकडून तिकडे ये जा करत असायचे. बौद्धांना राजेलोकांसोबतच सामान्य जनांनीही अगदी ब्राह्मणांनीही धर्मादाय केला होता. कुडा लेणीतील हा शिलालेख त्या दृष्टीने रोचक आहे. ब्राह्मण उपासक अयितिलु ह्याची पत्नी भयिला हिची चेतीय गृहाची देणगी मात्र बौद्धांसोबतच मूळचा धर्म न सोडलेले लोकही येथे होतेच. गाथासप्तशतीतील कित्येक गाथा सनातन धर्माचे वर्णन करणार्या आहेत. दिअरस्स असुद्दमणस्य कुलवहू णिअअकुडड्लिहिआईं। दिअहं कहेइ रामाणुलग्गसोमित्तचरिआईं ॥ आपल्याबद्द्ल दिराची अशुद्ध भावना जाणून कुलवधू दिराला म्हणते रामाचा बंधू लक्ष्मण सीतेशी जसा वागत असे तसे तुम्ही माझ्याशी वागा. गुणाढ्याची बृहत्कथा तर प्रसिद्धच आहे. सातवाहनांतर वैदिक असे वाकाटक नृपतीही इकडे सत्तेवर आले. वाकाटक नृपती हरिषेणाने तर अजोड अशी अजिंठ्याची दोन क्रमांकाची लेणी खोदवून घेतली. उत्तरेत शुंगांचे बौद्धांबरोबर वैर चालू असताना इकडे मात्र राजे बौद्धांना उदार राजाश्रय देतच होते.
In reply to त्यात लिहिला होतं की सातवाहन by प्रचेतस
In reply to नाशिकच्या त्रिरश्मी लेणी by सुमित्रा
In reply to राजमाता गौतमी बलश्री वर लेख by गामा पैलवान
In reply to गा.पै. हा नाही दुसरा लेख होता by सुमित्रा
In reply to राजमाता गौतमी बलश्री वर लेख by गामा पैलवान
In reply to बौद्ध आणि इतर धर्म यातल्या वेगळेपणा बद्दल... by सुमित्रा
In reply to जातक by सुमित्रा
In reply to हैला by अनिरुद्ध.वैद्य
In reply to त्या पुस्तका विषयी by सुमित्रा
In reply to हे म्हणजे by अनिरुद्ध.वैद्य
बाबा वाक्यम प्रमाणम झाल.मनुस्मृती वाचली आहे का ? नसेल तर हे म्हणजे... आणि असेल तर हा प्रतिसाद म्हणजे... असो धागा मनुस्मृतीवर केंव्हा अवांतर होईल याचाच विचार करत होतो.
In reply to हे म्हणजे by गॉडजिला
In reply to मनुस्मृती वाचण्याचा कै संबंध? by अनिरुद्ध.वैद्य
In reply to Not necessarily a विसंगती. by कॉमी
In reply to बरोबर आहे by Rajesh188
✔
राजेशएकशेअठ्याऐंशी ! अश्या अनेक विसंगती पाहुन गोन्धळायला होते !बौध्द किंवा कोणताही धर्म बदललेले लोक रोटी-बेटी व्यवहार करताना आपल्या जुन्या धर्मातील जातीप्रमाणेच करतात अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत.भारतात जात हीच सामाजिक ओळख आहे. याचं कारण की भारतात लोकं स्वत:ची ओळख म्हणून जातच लावतात. वैयक्तिक ओळख हा प्रकार भारतात जवळजवळ नाहीच. जी काही ओळख आहे ती समूह म्हणूनंच असते. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. सांगायचा मुद्दा असा की जात बदलून नवी जरी घेतली तरी ओळख जुनीच लावावीशी वाटते. आ.न., -गा.पै.
धर्मांतरित बौध्द सोडून मुळ बौध्द धर्मीय लोकांची लोकसंख्या 1% पण नाही त्याची काय करणे असावीत.याचं कारण माझ्या मते असं की, बौद्ध हा रूढ अर्थाने धर्म नाही. जरी तथाकथित विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बौद्ध हा धर्म नाही. कारण की त्यात स्मृतीच नाही. सर्वसामान्य लोकांना आचरता येईल असं काहीही नव्हतं. ना कसले सामाजिक नियम होते. नियम जरूर होते, पण ते सदस्यांसाठी होते, उर्वरित समाजातल्या लोकांसाठी नव्हते. बौद्ध हे विशेषण भिख्खु, श्रमण, इत्यादींना लावण्यासाठी आहे. गृहस्थी माणूस बौद्ध नसतो. आंबेडकरांनी बौद्ध म्हणून जी काही ओळख दिली आहे त्यात उपासनेचा काहीही संबंध नाही. ती एक सामाजिक सोय आहे. आ.न., -गा.पै.
In reply to बौद्ध हा रूढ अर्थाने धर्म नाही by गामा पैलवान
जरी तथाकथित विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बौद्ध हा धर्म नाहीबरोबर ती उपासना/साधना पद्धती आहे... पण त्याचा प्रसार व प्रचार साम, दाम, दंड, भेद न करता इतका व्यापक झाला की पुढे त्याला आपोआप धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. मग ते पिढीजात होणारे आचरण असो की त्यामार्गातील इतर साधक असोत त्यांच्या योगदानातून तो विशाल अन व्यापक बनला म्हणुन तो लोकांनी लोकांसाठी बनवलेला लोकांचा धर्म म्हणुन विस्तारीत झाला
In reply to जरी तथाकथित विद्वानांनी by गॉडजिला
In reply to काहीही हं .... by गामा पैलवान
काहीतरी ठोकून देताय?लूक हू इज अक्युजिंग xD xD xD
In reply to काहीतरी ठोकून देताय? by गॉडजिला
In reply to बुध्दाने मार्ग दिला by गॉडजिला
थोडक्यात माणसांनी मांनसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म हेचं त्यांचे विस्तारीत स्वरुप आहे. :) जे मानसिक क्रियांचा अभ्यासातून आत्मिक शांतता व प्रगती याची खात्री देते.हे नक्की कुठे लिहिलंय? की तुमचं मत आहे? काहीही का असेना, हे जर खरं असेल तर बौद्ध हा पारंपारिक हिंदू धर्माचं अंग बनून जातो. त्याला वेगळा दाखवायचा खटाटोप कशासाठी? आ.न., -गा.पै.
In reply to माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म ? by गामा पैलवान
In reply to माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म ? by गामा पैलवान
तर बौद्ध हा पारंपारिक हिंदू धर्माचं अंग बनून जातो. त्याला वेगळा दाखवायचा खटाटोप कशासाठी?गा.पै., मुळात बौद्धधर्म असा काही धर्म नाही त्यामुळे तो हिंदू धर्माचं१ अंग असणं किंवा नसणं ह्याला काही अर्थ नाही. वेगळेपणाबद्दल बोलायचंच झालं तर, बुद्धाने त्याच्या शिकवणूकीतून समतेचा पुरस्कार केला, सर्व माणसे सारखी आणि समान! हिंदूधर्मातल्या स्मृतींमधल्या 'जन्माधारित वर्णव्यवस्थेच्या' अगदी वेगळी शिकवणूक होती ती. इथे बुद्धाच एक वेगळेपण दिसतं. आ.न., - (अधार्मिक) सोकजी -------------------------------------------------------------------------------------- १ हिंदू धर्मासाठी धर्मग्रंथाऐवजी स्मृती, ही सोय म्हणून वापरण्याचा प्रयत्न आवडला :)
In reply to बौद्ध हा रूढ अर्थाने धर्म नाही by गामा पैलवान
In reply to त्रिपीटका, पंचशील by सुमित्रा
In reply to त्रिपीटका, पंचशील by सुमित्रा
In reply to प्रतिवाद करणारा छान प्रतिसाद by चौथा कोनाडा
In reply to चौथा कोनाडा by सुमित्रा
In reply to त्रिपीटका, पंचशील by सुमित्रा
In reply to प्रतिज्ञा by कपिलमुनी
In reply to मुळ बुद्ध धर्मात by Rajesh188
In reply to प्रतिज्ञा by कपिलमुनी
बौद्ध धर्म हा विज्ञान वादी आहे म्हणजे नक्की काय हे मला अजून पण समजत नाही.जाऊ द्या हो, सगळं समजलच पाहिजे असं थोडीच आहे! - (विज्ञानवादी साधक) सोकाजी
In reply to प्रतिज्ञा by कपिलमुनी
In reply to मुळात धर्म by Rajesh188
In reply to You are getting personal by सुमित्रा
In reply to मुळात धर्म by Rajesh188
In reply to ह्या जगाचा कोणी निर्माता नाही by Rajesh188
In reply to ह्या जगाचा कोणी निर्माता नाही by Rajesh188
In reply to rajesh188 आपणही आपली पोस्ट नीट वाचावी by सुमित्रा
In reply to त्या महान व्यक्तीला by श्रीगुरुजी
In reply to rajesh188 आपणही आपली पोस्ट नीट वाचावी by सुमित्रा
बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ?हे काही नीट समजले नाही बुवा. 'तात्कालिक' परिस्थिती कोणती ? आणि मूळ पंथात/धर्मात परत जाण्यात फायदे काय? का जातील ? (Assuming पंथात परत जाणे चा अर्थ स्वतःचा टॅग "बौद्ध" काढून "मू.ध/प" असा लावणे इतकेच अपेक्षित आहे. नसल्यास काय अपेक्षित आहे स्पष्ट झाले तर बरे होईल.)
In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे
In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे
In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे
In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे
आंबडेकरांना संस्कृत वाचता येत नव्हतीआंबेडकरांना ज्या भाषा येत होत्या त्यात संस्कृत सुद्धा होती.
समस्त समाजाला पुन्हा एकदा संकटात टाकून निघून गेलेयात त्यांची चूक आहे असं वाटत नाही. नवबौद्ध हे हिंदू दलितांपेक्षा जास्त चांगल्या स्थितीत आहेत. पण त्यांचा राजकीय उत्कर्ष झाला नाही. हे होणारच होतं. नेता महान असला तरी पाठीराखे तितके हुशार, चतुर असतीलच असं नाही. किंबहुना तसे ते नसतातच.
In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे
In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे
In reply to भारत देशात संस्कृत ही by चौथा कोनाडा
In reply to घोरपडे by सुमित्रा
In reply to घोरपडे by सुमित्रा
In reply to can you please prove it ? by घोरपडे
In reply to ऐसा कैसा चलेगा राव... by कॉमी
In reply to मी यावर शोधायचा प्रयत्न केला. by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to . by आशु जोग
In reply to . by आशु जोग
२ अब्राहमीक धर्म हिंदूंना आणि बुद्धांना गिळल्यालं बसेल आहेत ते जास्त गंभीर आहे .. यावर जास्त विचार व्हावा असे वाटते , उगाचच बुधः धर्मीयांशी वाद कशाला घालतायनेमक्या याच कारणासाठी मी बौद्धांशी संवाद साधू इच्छितो. त्याचं काय आहे की बुद्ध वेगळा दाखवला की बौद्ध धम्म हा पारंपरिक हिंदू धर्माहून वेगळा आहे असा तथाकथित सिद्धांत मांडता येतो. मग हळूच बुद्धाच्या जोडीस येशू आणून बसवायची सोय होते. बुद्धास मध्ये घालून भालचंद्र नेमाडे उघडपणे म्हणताहेत कॅथलिक पंथाने बौद्ध तत्त्वं उसनी घेतली आहेत : https://www.aksharnama.com/client/article_detail/4434 अशा रीतीने येशूचा चंचुप्रवेश झाला की बुद्धांना उर्वरित हिंदूंपासून अलग पाडणं उत्तरोत्तर सोपं होत जाईल. हे टाळायचं असेल तर बुद्धांना विचारप्रवण करणं हा मार्ग आहे. आ.न., -गा.पै
In reply to बौद्ध विचारप्रवण व्हायला हवेत by गामा पैलवान
In reply to बौद्ध विचारप्रवण व्हायला हवेत by गामा पैलवान
In reply to विचारवंत चे काम by Rajesh188
According to Ambedkar, the real objective of a religion should be the spiritual development of individuals:स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हवी होती तर मग हिंदू धर्म सोडायचाच कशाला? नारायण गुरूंनी केरळात हिंदू धर्मात राहूनंच दलितांच्या हिताच्या सुधारणा राबवल्या होत्या. हा भक्तीमार्ग आंबेडकरांना का अंगिकारावासा वाटला नाही, हा प्रश्न उद्भवतो. नारायण गुरु यांचं कार्य आंबेडकरांना बऱ्यापैकी समकालीन होतं. त्यामुळे आंबेडकरांना या कार्याचं मूल्यमापन करणं सहज शक्य होतं. पण ते का केलं नाही, हा प्रश्न आहे. लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
Ambedkar thus argued that there was no hope for Untouchables to live a respected life within Hinduism. The only way they could escape from their caste bondage was to renounce it.२. हिंदू धर्मांतर्गत दलितांच्या हिताच्या सुधारणा: त्याच लेखात आलेलं विवेचन, जे होणं शक्य नव्हतं.
His conclusion in Annihilation of Caste was that castes being mainly part of the rules of the Hindu religion, which were sourced from the Dharmashastras (Smritis and Puranas), could not be annihilated unless the Dharmashastras were destroyed.- (धर्मातीत स्पिरिच्युअल) सोकाजी
In reply to १. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट: by सोत्रि
In reply to हीच तर विसंगती आहे .... by गामा पैलवान
In reply to ह्म्म... by सोत्रि
बाबासाहेबांनी धर्मांतर अद्ध्यात्मिक कारणामुळे केलं असं वाटल्यास विसंगती वाटू /दिसू शकते.एकदम खरंय. इंग्रजी लेखातल्या या वाक्यास नेमका आधार कोणता ते शोधावं लागेल :
According to Ambedkar, the real objective of a religion should be the spiritual development of individualsअर्थात, हे नवबौद्धांनी करायला पाहिजे. बौद्ध धर्म स्वीकारणं अध्यात्मिक कारणासाठी की सामाजिक कारणासाठी की दोन्हींसाठी यावर नवबौद्धांना विचारमंथन करावंच लागेल. अन्यथा त्यांची नवबौद्ध म्हणून जी ओळख आहे ती पुसट होत जाईल. आ.न., -गा.पै.
In reply to अध्यात्मिक की सामाजिक यावर विचारमंथन हवं by गामा पैलवान
In reply to ह्म्म... by सोत्रि
In reply to राजकिय उद्दीष्टांसाठी by चौकस२१२
तर अगदीच फारकत नको म्हणून बुद्ध धर्म .. असा विचार केला गेलं असावाअसं वाटणं हे, काहीतरी करायचं म्हणून बौद्ध धर्मात धर्मांतर केलं, इतकं सुलभीकरण होऊन अतिशयोक्त होतंय. १९३६ साली त्यांनी धर्मांतर करणार असं ठरवून घोषणा केली आणि १९५६ साली धर्मांतर केलं, म्हणजे तब्बल २० वर्षांनी. त्या काळात त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास (comparative religion study) केला होता. त्यामुळे बौद्ध शिकवणींवर आधारित धर्म स्विकारण्याची त्यांची वैचारिक बैठक इतकी सोपी आणि सुलभ नव्हती. हा आंबेडकरांचा निबंध त्यांची वैचारिक बैठक स्पष्ट करतो: https://drambedkarbooks.com/2015/05/31/buddha-and-future-of-his-religion-dr-b-r-ambedkar/ - (अभ्यासू) सोकाजी
तुम्ही exactly कशावरून म्हणालात की नियम नाही, स्मृती नाहीत म्हणून?पहिल्याप्रथम, विलंबाने उत्तर देतोय म्हणून क्षमस्व. नियम नाहीत असं मी कुठेही म्हटलेलं नाही. नियम आहेत, पण ते सामान्य लोकांसाठी नसून सदस्यांसाठी आहेत. सामान्य गृहस्थी माणसाच्या चटकन आवाक्यात असेल असं काहीतरी हवं ना? यासंबंधी buddhist law वर गुगलून बघितलं तर पहिला लेख हा सापडला : https://www.encyclopedia.com/religion/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/law-and-buddhism या लेखातही हे विधान आलंय :
Scholars have also presumed that Buddhism did not have an obvious relationship to secular legal systems because of its distinction between lay and monastic populations ....बौद्धधर्माचा कायद्यावर बराच प्रभाव पडला आहे. मात्र तरीही सामान्य जनतेला आचरणात आणता येईल या हेतूने पद्धतशीर लेखन झालेलं दिसून येत नाही. असं लेखन अस्तित्वात असलं तरी ते भारताबाहेरचं असेल. भारतात तरी झाल्याचं दिसून येत नाही. या अर्थी बौद्ध धर्मात स्मृती नाही, असं मला म्हणायचं आहे. आ.न., -गा.पै.
इथे या विषयातील जाणकारांची