महाराष्ट्रातील सध्याच्या अनेक घडामोडी पाहता नजिकच्या काळात विधानसभा निवडणुका कधीही होऊ शकतात यात शंका नाही. मराठी- अमराठी वाद, मराठा आरक्षण याचबरोबर आता ही राजकीय कुरघोडी मराठी खाद्यपदार्थांपर्यंत पोहोचली आहे.
शिवसेनेने नुकताच शिवाजी पार्क वर वडा पाव संमेलन आयोजीत केले होते. महाराष्ट्रातील २७ नावाजलेले वडापावचे स्टॉल्स होते. त्यातील एकाला शिववडापावचे हक्क मिळणार आहेत. या शिववडापावला जागतीक बाजार उपलब्ध करुन देण्याचे शिवसेनेने ठरवले आहे.
झुणका भाकर केंद्रासारखी याची अवस्था होऊ नये तसेच यात काम करणारे केवळ मराठीच असतील याकडे शिवसेना विशेष लक्ष देणार आहे.
याच धर्तीवर काँग्रेसने ही कांदे पोहे संमेलन आझाद मैदानावर घ्यायचे ठरवले आहे. वडा पाव आणि कांदे पोहे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ( बटाटा, पाव, कांदा, पोहे ) हे कुठल्या प्रदेशातून आणले जातात त्यावरुन ही राजकारण जोर धरु लागले आहे.
एकंदर मराठी माणसाला आता वडापाव की कांदा पोहे याचा मनसे निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
मुंबईत घराबाहेर कांदे-पोहे मिळणारी ठिकाणे मला तरी माहित नाहीत. त्यामुळे नेहमीच्या वडापाव खाण्यात थोडा बदल म्हणून कधीतरी कांदे-पोहे खाण्याची संधी मिळणार यात आनंद आहे
अगामी निवडणुकीच्या काळात राहिलेले पक्ष आणखी कुठले मराठी पदार्थ मुंबईत ( आणि महाराष्ट्रात ) रुजवतात ते पाहू .
पण सध्या तरी मुंबईत वडापावचे मार्केट काबिज करणे हे इतर पदार्थांना अवघड आहे . आपणाला काय वाटते ?
वाचने
3602
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणते राहिले आहेत?
आणि सांजा,
In reply to कोणते राहिले आहेत? by कपिल काळे
तुलना होऊ शकत नाही
मर्द
In reply to तुलना होऊ शकत नाही by शक्तिमान
इंदौर चे
In reply to मर्द by बिपिन कार्यकर्ते
साबुदाणा
बिस्किट आंबाडे
नवीन आयडीया!!!
खिचडी
भाजी-पोळी-रोल
लापशी करायला हवी.
हे कसं वाट्तंय?
हे