आजच्या म.टा मधिल बातमी
झारखंडमधील धनबाद कोर्टातील मुख्य न्यायाधीश दीपक कुमार यांच्या कोर्टात मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात हत्या आणि देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.
राजू मलिक नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२,१४७,१४८,१४९ आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सुनावणी २९ तारखेला करण्यात येणार असून , राजू मलिकने आपला भाऊ सकल याच्या हत्येचा आरोप राज ठाकरे यांच्यावर लावला आहे.
दरम्यान, उत्तर भारतीयांवरील वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात बिहारमधील सर्व आमदार - खासदारांनी राजीनामे द्यावेत , असं आव्हान केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. याशिवाय पत्रकार परिषदेत लालूप्रसाद यादव यांनी ठाकरे कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवला.
' बिहारच्या लोकांची प्रतारणा करणा-या दोषींवर कारवाई करण्यासाठी आणि बिहारच्या हितासाठी राज्यातील सर्वंच पक्षाच्या आमदार , खासदारांनी राजीनामे द्यावेत ', असं लालूप्रसाद यादव पत्रकार परिषदेत म्हणाले. पुढे ते म्हणाले , ' कोणताही पक्ष ठाकरे घराण्यातील कुठल्याही पक्षाशी युती करेल , त्यांना देशद्रोही मानले जाईल '. हे स्पष्ट करताना लालू यांनी मराठी जनतेशी कोणतंही भांडण नसल्याचे सांगितले
वाचने
2454
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहि तांत्रिक अड्चणी मुळे लिन्क येथे पेस्ट करत आलि नाही
चालेल विनोद देताना चुका होत असतात.
न्यायाधीश
In reply to चालेल विनोद देताना चुका होत असतात. by वेताळ
देशद्रोह ??
निषेध???
देशद्रोहाचा अर्थ तरी कळतो का ?
स्वातंत्र्यसैनिक देशद्रोही