मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी - भाग ३०

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत. http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-live-updates-jodhpur-judgment-court-order-5150695/

वाचने 61313 वाचनखूण प्रतिक्रिया 281

In reply to by बिटाकाका

श्रीगुरुजी Fri, 04/27/2018 - 17:31
मुद्दे आटोपले कि डू आयडी, समर्थन वगैरे फालतू मुद्दे बाहेर यायला लागतात हे एक निरीक्षण आहे + २० लाख याबरोबरीने त्रागा, आदळआपट, आकांडतांडव, "मी" "मी" ची जपमाळ इ. फालतू मुद्दे सुद्धा पुढे येतात.

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/26/2018 - 20:37
दक्षिणेत एक सदगुरू(जग्गी वासुदेव) क्रिया योग, ईनर इंजिनियरिंग वगैरे वर क्लासेस घेत असतात. जगातल्या जवळपास कोणत्याही विषयावर ते अधिकारवाणीने बोलतात. कुणा मिपाकरास अनुभव आहे का ?

In reply to by मार्मिक गोडसे

बिटाकाका गुरुवार, 04/26/2018 - 22:01
कुठलेही अर्धवट ज्ञान वाईटच. इंडिया फर्स्ट पीएम सर्च केल्यावर गूगल त्यांच्या अल्गोरिथम नुसार विकिपीडियाच्या "लिस्ट ऑफ इंडियन पीएम्स" या पेजवर असलेला फर्स्ट पीएमशी निगडित नेहरूंचा उतारा हायलाईट मध्ये दाखवत आहे. या पेजवर एकच फोटो आहे "भारताचे सध्याचे पंतप्रधान मोदी" असा. आता यात गुगल आणि विकिपीडिया दोन्ही साईट्स आपापल्या जागी बरोबर असून हा कसलाही एरर नाही. पण भक्तांना नाचायला लागतेच काय??

In reply to by बिटाकाका

थॉर माणूस गुरुवार, 04/26/2018 - 23:17
>>>आता यात गुगल आणि विकिपीडिया दोन्ही साईट्स आपापल्या जागी बरोबर असून हा कसलाही एरर नाही. एका अर्थाने हा ग्लिच आहे, कारण सर्च जर पहिल्या पंतप्रधान (किंवा कोणताही मंत्री) यासाठीचा असेल तर फोटोसुद्धा त्याप्रमाणे फेच व्हायला हवा होता, पण तो मात्र सध्याच्या पदावरील व्यक्तीचा होतोय. कारण गुगल या क्वेरीसाठी विकीपिडीयावरून "List of Prime Ministers of India" फेच करत होते आणि सर्वात पहीला फोटो दाखवत होते जो सध्याच्या पंतप्रधानांचा (किंवा ज्या पदाची यादी आहे त्यातील सध्याच्या व्यक्तीचा) असतो. इथे गुगलने त्याच पेजवरील खालच्या यादीतून फोटो उचलायला हवा होता. ग्लिच नसता तर गुगलने फिक्स केला नसता.

In reply to by थॉर माणूस

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 00:03
असेलही, ग्लिच होता आणि तो गुगल ने फिक्स केला की विकी पेज अपडेट झाले कळले नाही. ****************** पण तरीही यात अगदी गुगलला "यु आर सो फुल ऑफ जंक" म्हणण्यासारखे काय कळले नाही. मोदी दिसले की जल्ला ऍसिडीटीच होते काही लोकांना. मंग गुगल पण मोदीला सामील...लै मज्जा!!

In reply to by बिटाकाका

थॉर माणूस Fri, 04/27/2018 - 05:48
गुगलने फिक्स केला तो, आता ते फोटोसाठी वेगळी युआरएल वापरतायत (अमेरीकन प्रेसिंडेंटसाठी असलेल्या स्टेप्ससारखी). विकीपेज पाहीले की कळते ना लगेच, पेज तसेच आहे अजून म्हणजे विकीपेजचा काहीच संबंध नाही, सोपं आहे फार पडताळणे. त्यामुळे कसलाही एरर नाही वगैरेला काहीही अर्थ नाहीये, जिथून कुठून माहिती मिळाली आहे त्याकडे कृपया दुर्लक्ष करा. >>>पण तरीही यात अगदी गुगलला "यु आर सो फुल ऑफ जंक" म्हणण्यासारखे काय कळले नाही. असते हो एकेकाची सवय, धड काय झालंय हे कळलेलं नसताना अर्धवट ज्ञानावर काहीही दावे करतात लोक. काय माहिती गुगलला योग्य आणि अचूक माहितीचा एकमेव स्त्रोत समजणारे बरेच लोक असतील ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील कदाचित. आपण उगाच अर्थ काढायचे नाहीत त्यातून. जमेल तशी योग्य माहिती पुरवायची आणि शांतपणे बाजूला बसायचं.

In reply to by थॉर माणूस

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 09:48
बादवे, आता परत चेक केलं तर तो ग्लिच फिक्स झालेला दिसत नाही. अजूनही सर्च तोच फोटो दाखवत आहे.

In reply to by बिटाकाका

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/26/2018 - 23:17
अमेरिकेचे पहिले अध्यक्ष किंवा इंग्लंडचे पहिले पंतप्रधान गुगलून बघा. तिकडे अगदी शिस्तीत दाखवतो.

In reply to by मार्मिक गोडसे

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 00:09
तुम्ही भक्त आहात का? मंग बळजबरी स्वतःवर का ओढून घ्यालाव? आन वरून धमकी पण... ------------------------ मी सर्वज्ञानी आहे असा माझा अजिबात दावा नाही. भारी पडलं तरी माझं अर्ध ज्ञान पूर्ण करायला आवडतं आपल्याला. त्यामुळे निवांत रहा.

In reply to by मार्मिक गोडसे

manguu@mail.com गुरुवार, 04/26/2018 - 23:32
मी पंतप्रधानांची यादी पहायला ते पेज पाहिले होते. त्यात विद्यमान म्हणून मोदीजींची माहिती सर्वात वर आहे. बाकी यादी खाली आहे. असो. वाचणारा नुसता फोटो पहायला ते पेज तसेही बघणार नसतो. बाकी माहिती बरोबर आहे. शिवाय , विकि अपडेट हे जनता करत असते. कुणीतरी अतीप्रेमाने केले असेल.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 10:01
https://www.mypetrolprice.com/3/0/Mumbai-Petrol-Price-Chart हे घ्या गेल्या १७ वर्षाच्या किमती पेट्रोल डिझेल सी एन जी आणि ऑटो एल पी जी च्या सर्व देशातील सर्व शहरातील किमती. एकदाचा आत्मा थंड होउ दे.

In reply to by सुबोध खरे

मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 11:33
चार पाच दिवसांपूर्वी ह्या साईटवर ही माहिती नव्हती, लोकांनी आवाज उठवला आता एक एक साईट लपवलेले दर दाखवू लागले.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद_१९८२ Fri, 04/27/2018 - 11:45
लोकांनी आवाज उठवला आता एक एक साईट लपवलेले दर दाखवू लागले.
-- इतर लोकांचे जाऊद्या, मिसळपाव साईटवर, गतकाळच्या पेट्रोल-डीजेलच्या दराबाबत तुम्हीच इतका जोरात आवाज उठवलात की, सरकारला घाबरुन मागचे सर्व दर प्रत्येक साईटवर जाहिर करावे लागले. :)) --- तुमचे, अभिनंदन !

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 11:46
तुमचं शिक्षण किती झालंय विचारायची सोय नाही कारण सामाजिक संकेत म्हणतो कि तो वैयक्तिक हल्ला ठरेल. पण तोच सर्वात उचित प्रश्न आहे. विचारावा कि विचारू नये?

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 11:48
गोडसे बुवा कशाला थापा मारताय? मी अगोदरही पाहिले होते. म्हणूनच तुम्हाला लिहिलं होतं कि चमच्याने भरवायची अपेक्षा कशाला?

In reply to by सुबोध खरे

मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 14:54
तुम्हीही तेव्हा काही दुवे दिले होते इकडे टिचकी मार तिकडे टिचकी मार ,मग मिळेल मागील ४ वर्षाचे इंधन दर. जेव्हा तेथे उपलब्ध नाही असं सांगितले तेव्हा तुम्ही गप्प बसलात. आज त्या साईटने खुले केले तेव्हा आले उड्या मारत मला दाखवायला. एकदा चमच्याने भरावयाचे नाही हे ठरवलं तर ठाम राहायचं होतं ना. तुमचा खोटेपणा उघडकीस आला. सरकार खोटे आणि त्याचे समर्थकही खोटे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 20:02
हायला झक मारली आणि तुम्हाला दुवे शोधून दिले असे वाटायला लागले आहे. वर तुम्ही म्हणताय माझा खोटेपणा उघडकीस आला? काय खोटेपणा केला आणि कुठे सरकारचे समर्थन केले आहे ते एकदा कळेल का? बाकी माझ्याबद्दल "अशी टिप्पणी' केल्याबद्दल धन्यवाद

अर्धवटराव Fri, 04/27/2018 - 09:00
धाग्याचं नाव काय, तर ताज्या घडामोडी. इथे चाललेला राडा ताजा नाहि, घडामोडीचं तर बोलायलाच नको. व्युत्पन्न मिपा, जागा हो !!

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 10:55
१९३० ते १९५० चा मिडीया आजच्यासारखा सनसनीप्रिय राहिला असता तर महात्मा गांधी सुद्धा आसारामासारखेच कुख्यात म्हणून प्रसिद्धी पावले असते.

In reply to by arunjoshi123

जेम्स वांड Fri, 04/27/2018 - 12:16
हे आजच्या कायद्यानुसार बलात्कारात मोडेल का? कसे ? का? जर मोडणार नसेल तर आसाराम अन मोहनदास करमचंद गांधी ह्यांच्यात साम्य कसे?

In reply to by प्रसाद_१९८२

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 12:51
https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20130617-mahatma-gandhi-experiment-sexuality-manuben-discovered-diaries-763997-1999-11-30 कदाचित त्यापेक्षा वाईट?

In reply to by arunjoshi123

गांधीजी आपल्या मायनर नातींसोबत नागडे झोपायचे.
तो एक प्रयोगाचा भाग होता व ती बाब गांधीनी कधीही लपवून ठेवली नाही. कविता करणारे माजी पंतप्रधान ,परराष्ट्र मंत्री असताना फक्त बाई,बाटलीत मग्न असायचे असे सुब्रमण्यम स्वामीनी म्हंटले होते. भाजपाचे 'मोबाईल' नेते म्हणून प्रसिद्ध असणारे एक नेते पत्नीस सोडून एका महिला पत्रकारासमवेत जगाच्या सफरीवर गेले होते. दुसर्या एकाचे तमाशा नर्तकीबरोबर संबंध होते. हे तिघेही संघाच्या खास 'राष्ट्रवादाच्या' मुशीत वगैरे तयार झालेले..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

manguu@mail.com Fri, 04/27/2018 - 14:05
एका माजी कविताकाराच्या घरी कुणी राजकन्या रहायची म्हणे. आणि हेच भाजपे काँग्रेसवाल्यांच्या घराचे कौल काढून आत बघतात !

In reply to by manguu@mail.com

हा हा हा. खरे आहे रे ते मंगू. http://www.rediff.com/news/report/mrs-kaul-here-you-dont-know-who-i-am/20140505.htm असो. हा 'ताज्या घडामोडींचा' धागा आहे. शिळ्या घडामोडी येथे नकोत असे ह्यांचे मत.

In reply to by manguu@mail.com

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 15:18
लोकांची "प्रकरणे" असू नयेत हा अजबच मूर्खपणा ऐकत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष सामूहिक बलात्कार करतात ते चूक आहे. प्रकरण असण्यात काही चूक नाही.

In reply to by arunjoshi123

मग राहूल गांधींना अटक का करत नाहीत राजनाथांचे पोलिस?सी,बी.आय? की ते राहूलला घाबरतात? अफवा पसरवायच्या, विकृत आनंद मिळवायचा व प्रकरण अंगाशी आले की धूम ठोकायची... नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना मारले.. काँग्रेस सरकार गुप्त कागदपत्रे जाहीर करीत नाही.. आता चार वर्षे सत्तेवर आहेत.. काय झाले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 15:43
नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना मारले.. काँग्रेस सरकार गुप्त कागदपत्रे जाहीर करीत नाही.. आता चार वर्षे सत्तेवर आहेत.. काय झाले?
१. बोस कोण्या विमान अपघातात मेलेले नाहीत २. नेहरू त्यांच्यावर पाळत ठेवत

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 15:59
मग राहूल गांधींना अटक का करत नाहीत राजनाथांचे पोलिस?सी,बी.आय? की ते राहूलला घाबरतात? अफवा पसरवायच्या, विकृत आनंद मिळवायचा व प्रकरण अंगाशी आले की धूम ठोकायची...
राहुलच्या केसमधे काँग्रेसने पेरलेल्या जजांनी केसदेखील अ‍ॅडमिट करून घेतली नाही. (ह्या जजांनी आजही न्यायव्यवस्थेची सगळी आब्रू विकून काँग्रेसची सेवा चालू ठेवली आहे.). न्यायव्यवस्था काँग्रेसच्या काळात इतकी दुबळी होती.

In reply to by arunjoshi123

खोट्या चकमक प्रकरणात अमित शहांना दिलासा देणारे न्यायाधीश पी. सदाशिवम केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात हा योगायोग ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 15:14
ती बाब गांधीनी कधीही लपवून ठेवली नाही.
म्हणून ती योग्य ठरत नाही.
असे सुब्रमण्यम स्वामीनी म्हंटले होते.
ह्यांनी म्हटलेले सगळे खरे मानता का?
भाजपाचे 'मोबाईल' नेते म्हणून प्रसिद्ध असणारे एक नेते पत्नीस सोडून एका महिला पत्रकारासमवेत जगाच्या सफरीवर गेले होते. दुसर्या एकाचे तमाशा नर्तकीबरोबर संबंध होते. हे तिघेही संघाच्या खास 'राष्ट्रवादाच्या' मुशीत वगैरे तयार झालेले..
ह्या बायका १८+ असतील तर हे सगळं आधुनिक आधुनिक नव्हे काय?

In reply to by arunjoshi123

प्रश्न आधुनिकतेचा नाही रे अरूण. नैतिकतेचा टेंभा मिरवत 'गिरी तो भी टांग उपर' करणार्या लोकांचा आहे. सुब्रमण्यम स्वामीच नव्हे तर अनेकांनी ह्याविषयी लिहिले आहे. भाजपाच्या आतील गोटातल्या लोकांना(आता बरेचसे मार्गदर्शी मंडळात असतील!) ह्यापेक्षा अधिक माहिती असेल ह्यात शंका नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 15:41
माईसाहेब, तुमच्याकडे ४० वर्षापासून एक नोकर आहे. पत्रकार निकमाने लावलेला फोन नेहमी तोच उचलतो याचा अर्थ तुमचे नि नोकराचे अनैतिक संबंध आहेत असं होतं का? लोकांना काय काहीही म्हणतात. इंदिरा गांधी एका माणसाकडून एकांतात योग शिकायच्या. धिरेंंद्र ब्रह्मचारी म्हणून लिहिलं तर चिकार कहाण्या मिळतात. मग? =================== गांधीजींची केस एक लोकवंदता नाही. ती एक सत्य कथा आहे म्हणून तिच्यावर बोलताना मध्येच दुसरा विषय आणू नये. नग्न स्त्रीच्या शेजारी नग्न झोपून ब्रह्मचर्याची परीक्षा घेता येत असेल तर अजून एक पायरी पुढे जाऊन पुढे बरे काही काही करून देखील त्यापुढची ब्रह्मचर्याची परीक्षा घेता येईलच की. पहिली पास पुढची परीक्षा घ्यायचे का गांधीजी? आणि एकदा पास झालं कि झालं कि मोप. वारंवार भिन्न भिन्न स्त्रीयांशी, भिन्न भिन्न जागी तीच तीच परीक्षा कशाला घेत होते ते? स्त्री काय पुरुषाच्या परीक्षेचे साधन आहे का?

In reply to by arunjoshi123

वाजपेयी विवाहित दांपत्याबरोबर एकत्र का राहत होते? संघाची शिकवण आहे का ती? एक पत्नी असताना तमाशा नर्तकीबरोबर संबंध ठेवणे.. हे संघाने शिकवले का भाजपाच्या दिवंगत नेत्याला ? ह्या प्रकरणांची चर्चा समाज्माध्यमांवर काँग्रेस्वाल्यांनी केली तर चालेल का? गांधी द्वेष एका मर्यादेपर्यंत समजू शकते पण बौद्धिके घेणार्या ह्या मंडळींची चारित्र्ये बरबटलेलीच आहेत हे विसरू नकोस.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:06
ह्या प्रकरणांची चर्चा समाज्माध्यमांवर काँग्रेस्वाल्यांनी केली तर चालेल का?
पाहिजे तेवढी करावी. ========================
गांधी द्वेष एका मर्यादेपर्यंत समजू शकते
काही गरज नाही. ========================
संघाची शिकवण आहे का ती?
देशातली लफडी शून्य करणे हे संघाचं अजिबात टार्गेट नाही.

In reply to by arunjoshi123

देशातली लफडी शून्य करणे हे संघाचं अजिबात टार्गेट नाही.
मग दुसर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून विकृत आनंद मिळवणे हे तरी टार्गेट असता कामा नये. गांधींचे टार्गेट स्वातंत्र्य मिळवून द्यायचे हे होते. ते साध्य झाले..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:40
मग दुसर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून विकृत आनंद मिळवणे हे तरी टार्गेट असता कामा नये.
पटेल, नेहरू, इ इ नी देखील हा विकृत आनंंद घेतला आहे तर? श्योर?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:47
मग दुसर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून विकृत आनंद मिळवणे हे तरी टार्गेट असता कामा नये.
वर जी तमाशा नर्तकी, परराश्ट्र दौर्‍यावरची मैत्रीण, आणि फोन उचलणारी बाई ही उदाहरणं दिलीत ती अत्यंत सात्विक आनंद देणारी होती वाटतं.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:20
पण बौद्धिके घेणार्या ह्या मंडळींची चारित्र्ये बरबटलेलीच आहेत हे विसरू नकोस.
दोन्ही बाजूंनी मान्य असलेली प्रेम प्रकरणे किंवा प्रकरणे म्हणजे बरबरटलेले चारित्र्य नव्हे. हे मला इथेच आल्यावर इथल्या पुरोगाम्यांकडून शिकायला मिळाले आहे.

In reply to by arunjoshi123

एवढे 'मॉडर्न' विचार आहेत तर मग गांधी जे प्रयोग करायचे त्यावर प्रॉब्लेम काय आहे? की हे असे असूनही गांधींना महात्मा म्हणतात म्हणून ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:38
एवढे 'मॉडर्न' विचार आहेत तर मग गांधी जे प्रयोग करायचे त्यावर प्रॉब्लेम काय आहे?
आपलं या विषयावरचं ज्ञान आणि वाचन शून्य दिसतं. बधाई हो. ========================================== गांधीजी मॉडर्निटीचे सर्वात मोठे शत्रू होते (विरोधक शब्द टाळला आहे) त्यामुळं विधान बाद आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:43
एवढे 'मॉडर्न' विचार आहेत तर मग गांधी जे प्रयोग करायचे त्यावर प्रॉब्लेम काय आहे?
लफडी करणं वेगळं आणि अज्ञान बालिकांवर लैंगिक प्रयोग करणं वेगळं. ते चूक नाही का वाटत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 15:23
तो एक प्रयोगाचा भाग होता
हा प्रयोग नसून एक विकृती आहे आणि तुम्ही तो सत्वर सोडा असे नेहरू, पटेल इ इ नी त्यांना सांगीतले. ============ त्यांच्या आश्रमातल्या कितीतरी बायका यामुळे आश्रम सोडून गेल्या. ============== कितीतरी बापये सोडून गेले. ================== त्यांनी ज्यांच्यावर प्रयोग केला ते शेवटी इस्पितळात वेडे म्हणून भरती झाले. ==================== आणि आश्रमात अगदी पती-पत्नीस संबंध अलाउड नव्हते. कोणी पुरुषाने कोण्याही स्त्रीला स्पर्श नको करायला असा नियम होता. नेमका गांधीजिंनाच सर्व प्रयोग अलाउड होते? हे तर बर्‍यापैकी राम रहीम सारखं वाटतंय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 15:46
कविता करणारे माजी पंतप्रधान ,परराष्ट्र मंत्री असताना फक्त बाई,बाटलीत मग्न असायचे असे सुब्रमण्यम स्वामीनी म्हंटले होते.
हे विधान सोनिया सीआयए ची हेर आहे या विधानाइतकेच सत्य आहे हे जनतेला कळते.

In reply to by arunjoshi123

स्वधर्म Fri, 04/27/2018 - 16:12
अरूण जोशी: द्वेष तो किती असावा? गांधीजी बर्याच जणांना पूज्य नाहीत, पण हे असं विधान लिहीताना मिपाच्या वाचकांत अनेक सभ्य स्त्री-पुरूष अाहेत याचा तरी विचार करायचा! इकडे गांधींबद्दल जोशी असे लिहीत असताना गामा पैलवान तिकडे अासारामबद्दल अादरार्थी संबोधन वापरून त्यांच्यावरची केस उच्च न्यायालयात टिकणार नाही असा अाशावाद जागवत अाहेत. एकाच वेळी अंध द्वेष अाणि अंध भक्तीची परिसीमा बघायला मिळाली. दुर्दैव मिपाचे.

In reply to by स्वधर्म

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 16:42
प्रिय स्वधर्म, माझ्या विधानात द्वेष आहे असं आपलं गृहितक आहे. मला कोणाबद्दलही द्वेष नाही. गांधीजींबद्दल देखील नाही. गाधीजींच्या स्वमान्य आणि जगन्मान्य वर्तनाबद्दल मला प्रश्न आहे. हा प्रश्न मी अत्यंत सभ्य, सत्य शब्दांतच लिहिला आहे. जगभरातल्या सर्व माध्यमांत अधिकृत पत्रकारांनी हा विषय अश्याच शब्दांत मांडला आहे (उलट अजूनच वाईट शब्द वापरले आहेत.) =============== काही अत्यंत प्रतिष्ठित आणि सभ्य लोकांनी ह्या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी बरेच आयुष्य मोजले आहे. पण गां म्हटले लोक कान बंद करतात. त्यातली मराठी ब्राह्मणाची तर अशी प्राज्ञाच होऊ नये. तरीही मी विचारत आहे याचं आपल्याला कौतुक असलं पाहिजे.
इकडे गांधींबद्दल जोशी असे लिहीत असताना गामा पैलवान तिकडे अासारामबद्दल अादरार्थी संबोधन वापरून त्यांच्यावरची केस उच्च न्यायालयात टिकणार नाही असा अाशावाद जागवत अाहेत.
यातही काही गैर नाही. गुन्हेगारी कृतीस गुन्हेगारीच न मानणे वेगळं आणि क्ष व्यक्तिनं एखादा गुन्हा केलेला नाही असं वाटणं वेगळं आहे. आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने रामदेव, रविशंकर, जग्गी, कोडनानी, साध्वी, असीमानंद, पुरोहीत, लोया इ इ केसेस हाताळलेल्या आहेत ते पाहता असा आशावाद व्यक्त करणे अजिबात गैर नाही.

In reply to by स्वधर्म

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:14
गांधीजी बर्याच जणांना पूज्य नाहीत
गांधीजी मला पूज्य आहेत. शिवाय आज रोजी पाकिस्तान, चीन धरून सर्व प्रगत देशांत राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावी असे किमान एक एक गांधीजी पैदा व्हावेत आणि असं झाल्यावर आपल्याही देशात ८-१० गांधीजी पैदा व्हावेत अशी आमची सच्ची मनोकामना आहे.

In reply to by arunjoshi123

स्वधर्म Mon, 04/30/2018 - 12:55
अजो, तुंम्ही गांधीजींबद्दल ते त्यांच्या नातींसोबत काय करत होते हे सांगण्यासाठी जशी सभ्य भाषा वापरली, तशीच भाषा अासाराम भक्त महिला व मुलींसोबत काय करत होते हे सांगण्यासाठी केंव्हा वापरणार? बाकी, तुमच्या भाषाकौशल्याविषयी खूप अादर अाहे, फक्त काही केलं तरी त्यातल्या भावना पोहोचतातच.

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 12:40
७२ वर्षांचा पुरुष बलात्कार करू शकतो का? =================== आसारामच्या बाबतीत बलात्कार सिद्ध झालेला नाही. त्याची पोटेंसी सिद्ध झालेली आहे. तिलाही वैज्ञानिक दृष्ट्या फार आधार नाही.

In reply to by arunjoshi123

मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 14:59
७२ वर्षांचा पुरुष बलात्कार करू शकतो का? दीर्घायुषी व्हा, ७२ व्या वर्षी प्रयत्न करून बघा. तुम्हाला जाहिरातीत घ्यायची जबाबदारी माझी.

पैसा Fri, 04/27/2018 - 14:24
२०१४ पूर्वी म्हणजे काँग्रेस सरकारमध्ये असताना मिपावर राजकीय चर्चा व्हायच्या पण अशी उभी दुफळी पडून सतत भांडणे होत नव्हती. २०१९ ला पुन्हा काँग्रेसचे सरकार आले तर निदान मिपाला अच्छे दिन येतील काय? =))

In reply to by पैसा

बबन ताम्बे Fri, 04/27/2018 - 18:30
त्यासाठी एक खेळीमेळीची २०-२० क्रिकेटमॅच ठेवा म्हणजे मिपाला अच्छे दिन येतील :-) मी खालील टीमची कल्पना केली आहे. टीम A माईसाहेब कुरुंदिकर (नॉन प्लेयिन्ग कॅप्टन ? ) मंगूशेठ (व्हाइस कॅप्टन आणि स्पिन बॉलर) विशुमित मार्मिक गोडसे पगला गजोधर कपिलमुनी टर्बोचार्ज्ड फिलॉसॉफर (हे दिसत नाहीत हल्ली ?) टीम B श्रीगुरुजी (कॅप्टन आणि ऑलराउंडर) बिटाकाका गामा पैलवान अरुण जोशी१२३ (टीम बी चे राहुल द्रवीड - द वॉल - खिंड लढवत असतात) डॉ. सुबोध खरे प्रसाद ८२ राजकीय काथ्याकूट साठमारीपासून अलिप्त मिपावाचक यात भर घालू शकतात.

In reply to by बबन ताम्बे

पैसा Fri, 04/27/2018 - 19:28
खेळीमेळीचे? एक टीम बांबूची बॅट घेऊन येईल आणि दुसरी मश्रुमचे बॉल. सगळ्या वाचणाऱ्या लोकांना तडाखे बसतील. =))

In reply to by बबन ताम्बे

श्रीगुरुजी Fri, 04/27/2018 - 19:37
LLRC टीम A साठी जेम्स वांड, पुंबा, अभ्या.. हे खेळाडू खेळू शकतील. पैसाताई पंच म्हणून योग्य ठरतील.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा Fri, 04/27/2018 - 19:44
दोन्हीकडून चिकी खाऊ म्हणून शिव्या बसतील. ते संपादक लोक आहेत दोन दोन. ते बरे आहेत! =))

In reply to by श्रीगुरुजी

जेम्स वांड Fri, 04/27/2018 - 20:33
की समोरच्याला थेट विरोधी संघात ढकलायची खेळी अन रडीचा डाव पाहून मौज वाटली, अडगेपणा म्हणतात तो हाच! मुद्दे सोडून माणसाला टार्गेट करणे, समर्थन दिलेले मुद्दे विसरून जायचे अन समर्थन न दिलेले मुद्दे लक्षात ठेवून विरोधी पार्टीत ढकलायचे, जय हो!, तुम्ही कायम शंभर टक्के बराबरच असता हा तुमचा आग्रह असल्यास आमचा निरुपाय होय. बाकी आदर होता आहे अन राहणार. (ह्यावरही तिरसट प्रतिक्रिया नाही आली म्हणजे मिळवले) बाकी पैसा ताई अन पंच म्हणल्यावर एकदम स्पार्टाकस भाऊंचा स्टिव्ह बकनरच्या लीला लेख आठवला. Crying with Laughter (तेच आपलं LLRC हो )

In reply to by जेम्स वांड

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 23:34
एखाद मुद्द्यावर थोडं विरोधी बोललं की समोरच्याला थेट डुप्लिकेट आयडी ठरवायची खेळी अन रडीचा डाव पाहून मौज वाटली, यालापण अडगेपणा म्हणतात का असा प्रश्न पडला आहे! ----------------------- आमाला मॅच जिंकायची आहे, तवा मास्टर ब्लास्टर आमच्याच टीम मंदी पायजेल! दादानु, तुमीच आमच्यात मोठे!!

manguu@mail.com Fri, 04/27/2018 - 15:52
*संजीव पेडणेकरांचे पेट्रोल दरवाढीचे तर्क आणि तथ्य* सुरूवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो. भाजप विरोधक असलो तरीसुद्धा कॉंग्रेस समर्थक अजिबात नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या काळात कसं आलबेल होतं आणि आता कशी वाट लागलीय एवढ्या काळ्या पांढऱ्या पटावर हे लिहिलेलं नाही. संजीव पेडणेकर हे मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत समाज माध्यमांवर लिहित असल्याचं दिसतं. पेट्रोल दरवाढीबाबतची त्यांची एक पोष्ट नुकतीच वाचनात आली. त्यातलं शेवटचं वाक्य असं आहे की सुशिक्षित लोकांनाही देशाचं अर्थशास्त्र कळत नाही, कळून घ्यायची इच्छाही नसते. त्यांच्या या इच्छेखातर ते समजून घेण्याचा इथे प्रयत्न केला आहे इतकंच! *मुद्दा क्र. १* - इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर मेट्रो शहरांमधील पेट्रोल दराबाबतची एप्रिल २०१८ पर्यंतची आकडेवारी उपलब्ध असताना पेडणेकरांनी त्यांच्या लेखात २०१५ पर्यंतचीच आकडेवारी संदर्भासाठी का वापरली ते काही कळालेलं नाही. असो. *मुद्दा क्र २* - १ एप्रिल २०१४ रोजी मुंबईत पेट्रोलचे दर होते ८०.८९ रुपये. मोदी सरकार सत्तेवर आले १६ मे २०१४ रोजी. आज (२२ एप्रिल २०१८ला) दर आहेत ८२.२५ रुपये. तरीही काही लोक पेट्रोल परवडत नाही म्हणताहेत, असं पेडणेकरांचं मत आहे. ही आकडेवारी बरोबर आहे. पण यात क्रूड ऑईलसंबंधी काहीही माहिती नाही. ती माहिती अशी की, १ एप्रिल २०१४ला क्रूड ऑईलचा दर १०३.७४ होता. आणि २२ एप्रिल २०१८ला क्रूड ऑईलचा दर ६८.३६ आहे. थोडक्यात *१ एप्रिल २०१४च्या मानाने आता ३५.३८ डॉलर/बॅरलने क्रूड ऑईल स्वस्त झालं तरी पेट्रोलचा दर किमान २ रूपयाने का होईना पण 'वाढलेलाच' आहे, हे महत्वाचं!* *मुद्दा क्र ३* - मोदी सरकारने ४ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पेट्रोलचे दर चक्क ६३.९० पर्यंत खाली आणल्यामुळे ज्या लोकांना स्वस्त पेट्रोलची चटक लागली होती तेच आता ओरडताहेत, असं पेडणेकरांचे मत आहे. थोडक्यात *मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी एप्रिल २०१४ ला ८०.८९ रुपये पेट्रोलचा दर होता. तो फेब्रु २०१५ ला म्हणजे १०च महिन्यात मोदींनी ६३.९० इतका (म्हणजे १७ रूपयांनी) खाली आणला असा पेडणेकरांचा दावा आहे. पण त्याचवेळी एप्रिल २०१४ ला १०३.७४ ला मिळणारं क्रूड ऑईल फेब्रु २०१५ मधे ५१.६९ म्हणजे निम्यापेक्षा खाली गेलं, हे मात्र पेडणेकर सांगत नाहीत.* आता यात मोदी सरकारने पेट्रोलचा दर 'खाली आणला' या दाव्यात किती तथ्य आहे हे ज्याचे त्याने ओळखावे. *मुद्दा क्र ४* - २९ जानेवारी २००९ रोजी पेट्रोल होतं ४४.५५. ते १६ डिसेंबर २०१० रोजी झालं ६०.४६. मग १ डिसेंबर २०११ रोजी झालं ७०.६६. सप्टेंबर २०१३ रोजी तर ते गगनाला भिडून ८३.६२ इतकं झालं. आता सांगा अवघ्या ४ वर्षात जवळपास ८८ टक्के पेट्रोल दरवाढ करणारी काँग्रेस बरी कि गेल्या ४ वर्षात भाव ६४ च्या तळाला नेऊन ८२ भाव राखणारं मोदी सरकार बरं? असं पेडणेकर विचारताहेत. आता याच कालावधीची क्रूड ऑईलची किंमत पहा. २९ जानेवारी २००९ रोजी क्रूड ऑईलचा दर होता ४१.६८. जो १६ डिसेंबर २०१० रोजी झाला ९१.५१ आणि सप्टेबर २०१३ ला झाला १०४.६८. म्हणजे *कॉंग्रेसच्या काळात सरासरी ८८ टक्के झालेली पेट्रोल दरवाढ सांगणारे पेडणेकर त्याचवेळी १५१ टक्के झालेली क्रूड ऑईलची दरवाढ मात्र सोयीस्करपणे दडवतात.* *मुद्दा क्र ५* - आता मोदी सरकारची ४ वर्ष पाहू. १३ मे २०१४ ला पेट्रोलचा दर होता ८० रू. १६ ऑगस्ट २०१५ला तो दर ६८.२४ असा खाली गेला. त्यानंतर १ ऑगस्ट २०१६ला तोच दर ६५.७ असा आणखी खाली गेला. मात्र १६ मे २०१७ ला तोच दर ७६.५५ इथपर्यंत वर गेला. थोडक्यात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ते १६ मे २०१७ या तीन वर्षात पेट्रोल सरासरी १२ टक्के कमी दराने मिळाले आहे हे खरंय. आता याच कालावधीत क्रूड ऑईलची किंमत पहा. १३ मे २०१४ ला क्रूड ऑईल होतं १०४.३५. तर १६ ऑगस्ट २०१५ला तो दर ४०.४५ इतका खाली गेला. त्यानंतर १ ऑगस्ट २०१६ला तोच दर ४१.८ असा राहिला. मात्र १६ मे २०१७ ला तोच दर ५०.३३ इथपर्यंत वर गेला. थोडक्यात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ते १६ मे २०१७ या तीन वर्षात क्रूड ऑईल सरासरी ५८ टक्के स्वस्त दराने मिळालेलं असताना फक्त १२ टक्केच कमी दराने पेट्रोल आपल्याला मिळालेलं आहे! *थोडक्यात, १५१ टक्के क्रूड ऑईलची दरवाढ झालेली असताना ८८ टक्के पेट्रोल दरवाढ कॉंग्रेसच्या ४ वर्षाच्या काळात झाली. तर मोदी सरकारच्या पहिल्या तीन वर्षात क्रूड ऑईलची किंमत ५८ टक्क्यांनी स्वस्त झाली तरी १२ टक्केच कमी दराने पेट्रोल मिळालेलं आहे, हे विशेष!* *मुद्दा क्र ६* - आता २२ एप्रिल २०१८ ला क्रूड ऑईलची किंमत ६८.३६ अशी आहे. तर पेट्रोलचा दर ८२.२५ असा. म्हणजे *१६ मे २०१४च्या मानानेही क्रूड ऑईल जवळपास ३५ टक्के स्वस्त दरानेच मिळाले. तरी पेट्रोलची किंमत ८० वरून ८२ अशी वाढलेलीच आहे.* आता यावर पेडणेकर काय बोलतील? *मुद्दा क्र ७* - कॉंग्रेसच्या काळात बोकांडी बसवलं गेलेलं इराणचं कर्ज मोदींनी फेडलं. तरीही पेट्रोल ६४ पर्यंत खाली आणलं हे खरं तर कौतुकास्पद, असा पेडणेकरांचा दावा आहे. पहिली गोष्ट पेट्रोलचा ६४ रूपये हा दर फेब्रु २०१५तला आहे. तर मोदींची इराण भेट मे २०१६ची आहे. शिवाय पेट्रोलचा दर आणि क्रूड ऑईलची त्यावेळची किंमत याची आकडेवारी मुद्दा क्र ३मधे दिलेली आहेच. *थोडक्यात त्या दराचा आणि त्या भेटीचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. त्यामुळे ६३ रू दराची पिपाणी पेडणेकरांनी इथून पुढे तरी वाजवू नये म्हणजे झालं!* *मुद्दा क्र ८* - क्रूड ऑइलचे भाव खाली येऊनही मोदी सरकारने त्या प्रमाणात पेट्रोलचे दर का कमी केले नाहीत? कारण काँग्रेसने केवळ इराणचं क्रूड ऑइलचं तब्बल ४३ हजार कोटींचं बिल थकवलं होतं. त्यांच्या काळात डॉलर २०१० मध्ये होता ४५ ते ४६ रुपये. तो झाला २०१४ मध्ये ६२ ते ६३ रुपये. त्यामुळे इराणला डॉलरमध्ये रक्कम द्यायची तर देशाच्या तिजोरीवर प्रचंड भार पडला असता. त्यामुळे मोदींनी इराणला भेट देऊन त्यावर तोडगा काढला आणि बोकांडी बसवलं गेलेलं कर्ज फेडलं, असं एकूण पेडणेकरांचं मत. वस्तुस्थिती अशी आहे की युरोपियन समुदाय हा क्रूड ऑईलकरता इराणचा एक मोठा ग्राहक आहे. आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी कर्जाची रक्कम ही यूरो (यूरोपियन चलन) मधे हवी असणं ही इराणची गरज. मात्र इराणच्या आण्विक कार्यक्रमामुळे २०११ सालापासून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्यांच्यावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले होते. त्यामुळे इराणशी यूरोमध्ये व्यवहार होत नव्हता. तरीही कर्जापैकी ४५ टक्के रक्कम आपल्या ऑईल कंपन्यांनी रूपयात २०१३मध्येच इराणला दिलेली आहे. जानेवारी २०१६ला निर्बंध सैल झाले. आणि मे मध्ये मोदी सरकारने उर्वरीत रक्कम यूरोमध्ये देण्याचा करार केला. *२०१० मधील डॉलर ४५ वरून २०१४ला ६२ झाल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत होता. तर मग ते कर्ज २०१४लाच सत्तेवर आल्यावर लगेच का नाही दिलं गेलं? दोन वर्षांनी आणि ते ही मे २०१६ ला जेव्हा डॉलर ६८ वर पोचलेला असताना का दिलं? उलट दोन वर्ष आणखी उशीर केल्यामुळे कर्जाचा डोंगर आणखी वाढविण्यात मोदी सरकारनेही हातभार लावला, असं म्हटलं तर चालेल का पेडणेकरांना? त्यामुळे पेडणेकर सांगतात त्याप्रमाणे डॉलरचा भाव वधारत होता म्हणून काही मोदी सरकारने कर्जाची रक्कम ताबडतोब दिलेली आहे, असं नव्हे तर आर्थिक निर्बंधांमुळे हा 'डिले' झालेला आहे इतकंच!* *मुद्दा क्र ९* - काँग्रेसच्या काळात झालेली रुपयाची ४५ वरून ६३ पर्यंत झालेली घसरगुंडी मोदींनी ६८ वरून ६३ पर्यंत रोखली. आजही रुपया तेव्हाच्या ६३ च्या तुलनेत ६६ आहे. तेव्हासारखी त्याची डॉलरसमोर कत्तल नाही झालीय हेही लक्षवेधीच, असं पेडणेकर अनुमान नोंदवतात. *मात्र ६३ पासून ६८ पर्यंतची घसरगुंडी ही मोदी सरकारलाही आवरता आलेली नाही आणि आजही रुपया तेव्हाच्या ६३ च्या तुलनेत ६६ आहे पण तो ६८पर्यंतही गेला होताच, हे सांगायचं मात्र पेडणेकर सोयीस्कर टाळतात!* *मुद्दा क्र १०* - पेट्रोल दरवाढीबद्दल बोलताना जीएसटीतून पेट्रोल/डिझेलला का वगळलं, ते पेडणेकर का सांगत नाहीत? दुष्काळ संपला तरी दुष्काळाचा कर, महामार्गालगतची दारूची दुकाने बंद केली म्हणून त्याच्या वसूलीचा कर, सप्टे. २०१६ला दीड टक्क्यांनी वॅट वाढवले. अशा प्रकारे *संपूर्ण देशात पेट्रोल/डिझेलवरील सर्वाधीक कर महाराष्ट्रातच लावला गेलाय/जातोय.* अर्थात केंद्रात आणि राज्यातही भाजप शासन असूनही हे कर कमी का होत नाहीत? २०१३ साली त्या वेळच्या केंद्र सरकारला अबकारी करातून (excise duty) ५१ हजार कोटी मिळत होते तर मोदी सरकार आल्यानंतर सप्टें २०१७पर्यंत हीच रक्कम १ लाख १५ हजार ८०० कोटी इथवर पोचली. कारण २०१३ साली पेट्रोलवर अबकारी कर ७.२८ रूपये होता, तो वाढवून २४.४६ करण्यात आला तर डिझेलवरील अबकारी कर जो ३.२८ रूपये होता तो वाढवून १८.३६ रूपये करण्यात आला. म्हणजे *फक्त पेट्रोल/डिझेलवरील कर वाढवूनच (म्हणजेच लोकांच्या खिशात हात घालून) केंद्र सरकारने १ लाख १५ हजार ८०० कोटी रूपये कमावलेत, हे सप्टेंबर २०१७लाच सजग नागरीक मंचच्या विवेक वेलणकरांनी सप्रमाण आकडेवारीनिशी जाहिररीत्या दाखवून दिलं. मग पेट्रोल/डिजेलवरील कर कमी करेन हे जे आश्वासन मोदींनी लोकसभा निवडणूकीपूर्वी दिलेलं त्याचं काय झालं?* याबाबत मात्र पेडणेकर एक अक्षरही लिहिणार नाहीत. हे सगळं लिहिण्याचं कारण एवढंच की लोकांना काही कळत नाही किंवा कळून घ्यायचं नसतं, असं पेडणेकरांसारख्या लोकांचं म्हणणं आहे/असतं. त्यात तथ्य आहेच. पण *लोकांनी ते खरंच कळून घ्यायचा प्रयत्न केला तर पेडणेकरांसारखी लोकंच तोंडघशी पडतील हे नक्की.* बुडीत खात्यातले ४ लाख कोटी परत आल्याचे मागेही त्यांनी लिहिले आणि ते धादांत खोटं असल्याचं दी इंडियन एक्सप्रेसने सिद्ध केल्यावर 'मी फक्त दुवा आहे' अशी सपशेल पळवाट पेडणेकरांना शोधावी लागली. मुळात पेडणेकर सारख्यांचं काहीही चुकत नाही. कारण ते ज्यांना 'प्रमाण' मानतात त्या 'अजेय संघटने'ची मोडस ऑपरेंडी ही अशीच आहे. *आपल्या सोयीची तेवढीच माहिती पसरवायची आणि त्यात आपल्या अजेंड्याचे मुद्दे बेमालूमपणे घुसळून 'लार्जर दॅन लाईफ' अशी आपल्या बाहुल्यांची प्रतिमा उभारायची.* पण यात ते सदासर्वकाळ यशस्वी झालेत असं आधीही झालेलं नाही आणि पुढेही होतीलच असेही नाही!  *आनंद भंडारे*

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 20:43

मला प्रश्न् इचारु नये.

मोगा खान बाकी या भंडारे आणि पेडणेकरांच्या साठमारीत मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे. तुम्ही पण जरा त्या स्वामिनाथन अय्यर साहेबांचा लेख वाचून पहा म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात येईल.

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:09
पेट्रोल घेणार्‍या श्रीमंत लोकांच्या तुलनेत ते ही न घेऊ शकणारांचा फायदा झाला ही आनंदाची गोष्ट आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 20:10
गोडसे बुवा तुम्हाला थोडासा अहंगंड झालाय असं दिसतंय. असो खालील लेख वाचून घ्या. दुसऱ्या धाग्यावरही टाकलाय. या पेट्रोल डिझेलच्या दरा बद्दलच आहे आणि तो मणिशंकर अय्यर यांच्या सख्ख्या भावाने म्हणजे स्वामिनाथन अंकलेसारिया अय्यर या काँग्रेसी माणसानेच लिहिला आहे. म्हणजे तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव होऊ शकेल. https://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/modi-must-resist-urge-to-indulge-in-petrol-populism/

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 20:14
त्या दुव्यातीलच काही भाग During UPA rule, oil shot up from $37/barrel in 2004 to a peak of $140/barrel in 2008, and then declined to a still high $108/barrel in 2014. To cushion the impact on consumers, the UPA government slashed taxes on crude, petrol and diesel, forced government oil companies to provide massive implicit subsidies, and added budgetary handouts. That once added up to over Rs 100,000 crore/year. Chidambaram warned at the time that this was crowding out development spending. He hit on the idea of increasing the controlled price of diesel by small amounts every month, pruning the subsidy bill gradually without creating a political backlash. This excellent strategy was followed by Modi on attaining office. Soon afterwards, the price of oil fell so sharply that no subsidy was needed. The government seized this opportunity to decontrol the prices of petrol and diesel, and partially restore taxes on these that had earlier been slashed. Prices went up and down with market trends, without any political backlash. But as the next general election approaches, the Congress is blaming the BJP for rising petrol and diesel prices. Chidambaram has tweeted that the BJP is anti-middle class. He says crude oil is down from $108/barrel in May 2014 to $75/barrel today, so why have Indian petrol and diesel prices risen in this period? The answer, of course, is the elimination of subsidies and tax cuts. In 2014, prices were highly subsidised and taxes on petroleum products had been slashed. Chidambaram aimed to gradually eliminate these distortions and then decontrol oil. He was unable to complete the job when in power, but his aim has since been fulfilled by Modi. This is politically inconvenient to acknowledge, so Chidambaram now castigates the strategy he himself initiated. He will fail to make this a major election issue. Decontrol has taken the politics out of pricing. As long as petrol and diesel prices were government-controlled, an increase of even Rs 3/litre evoked widespread protests. Yet since 2014, prices have risen almost Rs 20/litre without provoking protests. One reason is that small increases spread over months are shrugged off by the public. A more important reason is that oil has been de-politicized.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Fri, 04/27/2018 - 20:30
http://www.misalpav.com/comment/992875#comment-992875 http://www.misalpav.com/comment/992888#comment-992888 इथे याच गोष्टी लिहिल्या आहेत. आपण बघायचंच नाही आणि केवळ धुळवड खेळायची ठरवली तर काय करणार? असो यापुढे आपल्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देणार नाही. धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 20:50
मी इंधन दरवाढीबाबत चकार शब्द काढला नव्हता, त्यामुळे तुम्ही दिलेल्या दुव्यात कोण त्याचे समर्थन करतय ह्याच्याशी मला देणं घेणं नाही. इंधन दर लपाविण्याबद्दल मी शंका उपस्थित केली होती, त्यामुळे तुम्ही अशी लपवा लपावी नाही हे दाखविण्यासाठी जे काही दुवे दिले तेथेही१७,१८ चे दर नव्हते. म्हणजे माझी शंका खरी होती. तुम्ही ते मान्य करणार नाही. असो.

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Sat, 04/28/2018 - 11:15
इंधन दर लपाविण्याबद्दल मी शंका उपस्थित केली होती,
पावनं कंच्या शाळंत शिकलं? मास्तर कोण व्हतं तुमचं मनायचं?

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 17:34
मिपांवरच्या सभ्य मंडळींना "म्हातार्‍या माणसाने मायनर मुलीसोबत ब्रह्मचर्याच्या चाचणीसाठी नागडे झोपणे नि नंतर ती मुलगी मेंटल होणे" आणि "तथाकथित सभ्य म्हणवणार्‍या लोकांची सामान्य लफडी असणे (तशी केवळ वंदता असणे पण ते एक असो)" यातला फरक कळत नाही का? मोठ्या माणसाचं नाव घेतलं कि धडकी बसणे, प्रश्न विचारायची प्राज्ञा न होणे हेच का पुरोगामितेचे लक्षण? ================================= I am amazed to see that nobody is shocked with Gandhiji's behavior. It's more appalling that so called gentle men questioning my intent. They are concluding that I hate Gandhiji for no reason. Why should I hate Gandhiji? And what wrong question have I asked? What different question have I asked? Nobody is bothered to criticize Gandhiji, nobody cares to express regret, nobody thinks of empathizing with the sufferers, nobody justifying the persistent questioning of Gandhians over this issue. Why do we become so abnormal when it comes to big names? Replace the name Gandhiji with a commoner name and depict the story again. See what would have happened to that person. Long live India!

In reply to by arunjoshi123

पैसा Fri, 04/27/2018 - 17:51
प्रयोग अयशस्वी झाला असता तर काय? हे डोक्यात आल्याशिवाय राहत नाही. चिकित्सा सगळ्याची झाली पाहिजे हेही बरोबर. पण सध्या परिस्थिती अशी आहे की हे स्पष्टपणे मिपावर कोणी लिहिले तर तो माणूस मिपा सदस्य असेपर्यंत "हे आले गांधी द्वेष्टे" म्हणून त्याचा उद्धार होत राहील. हे विकतचे श्राद्ध कोण गळ्यात घेणार? *उत्तर दायित्वास नकार लागू.

In reply to by पैसा

सध्या मोदी द्वेष्टे, मोदींच्या नावाची कावीळ,प्रेस्टिट्युट अशा शब्दांची चलती आहे. पेट्रोलचे भाव वाढले लगेच ' काँग्रेसच्या काळात भाव वाढत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात? आंदोलने केलीत का?" अशी झटकन विचारणा होते. '

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 18:19
हाहाहा...अहो माईसाहेब, मग ते भक्त, भाजप्ये, भाजपेयीं, संघी वगैरे शब्दांची चलती अफगाणिस्तानात आहे की काय??

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 18:27
माईसाहेब, काँग्रेसच्या काळात जेव्हा क्रूड ऑइलचे भाव वाढले तेव्हा: १. सरकारी ऑयल मार्केटींग कंपनीज चा एक वर्षाचा तोटा २ लाख कोटी होता. (आज नफा आहे.) २. हे पैशे बजेटमधून दिले गेले. (आज बजेट शिस्तीत आहे.) ३. त्यामुळे व्होलसेल इन्फ्लेशन १०-१२% झाले. रिटेलचे विचारू नका. (आज महागाई शिस्तीत आहे.) ४. रिलायन्स आणि एस्सार या कंपन्या बंद पडल्या. (आज पुन्हा चालू होत आहेत.) ५. देशातले एकही जास्त किमतीला व्हायेबल बनणारे फिल्ड ऑपरेटीव झाले नाही. ६. २०१४ ते २०१८ मधे क्रूड शिवाय जे इतर इनपुट आहेत ते ५% प्रतिवर्ष असे वाढत आहेत. ७. २०१४ मधे नि २०१८ मधे ६० रु आणि ६६ रु असा चलनाचा दर आहे. ============================ हे सगळं एकत्र जोडा. ======================= सरकारने इंधन विकत घेणारांस सब्सिडी का द्यावी? मोदी ती देत नाहीयेत. हाच प्रण काँग्रेसने पण केला होता पण तोडला.

In reply to by arunjoshi123

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 20:09
व्यावहारिक दृष्टिकोनातून, पेट्रोलचे भाव, आतबट्ट्याचा व्यापार करून कमी करण्याची गरज नाही. -------------------------- राजकीय दृष्टिकोनातून, लवकर कमी करावेत. सामान्य लोकांपर्यंत असली विश्लेषणे पोहोचत नाहीत.

In reply to by बिटाकाका

मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 21:05
व्यावहारिक दृष्टिकोनातून, पेट्रोलचे भाव, आतबट्ट्याचा व्यापार करून कमी करण्याची गरज नाही. असं का वाटतं तुम्हाला? खालील लिंक मध्ये मागील ५ वर्षातील कच्च्या तेलाचे प्रती बॅरल दर रुपयात दिले आहेत. दर कमी केल्यास नक्की काय परिणाम होतील हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. https://www.indexmundi.com/commodities/?commodity=crude-oil&months=60&currency=inr

In reply to by मार्मिक गोडसे

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 23:22
एक प्रतिसाद सोडून वर जोशींनी एक्सप्लेन केलं आहे. ----------------------- सरकारने डेफिसीट कमी करण्यासाठी आणि योजनांना मनी पंप करण्यासाठी ह्या सबसिडी प्रकाराला फाटा द्यावा. शेवटी सरकारला कुठून तरी पैसा आणावाच लागतो आणि सध्या तरी मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by बिटाकाका

मार्मिक गोडसे Fri, 04/27/2018 - 23:41
सरकारने डेफिसीट कमी करण्यासाठी आणि योजनांना मनी पंप करण्यासाठी ह्या सबसिडी प्रकाराला फाटा द्यावा. शेवटी सरकारला कुठून तरी पैसा आणावाच लागतो इंधनाचे दर दुप्पट केल्यास डेफिसिट कितीने कमी होईल? किंवा इंधनाचे दर निम्म्याने कमी केल्यास डेफिसिट कीतीने वाढेल?

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान Sat, 04/28/2018 - 02:38
मा.गो., तुमच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. पण सवलत न देता तूट कमी करायची असेल तर भ्रष्टाचार थांबला पाहिजे. मोदी नेमका भ्रष्टाचारच काबूत आणताहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by पैसा

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 18:14
आणि आता ते नुसते तेवढ्यावर थांबत नसून दोन लोकांचे मत सारखे (आणि विशेषकरून भाजप-मोदी समर्थनार्थ) असतील तर तर त्यांना एकमेकांचे डुप्लिकेट आयडीज ठरवून मोकळे होतात. लै मंजी लैच मज्जा हाय. ------------------------------------------- जस्ट एक कल्पना म्हणून हे असले लॉजिक लावून मिपाकडे पाहिले आणि क्षणात डुप्लिकेट आयड्यांचा एक घोळका नजरेसमोरून पुढे सरकला :):).

In reply to by बिटाकाका

पैसा Fri, 04/27/2018 - 19:21
हे नवीन नाही. लै जुने आहे. पण आता निव्वळ एका विषयावर निखळ चर्चा होऊ शकत नाही च्च. "आमचा एक वाईटपणा दाखवता, तर तुमचे दोन दाखवतो." असली हिरहिरी सगळीकडे. काय करता!

In reply to by पैसा

जेम्स वांड Fri, 04/27/2018 - 20:37
पाहून आनंद जाहला! काड्या टाकून आग पेटवून मजा पाहणाऱ्यात नसणाऱ्या मिपाकरांत तुमचा नंबर आम्ही खूप वरती ठेवला होता, मूर्तीभंजनाबद्दल आभारी कोटी कोटी आभार.

In reply to by जेम्स वांड

पैसा Fri, 04/27/2018 - 20:55
मी कधी म्हटलं मी काड्या सारतं नाही? मिपावर एवढी वर्षे उगीच काढली का? =)) आपल्याला मूर्ती बिर्ती नको बुवा. फुकटचा मोठेपणा! डू आयडी असल्याचे आरोप करणे ही अगदी बारकुली गोष्ट आहे. कोणी म्हटले तर काय अंगाला भोके पडतात का? बरे इथे कोण आधार कार्ड मागतोय? काढेनात का दोन काय दहा आयडी? पासवर्ड अन् ईमेल सांभाळायचे झंझट त्यांनाच. लोकांनी एकाने आयडी काढून दुसऱ्याला वापरायला देणे, बऱ्याच जणांनी मिळून एक आयडी वापरणे तऱ्हा तऱ्हा केल्यात. फिरभी हम चूप थे, चूप है, चूप रहेंगे.

In reply to by पैसा

बिटाकाका Fri, 04/27/2018 - 23:28
असे हजार जण डुप्लिकेट आयडी म्हणून नाचले असते तरी मला शष्प फरक पडला नसता पण पद्धत तर बघा. उघड पाने मान्य पण करायचं नाहीये की हो आरोप आहे. वरून माझी भूमिका हे माझं सोंग आहे वगैरे...म्हणून शेवटी स्पष्ट विचारलं! ––––-––––––––– आता तुमीच पंच हाव, तुमीच न्याव मिळवून द्यावा ही नम्र विनंती!!

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 04/27/2018 - 18:19
प्रयोग अयशस्वी झाला असता तर काय? हे डोक्यात आल्याशिवाय राहत नाही.
प्रयोग यशस्वी झाला आहे की अयशस्वी अशी कोणतीही शहनिशा झालेली नाही. त्यामुळं हे विधान व्हॅलिड नाही.

डँबिस००७ Fri, 04/27/2018 - 23:10
कर्नाटकात भाजपच विजयी होणार आहे !! जनतेची २०१९ ची पुर्व तयारी चालु आहे ! जनता २०१९ ला मोदीजींनाच निर्विवाद निवडणुका जिंकुन देणार आहे. मोदींवर देशातील १००% जनतेचा विश्वास आहे. ह्या विश्वासाला सार्थ ठरवत मोदीजी देशाला पुढे नेण्याच काम सुरुच ठेवणार !!

चित्रगुप्त Sat, 04/28/2018 - 07:25
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील मदरशात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पोलिसांनी मौलवीला अटक केली आहे. पॉस्को कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.... लोकसत्तातील पूर्ण बातमीचा दुवा: https://www.loksatta.com/desh-videsh-news/maulvi-of-madrasa-arrested-under-pocso-act-ghazipur-minor-rape-case-1670394/

श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 09:54
चित्रगुप्त काका, मी आधीच लिहिल्याप्रमाणे हा 'निधर्मी व पुरोगामी' प्रकारचा बलात्कार असल्याने मेणबत्ती मोर्चा, निषेध, आंदोलने, परदेशात पंतप्रधानांच्यविरूद्ध निदर्शने करणारे निधर्मी व पुरोगामी विचारवंत या बलात्काराविरूद्ध एक चकार शब्द काढणार नाहीत. अगदीच आरडाओरडा झाला तर 'गुन्हेगारांचा धर्म पाहू नका' असा पुरोगामी सल्ला देतील. काहीजण तर या मुलीनेच मुल्लाला फसविले किंवा कथुआ प्रकरणावरून लक्श वळविण्यासाठी हा बनाव रचण्यात आला आहे हे सुद्धा ठासून सांगतील.

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. Sat, 04/28/2018 - 10:47
हा ना, आता मुल्लाचा आणि राहुलच्या भेटीचा फोटोशॉप केलेला पुरावा पण येईल ट्रोलिंग साठी. कॉलिंग श्रीगुरुजी फॉर फेक फोटो पुरावा.

In reply to by अभ्या..

माहितगार Sat, 04/28/2018 - 11:34
अभ्याराव ते गुरुजींचे सोडून द्या , ते त्यांच्या वैचारीक विरोधकांना हव्या त्या मैदानात खेळवून दमवतात . पण ह्या गूगल इमेजेस घ्या . आता तुम्ही नाव काढले म्हणून -राहुलरावाम्च्या गूगल छायाचित्र यादी दिली त्यातील प्फेक नसलेल्या जेनुआईन छायाचित्रारील काही लोक रोज काही ना काही वेगळे अनुचित उपद्व्याप करत असतील . प्रत्येकाच्या मागे गुप्तहेर आणि इनकम छायाचित्र विभाग लावला तर दोनचार तरी नको असलेली उदाहरणे गावतील जी राहुलजींच्या आज या राजकारण्याच्या उद्या त्या राजकरण्याच्या छायाचित्रात दिसतात . केवळ छायाचित्र कुणासोबत आहे या वरुन काही ठरत नसावे . लागेबांधे सिद्ध होण्यासाठी अधिक संदर्भ आणि पुराव्यांची गरज भासत असावी की नाही. समजा या किंवा अशा केस मधल्या मौलवीने राहुलजी सोबत केव्हातरी खरा फोटो काढून घेतला असला तर तेवढ्याने लगेच राहुलजी वाईट ठरतात का ? तसे नक्कीच नसावे - ( बाकी मी घराणेशाही प्रेमी नसल्याने त्यांची अजून किती बाजू घ्यावी ते समजत नाही ) राहुलरावांचे आसारामासोबत फोटो नसतीलही पण इतर काँग्रेस नेत्यांच्या आसारामासोबत असलेल्या उठबशी बाबत पुरेसे लिहून आलेले आहे , त्याचे दुसर्‍या धागावर व्यवस्थीत संदर्भही दिले आहेत हवेतर इकडेही देता येतील. असो

In reply to by अभ्या..

माहितगार Sat, 04/28/2018 - 13:07
अभ्याराव वैरारीक दृष्ट्या व्यक्त होण्यासाठी कंपू आणि कळपांचे अडसर आपण शोधत नाही. आमची बॅटींग बर्‍यापैकी चौफेरच असते . मी नेमक्या कोणत्या चेंडूवर आनि केव्हा कॅच घेतो ते इतरत्र लिहिले आहे ते नंतर केव्हा तरी सांगेन सध्या तिकडच्य गल्लीतला एक प्रतिसाद इकडे रेकॉर्डसाठी नोंदवतो त्या बापूंनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेली लेखी प्रशस्तीपत्रे न्यायालयास सादर केली असावित (चुभूदेघे) ; तरीही एकतर्फी काय संबंध जोडताय ?
२६ एप्रिल म्हणजे कालचे एन डि टि व्ही वृत्त आहे Edited by Deepshikha Ghosh | Updated: April 26, 2018 07:56 IST Behind Asaram's Multi-Crore Empire, A Roster Of Political "Friends" Asaram owes much of his early growth to successive Gujarat governments -- both Congress and the BJP. Since the days of former Prime Minister Indira Gandhi, high profile politicians have been close to self-styled godmen to woo voters. The gurus, in return, often gained considerable clout and have used it often to brazenly break the law. Asaram owes much of his early growth to successive Gujarat governments -- both Congress and the BJP. It was in the Congress regime in 1981 and 1992 that he was allotted 14,515 square metres of land. In 1997 and 1999, when the BJP was in power, he was allocated around 25,000 square metres of land to expand his ashrams in Gujarat. In Madhya Pradesh, the Congress government of Digvijaya Singh gifted Asaram prime land in 1998. The Congress veteran is seen bowing to Asaram in photos. Nearly 15 years later, in 2013, Digvijaya Singh publicly expressed regret about the land allotment, calling it a "mistake". Known to his followers as "Bapuji", Asaram counted among his admirers former union minister Uma Bharti, Chhattisgarh Chief Minister Raman Singh and Rajasthan Chief Minister Vasundhara Raje of the BJP and ex-ministers Kapil Sibal, Kamal Nath and Ashok Gehlot of the Congress. But Asaram and PM Modi are reportedly far from close; in 2012, without naming PM Modi, who was then the Chief Minister of Gujarat, Asaram had made some remarks that were seen as a threat to throw him out of power. In 2009, allegations emerged of Asaram occupying land illegally in Gujarat. Over 67,000 square metres of land was reportedly taken back by the government.

In reply to by अभ्या..

श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 14:12
खांग्रेसी नेत्यांचे आणि गुन्हेगार मुस्लिमांचे साटेलोटे दाखविण्यासाठी फोटोची गरज नाही. ते उघड गुपित आहे. उदाहरणार्थ गांधीजी आणि 'भाई' रशीद. आणि समजा राहुल आणि या मुल्लाचा खरा फोटो टाकला तरी तुम्ही धावत येऊन फोटो खोटा आहे असा दावा कराल. कशावरून खोटा असे विचारले तर "कारण मी म्हणतो म्हणून" हे सबळ कारण देऊन "मी"पुराण सुरू होईल.

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. Sat, 04/28/2018 - 14:31
ते खऱ्या फोटोला खरेच म्हणायची नियत अजून शाबूत आहे माझी. निदान दुसऱ्या कुणासाठी तरी खोटे फोटो टाकून ट्रोलिंग करण्यापेक्षा स्वतः: बद्दल खरे बोललेले बरे ना. आणि मा. संपादक मंडळाला मी विनंती करतो की स्कोअर सेटलींग आणि त्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या ह्या आयडीवर त्वरित कार्यवाही व्हावी. धन्यवाद.

In reply to by अभ्या..

श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 14:46
इथे मी काही स्कोअर सेटलिंग वगैरे करीत नाहीय्ये. मला त्याची गरजच वाटत नाही. माझ्यावर आरोप करायला सुरूवात आपणच केली आहे याचा विसर पडलेला दिसतो.

In reply to by श्रीगुरुजी

अभ्या.. Sat, 04/28/2018 - 20:13
आरोप आणि खोटा आरोप ह्यात फरक असतो श्रीगुर्जी. सुरुवात आपण फेक फोटो टाकून केलेली आहे. एकतर खोटेपणा करायचा तो करायचा, उघडे पडले तर त्याला फाटे फोडत दुसर्‍याकडे बोटे दाखवत बसायचे. खोटे उघड करणार्यालाच खोटे ठरवत बसायचे, नुसते तितकेच करुन गप्प बसण्याएवजी जिथे तिथे त्याचाच उल्लेख करत उकसावायचे ह्याला स्कोरसेटलिंग म्हणतात. करायचे ठरवले तर हे आम्हाला चांगले करता येते. फक्त ते करायची नियत नाहीये. (हे एकदाच सांगितलेल्या "मी" पुराणात अ‍ॅड केले तरी चालेल) तुमच्याशी आणि तुमच्या पक्षविचारांशी वैयक्तिक वैर नाहीये, इव्हन ते कधी दाखवलेले ही नाहीये पण ह्याच पध्दतीने तुमची वागणूक चालू राहिली आणि तुम्ही वैयक्तिक हल्ले करत राहिलात तर संपादक मंडळाकडे तक्रार केलेलीच आहे. त्यांच्याकडून काही कार्यवाही न झाल्यास मी आपणास माझ्या पध्दतीने उत्तर देत राहीन. धन्यवाद.

In reply to by अभ्या..

श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 21:31
एकतर्फी आणि पक्शपाती आरोप झाले व त्याच्या आडून स्कोअर सेटलिंग सुरू झाले की योग्य ते उत्तर द्यावे लागते. एनी वे, जे सांगायचं ते सांगून झाले आहे. माझ्याकडे अजून नवीन सांगण्यासारखे काही नाही व अधिक काही लिहिण्यात स्वारस्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गामा पैलवान Sun, 04/29/2018 - 01:37
श्रीगुरुजी, बनावट चित्रं टाकण्यात तुमची शाळकरी गफलत ( = स्कूलबॉय एरर) झालीये. चूक झाली म्हणून सरळ पडदा टाकून द्या ना. हा.का.ना.का. आ.न., -गा.पै.

In reply to by अभ्या..

श्रीगुरुजी Sat, 04/28/2018 - 15:44
बादवे, खरं स्कोअर सेटलिंग म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्यावर आरोप केलेल्या पहिल्या प्रतिसादानंतर ठराविक ३-४ आयडींचे माझ्याबद्दल दिलेले प्रतिसाद वाचा. स्कोअर सेटलिंग लगेच समजून येईल.

In reply to by श्रीगुरुजी

arunjoshi123 Sat, 04/28/2018 - 11:06
अगदी आपल्या मिपावरच्या पुरोगाम्यांच्या आत्मधर्मवैफल्यवाफा निवाल्या आहे. ================= तसं त्यांचंही बरोबरच आहे म्हणा, ते पडले सगळे पुरोगामी ब्राह्मण, तेव्हा मौलवीने त्यांच्या धर्माच्या मुलीवर बलात्कार केला तर त्यांना न्यूनगंड कसा येईल? न्यूनगंड येऊ शकणे हे पुरोगामीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तसा पुरोगाम्यांचा धर्म नसतो, पण तरीही आपल्या धर्माच्या मुलीवर बलात्कार होणे ही दु:खाची गोष्ट आहे, संतप्त व्हायची नाही हे ही त्यांना कळते. सबब सध्याला आत्मग्लानीक्रोधजन्याक्रोशज्वलित मेणबत्त्या फडताळातच असू द्यायच्या.