नमस्कार मिपाकर मित्रांनो,
सर्वसामान्य घरांमधे किमान एक किंवा दोन वर्तमानपत्रे येतात. वर्षाला साधारण ३० ते ५० किलो रद्दी तयार होते. बाजारभावाप्रमाणे दारावर येणारा रद्दीवाला ९-१०-११ रुपये किलोने रद्दी विकत घेतो. पण त्याच्या काट्यावर १० किलो रद्दी ७ किलो भरते. आमच्या घरात डिजिटल काटा आहे व नेहमी आधी मी मोजुन घेऊन नंतरच रद्दीवाल्याला मोजायला देतो म्हणून माहिती. जेव्हा माझ्या काट्यावर मोजतो तेव्हा रद्दीवाला ७ रुपये किलोने पैसे देइन असे बोलतो. रद्दीवाल्याच्या काट्यावर ३० किलो रद्दी फक्त २२ किलो भरली होती.
असो, अजून अनेक समस्या रद्दीवाल्यासंबंधित आहेत. रद्दीशीही संबंधित आहेत.
भारतात कचरासंकलनामध्ये निव्वळ रद्दीपेपरची समस्या इतकी आहे की डम्पींग ग्राऊंडचा सुमारे ४०-५० टक्के कागदासंबंधित कचर्याने व्यापला आहे. वापरल्या जाणार्या १०० किलो कागदापैकी फक्त २० टक्के पुनर्वापरासाठी उपलब्ध होतो. विकसित देशांत हे प्रमाण सुमारे ५० ते ७० टक्के आहे. भारतातल्या पेपरमिल्सना वापरलेले कागद लागतात, त्यांच्या एकुण गरजेपैकी त्यांना परदेशातून सुमारे ५०-६० टक्के आयात करावे लागते. नवीन पेपर तयार करायला सुमारे ६० टक्के नवीन कच्चा माल (झाडे), व ४० टक्के जुने कागद लागतात.
जर प्रत्येक घरातुन वापरलेले कागद नीट गोळा करता आले तर. ही आयात कमी करता येईल-त्यात जाणारे विदेशी चलन वाचवता येईल, डम्पिंग ग्राउंडची वाया जाणारी जागा वाचवता येइल. करोडो लिटर पाणी, लाखो झाडे, वीज वाचवता येईल. फायदे अनेक आहेत.
भारतातले रद्दी पेपर गोळा करण्याची व्यवस्था अतिशय वाईट आहे हे आपण वर पाहिलेच. मुळात आपण सामान्य लोक ह्याकडे तसे लक्ष देत नाही, सरकार जागृती करुन थकून जाते, पेपरमिलवाले त्यांच्या उद्योगाच्या व्यापातच फसले आहेत. अशा समयी जर व्यावसायिकरित्या घरोघरचे, ऑफिसांतले वापरलेले कागद गोळा करुन पेपरमिलवाल्यांपर्यंत पोचवले तर हे सगळे शक्य होईल. वापरलेल्या कागदांपैकी सुमारे ८० टक्के कागद पुनर्प्रक्रिया करुन नवीन कागदनिर्मितीसाठी वापरता येतो.
असे प्रयत्न झाले आहेत, होत आहेत. अनेक पेपर मील जसे खन्ना, आयटीसी, रामकी ग्रूप सारख्यांनी रिवर्स इंटीग्रेशन सुरु केले आहे, पण म्हणावे तितके यश येत नाही. अनेक एन्जीओ ह्यात आहेत पण तुम्हाला माहितच आहे एन्जीओ कसे काम करतात ते. मुख्य प्रश्न आहे सामान्य नागरिकांच्या सहभागाचा. माझ्यामते सामान्य लोकांना रद्दीच्या बदल्यात पैसे मिळतात ते हवे असतात विनासायास. घरबसल्या कोणी पेपर घेउन जातो, पैसे देउन जातो, कसं सुटसुटीत. एन्जीओ दान करा म्हणतात, पेपरमिलवाले आमच्या कलेक्शन सेण्टरवर आणुन द्या म्हणतात. बरेच इशु आहेत.
प्रश्न असा आहे की जर घरीच येउन कोणी हे पेपर घेउन जाणार असेल व ह्या बदल्यात पैसे न देता इतर काही देणार असेल तर तुम्हाला ह्या वर्षाच्या ३०-५० किलो रद्दीच्या ३००-५०० रुपयांच्या ऐवजी काय घ्यायला आवडेल? तुम्हाला काही कल्पना सुचतात का की पैशांऐवजी काहीतरी पर्यावरणासाठी केल्याचं समाधान व त्याचं बक्षिस म्हणून एखादी गोष्ट, सेवा, सवलत मिळाली तर सामान्य जनता आकर्षित होऊन सहभागाचं प्रमाण वाढेल?
माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत. बघा कशा वाटतात, यातल्या व्यवहार्य नसतील तर सांगा, वेगळ्या काही असतील तरी सुचवा.
१. एका वर्षाच्या रद्दीचे पैसे नियोजित करुन तेवढ्याचे गिफ्ट कुपन, डिस्काऊंट कुपन, गिफ्ट वाउचर्स देणे.
२. बचतगटांकडून हाताने बनवल्या जाणार्या वस्तू, अंध, अपंग मुलांकडून, व्यक्तिंकडून बनवल्या जाणार्या वस्तु देणे
३. सोडेक्सो कुपनसारखे फुड कुपन्स देणे
४. ५०० रुपयात बसेल असा जास्तीत जास्त रकमेचा हेल्थ इन्शुरन्स, अॅक्सिडेंट इन्शुरन्स तत्सम देणे.
५. घरपट्टी, पाणीपट्टी, तत्सम करांतून १ टक्का सुट देणे.
स्वच्छ भारत अभियानास समस्त भारतीयांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपले अमुल्य मत जरुर नोंदवा.
धन्यवाद.
संदर्भः http://dipp.nic.in/english/Discuss_paper/DiscussionPaper_Recycling_WastePaper_21October2011.pdf
वाचन संख्या
10674
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
संकल्पना आवडली
कल्पना चांगली आहे
वेलकम बॅक
हम्म.
In reply to वेलकम बॅक by खटपट्या
आमच्याकडे
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to आमच्याकडे by चौकटराजा
चांगली वाईन
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ठीक आहे, जमवतो.
In reply to चांगली वाईन by सुनील
फायदे?
In reply to ठीक आहे, जमवतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे व्वा! छान. चांगली कल्पना
In reply to फायदे? by सुनील
सुला वाइन टुर चा पर्याय फारच प्रभावी आहे
In reply to अरे व्वा! छान. चांगली कल्पना by संदीप डांगे
च्छ्या
In reply to आमच्याकडे by चौकटराजा
आम्च्याकडे १० रु. किलो आहे
In reply to च्छ्या by नाखु
थर्मोकोल बंद करा प्रथम.
रद्दी मरो, त्या गुजरात
इ — पेपर वाचुन रद्दीच्या
सेम हेच म्हणणार होतो. जगातील
In reply to इ — पेपर वाचुन रद्दीच्या by कविता१९७८
नाही ओ!!
In reply to सेम हेच म्हणणार होतो. जगातील by उगा काहितरीच
डिजीटल अंत्योदय
In reply to नाही ओ!! by राजेंद्र मेहेंदळे
उत्तम कल्पना
'रद्दी' च्या मोबादल्यात मला
लेख आवडला. कल्पना देखील उत्तम
कल्पना नविन नाही.
पेपरच घेतला नाही तर महिन्याचे
बिग बझार हेच तर करते !
Paytm cash
@बजरबट्टू,
तंतोतंत
In reply to @बजरबट्टू, by संदीप डांगे
धंद्यातव्यवसायात संधी असेल तर (म्हणजे मागणी प्रचंड पण पुरव्ठा पुरेसाही नाही) तर त्या व्य्वसायीकानी अजून नव नवे पर्याय शोधायला हवेत लोकांपर्यंत पोहोचायला. अति अवाम्तर अजूनही (अगदी माझ्या सद्ध्याच्या) कंपनीतही जुने कागद (गोपनीयता कारणास्तव) जाळले जातात (गेल्या वर्षापुर्वी किमान ४०० फाईल जाळल्या (सन १९८०-९० पर्यंतच्या) ता.क. मी जाळल्या नाहीत तर मनुष्यबळ विकास (?) विभागाच्या देखरेखीत आणि अखत्यारीत जाळल्या गेल्या.नाखुकाका, फाईली जाळून
In reply to तंतोतंत by नाखु
हा उपाय
In reply to नाखुकाका, फाईली जाळून by संदीप डांगे
मी आता वृत्तपत्र घेणे बम्द
कल्पना नविन नसली तरी नक्कीच
चिंचवडला डॉ. वैद्य म्हणुन
धन्यवाद पिराताई,
In reply to चिंचवडला डॉ. वैद्य म्हणुन by पिलीयन रायडर
काही तरी केलं पाहिजे
In reply to धन्यवाद पिराताई, by संदीप डांगे
वा
In reply to चिंचवडला डॉ. वैद्य म्हणुन by पिलीयन रायडर
सदरहू
In reply to वा by आवडाबाई
काका, डिटेल्स मला मिळाले की
In reply to सदरहू by नाखु
पेपर मॅशेची खेळणी, शो पीस
छान विषय! बर्याच दिवसानंतर
पिरा
डॉ. वैद्य - ९४२०८६३९२०
रद्दी
संदीपभौ वेलकम बॅक!
महिन्यातून एकदा एक म्हातारी
नारळ.
वाचतोय.
वेळ!
भाजीपाला
नमस्कार डांगे साहेब,
प्लास्टिक वर लसूण!
चांगले प्रतिसाद दिले सर्वांनी
मी वस्तू घेताना खूप विचार
रद्दी विकून येणारा पैसा आजू
चांगला उपक्रम आहे. कोणत्या
मुंबई - ठाणे
In reply to चांगला उपक्रम आहे. कोणत्या by मार्मिक गोडसे
धन्यवाद!
आमची कंपनी