Skip to main content

तुम्ही आमची गळाभेट घ्या,आम्ही तुमचे गळे कापतो!

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 03/01/2016 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय पंतप्रधान नमो यांना दंडवत! आपण जेव्हा सत्तेत आलात तेव्हा आमच्या मुखावर एकच नारा होता. बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल! आपण अफगणिस्तानला भेट दिली तरी आम्ही आवडून घेतलं.कारण आम्हाला पठाणामध्ये काबुलीवाला अजूनही दिसतो. आपण तसेच पाकिस्तानात गेलात मात्र हे खटकले,कारण शेजारी जरी असला, तरी: आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥ होय तो कारण करावा विचार । काय भडीभार करुं देवा ॥२॥ तुका म्हणे काय करुं लापणिक । जनाचार सुख नाशवंत ॥३॥ याप्रमाणेच आम्ही विचार केला. आणि आपल्या भक्तांपैकी काहींचे मौलिक विचार ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली. आता काही अतिरेक्यांनी आमच्यावर हल्ला केला. आपले काही भक्त याचेही उत्तर देतील. नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत? बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या! आपलाच: deadp

वाचने 19571
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

ढकांब्याच्या पंचायतीला मिळणारा सव्वा रुपया मोठा की तिथे लपलेल्या भाड्याच्या जागेतील अतिरेकी पकडायचा ? अश्या अनेक भाड्याच्या जागांत अनेक आतंकवादी दबा धरून बसलेले असतील . कोण जाणे ? ढकांब्याच्या पंचायतीला सव्वा रुपया मिळण्यासाठी आपण तोच नियम कवटाळून बसायचा ?

In reply to by माहितगार

मुद्दे योग्य आहेत पण सगळे प्रत्यक्षात आणणे कठीण आहे. काही गोष्टींना अंतर्गत विरोधच एवढा होईल की मूळ उद्देशच बारगळेल. सध्या फक्त मोदींच्या चुका काढायची स्पर्धा चालू असते. त्यात हा संतुलित प्रतिसाद आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारे, विरोधी पक्ष, पोलिस दले, इतर संरक्षण दले व सामान्य नागरिक, न्यूज चानेल या सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून वागले तर बर्याच समस्या आणि गोंधळ कमी होतील. मोदींनी काय करावे हे पण सांगा कोणीतरी. म्हणजे पाकिस्तानशी चर्चा करावी का नाही, केली तरी पंप्रबरोबर करावी का सैन्यप्रमुखाबरोबर का ISI प्रमुखाबरोबर. जर या तिघांपैकी एकाबरोबर चर्चा केली त्याचा दुसर्याला राग येवून त्यांनी काही घातपाती कारवाई केली तर काय करायचं. समजा चर्चा करून किंवा न करून घातपाती कारवाया चालूच राहिल्या तर काय करायचं? तुम्ही भिंतीचं कुंपण घातलं तरी आतल्याच एखाद्यानी पळवाट काढून दिली तर काय करायचं? डिफेन्समध्ये कार्यरत व्यक्तींना सोशलनेटवर्कींग साइट्स, अभारतीय इमेल सेवा, अभारतीय संकेतस्थळे आणि अभारतीय व्यक्तींशी आंतरजालावरून संपर्कास बंदी घातली आणि अमलात पण आणली तरी एखाद्याने फेक अकौंट तयार करून संपर्क साधला तर काय करायचं? सीसी टिव्ही कॅमेर्‍यांची संख्या आणि गस्त वाढवली तरी गस्त घालणार्यांपैकीच एखादा फितूर झाला तर काय करायचं? काही गोष्टींवर बंदी घातल्यावर किंवा सक्ती केल्यावर व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होते आहे म्हणून गळे काढले गेले तर काय करायचं? यात "काय करायचं" हे बाकी सर्वांनी काय करायचं ह्यापेक्षा फक्त मोदींनी काय करायचं ते सांगावं ही विनंती.

In reply to by ट्रेड मार्क

योग्य प्रश्न अहेत रे ट्रेड मार्का. पण ह्याची उत्तरे संऱ़क्षण खात्यातले सचिव्,वरिष्ट अधिकारी,सैन्यातले माजी अधिकारी ह्यांनी द्यायची. मोदी त्यांचे मत विचारात घेत असतीलच.. तशी चर्चाही होत असेल. एखादी कंपनी तोट्यात जात असेल, कंपनीच्या सी.ई.ओ.वर टिका होणारच. मग सी.ई.ओ-"टिका काय करताय.. तुम्हीच सांगा मी कंपनी कशी चालवू.." हे विचारण्यासारखे आहे. असे ह्यांचे मत. असो. मोदी व सरकारवर उगाच टिका करण्यात अर्थ नाही. मनमोहन पंतप्रधान असताना असे हल्ले झाले की "नेभळट कमकुवत नेतृत्व' आहे म्हणून लोक म्हणायचे.त्यात सत्ताधारी आघाडीवर होते.

In reply to by माहितगार

>>इंग्रजी वृत्तपत्रातील बातम्यांवरुन काही त्रुटी जाणवल्या/ सुधारणेस वाव आहे असे वाटले त्या अशा. प्रेस्टिट्यूट मीडियाचं काय सांगू नका राव !!!

"पाकिस्तानको उसीकी भाषामें जवाब देना चाहिये, ये लवलेटर लिखना बंद करो" असे माननीय नमो साहेबांचेच विधान आहे. आता ह्यालाही ते चुनावी जुमला म्हणत असतील तर धन्य असो. योग्य बोललास रे संदीपा.मनमोहन असताना हा हल्ला झाला असता तर 'देशाचे नेत्रूत्व कमकुवत माणसाच्या हाती असल्याने हे सगळे होतेय' असे फेसबुकी अनुमान निघाले असते. 'मनात आणले तर आपण पाकिस्तानला तीन दिवसांत संपवू शकतो.. फकत हवी ती प्रखर देशभक्ती व खंबीर नेत्रूत्व' अशी वाक्ये तुमच्या त्या ट्वीटरवरच वाचली होती.असो. हा प्रश्न वाटतो तेवढा सरळ नाही हे एव्हाना कळले असेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अम्मीजान , कैसी है आप ? आप आती है तो दिल मोघल गार्डन बन जाता है !

नियमित कालावधीदरम्यान प्रसिद्ध होणार्‍या काही बारीकसारीक बातम्यांवरून गेले कित्येक महिने माझ्या मनात अशी एक आशंका निर्माण होते आहे की पंजाबमध्ये काहीतरी शिजतेय. पंजाब अस्वस्थ आणि अशांत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. केवळ पैसा हेच आमिष नसावे. इन्फिल्ट्रेशन आणि इन्डॉक्र्टिनेशनचाही भाग त्यात असावा.

@"ट्रेड मार्क" मोदींनी काय करावे हे पण सांगा कोणीतरी. म्हणजे पाकिस्तानशी चर्चा करावी का नाही, केली तरी पंप्रबरोबर करावी का सैन्यप्रमुखाबरोबर का ISI प्रमुखाबरोबर. जर या तिघांपैकी एकाबरोबर चर्चा केली त्याचा दुसर्याला राग येवून त्यांनी काही घातपाती कारवाई केली तर काय करायचं. पाकिस्तानी पन्तप्रधान / सैन्यप्रमुख / ISI प्रमुख यापैकि फक्त पन्तप्रधान बरोबर मोदि गळाभेट करुन आले ते पण सर्व international / political protocall तोडुन ?? मोदि अन शरिफ फार जुने / जिगरी मित्र आहेत का ? ??????? पाकीस्तानात कोण कोणाच्या तालावर नाचते ही एक रहस्य / गुप्त बातमी आहे काय ?? यानन्तर पठानकोट घट्ना एक नेहमीची घट्ना समजायची काय ?? ********************************************************************* ********************************************************************* ज्यांना मोदींचे धाडस वा त्यातून साधलेला डावपेच समजू शकत नाही, त्यांना पठाणकोट हल्ल्याचे रहस्य कधीच उलगडू शकत नाही. ज्याना मोदींचे धाडस व डावपेच समजले त्यानी तरी एक क्लु द्यावी धाडस व डावपेच बद्दल. धाडस व डावपेच नावाखाली काय होइल ?? सध्या वाघा सीमेवर BSF व PAKISTANI RANGERS चा कार्यक्रम होतो उद्या कच्छ आखातात भारतीय / पाकिस्तानी नौदलाचे fleet review होइल आणि हवाई दलाचे सराव होतील गप्प बघत बसायचे काय ?? जसे आत्ता गप्प बसावे असे वाट्ते. ********************************************************************** ********************************************************************** जाता जाता पाकीस्तानी पन्तप्रधान शरिफ नी श्रीलंका राजधानी कोलंबो येथुन भारतीय पन्तप्रधान मोदींबरोबर पठाणकोट हल्ल्याबद्दल चर्चा केली ??? काय डावपेच आहेत ते काय समजले नाहि. सत्य हे आहे कि शरिफनी पाकीस्तानातुन काय बोलावे हे शरिफ ठरवु शकत नाहि. यापुढे काय बोलावे गप्प बसलेले चांगले.

"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही या धाग्याला शोभून दिसेल अशी म्हण आहे. कुणाच्या हि प्रतिसादाला प्रतिसाद न देत मी मला जेवढे सांगणे शक्य आहे तेवढेच सांगेन. १) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा? सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे. २) पंजाब शांत असला तरीही त्यात खालीस्तानचे स्वप्न उराशी बाळगून असणारे लोक कमी नाहीत.अशा काही असंतुष्ट लोकांना हाताशी धरून घातपाती कृत्य करणे एखाद्या राष्ट्राला करणे सहज शक्य असते. ३) पाकिस्तान लष्कराला शांतता नकोच आहे कारण शांततेच्या काळात लष्कराचे महत्त्व कमी होत जाते. यासाठी दहशतवाद्यांना हाताशी धरून अशी कृत्ये घडवून आणली जाणारच हे आपल्या सरकारला माहित आहे. शिवाय भारत पाकिस्तान मध्ये व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल पण या गोष्टींच्या तस्करीला आळा बसेल. उदा पाकिस्तानात पान कोपर्या कोपर्यावर मिळते पण ते सर्व भारतातून तस्करी करून आणलेले असते. जर व्यापार सुरळीत झाला तर भारत आणि पाकिस्तान सरकारला कर मिळेल पण तस्कर आणि लष्कर यांचा हितसंबंध दुखावतो. असे अनेक उद्योग आहेत. यात लष्कराचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांना भारत पाकिस्तान व्यापारी संबंध सुरळीत होणे परवडणारे नाही. या न त्या प्रकारे ते त्यात खीळ घालण्याचा प्रयत्न करणारच ४) दहशत वाद्यांच्या या कारवाईची तयारी कमीत कमी ४-६ महिने चालू असल्याशिवाय त्यांना भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्ला करणे शक्य नव्हते. तेंव्हा हि कारवाई लगेच झाली हे म्हणणे सोपे आहे. ५) वायुसेनेच्या तळावर हल्ला होऊन एकही विमान किंवा महत्त्वाची उपकरणे दहशतवाद्यांना नष्ट करता आली नाहीत हि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या गोष्टी कुठे आहेत याची संपूर्ण माहिती त्यांना होती तरीही भारतीय गुप्तहेर खात्याने त्यांचा हा बेत नाकाम ठरवला. या उलट पाकिस्तान च्या नौदलाच्या तळावर हल्ला झाला तेंव्हा तेथे त्यांनी १८ सैनिक मारले आणि P ३ C ओरायन हि (३५० कोटी रुपयांना एक अशी) दोन विमाने नष्ट केली. ६) मोदी साहेबांनी संयुक्त अरब ऐमिरातीशी केलेल्या करारात दावूद इब्राहीम ची मालमत्ता गोठवण्याची सुरुवात झालेली आहे.दावूदची मालमत्ता लष्कराच्या आशीर्वादानेच उभी राहिली आहे आणि त्यात लष्कराच हातही आहे. त्यामुळे असे होणे हे त्यांना महाग पडू लागले आहे. http://www.oneindia.com/india/dawoods-bad-days-begin-as-uae-probes-his-… ७) मी एकदा असे म्हटले होते कि प्रत्येक माणसाला असे वाटते कि राजकारण आणि क्रिकेट यात आपल्याला सगळे समजते आणि त्यावर खास टिप्पणी करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर ने ब्याट कोणती वापरावी पासून पंतप्रधानांनी चीन पाकिस्तान बरोबर संबंध सुधारणे कसे चूक आहे यावर आपण सल्ला देऊ शकतो. असो

In reply to by सुबोध खरे

१) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा?
१) माझा हा प्रतिसाद आपण नीटपणे वाचला आहे का ? त्यात संपूर्ण सीमेवर सी सी टी व्ही लावावेत असे कुठे लिहिले आहे ? "ज्या सीमा भागात कुंपण नाही खास करुन आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रातील नद्यांची क्षेत्रे, तेथे थर्मल इमेजींग यंत्रणा" अशी चर्चा केलेली आहे. कारगीलच्या अनुभवानंतर ज्या ठिकाणी ज्या काळात मनुष्यबळ तैनात करता येत नाही तेवढ्या भारत-पाक सीमा भागा पुरता इलेक्ट्रॉनीक्सचा वापर वाढवला गेला आहे असे माझ्या वाचनात आले होते. (तुर्तास संदर्भ हाताशी नाही) सी सी टी व्हीच्या वाढीव प्रमाणा संदर्भातील चर्चा सीमा भागातील वसाहती आणि रस्ते क्षेत्रात साठी केली आहे. सीसी टिव्ही मानवी सुरक्षा गस्तीस पूर्ण पर्याय होऊ शकत नाहीत पण सहाय्यकारी ठरू शकतात. २) आपण काही ठिकाणी पाकीस्तानी लष्कर असा उल्लेख केला आहे पण बर्‍याच ठिकाणी नुसते लष्कर लिहिले आहे, चुकीचे अनर्थ करणारी मंडळी सर्वत्र असतात तेव्हा उर्वरीत ठिकाणी जेथे पाकीस्तानी लष्कराबद्दल उल्लेख आहेत ते तसे स्पष्ट केल्यास बरे किंवा कसे ? ३) पाकीतानी सिव्हीलीयन गव्हर्नमेंट आणि लष्कर आणि त्यांचे अतिरेकी एकत्रपणे कारवाया करत आहेत अथवा वेगळेपणाने इन एनी केस भारतीय सुरक्षाव्यवस्थेत पुरेसे गॅप्स शोधण्यात ते वेळोवेळी यशस्वी होताना दिसतात हा एक भाग, दुसरे पठाणकोट हल्ल्ला हा भारतीय सीमेत येऊन एका मोठ्या सैनिकीस्थळावर हल्ल्याचा प्रयत्न आहे, महत्वपूर्ण भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना पोहोचता येऊ लागणे हि गंभीर बाब आहे यास कितपत कमी लेखावयाचे ? अशा पद्धतीने भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना भविष्यात पोहोचता येऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घेतली जावयास हवी ?

In reply to by सुबोध खरे

"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही या धाग्याला शोभून दिसेल अशी म्हण आहे. कुणाच्या हि प्रतिसादाला प्रतिसाद न देत मी मला जेवढे सांगणे शक्य आहे तेवढेच सांगेन.
डॉक्टरसाहेब, नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट प्रतिसाद! या धाग्यावर सैन्यातील कोणीतरी प्रतिसाद द्यायचीच वाट पहात होतो.

In reply to by श्रीगुरुजी

ते सोन्याबापू आजकाल सैन्यात असतात. डाक्टर आर्मी मेडीकल कोरमधून रिटायर झालेत ;) आपल्या गोटातून प्रतिसाद यायची वाट पहात होतात का?

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळराव माझा वर्गमित्र प्रत्यक्ष पठाणकोट बेस वर जखमी झालेल्या सैनिकांच्या इलाजासाठी (क्रिटीकल केअर स्पेशालीस्ट) हजर होता. त्यातून उपलब्ध झालेली प्राथमिक माहिती हि अर्थात सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी नाही. निवृत्त मी लष्करातून झालो आहे. लष्करी विचारधारेतून नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळराव माफ़ करा पण आपला प्रतिसाद अतिशय विचित्र आहे, अर्थात तुम्हाला आर्मी कळली नाही साहेब, u can retire a soldier from an army but u cannot retire army from a soldier असं म्हणतात, बघा झेपले तर आम्ही सिविलियन नाही, की बुआ आज सुपरवायसर रिटायर झाला की उद्या पासुन त्याला पेंशन केस साठी चपला घासायला लावा, श्रीगुरुजी ह्यांना त्यांचे मत जिकडे आहे तिथे होकार द्यायचा हक्क आहे अन कदाचित ते तसेच रहावे म्हणून झटने ही माझी किंवा निवृत्ति आधी डॉक्टरांची ड्यूटी होती. :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

धन्यवाद सोन्याबापू! गोपाळरावांच्या प्रतिसादांना तसाही काहीच अर्थ नसतो. ते माझे नाव पाहिले की चवताळून उठतात आणि लगेच देहभान हरपून अत्यंत विचित्र प्रतिसाद देतात. त्यांचा वरील प्रतिसादही नेहमीप्रमाणेच विचित्र आहे.

In reply to by सुबोध खरे

सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे.>>>>>>>> आपला अजेन्डा समजला. दुखरी नसही कळाली. व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल>>>>>> आधी भारत पाकिस्तान व्यापाराचा भारतिय जागतिक व्यापरामध्ये ट्क्का बघा. आणी व्यापाराच्या निमित्ताने काही आगळीक झालीच तर?

In reply to by DEADPOOL

DEADPOOL साहेब मला केजरीवाल साहेबांचा उपमर्द करायचा कोणताही हेतू नव्हता.मला आआप बद्दल काहीच वाटत नाही. प्रेम हि नाही कि द्वेष हि नाही. मुळात सगळ्या दिल्लीत CCTV लावणे हि अव्यवहार्य योजना होती हे केजरीवाल साहेबाना माहित होते. पण अशा दिलखेचक घोषणा सामान्य माणसाना मते देण्यास उद्युक्त करतात हे समजण्याइतके ते धूर्त नक्कीच आहेत. माझा हेतू फक्त तुलना करणे हा होता. जर साधे दिल्ली सारख्या ठिकाणी जेथे २४ तास माणसे, वीज आणी इतर संसाधने आहेत तेथे हे अशक्य आहे तर इतक्या प्रचंड लांब असणार्या सीमेवर CCTV लावणे त्यावर नजर ठेवणे हे किती कठीण आहे हे समजून घावे यासाठी हि तुलना होती. राहिली गोष्ट व्यापाराची-- यात भारताला फायदा होण्यापेक्षा पाकिस्तानी लष्कर आणी बिनसरकारी प्याद्यांचा पैशाचा स्त्रोत आटवणे हा हेतू आहे. भारताला यात एक सहस्रांश टक्के इतका फायदा होईल हे न कळ्ण्य़ा इतके सरकारी लोक किंवा राजकारणी लोक ढ नाहीत.

मुद्दा क्रमांक २, ३, ४ शी विशेष सहमत.

इस्रायल सारखा देश आणि तेथील राजकारण्यांची जाज्वल्य देशभक्ती पाहिली तरीही तेथेही दहशतवादी हल्ल्यात लोक बळी पडतातच ना? स्वातंत्र्याची किंमत हि आयुष्यभर मोजत राहायला लागतेच.स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे सोपे नाही. अजून किती शहीद हवेत हा प्रश्नच गैरलागू आहे. बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!हि काय जादूची कांडी आहे का? तुम्ही एका अण्वस्त्र सज्ज अशा बेजबाबदार राष्ट्राची गोष्ट करत आहात कि एका टिनपाट गुन्हेगाराची? तुम्हाला काय सर्वंकष युद्ध हवे आहे का? ज्यात कोट्यावधी भारतीय बळी पडतील. पाकिस्तान समूळ नष्ट होईल पण हि किंमत परवडेल का? नारेबाजी करणे सोपे आहे. मी वर लिहिले आहे तसे दावूदची आर्थिक नाकेबंदी करणे, लष्कराच्या आर्थिक नाड्या आवळणे हे उपाय सुरु केलेले आहेतच. पाकिस्तानी जनतेला जेंव्हा हे कळून चुकेल कि त्यांना बंदुका नाही तर पुस्तकांची आणि नोकर्यांची गरज आहे( शिक्षण) तेंव्हा हे लष्कर आणि दहशतवादी यांना जनतेचा आधार मिळणे कमी होईल. गरिबी हि क्रांती आणि गुन्हेगारी यांची माता आहे. क्रांतीच्या नावाखाली निरक्षर आणि बेकार तरुणांची माथी भडकावणे जास्त सोपे असते आणि त्यातून धर्माच्या नावाखाली गुन्हेगारी हीच क्रांती आहे असे डोक्यात भरवून दिले कि दहशतवाद पसरवणे सोपे होते. त्यामुळे पाकिस्तानी जनतेची साक्षरता आणि तीवर लष्कराचा कमी होणारा ताबा हि तेथील गुन्हेगारी आणि दहशतवाद कमी होण्यासाठी मदत करेल. तेथील लष्कराला तस्करीतून मिळणारा पैसा जर तुम्हाला तेथील जनतेकडे वळवता आला तर जनतेला लष्करापेक्षा मुलकी सरकारचे महत्त्व समजून येईल. Journalist Lifschultz's famous article revealed that General Zia himself was doing heroin through Hamid Hasnain, chief executive of Habib Bank in Islamabad, who was found in possession of General Zia's personal documents like cheque books. The man was nabbed after his agent was arrested in Oslo in 1983. General Zia's wife Shafiqa tried to interfere in the court case against Hamid Hasnain but was effectively prevented by the government of Norway. Western sources named ten Noriegas in Pakistan. Air force chief Anwar Shamim, very close to General Zia, was refused as Zia's ambassador by Canada because his heroin connection. In 1986, two army officers were arrested in Karachi with 900 kilos of heroin on them worth $4 billion. Major Zahooruddin was taken from police custody to a military base from where he 'miraculously' escaped; Flight Lieutenant Rehman feigned illness and escaped equally 'miraculously' from the hospital. In all, 14 officers were arrested for heroin in 1989. In 1987, squadron leader Farooq Ahmad Khan was arrested in New York with two kilos of heroin on him and within a week squadron leader Qassim was arrested in Karachi. The officers used army-owned NLC trucks to smuggle heroin (in one case 10 metric tons) across Pakistan to outlets, including National Shipping Corporation, to be later white-washed by the BCCI which laundered $4 billion for its Pakistani patrons. Gadoon Area near Peshawar was used for poppy growing, supported by NWFP politicians. The PPP government, pushed by the US, pretended to move against Ayub Afridi of Landi Kotal and Mirza Iqbal Baig of Lahore. Baig was arrested in 1989 linking him to a Japanese courier caught in Amsterdam with 17.5 kilos of heroin in 1988. This was also a General Zia connection, But the Lahore High Court freed Baig 'for lack of evidence'. Ayub Afridi kept dodging arrest by moving around, in which he was 'helped' by the authorities. Ayub 'financed' a number of PPP leaders win election. Benazir however fired General Hameed Gul 'who was controversial for his alleged involvement in drug trade under the Zia regime', and arrested General Fazle Haq, fired Brigadier Imtiaz for alleged drug trade connections, which offended the GHQ top brass. The army put together the IJI against the PPP, comprising most of the pro-heroin elements who began bribing the PPP members. Benazir offered a PPP ticket to Malik Waris Khan Afridi of the Khyber Agency, making him state minister and member of her cabinet. Other heroin peddlers whom the PPP took in its fold were Amanullah Gichki, Muhammad Ali Rind (a former Zia connection) from Balochistan and Malik Moin Khan Afridi who was elected to the 1988 National Assembly. Later, Zardari was reported to have run a heroin smuggling network to enrich himself. बाकी बलुचिस्तान किंवा सिंध प्रांतातील फुटीरतावादाला भारतीय गुप्तहेर संस्था खत पाणी घालत आहेत हा पाकिस्तानचा आरोप आहेच.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, आपल्या प्रतिसादांचे कौतुक होते आहे हा कौतुक सोहळा चालू द्यात; माझ्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास 'अजून किती शहीद हवेत हा प्रश्नच गैरलागू आहे. बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!हि काय जादूची कांडी आहे का? ' या आपल्या दोन मुद्यात असहमत होण्यासारखे फारसे काही नसावे परंतु अद्याप इतर काही साशंकता बाकी आहेत. १) महत्वपूर्ण भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना पोहोचता येऊ लागणे हि गंभीर बाब आहे यास कितपत कमी लेखावयाचे ? अशा पद्धतीने भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना भविष्यात पोहोचता येऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घेतली जावयास हवी ? या प्रश्नांचे विश्लेषण अथवा उत्तराचा आपल्या प्रतिसादातील नेमका भाग कोणता ? २) आपल्या दोन्ही प्रतिसादात मिळून भारत-पाकीस्तानात व्यापार सुरळीत झाला तर सारे काही आलबेल होऊ लागेल असा सूर आहे. भारत सोडल्यास जगातल्या इतर सर्व देशांशी पाकीस्तानचा व्यापार गेली सर्व दशके सुरळीतच होता आणि आहे. पाकीस्तानी लष्करच तस्करीत सहभागी असेल (शक्यता नाकारत नाही) तर त्यांना पाकीस्तानची समुद्री सीमा उघडी आहे आणि तिथून ते तस्करी करतच असणार. अगदी अलिकडचा आमेरीकेत पाकीस्तानी वंशाच्या लोकांकडून झालेला दहशतवाद तपासला तर ती मंडळी साक्षर सुद्धा होती आणि पाकीस्तान आमेरीकेचा व्यापार बर्‍यापैकी सुरळीत असावा. पाकीस्तान निर्मितीच्या वेळी द्वीराष्ट्रवादाची मांडणी करणार्‍यातील बरीच मंडळी साक्षर वगैरे असावीत. ३) गरिबीचा शांततामय मार्गापासून भटकण्याशी संबंध असू शकतो यावरून असतोच आणि मग गरिबी संपली की सगळे आलबेल ? केवळ गरिबीमुळे लोक दहशत वादाच्या तत्त्वज्ञानास बळी पडतात गरीबी नसेलतर दहशतवादापासून दुर जातील हे विधानही साशंकता असलेले आहे. पाकीस्तानचे परकॅपिटा इनकम भारतापेक्षा कमी आहे किंवा गरिब आणि श्रीमंतीतील दरी भारतापेक्षा अल्पशी अधीक आहे पण हे फरक आपली थेअरी स्विकार्य ठरावी एवढेही मोठे नसावेत. त्या अर्थाने बांग्लादेशात पाकीस्तानापेक्षा अधिक गरिबी आहे आणि तेथून अधिक अतिरेकी यावयास हवेत पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे आपले हे तर्क रिव्हिजीट करण्याची गरज आहे किंवा कसे.

In reply to by माहितगार

माहितगार तो प्रतिसाद आपल्याला नव्हता. वेळ मिळाला कि आपल्याला सविस्तर प्रतिसाद देतो. कृपया वाट पहा धन्यवाद.

In reply to by माहितगार

माहितगार साहेब सर्वच्या सर्व लष्करी विमानतळाभोवती किमान १२ फुटाची संरक्षक भिंत असते आणि त्यावर काटेरी तारेचे कुंपण असते. प्रत्येक विमानतळाच्या आतमध्ये थोड्या थोड्या अंतरावर निरीक्षणासाठी मनोरे असतात आणि त्या मनोर्यावर सर्चलाईट पण असतात. त्या मनोर्यावर २४ x ७ सैनिकांचा खद पहारा असतो. दहशतवादी (मुख्य फाटकातून कि) कसे आत शिरले ते अजून उघड झालेले नाही. सीमेतील कोणत्या भागातून दहशतवाद्यांना आत घुसवता येईल याची पूर्ण पाहणी आणि तयारी पाकिस्तानी लष्कराच्या मदती शिवाय होणे शक्य नाही. मी लष्कर म्हणतो ते अधिकृत लष्करच आहे (लष्कर ए तय्यबा सारखे गैर अधिकारी लोक नव्हेत.त्यांना लष्कर मानणे हा लष्कराचा अपमान आहे.) या तयारीला आणि डावपेचाला काही महिने लागतात. त्यातून सुद्धा त्यांचे ९९ % बेत आपले लष्कर आणि सीमा सुरक्षा दल हाणून पडत असतात. पण हे असे पराभूत केलेले डावपेच काही लष्कर / सीमा सुरक्षा दल आपल्या "मार्केटिंग विभागाकडून" जाहिरात करीत नाहीत. ज्या उरलेल्या १% डावपेचात ते सफल होण्याची शक्यता असते त्याला आळा कसा घालायचा आणि त्याचा निपटा कसा करायचा याचे डावपेच सुद्धा लष्कर( सीमा सुरक्षा दल करत असतेच). काही लोकांच्या बोलण्यात "शांततेच्या काळात लष्कर स्वस्त मिळणारी दारू पिउन पार्टी करत असते" असे मी ऐकले आहे. अशा विचाराच्या लोकांकडे दुर्लक्ष करणेच सोयीस्कर आहे. महत्वाच्या लष्करी तळापर्यंत दहशतवादी पोहोचू नयेत हि काळजी सर्वच देश घेत असतात. तरीही ज्या दहशतवाद्यांना दुसर्या राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याचे सहाय्य मिळते त्याच्या जवळ उपकरणे पैसा आणी गुप्त महिती जास्त असणार आणी त्यामुळेच त्यांचे काम जास्त सोपे होते. याच साठी भारतीय लष्कर, गुप्तहेर खाते आणी सीमा सुरक्षा दलाचे काम जास्त कठीण आहे. वर बर्याच लोकांनी फारसा विचार न करता नुसते आरोप केलेले आहेत. लिहिण्यासारखे बरेच आहे पण लोकांना पाहिजे तसे प्रतिसाद न आल्यास फाटे फोडण्यात समाधान मानणार्या लोकांशी वितंडवाद घालण्यात काही हशील नाही. श्री गुरुजींनी एक दुवा दिला आहे तो हि वाचून घ्या.

In reply to by सुबोध खरे

मी लष्कर म्हणतो ते अधिकृत लष्करच आहे (लष्कर ए तय्यबा सारखे गैर अधिकारी लोक नव्हेत.त्यांना लष्कर मानणे हा लष्कराचा अपमान आहे.)
डॉक्टर साहेब 'पाकीस्तानी लष्कराचा' उल्लेख नुसते लष्कर या शब्दाने नव्हे तर 'पाकीस्तानी लष्कर' करावा अशी अपेक्षा ठेऊन आहे. बाकी कुठे राजकीय दृष्टीने बघावे आणि कुठे नाही याचे तारतम्य नसलेली मंडळी सर्वत्र असतात, तुमचे आणि श्री गुरुजींचे प्रतिसाद त्यांच्या कडे फोकस्ड असतील तर तो तुमच्या राजकीय दृष्टीकोनांचा भाग झाला. माझ्या सारखी मंडळी राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांकडे बिगर राजकीय दृष्टीने बघतात, आमची अपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत राजकीय पवित्रेबाजी पलिकडे जाऊन विश्लेषणे करून पुढे काय आणि कोणत्या सुधारणांच्या पायर्‍या घेतल्या जातात हे पाहण्याची असते. या धाग्यावरील प्रतिसादातून अद्यापतरी तशी चर्चा वाचण्याचे समाधान मिळालेले नाही.

१) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा? सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे. आंतरराष्ट्रीय सीमा हा सर्वस्वी केन्द्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. केन्द्र सरकारने छान काम केले तर कौतुक नक्किच होइल. त्याची तुलना " दिल्ली राज्य सरकार " बरोबर कशाला?. २९०० किमी सीमा संभाळणे हा साक्षात्कार ६० वर्षांने सत्तेत आल्यावर झाला का ? २) पंजाब शांत असला तरीही त्यात खालीस्तानचे स्वप्न उराशी बाळगून असणारे लोक कमी नाहीत.अशा काही असंतुष्ट लोकांना हाताशी धरून घातपाती कृत्य करणे एखाद्या राष्ट्राला करणे सहज शक्य असते. थोडयाफार फरकाने दहशदवाद पंजाब व काश्मीर येथे सुरु झाला. आज पंजाब मधील दहशदवाद औषधासाठी असेल (पुर्ण सम्पला बोलणे धाड्साचे होइल) . पण काश्मीर येथे थोडाफार आहे. पंजाब मधील दहशदवाद भरपुर कमी होण्यास कोण कारणीभुत कोण? सरकार का सुरक्षा यन्त्रना की पंजाब मधील लोक....... बोलण्याचा उद्देश असा कि एखाद्या राष्ट्राकडे बोट हव्या त्या पध्दतीने करुन आपली जबाबदारी टाळु शकत नाहि ६० वर्षा नन्तर सुध्दा तेच तेच विधान एकत बसायचे काय ? ३) पाकिस्तान लष्कराला शांतता नकोच आहे कारण शांततेच्या काळात लष्कराचे महत्त्व कमी होत जाते. यासाठी दहशतवाद्यांना हाताशी धरून अशी कृत्ये घडवून आणली जाणारच हे आपल्या सरकारला माहित आहे. शिवाय भारत पाकिस्तान मध्ये व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल पण या गोष्टींच्या तस्करीला आळा बसेल. उदा पाकिस्तानात पान कोपर्या कोपर्यावर मिळते पण ते सर्व भारतातून तस्करी करून आणलेले असते. जर व्यापार सुरळीत झाला तर भारत आणि पाकिस्तान सरकारला कर मिळेल पण तस्कर आणि लष्कर यांचा हितसंबंध दुखावतो. असे अनेक उद्योग आहेत. यात लष्कराचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांना भारत पाकिस्तान व्यापारी संबंध सुरळीत होणे परवडणारे नाही. या न त्या प्रकारे ते त्यात खीळ घालण्याचा प्रयत्न करणारच. जर पाकिस्तानात पान भारतातून तस्करी करून जात असेल तर मी असे म्हणेन कि भारतात पान तस्करी माध्यमातुन काळा पैसा तयार होत आहे. सरकारने सध्या तयार होणारा हा "काळा पैसा" रोखावा. ते पान पाकिस्तान लष्करातील लोक / अतिरेकी खातात आणि भारतात येवुन थुन्कतात. ४) दहशत वाद्यांच्या या कारवाईची तयारी कमीत कमी ४-६ महिने चालू असल्याशिवाय त्यांना भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्ला करणे शक्य नव्हते. तेंव्हा हि कारवाई लगेच झाली हे म्हणणे सोपे आहे. दहशत वाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्लाचा सराव काहि पाकीस्तानी विमानतळावर केला अशी बातमी आली. आता यावर काय बोलायचे . ५) वायुसेनेच्या तळावर हल्ला होऊन एकही विमान किंवा महत्त्वाची उपकरणे दहशतवाद्यांना नष्ट करता आली नाहीत हि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या गोष्टी कुठे आहेत याची संपूर्ण माहिती त्यांना होती तरीही भारतीय गुप्तहेर खात्याने त्यांचा हा बेत नाकाम ठरवला. या उलट पाकिस्तान च्या नौदलाच्या तळावर हल्ला झाला तेंव्हा तेथे त्यांनी १८ सैनिक मारले आणि P ३ C ओरायन हि (३५० कोटी रुपयांना एक अशी) दोन विमाने नष्ट केली. भारतीय गुप्तहेर खाते व सशस्त्र सेनेने हा बेत हाणुन पाडला. पठाणकोट एअरबेस वर अतिरेकि एका पोलिस आयुक्तच्या गाडितुन धोका देवुन गेले. अन्यथा हि कारवाइ एअरबेस गेटवरच झालि असती. व्ही आय पी लोकाना अडवायचे कसे या मानसिकतेचा फायदा अतिरेक्यानी घेतला हे फार लाजिरवाणे. ६) मोदी साहेबांनी संयुक्त अरब ऐमिरातीशी केलेल्या करारात दावूद इब्राहीम ची मालमत्ता गोठवण्याची सुरुवात झालेली आहे.दावूदची मालमत्ता लष्कराच्या आशीर्वादानेच उभी राहिली आहे आणि त्यात लष्कराच हातही आहे. त्यामुळे असे होणे हे त्यांना महाग पडू लागले आहे. http://www.oneindia.com/india/dawoods-bad-days-begin-as-uae-probes-his-p... हि काय मोठी बातमी आहे. ?????? काँग्रेसचे लोक दावुदला काहि करु शकत नाहित असा एक समज आहे ..दावुद ला युती / वाजपेयी काळात दणका दिला असता तर बरे झाले असते, आज केंद्रात भा ज प सरकार असुन पुर्वी दावुद ची भारतातील मालमत्ता खरेदी केलेल लोक न्यायालयात चकरा मारत आहेत मालमत्तेचा ताबा मिळावा म्हणुन. ७) मी एकदा असे म्हटले होते कि प्रत्येक माणसाला असे वाटते कि राजकारण आणि क्रिकेट यात आपल्याला सगळे समजते आणि त्यावर खास टिप्पणी करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर ने ब्याट कोणती वापरावी पासून पंतप्रधानांनी चीन पाकिस्तान बरोबर संबंध सुधारणे कसे चूक आहे यावर आपण सल्ला देऊ शकतो. सल्ला देण्याची बिलकुल इच्छा नहि. जेव्हा चीनी पन्त्प्रधान थेट अहमदाबाद येथे दौरयावर आले तेव्हाच चीनी सैन्याने लडाख प्रदेशात अतिक्रमण केले होते, तेव्हा अतिक्रमण सोडुन बाकी गोष्टीनचा उदो उदो केला गेला. कशाला सल्ला देवु ???????? ज्या लाहोरच्या वेशीवर भारतीय सैन्याने ६५ व ७१ च्या युध्दात धडक मारली होती त्या लाहोरला international / political protocall तोडुन स्वतंत्र भारतात जन्मलेले भारतीय पन्त्प्रधान विमानाने गुपचुप जाउन आले. ६० वर्षात असे घडले नव्हते.

In reply to by लिओ

बोलण्याचा उद्देश असा कि एखाद्या राष्ट्राकडे बोट हव्या त्या पध्दतीने करुन आपली जबाबदारी टाळु शकत नाहि ६० वर्षा नन्तर सुध्दा तेच तेच विधान एकत बसायचे काय ? ६० वर्षात असे घडले नव्हते. मग लष्कराने, मोदी साहेबांनी आणी सीमा सुरक्षा दलाने काय काय करायला हवे आहे हे तरी सांगा?

यापुढे "डिप्लोमसि" शी संबंधित सगळे निर्णय फक्त तुमचेच असतील असा कायदाच करून टाकू आपण. हाकानाका.

In reply to by श्रीगुरुजी

२६/११/२००८ च्या मुंबई हल्ल्याशी या हल्ल्याची तुलना केली तर......... मुंबई हल्ला तीन चार ठिकाणी एकाच वेळी झाला होता. हा हल्ला एकाच ठिकाणी होता. मुंबई हल्ला अचानक झाला होता. या हल्ल्यावेळी विमाने हल्ल्याच्या सहा तास आधी हलवली म्हणतात. तेव्हा हल्ल्याची पूर्वकल्पना होती. मुंबई हल्ला नागरी ठिकाणांवर झाला. त्या ठिकाणी सुरक्षा अत्यंत कडक असणे अपेक्षित नसते. हा हल्ला सीमेजवळच्या लष्करी तळावर झाला जेथे नेहमीच सतर्कता आणि तयारी अपेक्षित असते. मुंबई हल्ल्यावेळी हल्ल्याच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक उपस्थित होते. प्रतिकारावेळी त्यांना कमीतकमी धोका होईल हे पाहणे महत्त्वाचे होते. या हल्ल्याच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती. वरची तुलना* पाहता अतिरेक्यांना काबूत आणण्यास मुंबई हल्ल्याइतकाच किंवा अधिक वेळ लागला. हे लष्कर/कमांडो यांच्यासाठी काळजीचे कारण असावे. त्याचे आत्मपरीक्षण ते करतील अशी आशा आहे. *आणखी एक फरकाचा मुद्दा मनात आला होता पण आता तो व्हॅलिड राहिलाय का अशी शंका आली म्हणून तो लिहिला नाही.

@ नितिन थत्ते स्विफ्ट अ‍ॅक्शन सेव्ह्ड द डे अनुशंगाने तुम्हि जे लिहिले त्या संदर्भात एक मत लिहावे असे वाट्ते हल्ल्याची पूर्वकल्पना होती. हल्ल्याची पूर्वकल्पना होती तर प्रतिहल्ल्याची तयारी पण झालीच असणार. पण अशी टिप मिळाली होती का अतिरेकी सरकारी / पोलिस अधिक्षकाच्या गाडीतुन घात करुन येतील म्हणुन. मुंबई हल्ल्यानन्तर व्ही व्ही व्ही आय पी शाणे झालेत असे वाट्ते काय ?? आज पण व्ही व्ही व्ही आय ना सिक्युरीटि चेक ला कसे अड्वायचे हा सुरक्षा यंत्रणाना प्रशन पड्तोच. लष्कर/कमांडो यांची काय झाल्यावर काय करायचे याची SOP ठरलेली असते. कृपा करून भारतीय सशस्त्र सेनेवर शंका करु नका. आज आपण जी लोकशाही "न कळणारया" आनन्दात जगतो कारण भारतीय सशस्त्र सेनेला माहीत आहे की बराकीत कधी जायचे आणि बराकीबाहेर कधी यायचे ते पण एकदा या देशाने आणिबाणी अनुभलेली असताना.

In reply to by लिओ

सलविंदर सिंग नावाच्या एसपीचे अपहरण करून त्याच्याच गाडीतून अतिरेकी लष्करी तळावर पोहोचले. दरम्यान त्याच्याबद्दल संशय न आल्याने त्याला अतिरेक्यांनी न मारता सोडून दिले असे त्याचे सांगणे होते. हाच सलविंदर सिंग आता संशयाच्या भोवर्‍यात आहे. एनआयए ला त्याच्या जबानीत विसंगती आढळली आहे. अतिरेक्यांनी त्याची गाडी वापरणे व त्याला न ओळखता न मारता सोडून देणे हे एनआयए ला संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे आता त्याची चौकशी सुरू असून कदाचित त्याची सत्यशोधक चाचणी होण्याची देखील शक्यता आहे. पठाणकोट तळाच्या सुरक्षा भिंतीवरील ३ फ्लड लाईट्स दिशा बदलून ठेवलेले आढळले आहेत. त्यासंबंधात एका तांत्रिक कर्मचार्‍याची चौकशी सुरू आहे. एकंदरीत तळावरील कोणीतरी फितूर झाल्याने अतिरेक्यांना तळात प्रवेश करता आला या अंदाजावर चौकशी सुरू आहे. खरे खोटे खुदा जाने!

गंमत अशी आहे, की नक्की काय झालंय याची माहिती न घेताच लोक लिहीत असतात. हल्ला होणार आहे (आणि तो तळाबाहेरून होणार आहे) असं इंटेलिजन्स इन्पूट होतं. हे इंटेलिजन्स इनपूट दिल्ली ला कळायला वेळ लागला कारण स्थानिक पोलिसांनी वेळ घेतला. पण त्या आधीच अतिरेकी तळात घुसले होते याची कल्पना सुद्धा संबंधीत लोकांना आली नाही. हल्ला बाहेरून होण्याऐवजी आतूनच आत झाला (http://indianexpress.com/article/india/india-news-india/pathankot-attac…). बाहेर केलेली सर्व तयारी त्यामुळे वाया गेली. शिवाय नक्की हल्ला कुठे होणार आहे ते कुणालाच माहिती नव्हतं कारण पठाणकोट ला बाकीची पण इन्स्टॉलेशन्स आहेत (तसंच मिसाईलचा तळ सुद्धा आहे). तरीसुद्धा गरुडांनी आणि एन एस जी नं अतिरेक्यांना २५०मी बाय २५०मी एरियात कोंडलं होतं. मारले गेलेले बहुतांश दुर्दैवाने मारले गेलेले आहेत. अतिरेक्यांच्या हुशारीमुळे नव्हे. भाग १: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathank… भाग २: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathank… भाग ३: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathank…

कितीही मागे गेलो तरी पाकिस्तान सोबत जेव्हा केव्हा भारतीय (सरकारी स्तर) चर्चा करतात तेव्हा लागोलग अतिरेकी हल्ले होत राहिले व सामान्य नागरिकांचे प्राण जात राहिले. याला विपक्ष नेहमीच गाफिलपणा म्हणत आला. आजच्या समयी मोदी सरकार अतिउत्साही म्हणून पुन्हा गाफिल राहीले व पुनःश्च पाक अतिरेकी मनात आणल्यावर कुठेही नागरी भागात हल्ला लीलया करु शकतात हे दिसले, किंबहुना लष्करी तळावर हल्ला होणे तोदेखील सीमे पलीकडुन हे अधोरेखांकित करते की आपले रक्षणकर्ते आजही झोपा काढतायत व सरकारला कधीच सोयरंसुतक नव्हते. याखेपेला तर मी परखडपणे असे म्हणेन की " आ बैल मुझे मार".

यात सगळ्यात संशयास्पद हे बीएसेफ आणि पंजाब पोलिस आहेत. तो पंजाब पोलिस एस्पी हा सपोजेडली बॉर्डरवर ड्रग डील फायनलाइज करायला गेला होता. ड्रग डीलर्स अतिरेकी निघाले अशीही थिअरी आहे. बीएसेफ्च्या हवालदाराला अटक देखील झाली आहे. http://indiatoday.intoday.in/story/pathankot-terror-attack-bsf-mans-arr…