गेल्या ३-४ दिवसांपासून मिपा वर जोरदार चर्चा सुरू आहे .
डॉ. दाढेंच्या लेखाने विक्रमी 196 प्रतिसाद (या घडीला) गपापप खेचुन एक विक्रम आधिच प्रस्थापित केला आहे. त्याबाद्दल सर्व प्रतिसाद्यांचे, पुण्याचे आणि पुणेकरांचे मी अभिनंदन करतो.
चर्चा जोरदार झाली कारण पुणेकर आणि पुण्याबद्दल असलेला त्यांचा अभिमान.
कुठलाही देश,राष्ट्र, किंवा जागा परफेक्ट नाही. पुणं ही नसेल. ही गोष्ट सगळ्यांना मान्य.
पण पुणे आपल्या ठराविक वैशिष्ट्यांमुळे आज जगात नाव राखुन आहे. पुण्याला सांस्कृतीक राजधानी ही सर्वमान्य जनतेने दिलेली पदवी.
पण याचा बाकींना का विरोध कळलंच नाही. पुणे हे विद्येचे माहेरघर. सगळ्या जगात पुणे युनिव्हर्सिटीचे नाव आहे. तसेच शैक्षणिक गुणवत्ता इथल्या शिक्षणसंस्था टिकवून आहेत. पण खडे फोडणारांना हेही मान्य नाही... विरोध कळलाच नाही .
पुणे म्हणजे खादाडांसाठी स्वर्ग. बेडेकर,लक्ष्मिनारायण्,चितळे,दुर्वांकुर्,वैशाली, चैतन्य, गंधर्व .... (भरपुर काही ) यांनी आपला ब्रांड तयार केला आहे. पण बाकींचा विरोध कळलाच नाही. पी.एम.टी. रिक्षा इ. फसवणारे लोक पुण्यात (फक्त पुण्यात आहेत का ? मग पुणे वगळता सगळी कडे काय संत तुकारामानी जन्म घेतला का ? ) असे म्हणत , पुणेकर खडूस आणि बाकिच्यांना उगाच हिन लेखतो, इ,इ बेसलेस विधाने करून पुणेकरांना पुन्हा प्रुव्ह करण्यास भाग पाडलं ...
समस्त पुणेकर : यशोधरा, आन्या बैल, अभिज्ञ, पक्या, वेलदोडा, टारझन, टिंगोबा,भाग्यश्री,मनिषा,चिन्या,पेशवे,रेवती,चित्रे,भडकमकर मास्तर आणि नजरचुकीने कोण राहीले असतिल तर ते
अ-पुणेकर : तात्या,बोका, माणुस, अनामिक,बैल्,लंबुटांग,ऍडीजोशी,विजुभाउ इइ
आणि नुसतीच चर्चा करुन प्रतिसादांच्या रेकॉर्ड ला हातभार लावणारे गटणे,ओगले आणि इतर माझे मराठी बांधव ... यांचे हार्दिक अभिनंदन
:) यमीचे विशेष आभार :)
असो ... सगळंच सगळे हलके घ्या आणि आपण मराठी एक आहोत हे लक्षात असू द्या.(किंवा असेलच)
हे इंटर्नल वाद होते, कोणी बाहेरचा आला की आपण सगळे पुणे-मुंबई-नागपुर न करता त्यांचा समाचार घ्यायला पुन्हा एकत्र येवुच.
आपला पुणेकरांवर,पुण्यावर, आणि मराठी आणि मराठी माणसावर सारखाच लोभ असणारा
टारझन
टा-या