Skip to main content

आपण यांना का खाल्लंत ?

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 09/01/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच. लहान असताना, आमच्या शेजारी एक ख्रिश्चन सदगृहस्थ रहात असत. एका ख्रिसमसला त्यांनी आमच्या घरी एक केक आणून दिला. पुस्तकाच्या आकाराचा तो केक, इतका छान सजवला होता की तो, एखाद्या डिक्शनरी एवढा जाड, केक पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. लवकरांत लवकर तो केक खायला मिळावा म्हणून मी आईमागे सारखी भुणभूण लावली होती. शेवटी संध्याकाळी घरातले सगळे सदस्य हजर झाल्यावर आईने तो केक कापला आणि त्याचा एक भला मोठ्ठा तुकडा माझ्यासमोर ठेवला. पण पहिला घांस खाताच मी तोंड वेडेवाकडे केले. त्यांत संत्र्याची सालं घातल्यामुळे ती कडवट लागत होती. ती चव मला अजिबातच आवडली नाही. माझी झालेली फजिती पाहून माझ्या बहिणींना हंसु आवरत नव्हते. त्यानंतरही अनेक प्रसंगी, 'दिसते तसे नसते' या म्हणीचा मी अनुभव घेतला आहे. एकदा, मुंबई आयआयटी मधे एका नातेवाईकांचा मुलगा रहात होता. मलाही लायब्ररीचे काम असल्याने तिथे जायचे होते. तर दुपारी वेळ ठरवून, मी त्याच्या होस्टेलवर जेवायला गेलो. बेत पावभाजीचा होता. पण बघून तरी ती पावभाजी वाटत नव्हती. त्याची चव घेतली मात्र! अरेरे! त्याला कसलीच चव नव्हती. नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती ती! नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की संस्था जरी नामांकित असली तरी व्यवस्थापन अगदीच ढिसाळ होते आणि मुलांचे खाण्यापिण्याचे हाल अनेक वर्ष चालूच होते. कदाचित अजूनही तशीच परिस्थिती असेल! पुढे व्यवसायानिमित्त, अनेकदा पंचतारांकित हॉटेलांमधे जेवण्याची वेळ आली. पण तोपर्यंत मी अनुभवाने शहाणा झाला होतो. त्यामुळे बाह्यरुपावर न जाता आधी सर्व पदार्थांची चव घेतल्याशिवाय मी डिश भरतच नसे. कित्येक पदार्थ असे असतात की ते खाल्यावर पोट तर भरते पण चव नसल्यामुळे खाण्याचे समाधान त्यांत मिळत नाही. शिरा, उपमा, पोहे ह्याची रेसिपी जरी माहित असली तरी प्रत्येकाच्या हाताची चव वेगळीच. बाहेर कुठेही असे 'चवलेस' पदार्थ खाल्ले तर 'आपण यांना का खाल्लंत ?' असं म्हणू तरी शकतो. घरी मात्र, गंभीर प्रसंग टाळण्यासाठी, तो पदार्थ पुन्हा वाढून न घेणे, एवढेच आपल्या हाती असते.imoti

वाचने 23362
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

फ्लेक्स वरची मिसळ असायला जेपी काय पुणे (३०) मधले आहेत का? आता म्हणले म्हणजे देणार ते =))...तुला पण देतील पटवुन देण्यासाठी. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ठाण्यातील मामलेदारची मिसळ देण्यात येईल *blum3* अर्थात आमचा मिरचीच खळ संपवुन येतो. *wink* =))

पुण्यात मार्केटयार्ड रस्त्यावरील "वाडेश्वर" अत्यंत बोगस हॉटेल आहे. तिथे ईडली सोडून उरलेले सर्व पदार्थ अत्यंत बेचव आहेत. २-३ वेळा वेगवेगळ्या वेळी जाऊन वेगवेगळे १०-१२ पदार्थ ट्राय केले होते. प्रत्येकवेळी तोच वाईट अनुभव आला.