Skip to main content

मराठी संकेतस्थळ दैन्या वस्था

लेखक एकुलता एक डॉन यांनी रविवार, 06/04/2014 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार अनॆकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील पण जे २००६ पासून मराठी संकेत स्थळे बघात आलेली लोक आहेत त्यांनाच नक्की पटेल १) मराठी ब्लोगरस कमी झाले २) मराठी ब्लोगरास मिट शेवटची २०११ झाली नंतर बंद ३) बरेच मराठी संकेत स्थळॆ बंद झालीत www.laibhaari.com सर्वात धक्का दायक

वाचने 58910
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

भारतीय माणूस खूप संकुचित आहे . कोणत्या हि भारतीय भाषेतील स्थळा वर असणारे सर्व सभासद स्वतः ल वेगळे समजतात . कोणत्या हि विषयाकडे तथस्त पने ते बघत नाहीत तर चष्म्यातून बघतात चष्मा धर्माचा असतो ,जातीचा असतो,शहरी पणाच असतो ,शिक्षणाचा असतो , भाषेचा असतो . त्या मुळे चर्चा होवून त्यात मत मांडणाऱ्या सर्व लोकांनाच मान राखला जात नाही . तेच युरोपियन भाषेत आणि यरोपियन लोकात खूप मस्त चर्चा होते . भारतीय लोकांनी ब्रॉड minded झाले पाहिजे . फक्त कपडे वापरून आणि पिझ्झा खावून शहाणपण येत नाही

लोकांमधे मुक्त संवाद असावा, थोडी गंम्मत, थोडे विवाद.... आणि अजून बरेच काही इथं असावे असे वाटते. नवं लेखकांनी जुने लिखाण वाचावे त्यामुळे मिपावर आपल्या आधीपासून लोकं का नांदत आहेत हे समजायला मदत होईलच पण सोबतीला संस्थळ(सभासद न्हवे) तुमच्याकडून काय अपेक्षेने पहात आहे हे समजायला सुद्धा मदत होईल. सर्व्हयवल ऑफ फिटेस्ट हा निसर्ग नियम आहे, त्यानुसार नवीन सभासदांकडून अजून चांगल्या लिखाणाची अपेक्षा असणे व अपेक्षाभंगाने नियमीत सदस्यांचा हिरमोड होणे नक्कीच गैरवाजवी नाही. म्हणून अशा सभासदांनी जुन्या लोकांकडून होणाऱ्या टीकेला अथवा दर्जा खालावतो आहे वगैरे भडिमाराला अतिशय सकारात्मकच घेणे आवश्यक आहे.... पण सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट हा थोडा भ्रामक नियम आहे व निसर्ग सांगतो की जे बलवान असतात ते टिकतात असे न्हवे, तर जे बदलाशी जुळवून घेतात तेच टिकतात म्हणून जुन्या सदस्यांनी सुद्धा मिपाशी जुळण्याचा यत्न करणाऱ्या नव्या टग्यानां थोडे सांभाळून समज देणे अपेक्षित आहे. अर्थात ते सुद्धा मिसळीचा तडका राखूनच :) कारण हे मिपा आहे.

मनोगतवर अलीकडील लेखन हे दोन आठवडे एक दिवसापूर्वी इतके जुने आहे.( हे सर्वात नवीन लेखन होते) त्याखालोखाल दोन आठवडे चार दिवस आणि तिसर्‍या क्रमांकाचे नवे लेखन एक महिना तीन आठवड्यांपूर्वी चे आहे. तेथे कोण लिहीते हे माहीत नाही

३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही, रस्त्यावर मिळणारे काही English पुस्तक सोडले तर. दिल्लीच्या पुस्तक मेळाव्यात मराठी पुस्तके दिसत नाही. साहित्य विकत घेणारे फारच कमी असतात. प्रेमचंद कालिदास ही नावे ही पुस्तक मेळाव्यात आलेल्या लोकांना माहीत नव्हती.

In reply to by विवेकपटाईत

३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही,
अगदी सहमत. ही पिढी व्हिडिओज आणि रील्स वाली आहे, इन्स्टा वाली आहे.

In reply to by विवेकपटाईत

३० वर्षांखालीलच काय, वरिष्ठ पिढीचे लोकही वाचत नाहीसे झालेले असण्याची खूप शक्यता आहे. मी स्वतःचेच उदाहरण देतो. सध्या माझे वय ७१ आहे. अगदी लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. पुढे तारुण्यात अगदी बस-ट्रेन प्रवासातच काय, सायकल चालवताना सुद्धा एका हातात पुस्तक धरून वाचायचो. ऑफिसात बराच वेळ मोकळा असायचा, तो सगळा वाचन-लेखन यात घालवायचो. पुढे पन्नाशी-साठीत रोज रात्री अडीच-तीनला जाग यायची, तेंव्हा तास-दोन तास वाचन करायचो. दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा तर असायचेच. पुढे यूट्यूब, मिपा वगैरे सुरु झाल्यवर प्रत्यक्ष पुस्तके वाचणे कमी होऊ लागले ( मी पूर्ण जन्मात वर्तमानपत्र अगदी क्वचितच वाचले असेल, फार तर एक-दोन वर्षे ) लॅपटॉप, मोबाईल वापरामुळे डोळे बिघडू लागले, वाचायला त्रास होऊ लागला, आणि खरेतर लॅपटॉप, मोबाईलचा उपयोग कमी करायला हवा हे माहित असूनही पुस्तके वाचणेच जवळजवळ बंद झालेले आहे. आता बोला. मनोंचे पानिपतवरील पुस्तक वाचायचेच, असे ठरवले आहे. इतर काही अलिकडे वाचलेले नाही.

३० वर्षाखालील पिढी जरा जास्तच फोकस्ड आहे. त्यांना त्यांच्या विषयातील बहुतेक माहिती असते. यू ट्यूब आणि विकी मुळे बराच फरक पडला आहे. बाकी ललीत लेखन वाचन मात्र फारच कमी झाले आहे हे नक्की

मी सहमत आहे, स्पेशालिस्ट पिढी आहे ही. अगदी मिलेनियल पिढी पर्यंत तीच जनरलिस्ट असे. हा सूक्ष्म फरक आता मोठा झालाय इतके नोंदवून खाली बसतो.