मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अहमदाबाद स्फोट

नितमित · · काथ्याकूट
कोणी पुण्याशी रिलेटेड आहे का?

वाचने 7813 वाचनखूण प्रतिक्रिया 23

नितमित 26/07/2008 - 19:57
अहमदाबादमध्ये स्फोट झाल्याबद्द्ल काही माहीती आहे का?

नीलकांत 26/07/2008 - 20:04
राजेंनी आताच खरडवहीत हा दूवा दिलाय. http://www.rediff.com/news/2008/jul/26ahd.htm

ब्रिटिश टिंग्या 26/07/2008 - 20:18
९ वा ब्लास्ट झाल्याची बातमी आहे....खरी आहे काय ?

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) 26/07/2008 - 20:35
ताजा बातमी ! http://www.josh18.com/showstory.php?id=260151 १२ विस्फोट !!! बेंगलुरु प्रमाणेच बॉम्ब हल्क्या जातीचे ! ४ मृत्यु मुखी ! ३० जखमी ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

विकेड बनी 26/07/2008 - 21:13
वाचकहो, अ) दोन शहरांत हलके बॉम्बस्फोट होतात. कारण, दहशत पसरवणे. लोकांना ठार करणे नसावे. ब) मोदींच्या बालेकिल्ल्यात शिरून वार. क) केंद्रात सरकार डळमळीत ड) भाजपाला सत्ताग्रहणाचे वेध परस्पर संबंध सांगा बरें!

In reply to by विकेड बनी

सखाराम_गटणे™ 26/07/2008 - 21:45
आता मोदी बघा, ऐकेकाला कसे पकडुन मारतात ते. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

मेघना भुस्कुटे 26/07/2008 - 21:19
आता १६ स्फोट. १५ ठार. अहमदाबादेतल्या मिपाकरांनी प्लीज खुशाली कळवा.

सँडी 31/07/2008 - 10:30
अह मदाबाद ची बातमी ऐकुन मन सुन्न झालय... .रात्रिचा १ वाजलय्..नाहि झोप येनार आज... का? का ही लोक दुसर्‍यांच्या जीवावर उठली आहेत? हे कुठेतरी थांबायला हवं! पण कसं??????????????????????????

धोंडोपंत 26/07/2008 - 22:27
स्फोट कुणी घडवलेत, कशासाठी घडवलेत याची शहानिशा सरकारी यंत्रणा करेलच. पण दोन्ही स्फोट भाजपाचे सरकार असलेल्या राज्यात झाले असल्यामुळे भाजपावरील खुन्नसमधून झाले आहेत हे नक्की. आम्ही या घातपाती कृत्याचा निषेध करतो आणि यामागच्या शक्ती श्री. नरेंद्रजी लवकरच शोधून काढतील अशी आशा बाळगतो. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

संजय अभ्यंकर 26/07/2008 - 22:59
पाश्चात्य देशात लोकसंख्या कमी व शहरीभागात निर्मनुष्य भाग ज्यास्त. तसेच बस व ट्रेन मधेही बहुदा तुरळक प्रवासी असतात. त्यामुळे बाँब ठेवणे सोपे असते. असे असुन सुद्धा असले घातपाती प्रकार तुरळकच होतात. भारतासारखे घाऊक होत नाहीत. आमचे परदेशस्थ मि.पा. कर यावर प्रकाश टाकू शकतील काय? हा प्रश्न विचारण्याचा हेतू हा की, काय पाश्चात्य देशात, सुरक्षा यंत्रणा वेगळी आहे की लोक जास्त जागरूक आहेत? मुंबई बाँब स्फोटा नंतर ट्रेनमध्ये बसल्यावर मी लोकांनी शेल्फवर ठेवलेल्या सामनाच्या मालकीबद्दल शाहनिशा करित असे. तेव्हा लोक माझ्याकडे, हा कोण घाबरट आला अशा नजरेने पहात. कुछ नही होता हि बेफिकिर वृत्ती त्यामागे आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग 27/07/2008 - 08:43
आमचे परदेशस्थ मि.पा. कर यावर प्रकाश टाकू शकतील काय? हा प्रश्न विचारण्याचा हेतू हा की, काय पाश्चात्य देशात, सुरक्षा यंत्रणा वेगळी आहे की लोक जास्त जागरूक आहेत? तुम्ही फार चांगला प्रश्न उपस्थित केलाय. माझ्या मते पाश्चात्य देशात किंबहुना जपान, कोरिया सारख्या पौर्वात्य देशातही लोकांची स्वयंशिस्त हा फार मोठा घटक आहे जो सर्वच गोष्टींवर परिणाम करतो. आपल्याखेरीज इतरही लोक आसपास आहेत त्यांच्या आणि आपल्या सुरक्षिततेची थोडी का होईना जबाबदारी आपली आहे ही एक सामाजिक समज बहुसंख्यांना असणे फार महत्त्वाचे ठरते. जपानमध्येही ट्रेन्स, बसेस इ. ला भरपूर गर्दी असते पण तिथेही असले प्रकार झालेले फार ऐकिवात नाहीत. आपल्याकडे होणार्‍या चुकीच्या गोष्टीतल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे दोषी व्यक्तींना शासन करण्यातली अक्षम्य चालढकल, दिरंगाई, राजकीय हस्तक्षेप आणि मतांच्या घाणेरड्या राजकारणापुढे देशप्रेमाचीही तमा नसणे! मुंबई बॉंबस्फोटासारखा संवेदनशील खटला आठ्-आठ वर्ष चालतो ह्याला काय अर्थ आहे? त्याकाळात जनता सगळी संवेदनशीलता हरवून बसते. देशद्रोहाच्या गुन्ह्याला अत्यंत वेगाने चौकशी, अत्यंत कडक शिक्षा आणि शिक्षेची तातडीची अंमलबजावणी हे जो पर्यंत होत नाही तोपर्यंत गुन्हेगार निर्ढावत जातो. अधिकाधिक धीट आणि कोडगा होत जातो. उदाहरणार्थ अफजल गुरुच्या फाशीबाबत जो काही लज्जास्पद दिरंगाईचा प्रकार चालू आहे त्यामुळेच पुनःपुन्हा असले हल्ले होऊन निरपराध जनता बळी पडत राहते आणि निर्लज्ज पांढरे बगळे 'झ' सुरक्षाव्यवस्थेतून आरामात फिरत रहातात! चतुरंग

In reply to by चतुरंग

सहमत! ९/११ च्या घटनेनंतर, अमेरिकेने अख्या जगाला धक्याला लावले आणी ओसामा व त्याच्या साथीदारांना ठेचले. इस्राईल वर झालेला एकही हल्ला तो देश पचवून घेत नाही. प्रसंगी शत्रूवर बाँब हल्ले करून त्याची नांगी ठेचतो. जग काय म्हणेल याची फीकीर त्याला नाही. आम्ही आपली तटस्थ देश, सहीष्णु देश इ. प्रतिमांचे चिंगम चघळत बसतो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

चिन्या१९८५ 27/07/2008 - 04:38
नरेंद्र मोदींकडुन अपेक्षा आहेत. त्यांनीतरी पोलिसांकरवी दहशतवाद्यांना शोधुन काढाव

केशवराव 27/07/2008 - 08:11
अहमदाबाद मधिल मि. पा. करांनी क्रुपया आपली खुशाली कळवावी. प्रत्येकाने काळजी घ्या रे बाबानो!

अनिल हटेला 27/07/2008 - 11:34
पून्हा एकदा हल्ला!!! भ्याड हल्ला!!!! पाठीत वार करायची जुनी खोड आहे ,हयान्ना!!! पण असल्या हल्ल्यान्ही खचणारे आम्ही नाही!!! मोदी तरी ह्यात सामिल असणा-यान्ना योग्य शासन देतील अशी अपेक्षा आहे !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मुकेश 27/07/2008 - 11:47
दहशदवादी जरी पकडले गेले तरी त्याचा काय उपयोग होणार आहे. संसदेवर हल्ला करणारा अफजल, त्याला अजून शिक्षा होत नाही. आपली सर्व नेते मंडळी शंड आहेत. दहशदवादावर गंभीरपणे विचार करण्याची आज गरज आहे. इस्लामरुपी सापाला दूध पाजल्याचे फार गंभीर परिणाम आज आपण भोगतोय .... .......मुकेश

In reply to by मुकेश

प्रकाश घाटपांडे 27/07/2008 - 17:34
इस्लामरुपी सापाला दूध पाजल्याचे फार गंभीर परिणाम आज आपण भोगतोय ....
दहशतवादाला जात धर्म पंथ नसतो. रामप्रहर हा विजय तेंडुलकरांच्या स्तंभलेखनावर असलेला नाट्याविष्कार परवाच सुदर्शन रंगमंचला पाहिला. हाच विषय त्यात चांगला मांडला आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

llपुण्याचे पेशवेll 27/07/2008 - 19:36
खरेतर दहशतवादाला धर्म नसतो हे खरे असेलही कदाचित. पण सध्याच्या दहशतवादाला स्पष्ट चेहेरा आहे इस्लामी जिहाद चा. आणि तरीही आपण दहशतवादाला जात धर्म पंथ नसत असे म्हणत राहीलो तर आपले दुर्दैव बाकी काही नाही. बंगळूर आणि अहमदाबाद च्या सर्व मृतात्म्याना भावपूर्ण श्रध्दांजली. पुण्याचे पेशवे

धमाल मुलगा 28/07/2008 - 10:18
अरे अहमदाबादेतील मित्रांनो, सगळे ठीक आहात ना? अमीतकुमार, आणि इतर, आपली खुशाली कळवा, सगळे बरे आहात ना?

In reply to by धमाल मुलगा

अमितकुमार 28/07/2008 - 11:56
हो आपला ऐककूलता ऐक अहमदाबादि मिपाकर सूखरूप आहे...... सर्व स्फोट हे जून्या अहमदाबाद मध्ये झाले जीथे दाट वस्ति आहे.... परिस्थिति खूप भयावह होति....