Skip to main content

लांगूल चालनाची हद्द!

लेखक उडन खटोला यांनी शनिवार, 15/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाला प्रोत्साहन देणारा एक घातक आणि विषारी निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. देशात मुस्लिम समुदायाचे जे आरोपी दहशतवादाच्या गुन्ह्यात दोष नसताना पकडले गेले असतील, त्यांच्यासाठी खास विशेष न्यायालये स्थापन करण्याचा हा निर्णय आहे. कसाब आणि अफजल गुरूला अनेक वर्षे बिर्याणी खाऊ घातल्यानंतर जनमताच्या रेट्यामुळे सरकारने त्यांना फासावर लटकविले. आता मुस्लिम गुन्हेगार वेगळे करून त्यांची सुटका सरकारच करणार आहे. जर, पुराव्याअभावी एखाद्या आरोपीवर गुन्हा शाबीत होऊ शकला नाही, तर तपास अधिकार्‍याला शिक्षा, त्या मुक्तता झालेल्या सन्माननीय आरोपीला नुकसानभरपाई, अशा उदार तरतुदी या नव्या विशेष न्यायालयाच्या अधीन राहणार आहेत. अधिक सम्पूर्ण लेख- http://www.epapergallery.com/ePaper.htm?SiteName=http://www.globalmarat…

वाचने 3563
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

Ohh My God !

माय लेकांची "विषाची शेती" अगदी जोरात दिसते!

सचीनभौ, सचीनभौ, कुटं हात तुमी? माय्लेकावर व्हवून जाव्द्या एक गोगोड- गोगोड लेख...यव्ह्डा मोट्टा चानस कसा सोडताय ?

मुस्लिम लोकसंख्येत २४% वाढ मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे. गेल्या दशकातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मिळालेल्या या अहवालातील ताज्या आकडेवारीनुसार, मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर आजही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र, नव्वदच्या दशकातील आकडेवारीशी तुलना केल्यास मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला आहे. १९९१-२००१ या काळात मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर २९ टक्के होता. तो आता २४ टक्क्यांवर आला आहे. स्थलांतराचा फटका आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील मुस्लिम लोकसंख्येवर बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदा स्थलांतराचा मोठा परिणाम झाला आहे. मुस्लिम लोकसंख्येत सर्वाधिक वाढ आसाममध्ये नोंदवली गेली आहे. २००१च्या जनगणनेनुसार आसाममध्ये ३०.९ टक्के मुस्लिम होते, दहा वर्षांत हा आकडा ३४.२ टक्क्यांवर गेला आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये हाच आकडा २५.२ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर गेला आहे. > जम्मू-काश्मीर (६८.३%), पश्चिम बंगाल (२७%) आणि आसाममध्ये(३४.२%) मुस्लिमांचे प्रमाण सर्वाधिक. > मेघालय, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशात केवळ ०.१ टक्के वाढ.mm

In reply to by आजानुकर्ण

बघा तुम्हीच. अच्छे दिन आले की नाही. कमजोर लाचार मजबूर अल्पसंख्यांची संख्या वाढते आहे म्हणजे त्याचे स्बलीकरण होणार की नाही आता. फक्त एक अवांतर प्रश्न असा पडतो की अल्पसंख्याक म्हणजे नक्की किती टक्क्याला पोचेपर्यंत की हिंदु ४५% आणि मुसलमान४४.९% झाल्यावरही तेच अल्पसंख्यांक आणी हिंदु ४४.९% आणि मुसलमान ४५% झाल्यावरही मुसलमानच अल्पसंख्यांक? बाकी भारत पुरोगामी होतोय याचेच प्रतीक म्हणायचे मुसलमानांची वाढती संख्या. लगे रहो. कदम कदम बढाये जा.

माई मोड ऑन बर का रे उडन खटोलया आमचे हे (स्वगतः- नक्की आज घरात कोण आहे सचिन,नानु कि ग्रेटथुंकर) म्हणतान कि ........

आत्ताच अक्षय कुमार चा बेबी सिनेमा पाहिला . अतिशय जबरदस्त आणि खिळवून ठेवणारा चित्रपट ! सर्वांनी जरूर पहा, आणि शक्यतो तिकीट काढून पहा !