आपले केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री थॉमस यांनी अन्नसुरक्षा बिलाचा गोषवारा असलेली एक पुस्तिका नुकतीच व्हेटीकन मध्ये जावून पोपच्या पायावर घालून आणली म्हणे.
याला आपली हरकत असायचे कारण नाही. आपणही दिवाळीला हिशोबाच्या वह्या भवानीला दावून आणतोच कि ! क्याथोलीकांची श्रद्धास्थाने व्यक्तीस्वरुपातही आहेत एवढेच.
म्हणून फक्त हे सरकारी प्रेस रिलीज मध्ये सापडते, माध्यमांमध्ये नाही. याची बातमी व्हायचे कारणही नाही, मान्य.
http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=99965
गोची तेव्हा होते जेव्हा आपण याच घटना एखाद्या मंत्र्याच्या आणि शंकराचार्यांच्या बाबतीत घडल्या अशी कल्पना करून ब्रेकिंग न्यूज चे मथळे विज्युअलाइज करायला लागतो…
आपला निधर्मीवाद/सर्वधर्मसमभाव सापेक्ष असतो का किंवा का असतो ?
अन्नसुरक्षा बिल हे सोनियांचे स्वप्न असायचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर कदाचित या घटनेतून मिळू शकेल का ?
(बालबुद्धी- इष्टु)
वाचने
19567
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
+ १
In reply to राईचा पर्वत by सुनील
थोडेसे अजुन स्पष्टीकरण
In reply to राईचा पर्वत by सुनील
इत्यलम
In reply to थोडेसे अजुन स्पष्टीकरण by इष्टुर फाकडा
आपल्या दोघांनाही चकवा लागलेला
In reply to इत्यलम by सुनील
नॉनइश्युवरुन लोकांमध्ये
मुद्द्याकडे येताना,
In reply to नॉनइश्युवरुन लोकांमध्ये by ग्रेटथिन्कर
@ इ.फा.
In reply to मुद्द्याकडे येताना, by इष्टुर फाकडा
मुख्य मुद्दा -लोकांना अन्न
In reply to मुद्द्याकडे येताना, by इष्टुर फाकडा
अरे व्वा!!!!!
In reply to मुख्य मुद्दा -लोकांना अन्न by ग्रेटथिन्कर
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद
In reply to नॉनइश्युवरुन लोकांमध्ये by ग्रेटथिन्कर
लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाहीहे फक्त गृहित आहे. याच्यासाही खरी राजकीय इछाशक्ती आहे की नाही याकरिता "शिधापत्रिकांच्या घोळांची पाश्वभूमी + गेले शतक दोन शतके होणार्या गलथान साठवणूकीने होणार्या हजारो टन अन्नाच्या नासाडीची पार्श्वभूमी" चांगले उत्तर देत नाही. किंबहुना "अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी योग्य गोदामे तयार करा आणि शिधापत्रिकेवरून नीट अन्न्वाटप होईल अशी व्यवस्था करा... इतर काहीही करण्याची गरज नाही" हा सल्ला तज्ञांकडून सरकारला अनेकदा दिला जातो आणि त्याकडे सतत डोळेझाक केली जाते. यात या योजनेतून काय साधायचे आहे ते दिसतच आहे... डोळे उघडे असल्यास. सद्याचे पुरावे हे फक्त गृहितच राहील किंवा भ्रष्टाचारासाठी अजून एक कुरण होईल असेच पुर्वानुभव आहे. जर सरकारला खरंच गरिबांच्या पोटाची काऴजी असेल तर ती (१) थोड्या काळासाठी भ्रष्टाचारमुक्त शिधापत्रीकेवरील अन्नचे वितरण आणि (आ) कायम स्वरूपी देशव्यापी रोजगार योजनेचे नियोजन यानेच होऊ शकेल. हे करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी भ्रष्ट सबळांना काबूत ठेवून दंड करण्याची कुवत असल्याचे पुरावे अजूनपर्यंत उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळा पुस्तिका वाटुअन किंवा अगदी कायदा करूनही (शिधापत्रिका कायदा आहेच की अनेक वर्षे) लोकाना ना अन्न मिळेल असा आनंद व्यक्त करायचा असेल तर स्वतःच्या बँकेच्या खात्यात एकाएकी करोडो रुपये जमा झालेत असाही आनंद व्यक्त करायला हरकत नाही... शेवटी सगळा खयालोंमे हंगामा.पोपच्या नावाने चुना लावत बसायचे...प्रतिसाद नीट वाचले तर असे दिसून येईल (किंवा खरे हे आहे की तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे) की बहुतेक जण असेच म्हणत आहेत की हा पोपबद्दलचा मुद्दा नाही तर "परदेशी माणूस किंवा कोणीही धर्ममार्तंड*" यांना आपल्या देशातल्या कायदाव्यवस्थेत दखल देण्याची अथवा सामील करून घेण्याची परवानगी सरकारला आहे काय? याचं उत्तर नाही असे आहे (हे माहित नाही असे दिसत आहे म्हणून मुद्दा भरकटवण्याच्या प्रयनाअगोदरच ते देऊन ठेवतो.) * :यात सगळे-- हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, इ. --- धर्म येतात.उत्तम प्रतिसाद
In reply to लोकांना अन्न मिळेल याचा आनंद by डॉ सुहास म्हात्रे
"अजूनही पर्रीकर सरकार नेपाळी आणि बांगलादेशी घुसखोरांना
In reply to उत्तम प्रतिसाद by पैसा
त्याहून वाईट!
In reply to "अजूनही पर्रीकर सरकार नेपाळी आणि बांगलादेशी घुसखोरांना by मुक्त विहारि
असो...
In reply to त्याहून वाईट! by पैसा