Skip to main content

बुद्धिभेद

लेखक तिमा यांनी बुधवार, 24/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी, मटा वाचून तोंड कडू झाले. त्याला कारण हा प्रताप आसबे, यांचा बुद्धिभेद करणारा ही लेख! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16934058.cms#write आज भ्रष्टाचाराविरुद्ध सगळ्या समाजाची एकजूट करण्याची गरज असताना असे जातीय लेख लिहून हे नवपत्रकार आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. (किंवा त्यांचा बोलविता धनी ते करवतो आहे, चार तुकडे फेकून). या लेखात बहुजन नेत्यांची बाजू घेऊन अभिजन कसे त्यांचे चारित्र्यहनन करत आहेत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या जाती जातीतील तेढ वाढवणार्‍या लेखाचा त्रिवार निषेध! आसबे यांनी पूर्वी खूप चांगले लेखलिहिले आहेत. त्यामुळे आश्चर्य वाटले. 'जोशीसरांची ती उद्यमशीलता आणि भुजबळांनी केलेला मात्र भ्रष्टाचार, असे त्यांत एक वाक्य आहे. या वाक्यावरुनच लेखकाच्या खर्‍या हेतूचा अंदाज येतो. सामान्य माणसाला जातीशी काय देणेघेणे ? तो सगळ्यांना एकाच मापाने मोजतो.

वाचने 1990
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आसबे यांनी पूर्वी खूप चांगले लेखलिहिले आहेत
२० वर्षापूर्वी प्रचारी थाटात आसबे लिहायचे(पैसे घेवून लिहिल्यासारखे वाटायचे). नंतरच्या काळात जरा बरे लिहायचे.वरच्या लेखातही आसबे ह्यांना कुठल्यातरी नेत्याने कामाला लावले आहे.

ब्राह्मण्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, शाहू-फुले-आंबेडकर, बहुजन-अभिजन, चातुर्वर्ण्य व्यवस्था, हजारो वर्षांचे शोषण, समता, सत्यशोधक चळवळ, वर्ण-वर्चस्व, इतिहासाची (विकृत) मांडणी असे घाऊक शब्द लेखात घालून तुंबलेली मळमळ बाहेर काढण्याचा एक प्रयत्न म्हणून दुर्लक्ष करता येईल. गेल्या काही-शे वर्षात कोणी कोणी कोण-कोणावर कसे अत्याचार केले/ शोषण केले याची यादी करायला घेतली तर अजून काही-शे वर्षे हे अत्याचाराचे आणि शोषणाचे टुमणे निवांतपणे वाजवता येईल. सत्तालोलुप पुढाऱ्यांचा, त्यांच्या पित्त्यांचा आणि पोटापाण्यासाठी ही अशी मळमळ बाहेर ओकणारे सोडून बाकी कोणाचे यात भले होणार नाही. लेखातील शेवटच्या उताऱ्यात गर्भित (पण निरुपयोगी) धमकी दिली गेली आहे असे वाटते.

In reply to by अपूर्व कात्रे

घाऊक शब्द लेखात घालून तुंबलेली मळमळ बाहेर काढण्याचा एक प्रयत्न म्हणून दुर्लक्ष करता येईल.
असेच आणि हेच म्हणतो. तद्दन भिकार लेख. पवारपित्त्याने लिहिल्यागत वाटतोय.

लेखकाशी सहमत आहे. आसबेंचा इतका भोंगळ लेख प्रथमच वाचण्यात आला. दोन्ही बाजूंनी नाराज होऊ नये यासाठी केली गेलेली कसरतच अधिक दिसते आहे.

हा लेख पाळलेल्या विद्वानाने लिहिल्यासारखा वाटतो.

कोणाचाही मुलाहिजा बाळगण्याची गरज नाही . शरद पवारांचाही . पण साप म्हणून भुई थोपटणे आणि पराचा कावळा करणे , हे चारित्र्यहनन झाले .
यावरून निष्ठा स्पष्ट होतात..

त्यात काय नवल. आसबेंची हिस्टरी बघता असा लेख आल्याचे नवल वाटले नाही. पुर्वी कुमार केतकर संपादक असताना लोकसत्ता चा खप कमी झाला होता. आता प्रताप आसबे मटाचा खप कमी करत आहेत व लोकं कुमार केतकर नसल्याने कदाचित, पण पुन्हा लोकसत्ते कडे वळत आहेत. काव्यागत न्याय आहे.