Skip to main content

राज ठाकरेंनी अखेर बोनीकपूर च्या कार्यक्रमाचा विरोध थांबवला..!

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 06/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच सहारा वन की कुठल्याश्या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाबाबत मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता तसेच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनाही चार खडे बोल वगैरे सुनावले होते.. भारताविरुद्ध रोज उठून काहीना काही दहशतवादी कारवाया करणाऱ्या, प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात पाठवणाऱ्या पाकिस्तानातील कलाकारांना इथे बोलावून त्यांच्याकरता रेड कारपेट घालण्याची काय गरज आहे? असे मुद्दे घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.. जाहीर भाषण करून आशाताईंनाही फटकारले होते, त्याचप्रमाणे विविध वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमात मनसेच्या पित्त्यांनी सदर कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला होता आम्हाला तेव्हा राजसाहेबांची भूमिका मनापासून पटली होती. कारण खरोखरच जो देश आपल्याशी केवळ शत्रुत्वाच्या नात्याने वागतो त्या देशाशी आपण सांस्कृतिक किंवा अन्य कोणतीही जवळीक केली तरी त्या पाकिस्तानचे शेपूट नेहमी वाकडे राहणार आणि भारतात अतिरेकी कारवाया करून निरपराध भारतीयांना ठार मारण्याचा त्यांचा उद्योग सुरूच राहणार.. तेव्हा अशा देशाच्या कलाकारांना इथे निश्चितच बोलावता कामा नये.. 'आपल्या देशात काय कमी मुलं आहेत जी चांगली गातात? त्यांना संधी द्या की..' - राज ठाकरेंच्या यादेखील भूमिकेचे आम्हाला खूप कौतुक वाटले होते.. परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क समझौता झाला म्हणे..! आशाताईंसारख्या महान कलावंताला या कार्यक्रमात भाग न घेण्यासाठी जाहीरपणे चार खडे बोल सुनावणाऱ्या राज ठाकरेंनी त्या बोनी कपूरसमोरशी समझौता कसा केला ?? [संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे. धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती. वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील. धन्यवाद!]

वाचने 10587
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

>>>शेवटी 'पैसा बोलता है.. ' हेच खरं..! संपला विषय. हे सुद्धा तुम्हाला राजकडूनच शिकावं लागलं तर. असो.* * माझा आणि मनसेचा काहीही संबंध नाही. खुलासा अशासाठी की राजवर गरळ ओकणारे माझ्यावर सुद्धा घसरतील म्हणून. असो.

आताच मिडियाकडुन ऐकले की साहेब स्वःच बोलुन गेले ".......पैसा* दे हो भाव!" बादवे प्रत्यक बातमीचा धागा झालाच पाहिजे या अट्टाहासास अनुमोदन.

हे वास्तव आहे. राजू चा इतिहास कच्चा आहे. वर्तमानाचे वास्तव आपण लिहिलेच आहे. आता असे चालूच राहिले तर भविष्य उज्वल मात्र आहे.

परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले >>> ???? संपादित.काल-परवाच राज ठाकरेंनी मिडीया ला झोडुन काढण्याची भाषा केली आहे ..मिडीया तुटुन पडणारच !! ...असो ...

In reply to by सुहास..

आपल्याला असे म्हणायचे आहे का की सदर बातमी ही धादांत खोटी आहे? तसे असेल तर आम्ही आमचे शब्द त्वरीत व बिनशर्त मागे घेतो..

अरेच्च्या ! प्रश्न तुलाच पडला आणि उत्तर ही तुच देणार का ? म्हणून एक सल्ला दिला, तो कसला वैयक्तीक , जागतिक सल्ला आहे तो. शिवाय तुमच्या सारख्यांना अशीच भाषा समजते, असा आमचा अनुभव आहे , दुसरे म्हणजे दिसली बातमी ( विषेशता कॉन्ट्रॉव्हर्सल ! ) की युनीवर्सल ट्रुथ सांगीतल्यासारखे घावत पळत येवुन तुम्ही धागे काढुन ट्यारप्या घ्यायचे धंदे करता असे ही एक आमचे ऑब्जर्वेशन आहे .. बाकी , आंजावर धागे काढुन , उखाळे-पाखाळे काढणार्‍यांना आमचा आधी ही दंडवत होताच, आता तुम्हालाही ! धन्यवाद ! ( आणी पुन्हा संपादकांची धमकी देवु नये ! )

In reply to by सुहास..

तो कसला वैयक्तीक , जागतिक सल्ला आहे तो.
आवश्यकता आणि सहमती नसली तरी आपल्या सल्ल्याचा आदर आहे..
दुसरे म्हणजे दिसली बातमी ( विषेशता कॉन्ट्रॉव्हर्सल ! ) की युनीवर्सल ट्रुथ सांगीतल्यासारखे घावत पळत येवुन तुम्ही धागे काढुन ट्यारप्या घ्यायचे धंदे करता असे ही एक आमचे ऑब्जर्वेशन आहे ..
ऑब्जर्वेशन अथवा ऑब्जेक्शन, काहीही असले तरी त्याचा आम्ही आदर करतो..ज्या सामजिक विषयावर आम्हाला इथे लिहावेसे वाटेल त्या विषयावर आम्ही इथे लिहायचे नाही का, इतकेच सांगावे.. आपण मूळ विषयावर प्रतिक्रिया न देता आम्ही हा धागाच मुळात का काढला असा आपला प्रश्न आहे.. अर्थात, तो आपण विचारू शकता, परंतु मूळ विषयावरही आपण काही प्रतिक्रिया दिली असतीत तर बरे झाले असते..
( आणी पुन्हा संपादकांची धमकी देवु नये ! )
आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आपल्याला कुठलीही धमकी वगैरे दिलेली नाही..तरीही आपणास तसे वाटत असल्यास आम्ही आपली मनापासून क्षमा मागतो..वास्तविक एकेरी, अरेरावीची भाषा आपणच वापरत आहात असे आम्हाला जाणवते..असो. बाय द वे, सदर बातमी खोटी आहे का? असे आम्ही विचारले होते.. त्याचे उत्तर दिले असतेत तर बरे झाले असते. असो, मर्जी आपली. तिचा आदर आहेच..!

In reply to by कॉमन मॅन

बाय द वे, सदर बातमी खोटी आहे का? असे आम्ही विचारले होते.. त्याचे उत्तर दिले असतेत तर बरे झाले असते. असो, मर्जी आपली. तिचा आदर आहेच..!
अरेच्च्या!! आश्चर्य वाटतंय तुमच्या दुतोंडी वागणूकीचं. कुठून तरी ऎकलेल्या फुटकळ बातमीवरून जोशात येत तुम्ही वर धागा काढलाय आणि परत प्रतिसाद कर्त्यालाच विचारताय बातमी खरी आहे का म्हणून. तरी म्हटलं तुमचं 'आजच्या शिळ्या बातम्या' नावाचं सदर काही दिवसांपासून दिसलं कसं नाही. :)

In reply to by किसन शिंदे

कुठून तरी ऎकलेल्या फुटकळ बातमीवरून जोशात येत तुम्ही वर धागा काढलाय
आमच्या मते कुठूनतरी ऐकलेली ही बातमी फुटकळ नव्हे. आजच्या वर्तमानपत्रातदेखील ही बातमी आली आहे.. वर्तमानपत्रवाले जर मुख्य पानावर ही बातमी देतात तर त्या बातमीसंदर्भात आम्ही इथे एक धागा काढला आहे त्यात आमचं काही चुकलं आहे असं आम्हाला वाटत नाही..

आम्हाला तेव्हा राजसाहेबांची भूमिका मनापासून पटली होती. कारण खरोखरच जो देश आपल्याशी केवळ शत्रुत्वाच्या नात्याने वागतो त्या देशाशी आपण सांस्कृतिक किंवा अन्य कोणतीही जवळीक केली तरी त्या पाकिस्तानचे शेपूट नेहमी वाकडे राहणार आणि भारतात अतिरेकी कारवाया करून निरपराध भारतीयांना ठार मारण्याचा त्यांचा उद्योग सुरूच राहणार.. तेव्हा अशा देशाच्या कलाकारांना इथे निश्चितच बोलावता कामा नये.. 'आपल्या देशात काय कमी मुलं आहेत जी चांगली गातात? त्यांना संधी द्या की..' - राज ठाकरेंच्या यादेखील भूमिकेचे आम्हाला खूप कौतुक वाटले होते.. ओ कॉमन मॅन राज यांना जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे. .. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क तोडपाणी -मांडवली झाली म्हणे..! उगाच कोणाचा राग कोणावरही काढु नका.जरा सबुरी ठेवा.

परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क तोडपाणी -मांडवली झाली म्हणे..!
हे लिहिण्यापूर्वी थोssssडे कष्ट घेतले असते तर धागा काढायची वेळ आली नसती. लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या या बातमीनुसार: "यापुढे पाक कलाकारांना घेऊन असे कार्यक्रम करणार नसल्याचे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले." सबब नांगी कुणी कुणासमोर टाकली हे कळतच आहे. अर्थात तुमच्या धागाप्रेमाबद्दल मी काही वेगळे बोलण्याची गरज नाही. इतिहास तुम्हालाही माहितच आहे. पुन्हा समोर आणायची वेळ येऊ देऊ नका इतकेच सांगतो.

In reply to by अन्या दातार

यापुढे पाक कलाकारांना घेऊन असे कार्यक्रम करणार नसल्याचे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले.
हा भविष्यातील मुद्दा आहे. परंतु सध्या जो कार्यक्रम सुरू होणार आहे त्या संदर्भात मनसेवाल्यांनी जो देशाभिमान दाखवला होता, आशाताईंना सुनावले होते त्याचे काय झाले? या बाबत लोकसत्तेचा कुठला दुवा आपण कृपया देऊ शकाल का? धन्यवाद..

In reply to by अन्या दातार

असा आमचा अंदाज आहे.. काल-परवापर्यंत साक्षात आशाताईंचादेखील देशाभिमान जागृत करू पाहणार्‍या मंडळींनी आज बोनी कपूर त्यांना भेटल्यानंतर एकदम अबाउट टर्न कसा काय केला हे सजमले नाही.. त्यावरून आम्ही तोडपाणी झाल्याचा अंदाज बांधला होता.. आमच्या लेखनातून आमचा तसा 'अंदाज' नसून 'आरोप' आहे असे जर कुणाला वाटत असेल तर कदाचित तो आमच्या लेखनाचा दोष असेल.. तोडपाणी झाले असा आमचा अंदाज आहे, आरोप नाही.. - हे आम्ही या प्रतिसादाद्वारे स्पष्ट करू इच्छितो.. त्यातून राज ठाकरे अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे आपल्याला वाटत असल्यास त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही...

In reply to by कॉमन मॅन

आपल्याच लेखात हे एक वाक्य सापडते बघा:
परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.
याचाच अर्थ तुम्ही थेट आरोप करत आहात राज ठाकरेंवर. मग "..... असा आमचा अंदाज आहे, आरोप नाही" अशी मखलाशी का करता? वरच्या प्रतिसादात तुम्ही म्हणता की राज ठाकरे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे आपल्याला वाटत असल्यास त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही... निदान आत्ताच्या प्रकरणाचा विचार करता आपली राज्यघटना असे मानते की सिद्ध होईपर्यंत आरोपीस निर्दोष मानावे. तसेच एखाद्यावर बेलगाम आरोप केल्यास व ते सिद्ध करण्याची जबाबदारीही येते. इतके दिवस राज्यघटना राज्यघटना म्हणून शहाणपण शिकवत धागे काढणार्‍या आयडीस या गोष्टींचा विसर पडावा? पब्लिक फोरमवर धागे काढण्यास मज्जाव नसला तरी गेलाबाजार पब्लिकला पकवू तरी नये असे माझे वैयक्तिक मत आहे. आग्रह/हुकूम्/आज्ञा नाही हे ध्यानात घ्यावे.

In reply to by अन्या दातार

पब्लिक फोरमवर धागे काढण्यास मज्जाव नसला तरी गेलाबाजार पब्लिकला पकवू तरी नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे.. परंतु आमचे नांव वाचून आमचा धागा उघडूच नये आणि पकवून घेऊ नये हेही पब्लिकच्या हातात आहे असे आम्हाला वाटते..
आग्रह/हुकूम्/आज्ञा नाही हे ध्यानात घ्यावे.
आभारी आहे..

तोड्पाणी / मांडवली झाल्याची "बातमी", की अंदाज??

समदा मामला आंदासपंचे हाय व्हय! चालुंद्या चालुंद्या ...

या देशातील " आम आदमी" असले निर्बुद्ध विचार करतो म्हणुन देशाचं "छान" चाललय. अर्धवटराव

"छोटे उस्ताद" या कार्यक्रमाला १०-१२ वर्षांच्या पाकिस्तानी किशोर-किशोरींना बोलवून असाच एक गायनस्पर्धेचा कार्यक्रम (मला वाटते) झी या वाहिनीवर चालू होता. (मला वाटतं ३-४ वर्षे झाली असावीत.) त्या स्पर्धेला समर्थन देताना मी म्हटले होते कीं राजकीय आणि लष्करी नेतृत्वाच्या पातळीवर वैर असल्यामुळे दोन्ही देशातील आम जनतेला फारच एकांगी मतं वाचावी, ऐकावी आणि पहावी लागतात. कांहीं खरी असतात तर कांहीं प्रचाराचा भाग असल्यामुळे खोटी असतात. या विषारी वर्तुळातून (vicious circle) बाहेर पडायचे असेल तर अशा तरुण-किशोर वयातील जनतेचा आपापसात संबंध वाढला पाहिजे. तसे झाले तर कित्येक गैरसमज दूर होतील व पुढची पिढी तरी मैत्रीच्या दिशेने मोकळ्या मनाने प्रयत्न करेल. म्हणून अशी कलावंतांची, लेखकांची आणि सामान्य जनतेची आवक-जावक ही निरोगी धोरणाच्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे असे मला मनापासून वाटते. फक्त 'गोची' एवढीच आहे कीं हे प्रयत्न फक्त आपणच (भारतच) करतो. आपण गुलाम अली, स्व. मेहदी हसन यांना इथे डोक्यावर घेऊन नाचतो. राहत फते अली इथे गायक म्हणून आपला जम बसवतात पण तशी दिलदारी आपल्या कलाकारांच्या वाट्याला पाकिस्तानकडून येत नाहीं. त्यामुळे आपले कलाकार तिकडे जाताना व तिथल्या मंचावर आपल्या कलेची अदाकारी पेश करताना दिसत नाहींत. थोडक्यात टाळी तर वाजायलाच हवी आहे, भारत त्या दिशेने सकारात्मक प्रयत्नही करताना दिसतो पण तसे सकारात्मक प्रयत्न पाकिस्तानकडून झालेले माझ्या माहितीत तरी नाहींत. असे प्रयत्न पाकिस्तानच्या बाजूनेही व्हायला हवेत. आता राज ठाकरे यांनी आणि बोनी यांनी आपापसात काय बोलणी केली व कुठल्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी आपला विरोध मागे घेतला याची अद्याप माहिती नसल्यामुळे त्याबाबत सध्या कांहीं मतप्रदर्शन करणे योग्य होणार नाहीं.

In reply to by सुधीर काळे

फक्त 'गोची' एवढीच आहे कीं हे प्रयत्न फक्त आपणच (भारतच) करतो.
आणि तोवर इथे भारतात पुन्हा एखादा पाक-पुरस्कृत बाँबस्फोट होतो..!

'मनाचे श्लोक' नावाचे नवीन सदर सुरु करावयाची सुचवणी करावयांस हवी, असा विचार धागा वाचून सहज येऊन गेला. बाकी चालू द्या.

खोके पोचले असावेत. चुलत्याच्या पावलावर पाऊल ठेवणे चालू आहे असे दिसते. ज्याचे उपद्रव मूल्य जास्त त्यालाच जास्तीत जास्त किंमत मिळते हेच खरे. - जय महाराष्ट्र

In reply to by अप्पा जोगळेकर

खोके पोचले असावेत. चुलत्याच्या पावलावर पाऊल ठेवणे चालू आहे असे दिसते. ज्याचे उपद्रव मूल्य जास्त त्यालाच जास्तीत जास्त किंमत मिळते हेच खरे. - जय महाराष्ट्र :crazy: :crazy: :crazy: अप्पा जोगळेकर मुळ्चे बिहारी आहात का.. ? असा प्रश्न तुम्हाला कोणी कसा विचारला नाही अजुन..? जय बिहार...

वॉर बिटवीन टू नेशन्स इज नेव्हर अ वॉर बिटवीन द पीपल बट बिटवीन द टू मेंटॅलिटिज ओफ द प्रिमियर्स. जगात राष्ट्रे कधीही एकमेकात भांडत नाहीत त्यांचे राष्ट्रप्रमुख आपल्या स्वार्थासाठी ही भांडणे लावत असतात. असा म्हणे युद्ध शास्त्रातील नियम आहे.

कॉमन मॅन च्या धाग्याला काय सिरिअसली घेतायत लोकं काही कळत नाही. मागे अण्णा हजारेंच्या आंदोलनावर पण हा आयडी असाच तुटुन पडला होता. कोळसा घोटाळा, लवासा प्रकरण ह्यावर काही धागा काढत नाही हा आयडी, त्यावरुन समजुन घ्या ना राव. आता परत सरकारी बढतीत आरक्षण द्यायला घटना बदलणार आहेतच ना, मग लोकपाल च्या वेळी काय प्रॉब्लेम होता, पण कॉमन मॅनने तेव्हा घटना बदलतायत म्हणुन आरडाओरड केली होती, आता ह्यावेळी धागा काढल्याचे आठवत नाही.

In reply to by अमोल खरे

मग लोकपाल च्या वेळी काय प्रॉब्लेम होता, पण कॉमन मॅनने तेव्हा घटना बदलतायत म्हणुन आरडाओरड केली होती,
'घटना बदलतायत..' अशी आरडाओरड आम्ही कुठेही केलेली नाही. कृपया दाखवून द्यावे..

आशा भोंसले यांच्या सारख्या मुंबईत महाराष्ट्रात व देशात अतिशय लोकप्रिय असलेल्या जेष्ठ कलावंतांनी नियोजित केलेला कार्यक्रम उधळून लावण्यासाठी मुंबईतील जनतेचे पुरेसे पाठबळ मिळणार नाही अशी शंका निर्माण झाल्यामुळे निषेधाची चळवळ मागे घेतली असावी. कपूर यांनी केलेल्या विनंतीचे निमित्त केले असावे असे वाटते. इतर देवाण घेवाण झालीच असेल असे वाटत नाही.

संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे.
संपादकांनी केलेला बदल आम्हाला शिरोधार्य आहे..
धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती.
आम्हीही काही सन्माननीय सदस्यांना हेच सांगत होतो..
वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील.
अत्यंत आभारी आहे. मिपा संपादक मंडळावरील आमचा विश्वास दृढ झाला आहे..

In reply to by कवितानागेश

अगदी काडीचाही फरक नाही. 'हा' आयडी अगदी सेम टू सेम 'त्या' आयडी सारखाच लिहितोय/वाद घालतोय/ संपादकांवरचा दृढ विश्वास वैगेरे... तेव्हा कौलं होती आता काथ्या आहे बाकी काडीचाही फरक नाही. उगा पब्लिकची सहानुभूती मिळवण्याकरता जातो असं म्हणायचं नि नाव बदलून परत इथेच यायचं..करायचे कशाला असले उपद्व्याप.

मी पहिल्या धाग्यालाच पकडलेला होता.. तुम्हाला आज कळतंय होय ? :D परा सर कुठे हात हो? तुमच्या विद्यार्थ्याला समज द्या जरा

आजवर वाचलेल्या काही अविस्मरणीय वेडझव्या लेखांपैकी हा एक लेख आहे.
अलीकडेच सहारा वन की कुठल्याश्या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाबाबत मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता
आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क समझौता झाला म्हणे..!
तुम्हाला ज्या कार्यक्रमाला विरोध आहे / होता तो कार्यक्रम नक्की कुठल्या वाहिनीवरती येतो ते माहिती नाही, तुम्हाला समझौता झाला, का तोडपाणी झाले हे नक्की माहिती नाही, मग नक्की कशाच्या आधारावरती ही फालतू बडबड करायला उभे झालात तुम्ही ? माहिती नसेल तर ज्ञानात थोडी भर घालून घ्या. आजवर जेवढ्या भागांचे चित्रिकरण झाले आहे ते भाग फक्त दाखवले जातील आणि ह्यापुढे वाहिनीच्या कुठल्याही कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकार अथवा नागरीकांचा सहभाग नसेल ह्या अटींवर वाहिनीला परवानगी देण्यात आलेली आहे. उगाच कळफलक समोर आहे म्हणून काही बडवत बसू नका अशी विनंती. आणि हो, एक वेळ तुमचे लेखन परवडले, पण प्रत्येक प्रतिसादावरती तुमची उपप्रतिसाद द्यायची खोड अक्षरशः किळस आणते. बाकी,
[संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे. धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती. वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील. धन्यवाद!]
हे वाचून अक्षरशः खदखदून हसलो. कॉमनमॅन ह्यांनी काय लिहिले ते माहिती नाही, पण बहूदा ते दोडके असल्याने त्यांना तंबी मिळाली असावी. अन्यथा काका /मावशी / आत्या/ ताई / मामा करत संपादकांच्या खरडवह्यात मुंगळ्या सारखे चिकटलेले जेंव्हा स्वतःचे संस्कृतचे अगाध ज्ञान दाखवत इतर सदस्यांना गांडू वैग्रे म्हणून घेतात, त्या सदस्यांच्या मातांची चौकशी करतात तेंव्हा ते प्रतिसाद उडतानाही दिसत नाहीत आणि अशा तंब्या देखील दिसत नाहीत. उलट अशा प्रतिसादाखाली एखाद्या संपादकाचा धाग्यावरती दिलेला प्रतिसाद बघून अजून मौज वाटते. हेच लाडके सदस्य जेंव्हा आपल्या 'पालक' संपादकांचा हवाला देत कट्ट्यावरती 'आज चावडीत काय झाले, कोणाच्या लेखावर कोण काय बोलले, कोणा विषयी काय लेखी तक्रार आली आहे, कोणी कोणाला पाठीशी घातले' हे अगदी नावासकट जाहिररीत्या सांगतात तेंव्हा तर अजूनच मौज वाटते. असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

यांचे पालक संपादक कोण आहेत हे सुद्धा जाहीर करुन द्णका देऊन टाका. अतिशय संतापजनक वाटचाल आहे सदर संपादकाच्या या लाडक्या पुत्राची.

In reply to by बॅटमॅन

कट्ट्याला जाऊन माझं नाव सांगणारा? बरं, असो. मला ८-१० पाल्यांची (पाल्ल्यांची हां, नाहीतर भाजीपाल्यांची म्हणाल) भरती करायची आहे. कोण कोण तयार आहेत? ;)

In reply to by पैसा

तुमचे "पालक"त्व कधीपर्यन्त टिकते त्यावर पाल्य भरतीचा निकष अवलंबुन असेल. आमचे नाव नोंदवा. कोणाच्याही विरोधी कंपुत सामील होवु पाहणारा..... इरसाल

हेच लाडके सदस्य जेंव्हा आपल्या 'पालक' संपादकांचा हवाला देत कट्ट्यावरती 'आज चावडीत काय झाले, कोणाच्या लेखावर कोण काय बोलले, कोणा विषयी काय लेखी तक्रार आली आहे, कोणी कोणाला पाठीशी घातले' हे अगदी नावासकट जाहिररीत्या सांगतात तेंव्हा तर अजूनच मौज वाटते. >>> =)) =)) तुझ्या कळफलकाला काही हाड-बिड आहे की नाही रे ! ;) एका वेळेस किती धोतरांना फटाके लावशील ;)

एका वेळेस किती धोतरांना फटाके लावशील इथे कोणी धोतर वापरणारे असतील असे वाटत नाही. तसेच धोतर हे वस्त्रप्रावरण केवळ समाजाचा एकच घटक ( पर्यायाने पुरुष ) वापरतो. सबब " धोतर" हे सामान्यनाम वापरून सदस्यांत डिस्क्रिमिनेशन कशासाठी? उगाचच पाशवीशक्ती दाक्षीण्य दाखवू नये

In reply to by विजुभाऊ

इथे कोणी धोतर वापरणारे असतील असे वाटत नाही. तसेच धोतर हे वस्त्रप्रावरण केवळ समाजाचा एकच घटक ( पर्यायाने पुरुष ) वापरतो. सबब " धोतर" हे सामान्यनाम वापरून सदस्यांत डिस्क्रिमिनेशन कशासाठी? उगाचच पाशवीशक्ती दाक्षीण्य दाखवू नये >>> अनमोल धोतराबद्दल ...आपल हे.....सल्ल्याबद्दल धन्यवाद ओ केप्लर बी चे काका !! :)

मुळात एक नक्कि राज ठाकरेंच राजकीय गणित जबरदस्त आहे. समझौता करत असताना त्यानी तमाम हिंदी वाहिन्याना दिलेला ईशाराच आहे की जर सध्याच्या राजकीय वातावणात हिंदी वाहिन्याना प्रक्षेपण करायच असेल तर राज ठाकरेंच मत विचारात घ्यावच लागेल. ईशारा देण्याच काम झाल मग त्यानी समझौता केला. एक जबरदस्त राजकीय खेळि. योग्य वेळी व योग्य त्या दिशेने केलेली.

छान

शेवटी राज ठाकरे एक राजकारणी आहेत आणि कुठल्याही राजकारण्याप्रमाणे त्यांना मतं मिळवण्यात जास्त आणि प्रश्न सोडवण्यात कमी रुची आहे हे लक्षात घेतले म्हणजे असे प्रश्न पडत नाहीत.

थोडक्यात जोवर राज ठाकरे निर्दोष आहेत असे सिद्ध होत नाहीं तोवर ते दोषी आहेत असे मानवे अशी घटनादुरुस्ती आणायला हवी! जय हो!

In reply to by सुधीर काळे

हे तर सर्वच हिंदूत्ववाद्यांना लागु करावे. आणि सर्वधर्मसमभाववाले दोषी असले तरी निर्दोषच मानले जावे अशी अजून एक दुरुस्ती सुचवतो.

ह्या विषयावर वर्तमानपत्रां मध्ये बरेच छापुन आले तसेच टीव्ही वर पण खुप चर्चा घडुन आली. पण ह्या गदरोळात एका महत्वाच्या बातमीकडे दुर्लक्ष झाले. ती म्हणजे टाटांनी धुडकावलेली पाक सरकारची सुमो ची ऑर्डर. "जो देश आमच्याविरुध्द अतिरेकि कारवाया करतो त्यांच्या बरोबर कोणताही धंदा करण्यात स्वारस्य नसल्याचे" त्यांनी सांगितले. अशी धमक आजता गायत (नुसत्या शाब्दीक वल्गना नव्हेत) अन्य कोणी दाखवलेली नाहे. राज ठाकरेनि ह्या बातमिचा त्यांच्या चर्चेत उल्लेख केला असता तर त्यांच्या मुद्द्याला वजन मिळाले असते आणि अप्रत्यक्ष पणे टाटांचा गौरव ही झाला असता.

राज ठाकरे यांचे एक खास सहकारी माझे चांगले जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडे मी याबद्दल आज चौकशी केली असता मला कळले कीं बोनी कपूर यांनी आपण पुन्हा असे पाकिस्तानी कलाकार घेऊन कार्यक्रम करणार नाहीं अशी हमी दिली आणि हा एकुलता एक कार्यक्रम त्यांना करू द्यावा अशी राजसाहेबांना विनंती केली. यानंतरच राज ठाकरे यांनी हा एक कार्यक्रम होऊ द्यायचा निर्णय घेतला. शिवाय ८ सप्टेंबर हा आशाताईंचा वाढदिवसही होता. याचा या निर्णयावर कांहीं परिणाम झाला असावा काय याबद्दल मी विचारले पण माझ्या मित्रांना याबद्दल कांहीं कल्पना नव्हती. पण मला वैयक्तिकपणे असे वाटते कीं याचाही विचार बहुदा झाला असावा. असो. थोडक्यात राजसाहेब "विकले गेलेले" दिसत नाहींत!