Skip to main content

जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 03/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
(१) जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे? (२) तसेच, सहावे स्थान शतृ, रोग दर्शवते. त्यानुसार जर सहाव्या स्थानात सिंह राशी असून त्याचा मालक रवी बाराव्या स्थानात कुंभ राशीत बुधासोबत असेल तर त्याचे फळ काय मिळेल? (३) आणि दहाव्या स्थानात धनू राशी असून त्याचा मालक गुरू हा तिसर्‍या स्थानात चंद्राबरोबर वृषभ राशीत असेत तर त्याचे फळ काय?

वाचने 20745
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

या सगळ्याची फळे म्हणून तुम्हाला तिरकस आणि घालून्-पाडून प्रतिक्रीया येतील. तुमच्या सहाव्या स्थानाला पर्‍या लागणार आहे तेंव्हा अता असलेल्या ग्रहांपेक्षा ह्या लागणार्‍या ग्रहाची चिंता करा....' तुमचे नशिब चांगले म्हणून या धाग्याला टार्‍याचे दशा नाही... नाही तर काही खरे नव्हते. असो... जाणकार सांगतीलच

निमिष'जी.. दहाव्या स्थानावरूनच प्राथमिकतः नोकरी, व्यवसाय, करियर इ. गोष्टी बघितल्या जातात. आपण म्हणता त्याप्रमाणे जर कुणाच्या कुन्डलीत सहाव्या स्थानाचा -सिंह राशीचा स्वामी रवि बारावा असेल.. म्हणजेच व्ययात बुधाबरोबर असेल.. तर तो एकप्रकारचा "विपरित राजयोग"च आहे. कारण ६,८, १२ ही स्थाने ज्योतिषात निगेटीव्ह स्थाने मानली जातात. पण त्या स्थानांतील राशींचे स्वामी जर एकमेकांच्या स्थानात बसले असतील.. तर "माईनस .. माईनस इजीक्वल टू प्लस" या नियमानुसार विचित्ररीत्या शुभकारी होतात.. षष्ठेश किन्वा अष्टमेश जर व्ययात असेल.. किन्वा वाईसे वर्सा असेल. तर त्यात काहीही वाईट नाही.. आणि आपण म्हणता.. त्यानुसार..
दहाव्या स्थानात धनू राशी असून त्याचा मालक गुरू हा तिसर्‍या स्थानात चंद्राबरोबर वृषभ राशीत असेत तर
तर ही व्यक्ती एक ऊच्च दर्जाची वक्ता/ प्रोफेसर/ज्योतिषी/अ‍ॅन्कर / स्वतःचे कोचिन्ग क्लास चालवणारी / समुपदेशक/ धर्मोपदेशक असू शकते. तसेच व्ययातल्या बुधादित्य-योगामुळे या व्यक्तीला परदेशात जाऊन आपले 'थिसेस' मांडण्याचा देखील योग येऊ शकतो. अर्थात इतर ग्रहस्थितीदेखील विस्तृतरीत्या सांगितली असती.. तर अधिक सखोल सांगता आले असते... :)

अरेरे... फारच क्लिष्ट उत्तर आहे बुवा. काहीच झेपत नाहीये. निमिष दादांना कळेल बहुदा. चालु द्या! बाय द वे ..पुण्यात कोणी खरच ज्ञानी असतील तर मला पण सुचवा. पत्रिका दाखवण्यासाठी! "येथे काँप्युटर वर कुंडली काढुन मिळेल" टाईप्स नको. जरा डेडीकेटेड मनुष्य सुचवा.

In reply to by पैसा

दुबैतले ज्योतिषी अरबी पतरिका मागत्यात! ति कुटुन आनु त्ये बी सांगा मंग! आम्ची आप्ली कोलापुरी हाय्..म्ह्नुनश्यान पुन्यात शोधाया निगालोय. पुन्यात लई लई हुशार मान्सं हायत! म्ह्नुन पुनेकर ज्योत्शी सांगा. (व्यनि मध्ये सांगिट्ला तरि बी चालन..उगाच निमिष दादांचा धागा भरकटायला नको. :) ) :)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

जाई'जी.. आपणास खरोखर भविष्य जाणून घ्यायचे असेल.. व समस्यांचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर तुम्ही पुण्यात प्रख्यात ज्योतिषी आदिनाथ साळवी'जींची अपॉइन्टमेन्ट घ्या... यांचा कॉन्टॅक्ट नं. नेटवर सहजोपलब्ध असेल. ९९% लोकांच्या आयुष्यात आदिनाथ'जींनी सांगितल्याप्रमाणेच घटना घडलेल्या आहेत.. अर्थात एखाद्या समस्येवर त्यांनी सांगितलेला उपाय करणे तितकंच आवश्यक आहे! नाडीज्योतिषावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल.. तर माझ्याशी व्यनि. तून सम्पर्क साधा.. (अर्थात समस्या निवारणासाठी नाडीपट्टीत सांगितले गेलेले समस्या-परिहारार्थ-शान्ती उपाय देखील करणे अपरिहार्य आहे.) जाई'जी.. आपल्याला ज्योतिषाच्या बाबतीत खूप डीप'मध्ये जायचं नसेल तर मित्रमन्डळ चौकात -पाटील प्लाझा येथे 'प्रसाद गोखले' नामक प्रख्यात ज्योतिषी आहेत. फर्ग्युसन रोडवरती 'मन्त्री हाऊस' मध्ये "विजय पटवर्धन" नामक हस्तरेखातज्ञ आहेत. हे दोघेदेखील परफेक्ट ज्योतिष सांगतात. परन्तु समस्येवरचा उपाय तुम्ही केलाच पाहिजे..असा त्यांचा आग्रह नसतो * वर उल्लेखलेले ज्योतिषी हे खरोखरच रिलायबल असल्यामुळे त्यांची नावे दिलेली आहेत. जाई'जी..पुण्यात इतरही अनेक सिद्धीप्राप्त ज्योतिषी माहित आहेत. परम सिद्धीद्वारे डोळे मिटून एखाद्या व्यक्तीचे भूत-भविष्य-वर्तमान या त्रिकालाविषयी ते सहज सांगू शकतात. परन्तु आपले अश्या सिद्धीप्राप्त लोकांविषयीचे मत आणि त्यावरील विश्वास याबद्दल काहीही मला माहित नसल्याने यांची नावे टंकण्याचा मोह मी आवरला आहे. तसेच वरील ४ही ज्योतिषांचे कॉन्टॅक्ट नम्बर इथे देणे सहजशक्य आहे. पण ते मला उचित वाटत नाही.. कारण जे खरोखर गरजू लोक आहेत.. ते नेटवरती तो मिळवण्याचा प्रयत्न करतीलच..आणि एखाद्या ज्योतिषाचा नम्बर नेटवर सापडला नाही.. तर माझ्याशी व्यनि'तून सम्पर्क साधावा.. जाई'जी..बहुधा आपणास इतकी माहिती पुरेशी असावी.. गरज वाटल्यास अधिक माहितीसाठी व्य.नि. तून सम्पर्क साधावा... धन्यवाद!!!

In reply to by मृगनयनी

उत्तम. दोनेक भविष्य सांगणार्‍या लोकांबद्दल समजले. छान वाटलं. एक बारीक प्रश्न : या परफेक्ट ज्योतिष सांगणार्‍या लोकांना कुठे कुठे बॉंबस्फोट होणार वगैरे कसं समजंत नाही बरें ? असो. भारताला अशा लोकांची अतोनात गरज आहे हे नमुद करु इच्छिते.

In reply to by शिल्पा ब

या परफेक्ट ज्योतिष सांगणार्‍या लोकांना कुठे कुठे बॉंबस्फोट होणार वगैरे कसं समजंत नाही बरें कै च्या कै म्हणजे ज्योतिषांना ह्या घटना दिसल्या म्हणजे त्यांनी त्यांचे कामधंदे सोडून बोंब निकामी करायला धावत बसायचे का काय ? बॉम्बस्फोट कुठे होणार हे पोलिसांना पण आधी समजते.. ज्योतिषी कशाला हवाय .. काय फरक पडतो.. हे म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाला हाताने भरवता येत.. म्हणून दुनियेतल्या सगळ्या मुलाना भरवण हि तुमचीच जबाबदारी आहे हे सांगण्यासारखं झालं

In reply to by स्पा

म्हणजे कसाब येणार हे मुंबै पोलिसांना आधीच माहीत होते? बाकी त्या कसाबची कुंडली कोणितरी तपासा...ग्रह उच्चीचे आहेत त्याचे..."गुरु"ची पण पत्रिका तपासायला हवी

In reply to by टवाळ कार्टा

स्पा म्हणताहेत म्हणजे असेलही. जनतेत असे उच्च विचारांचे लोकं आहेत म्हणुन बरं नैतर काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाही.

In reply to by मृगनयनी

या आदिनाथ साळवींनी २००४ साली जाहिर भविष्य पेपरमध्ये प्रसिद्ध केले होते.त्यात भाजप आघाडीचे सरकार येणार असे सांगितले होते(जे प्रसिद्धीमाध्यमातील लोक छातीठोकपणे सांगत होते आणि सामान्य जनतेचाही असाच अंदाज होता) आणि महाराष्ट्रात उध्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे भाकित वर्तवले होते.अर्थात प्रत्यक्षात काय झाले ते सांगायलाच नको.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर श्री. साळवींचे "आपला अंदाज कसा थोडक्यात(?) चुकला हे जाणून घेण्यासाठी ८० रुपयाचे पुस्तक प्रसिदध झाले आहे,ते घ्या" अशा आशयाचे निवेदन वर्तमानपत्रात आले ! म्हणजे 'गिरे तो भी टांग उपर'!

मृगनयनी यांनी दिलेले विवेचन अभ्यासपूर्ण आहे. विशेषत: विपरीत राजयोगाबाबतचे विवेचन समर्पक आहे. मी माझी कांही मते खाली मांडत आहे. १) दहावे स्थान हे कर्म स्थान. यावरून नौकरी, व्यवसाय, उपजीविकाचे साधन इ. जाते. थाचप्रमाणे या भावाला असपद स्थान असेही म्हटले जाते. म्हणजे चरितार्थाचे साशन करतांना कोणत्या प्रकारचा दर्जा अथवा मान मरातब मिळतो हेही पाहिले जाते. २) सहावे स्थान हे जरी रोग, रिपु स्थान असले तरी. भावात भाव या पद्धति नुसार ते दशमाचे भाग्य स्थान होते. त्यावरूनही नौकरी व ती मधील शुभाशुभ फले पाहता येतात. षष्ठेश रवि व्ययात (बारावे स्थान) असेल तर सामान्यतः नौकरी व्यवसायात कांहीसे त्रास, अपयश किंवा सफलतेत विलंब दिसून येतो. परंतु रवि - बुधाची अंशात्मक स्थिती पाहिली पाहिजे तरच निश्चित अनुमान निघू शकते. रविजवळचा बुधअस्तंगत असण्याचीही शक्यता आहे. ढोबळमानाने येथे रवि कांही प्रमाणात अत्मविश्वासाचा अभाव दर्शवतो. ३) तृतिय स्थानांत उच्च चंद्राच्या सहवासातील गुरु दशमाच्या दृष्टीने काय फल देईल हे इतके ढोबळ मानाने सांगणे थोडे कठिण आहे. कारण तृतिय स्थान व पंचम ही स्थाने दशमाला विरोध करतात. मात्र येथे गुरू भाग्यस्थानाला पहात आहे, त्या मुळे भाग्य स्थानाची फले सुधारण्याची शक्यता आहे. जन्म कुंडली संपूर्ण अंशात्मक असेल तर अधिक अभ्यास करता येतो. निदान चंद्राचे नक्षत्र - चरण तरी द्यावयास हवे होते.

In reply to by अरुण वडुलेकर

खुप दिवसांनी आपले आगमन पाहून अतिशय आनंद झाला! माहितीपूर्ण प्रतिसाद! रवि - बुधाची अंशात्मक स्थिती पाहिली पाहिजे +१ नक्षत्र चरण कळल्याशिवाय कोणत्याही मतावर येणे अवघड. आवांतरः तृतिय स्थानांत उच्च चंद्राच्या सहवासातील गुरु कुटुंबा विषयी लहान भावा बहिणीं विषयी विचार चांगले असणार का?.

मानव आता मंगळावर जाईल. तेथे वस्ती लोकसंख्या वाढेल. तेथे नोकर्‍यांची कमतरता जाणवेल. तेव्हा तेथील मानव "नोकरीसाठी पृथ्वी कोणत्या स्थानात आहे?" असा प्रश्न विचारेल काय?

In reply to by भरत कुलकर्णी

मानव आता मंगळावर जाईल. तेथे वस्ती लोकसंख्या वाढेल. तेथे नोकर्‍यांची कमतरता जाणवेल. तेव्हा तेथील मानव "नोकरीसाठी पृथ्वी कोणत्या स्थानात आहे?" असा प्रश्न विचारेल काय?
अगदी अगदी सहमत आहे. तसेच मानव मंगळावर गेल्यावरती चतुर्थी / अंगारकी वैग्रे करून उपासाचा फराळ देखील करेल काय? असा देखील प्रश्न पडला आहे. उलट वारकर्णी

करीयरच्या दृष्टीने दशमस्थानाचा विचार करणे त्याच बरोबर दशमेश आणि दशमस्थानातले ग्रह यांचा एकत्रीत परिणाम पहाणे गरजेचे आहे. याशिवाय दशमेशाच्या बरोबर होणारे युतीयोग सुध्दा महत्वाचे. "तर ही व्यक्ती एक ऊच्च दर्जाची वक्ता/ प्रोफेसर/ज्योतिषी/अ‍ॅन्कर / स्वतःचे कोचिन्ग क्लास चालवणारी / समुपदेशक/ धर्मोपदेशक असू शकते. तसेच व्ययातल्या बुधादित्य-योगामुळे या व्यक्तीला परदेशात जाऊन आपले 'थिसेस' मांडण्याचा देखील योग येऊ शकतो." हे अगदी बरोबर. केवळ राशी न पहाता दशमेश कोणत्या नक्षत्रात आहे आणि त्याचा स्वामी वक्री नाहीना हे पहाणे महत्वाचे. द्शमेश वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असता नोकरी/व्यवसायात स्थिरता येणे अवघड असते. दशमेश गुरु तृतिय स्थानात असल्याने त्याच प्रमाणे मीन लग्नला वृषभ राशी तृतिय स्थानात असल्याने व ती स्थीर राशी असल्याने नोकरी व्यवसायात स्थिरता असेल. याच बरोबर नोकरी व्यवसायाच्या निमीत्ताने लहान प्रवास घडणे अपेक्षीत आहे. हा जॉब फिरतीचा नाही तरी पण फिरणे व्हावे.

In reply to by नितीनचंद्र

केवळ राशी न पहाता दशमेश कोणत्या नक्षत्रात आहे आणि त्याचा स्वामी वक्री नाहीना हे पहाणे महत्वाचे. द्शमेश वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असता नोकरी/व्यवसायात स्थिरता येणे अवघड असते.
सहमत नितीन'जी.. मुळात "गुरु" वृषभेत आहे.. हे जरी कळले असले.. तरी तो कृत्तिकेचा आहे की रोहिणीचा आहे की मृगातला आहे.. यावरही बर्‍याच गोष्टी अवलम्बून असतात. कारण कृत्तिकेचा नक्षत्रस्वामी- सूर्य, रोहिणीचा स्वामी- चन्द्र .. पण रोहिणी शनीच्या फेवरमधली!.. आणि मृगेचा स्वामी- मंगळ.. !!! काही ठिकाणी वृषभेचा म्हणजे शत्रूराशीतला गुरु हा नीचीचा मानला जातो. परन्तु त्याच्याबरोबर चन्द्रही आहे..अर्थात अंशात्मक कुन्डलीशिवाय कुणाचे प्राबल्य किती.. हे ठरविणे खरोखर अवघड आहे. त्यामुळे गुरुपेक्षा चन्द्राचे प्राबल्य जास्त असेल तर जोडीदारामुळे या व्यक्तीचे भाग्य फळफळेल त्यातून या व्यक्तीचे जन्मनक्षत्र जर रोहिणी असेल आणि शुक्रही उच्च किन्वा मित्र राशीत सुस्थानी असेल.. तर या व्यक्तीवर गुरु आणि शुक्र या दोहोंची कृपा बरसेल!!! .. अर्थात इतर ग्रहस्थिती समोर आल्याशिवाय अजून विस्तृत आणि परफेक्ट सांगू शकत नाही!!! :)

नोकरीचे स्थान पहिले. मग ती आल्यामुळे दुसरे पत्नीचे, ती आल्यामुळे मग तिसरे पोरांचे..कुंडली बाजूला ठेवा, डायपर बदला.. चौथे मित्रांचे आणि शत्रूंचे. काही विशिष्ट मित्र असल्यावर वेगळे शत्रू लागत नाहीत. आईवडिलांना पाचवे सहावे यांपैकी एक देण्यास हरकत नाही. "बुध" म्हणजे "शहाणा". तो असल्या कुंडलीबिंडली भानगडीत येणारच नाही. त्याला इथे स्थान असेल असं वाटत नाही. "गुरु"चे स्थान शाळेच्या काळात सर्व क्रमांकांवर (१ ते ८ पिरेडांवर) असते. शाळा सुटल्यावर ते रिकामे होते. इत्यादि.

ज्यांचे करिअर हे त्यांच्या शरीरावर अवलंबून आहे अश्यांचे काय ? प्रथम स्थान पहावे कि दशम ? (ज्यांचे करिअर हे त्यांच्या शरीरावर अवलंबून आहे = गायक , खेळाडू इ. )

नोकरीचे स्थान फार लांब असू नये. सहा किंवा दहा मिनिटांवरच असावे. तसे नसल्यास कष्टदायक प्रवासाचे योग येतात! :P

भावात भाव काय (नशीब तिच्याआयला बहीणीत बहीण असं काही नसतं ;) ;-) :wink: ), विपरित राजयोग काय....वक्री, दशमेश एक ना दोन..ढ्यांव ढ्यांव ढ्यांव..नुसत्या ज्योतिषांकडुन नळ गळावा तसे ज्योतिष विद्या गळतीये... मरतय आता..घे पॉपकॉर्न आनि पळ पटकन.... - (पोपटाकडुन भविष्य विचारणारा) वाट्या...

संपादक महोदय, कृपया विषयाशी संबंधित नसलेले प्रतिसाद काढून टाकता येतील का? (या प्रतिसादासहीत)

संपादक महोदय, कृपया विषयाशी संबंधित नसलेले प्रतिसाद काढून टाकता येतील का? (या प्रतिसादासहीत) -निनाद सहमत!

मृगनयनी खालील ग्रहस्तीथी असता जातक कुठल्या क्षेत्रात नौकरी / व्यवसाय करेल. वृषभ लग्न - केतू रोहिणी ४- मंगल वक्री - आश्लेषा ६ - शनि वक्री ७ - राहू ९ - चंद्र, श्रावण १० - नेप ११ - सूर्य , बुध वक्री, हर्शल १२ - शुक्र भरणी, गुरु अश्विनी

In reply to by बापु देवकर

मृगनयनी खालील ग्रहस्तीथी असता जातक कुठल्या क्षेत्रात नौकरी / व्यवसाय करेल. वृषभ लग्न - केतू रोहिणी ४- मंगल वक्री - आश्लेषा ६ - शनि वक्री ७ - राहू ९ - चंद्र, श्रावण १० - नेप ११ - सूर्य , बुध वक्री, हर्शल १२ - शुक्र भरणी, गुरु अश्विनी
बापू देवकर'जी.... आपण जी ग्रहस्थिती दिलेली आहे.. त्यात काहीतरी गल्लत होते आहे.... म्हणजे... लग्न- वृषभ असेल आणि लग्नी केतू 'रोहिणी' नक्षत्रात असेल.. तर राहू- बायडिफॉल्ट 'वृश्चिक' राशीत- ज्येष्ठा, अनुराधा यांपैकी एका नक्षत्रात असावयास हवा... परन्तु वर आपण राहु - ७ व्या - म्हणजे 'तुळ' राशीत असल्याचे लिहिलेले आहे... जे की पर्यायाने चुकीचे आहे. त्यामुळे बाकी ग्रह आणि त्यांच्या आपण दिलेल्या राशी.... याबद्दल शन्का निर्माण होते.... तसेच -* ४- मंगल वक्री - आश्लेषा * .. या एका पॉईन्टमुळे हे निश्चित आहे.. की मन्गळ हा आश्लेशा नक्षत्रात- पक्षी: कर्क राशीत वक्री आहे. ,, म्हणजे जे ४,६,७,९,१०,११,१२ .. हे नम्बर जे आपण दिलेत.. ते स्थानांचे नम्बर नसून राशींचे आहेत. म्हणजे कन्येत -पन्चमात शनी वक्री आहे.. जातकाची जन्मराशी 'धनु' आहे... जन्मनक्षत्र- 'श्रवण' आहे...असे.. परन्तु शेवटी - *१२ - शुक्र भरणी, गुरु अश्विनी * - हे जे काही लिहिले आहे... ते अजिबात समजण्यासारखे नाही.... कारण १२ या राशीच्या पुढे म्हणजे 'मीन' राशीच्या समोर आपण शुक्र हा ग्रह लिहुन.. त्याचे नक्षत्र मात्र - 'मेष' राशीतील 'भरणी' हे लिहिलेले आहे. तीच गोष्ट 'गुरु' ग्रहाची ... 'गुरु' जर मीनेत असेल.. तर तो 'अश्विनी' नक्षत्रात असूच शकत नाही.... त्यामुळे येथे कृपया उचित ग्रहस्थिती नमूद करणे इष्ट व सुसंगत ठरेल....... :)

In reply to by मृगनयनी

त्याचबरोबर.. अजून एक गोष्ट येथे सान्गाविशी वाटते.. की 'चन्द्र' जर ९ या राशीत- पक्षी: धनु राशीत असेल.. तर नक्षत्र- मूळ, पूर्वाषाढा किन्वा उत्तराषाढा यांपैकीच एखादे असले पाहिजे. "श्रवण" नक्षत्र हे 'मकर' राशीत येते....... जे की आपण वरती ""९ - चंद्र, श्रावण"" असे लिहिलेले आहे.......जे चुकीचे आहे.... कृपया नोन्द घ्यावी.

माफ करा आधी हे लिहिले नाही…पन हे आकडे राशीदर्शक नसून , स्थानदर्शक होते. परत सुधारून देत आहेत वृषभ लग्न - केतू रोहिणी सिंह - मंगल वक्री तूळ - शनि वक्री वृश्च्किक - राहू मकर - चंद्र, श्रावण कुंभ - नेप मीन - सूर्य , बुध वक्री, हर्शल मेष - शुक्र भरणी, गुरु अश्विनी