नाथसंप्रदाय (२)
नाथसंप्रदाय (२)
आज पंथातील 'शाखाभेद" व 'प्रभाव आणि कार्य" यांची ओळख करून घेऊ.
शाखाभेद :
प्रत्येक महत्वाच्या विचारसरंणीत स्थल, काल, व्यक्तिविशेष व व्यक्तिविचार यांमुळे भेद निर्माण होतात. नाथपंथातही अशा बारा शाखा निर्माण झाल्या. .या शाखा गोरक्षनाथापासूनच प्रचलित आहेत. यांमध्ये फार तात्विक मतभेद आहेत असे म्हणावयाचे कारण नाही व असे भेद इथे नोंदविणे शक्यही नाही. मी आज फक्त नाव, मूल प्रवर्तक,स्थान व प्रदेश देत आहे. (चौकटीत कसे देतात ते अजून शिकावयाचे आहे!)
(१) सत्यनाथी सत्यनाथ पाताल-भुवनेश्वर ओडिसा
(२) धर्मनाथी धर्मराज दुल्लु लक नेपाळ
(३) रामपंथ रामचंद्र चौकतप्पे पंचीरा गोरखपूर
(४) नाटेश्वरी लक्ष्मण गोरखटीला पंजाब
(५) कन्हड गणेश मानकरा कच्छ
(६) कपिलानी कपिलमुनी गंगासागर बंगाल
(७) बैरागपंथ भर्तृहरी रत ढोंडा पुष्कर (राजस्थान)
(८) माननाथी गोपीचंद जोधपूर महामंदीर राजस्थान
(९) आईपंथ भगवती विमला जोगी गुंफा बंगाल
(१०) पागलपंथ चौरंगीनाथ
(११) ध्वजपंथ हनुमान
(१२) गंगानाथी भीष्म पितामह जखवार पंजाब
वरील माहितीचा फारसा उपयोग नाही. एवढेच कळते की प्रसार फक्त उत्तर हिन्दुस्थानात आहे.अफगाणिस्थान पासून बंगाल व नेपाळ पासून विदर्भापर्यंत सर्वत्र नाथ संप्रदायाचा झेंडा फडकला होता. दक्षिणेतील पंथाला शैवसिद्ध म्हणतात. दोहोंची विचारसरणी सारखीच आहे. काही नावेही दोन्ही पंथांत समान आहेत.वामाचारी तांत्रिक साधनेचा सामना करणे हेच प्रमुख ध्येय.
प्रभाव आणि कार्य :
वज्रयान, सहजयान,शाक्त, कापालिक इ. वामाचारी तंत्रसाधनांविरुद्ध गोरखनाथाने आंदोलन उभे करून धर्माचे शुद्धिकरण केले. पण पुढे त्तंत्रिक नाथपंथात घुसले व त्यांनी आपल्यापूर्वीच्या पद्धती या पंथातही सुरूच ठेवल्या. त्यामुळे गोरखनाथाचा खरा वारसा चक्रधर, ज्ञानेश्वर,अल्लमप्रभू, कबीर, नानक यांसारख्या संत पुरुषांनीच चालू ठेवला असे म्हणावयास पाहिजे.
वामाचारी साधनांविरुद्ध लढा उभारून सात्विक धर्मधारणेला पाठिंबा देऊन नाथपंथाने भारतातील वातावरण शुद्ध ठेवण्याचे बहुमोल काम १०व्या-११व्या शतकांत केले. आत्मप्रामाण्याची प्रतिष्ठा, चित्तशुद्धीवर भर, बाह्यावडंबराला विरोध, शरीराचे साधनेतील महत्व, ही या पंथाची वैशिष्ट्ये. योगाला महत्व दिले तरी भक्तीला
नाकारले नाही. चित्तशुद्धीबरोबर आचारधर्मालाही महत्व दिले. स्त्रीला साधनेचे स्वातंत्र्य दिले पण मठात अनाचाराचा प्रवेश होऊ दिला नाही.
हा पंथ सर्वसामान्य जनतेला जवळचे मानत असे. शंकराचार्यांचा धर्मप्रसार उच्चवर्णीयांच्या पुरता मर्यदित होता. त्यांच्या मठात सामान्य जनतेला प्रवेश नव्हता म्हटले तरी चालेल. त्यांनी लांबून दर्शन घ्यावयाचे.
उलट नाथपंथीय जोगी सर्वसामान्यांत मिळून मिसळून असत. बहुतेक गावागावातून वस्ती करत. सर्वांकडचे अन्न त्यांना चालत असे. धार्मिक समानता ही या पंथाची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणावयास पाहिजे.
निर्गुणोपासना ही कबीर व नानक यांची शिकवण नाथपंथातून आलेली. महाराष्ट्रात गहिनीनाथ-निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वर अशी परंपरा असली तरी ज्ञानेश्वरांनी आपल्या सर्वसमावेशक भूमिकेनुसार शिवाबारोबर विठ्ठलाला महाराष्ट्राचा लोकदेव म्हणून स्विकारले व वारकरी संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान दिले. कर्नाटकात लिंगायतांनी अशीच विचारधारा स्विकारली.
आज दुर्दैवाने पंथाची स्थिती फार चांगली म्हणता येणार नाही. अनेक दोष पंथात शिरले आहेत. हजार वर्षांनी नवीन गोरक्षनाथाने परत अवतार घेतला पाहिजे !
शरद
याद्या
7910
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
बैरागपंथ भर्तृहरी रत ढोंडा
लेखमाला आवडली.
भाग आटोपता घेतला.
धन्यवाद !
नाथपंथ
दत्तप्रभुंची महाराष्ट्राबाहेर
In reply to नाथपंथ by नीलकांत
दत्तप्रभुंची मंदीरे दक्षिणेत
In reply to दत्तप्रभुंची महाराष्ट्राबाहेर by मदनबाण
एक निरंजन को मै जानू गुरुजी
गुरूजी मै तो एक निरंजन ध्याऊ जी
In reply to एक निरंजन को मै जानू गुरुजी by प्यारे१
नाथसंप्रदाय
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
(No subject)
लेखमाला आवडली. प्रतिसादही
छान ओळख
साबरी मंत्र