अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीची उजळ बाजूच ठाऊक असते पण या उजळतेची काळी पार्श्वभूमी आपल्याला कळली तर किती धक्का बसतो याची उदाहरणे इथे देत आहे.
http://beftiac.blogspot.com/
एका चित्रपटाच्या निर्मितीखर्चात दोन चित्रपट
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_21.html
अशोक कुमार यांनी चित्रपटनिर्मिती करायला घेतली तेव्हा त्यांनी आपल्याच राज्यातील एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाला संधी दिली. त्या दिग्दर्शकानेही या संधीचे सोने केले आणि सुंदर चित्रपट बनविला परिणीता पण त्याबरोबरच अशोककुमार यांनी चित्रपटनिर्मितीकरिता दिलेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत स्वत:च्या आवडीचा अजून एक चित्रपट अशोककुमार यांच्या पैशातूनच बनविला जो प्रचंड गाजला. त्यांनी खोटे हिशेब दाखवून परिणीताच्या निर्मितीखर्चात गाळा मारून अशोक कुमार यांची फसवणूक करून हे कृत्य केले होते. दिग्दर्शक बिमल रॊय यांच्या दो बिघा जमीन या चित्रपटाची ही चक्रावून टाकणारी निर्मिती कथा अशोक कुमार यांनी त्यांच्या जीवननैया या आत्मचरित्रात्मक पुस्तकात नमूद केली आहे.
डोळ्यात येते पाणी
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_633.html
१९६२ साली आपण चीन सोबत चे युद्ध हारलो तरी आपले जे जवान सीमेवर लढले त्यांचे मनोधैर्य उंचावण्याकरिता आणि जे रणांगणात शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सरकारी पातळीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या समारंभाला साजेसे एक गीत बसविण्याची जबाबदारी संगीतकार सी. रामचंद्र यांच्यावर देण्यात आली. हे गीत लता मंगेशकर गाणार हे निश्चित झाले तरी ते लिहीणार कोण हा प्रश्न होताच. तेव्हा सर्व नामवंत गीतकार चित्रपटासाठी गीत लिहीण्यात व्यग्र होते अचानक सी. रामचंद्र यांच्यासमोर कवी प्रदीप यांचे नाव आले. कवी प्रदीप यांच्या तत्वज्ञानानी भारलेल्या गीतांना व्यावसायिक चित्रपटात फारशी मागणी नव्हती त्यामुळे सी. रामचंद्रांनी त्यांचेकडून बरेच दिवसात कुठलेही गीत लिहून घेतले नव्हते. जेव्हा या सरकारी कार्यक्रमाकरिता गीताची मागणी रामचंद्रांनी प्रदीप यांचेकडे केली तेव्हा कवी प्रदीप उसळून म्हणाले, "मानधन मिळायचे असेल तेव्हा तुम्हाला माझी आठवण येत नाही आणि अशा फुकटछाप सरकारी कार्यक्रमाकरिता मी गीत लिहून द्यावे असा तुमचा आग्रह का? मी हे काम मुळीच स्वीकारणार नाही."
मोठ्या कष्टाने सी. रामचंद्र यांनी कवी प्रदीप यांची समजूत काढण्यात यश मिळविले आणि सरतेशेवटी त्यांच्याकडून एक लांबलचक गीत लिहून घेतलेच. ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंखमे भरलो पानी या गीताची ही सून्न करणारी बाजू काही वर्षांपूर्वी लोकसत्तात वाचली आणि एका वेगळ्याच अर्थाने डोळे भरून आले.
आता एक उलट उदाहरण (म्हणजे काळ्या प्रकरणाची रूपेरी बाजू)
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_1435.html
२००४ सालच्या विधानसभा निवडणूकीनंतर लोकसत्ता ने त्यांच्या वाचकांसाठी एक स्पर्धा घोषित केली सरकारकडून माझ्या अपेक्षा या विषयावर लेख लिहायचा. निवडक लेखकांना थेट मुख्यमंत्र्यांशी एक तास चर्चा करायची संधी असले भन्नाट बक्षीस होते. माझा लेख (http://www.loksatta.com/daily/20041224/lviv02.htm) ही निवडला गेला आणि जानेवारी २००५ मध्ये वर्षा बंगल्यावर श्री. विलासराव देशमुखांच्या माझ्या सह इतर आठ पत्र लेखकांनी भेट घेतली (http://www.loksatta.com/daily/20050121/mp03.htm). चर्चेच्या दरम्यान देशमुख साहेब अगदी रंगात येऊन एक किस्सा सांगू लागले.
ते म्हणाले, "तुम्हाला वाटतं, पण बरेचदा आम्हा राजकारणी लोकांना देखील नोकरशाहीचा भोंगळ कारभार दिसतो पण त्याविरुद्ध काही करता येत नाही. मागे एकदा मी शिक्षणमंत्री असताना माझ्या हस्ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झाला. पुस्तक मिळाल्याची पोच म्हणून त्या कार्यक्रमात चक्क विद्यार्थ्यांचा अंगठा उमटवला जात होता. चौथीच्या विद्यार्थ्याचा अंगठा का घ्यावा का लागतो? त्याला सही करता येत नाही का? आणि तसे असेल तर मग तो विद्यार्थी वाचणार तरी काय? तर हे सगळे असे असून ही मी संबंधित अधिकार्याला जाब विचारू शकलो नाही कारण मलाही मर्यादा होत्या आणि आहेत."
एवढे बोलून देशमुखसाहेब थांबले. सर्व पत्र लेखक थक्क झाले होते. स्वत: मुख्यमंत्री च प्रशासनाविरुद्ध बोलत होते ही अतिशय catchy बाब होती.
त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन त्यांना याच प्रकरणाची दुसरी बाजू ऐकविली ती अशी:-
मी म्हणालो, "सर, आपण जसे पुस्तक वाटप केले होते अशाच एका कपडे / अन्न वाटप कार्यक्रमात बिहार येथे मी एक निरीक्षक या नात्याने एका सेवाभावी सामाजिक संस्थेतर्फे काम पाहिले होते. या कार्यक्रमात देखील ज्यांना वस्तूचे वाटप करण्यात आले अशांपैकी अनेक लहान मुले व स्त्रिया यांना लिहीता वाचता येत असूनही आम्ही त्यांना स्वाक्षरी करू दिली नाही व त्यांच्या अंगठ्याचे ठसे च नोंदीकरता घेण्यात आले कारण या नव्याने अक्षर ओळख झालेल्यांना स्वाक्षरी करायला दोन ते तीन मिनीटे लागतात आणि वाटप ज्यांच्या हस्ते व्हायचेय अशा व्यक्ती आपल्या सारख्याच मोठ्या पदावरील असल्याने त्यांना फारसा वेळ नसतो. अंगठा लावण्याचे काम काही सेकंदात होते म्हणून ते जास्त व्यवहार्य ठरते. तेव्हा याचा अर्थ असा नव्हे की ज्या विद्यार्थ्यांना आपण पुस्तके वाटली ती निरक्षर होती. तरी कृपया आपण संबंधित अधिकार्यांविषयी कुठलाही आकस मनात बाळगू नये व त्यांची अडचण समजून घ्यावी ही विनंती."
माझ्या या उत्तराने सारेच चकित झाले व मुख्यमंत्र्यांनीही आपल्याला ही माहिती नवीन व मोलाची वाटली असल्याचे कबूल केले त्याचप्रमाणे ते वस्तुस्थितीशी सहमत झाले..
खरं कारण काय?
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_8212.html
नोकरीनिमित्ताने केलेल्या माझ्या बेळगावच्या वास्तव्यादरम्यान माझा सिमेन्स, मुंबईच्या एका अधिकार्याशी परिचय झाला. हे गृहस्थ (ह्यांच्या नावाची इनिशिअल्स एसबी. पुढे ह्यांचा असाच उल्लेख केला जाईल) मोठे रसिक आणि कलासक्त (आणि मुख्य म्हणजे देव आनंद चे ग्रेट फॆन) त्यामुळे आमच्या गप्पा मस्त रंगायच्या. कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींना ते जवळून ओळखतात हे मला त्यांच्याशी बोलताना समजले. त्याचे कारण विचारताच त्यांनी सांगितले ती अमूक एक गायिका - ती ह्यांची आत्या (इथे नाव लिहीत नाही पण पुढे जे वर्णन येईल त्यावरून चाणाक्ष वाचक ओळखतीलच म्हणा..).
आता एसबी साहेबांचा स्वभाव एकदम मनमोकळा त्यामुळे माझ्या मनात अनेक वर्षांपासून खदखदत असलेला प्रश्न त्यांना विचारावा असे मला वाटले. आणि अगदी सहजच बोलल्यासारखा मी त्यांना म्हणालो, "एसबी साहेब, तुमच्या आत्याचा आवाज अगदी हुबेहूब लता मंगेशकरांसारखा आहे, पण लताजींच्या तूलनेत त्यांनी फारच थोडी गाणी गायलीत. गेली अनेक वर्षे मी असं ऐकत / वाचत आलोय की लताजींनी राजकारण करून तुमच्या आत्याबाईंना पुढे येऊ दिलं नाही. याशिवाय काही काळापूर्वी वर्तमानपत्रात तुमच्या आत्याबाईंची मुलाखत वाचली तेव्हा त्यांनी या गोष्टीचा साफ इन्कार केलाय. त्या म्हणतात ’माझ्या व्यावसायिक पिछाडी बद्दल दुसर्या कुणाला जबाबदार धरले जाऊ नये. मी मागे पडले कारण माझे लग्न झाले, संसार चालु झाला. ज्याप्रमाणे एखादी नोकरी करणारी स्त्री लग्नानंतर प्रापंचिक जबाबदार्यांमुळे नोकरी सोडते तितक्याच सहजतेने मी गाणे सोडले’. मग आता तुम्हीच सांगा खरं कारण काय? तुमच्या आत्याबाईंची कारकीर्द नेमकी कशामुळे संपुष्टात आली?"
एसबी साहेब उत्तरले, "त्याचं असं आहे चेतन, ही दोन्ही कारणं तितकीच खोटी आहेत. खरी गोष्ट अशी की आमच्या आत्याचे नाव त्याकाळच्या एका नामांकित हिन्दी-मराठी चित्रपटांच्या संगीतकाराबरोबर (यांचंही नाव इथे मी लिहू शकणार नाही पण वाचक अंदाज लावू शकतात) जोडले जाऊ लागले होते व त्यात काही प्रमाणात तथ्यदेखील होते याची प्रचीती आल्यावर आत्याच्या यजमानांनी आमच्या आत्याचं गाणं बंद करायला लावलं. आता आमची आत्या मुलाखतीत तिची व्यावसायिक कारकीर्द संपुष्टात येण्याच हे खरं कारण कुठल्या तोंडानं सांगणार?"
हुशार विद्यार्थी (?)
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_8435.html
वर्तमानपत्रात कुठल्याही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल काही छापून आलं की माझी आई ते मला मुद्दाम वाचून दाखविते मग त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, त्या विद्यार्थ्यांना काहीच साधन उपलब्धता नसताना त्यांनी मिळविलेलं अपार यश आणि त्या तूलनेत माझ्याकडे सारं काही असताना मी कसा अपयशी वगैरे गुर्हाळ दोन चार दिवस तरी आमच्या घरी चालतंच.
एकदा असंच पेपरात नाव आलं कचरू वाघ या विद्यार्थ्याचं. या गरीब विद्यार्थ्याने दिवसभर कष्टाची कामे करून, रात्रशाळेत अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलं होतं. झालं.. कचरूच्या नावाचा जप आमच्या घरी चालु झाला. अर्थात ह्यावेळी जप दोन दिवसातच थांबला कारण वर्तमानपत्राच्या पुढच्याच अंकात बातमी आली ती अशी की कचरूने स्वत: पेपर लिहीलेच नव्हते तर स्वत:ऐवजी पूर्णवेळ शिक्षण घेतलेल्या एका हुशार अल्पवयीन विद्यार्थ्याकडून ते लिहून घेतले होते.
पुढे काही काळानंतर अशीच एका पुण्यातल्या विद्यार्थिनीची (तिचं नाव आता आठवत नाही) बातमी आली - ती सीए ची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची. तिचे लगेच सत्कार वगैरे ही झाले पण दोन दिवसानंतर उघड झालं की ती प्रत्यक्षात अनुत्तीर्ण झाली होती तरी तिने खोटे निकालपत्र वगैरे गोष्टी अगदी व्यवस्थित पैदा केल्या व सर्वांना दोन दिवस चकविले.
या सर्वांवर कडी म्हणजे विद्या प्रकाश काळे ही युवती. ही प्रत्यक्षात खरोखरच अतिशय हुशार आहे. आता ही साधारण पस्तीशीची असेल पण वयाच्या जेमतेम अठराव्या वर्षापासून ती चोर्या करण्यात पटाईत आहे. वेळोवेळी तुरूंगात ही गेली आहे तर अनेकदा पोलिसांना तिने गुंगारा ही दिला आहे. आता तिने स्वत:ची मोठी टोळीही स्थापन केली आहे. तुरूंगातील वास्तव्यात तिने आपल्या हुशारीच्या जोरावर कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. अर्थात वकील झाल्यावर ती पुढे अनेकदा पोलिसांकडून पकडली गेली असली तरी तिला फारशी कडक शिक्षा होऊ शकली नाही याचे सारे श्रेय तिच्या वकिली कौशल्याला जाते.
तिच्या विषयीची एक बातमी तुम्ही इथे वाचू शकता :-
http://72.78.249.126/esakal/20100522/5736895754452919648.htm
इतर अनेक चोर्यांप्रमाणे हिने वय देखील चोरलेले दिसतंय.. बातम्यांमध्ये वय कमी दाखवलंय..
http://www.punenews.net/2010/05/lawyer-woman-run-gang-arrested-for.html
http://www.expressindia.com/latest-news/woman-among-five-arrested-for-ro...
http://news.in.msn.com/crimefile/article.aspx?cp-documentid=3924613&pag…
http://news.indiainfo.com/c-83-144953-1263496.html
विद्याचा सुरूवातीच्या काळातील पराक्रम (मोटरसायकलकरिता लहान मुलीचे अपहरण):-
http://www.indianexpress.com/ie/daily/19971213/34750503.html
काव्या विश्वनाथनची वाङ्मयचोरीची कबुली
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_596.html
काव्या विश्वनाथन या किशोरवयीन भारतीय वंशाच्या लेखिकेने आपण वाङ्मयचोरी केल्याचे कबूल केले आहे. तिच्या 'हाऊ ओपल मेहता गॉट किस' आणि 'गॉट वाइल्ड अँड गॉट अ लाइफ' या पुस्तकाचे हक्क अमेरिकन प्रकाशन कंपनी लिटल ब्राऊनने पाच लाख डॉलरना खरेदी केल्यानंतर अनेक वृत्तपत्रांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली होती.
परंतु तिच्या या पुस्तकांचे मेगॅन एफ मॅककॅर्फ्टी यांच्या 'स्लोपी र्फस्ट्स' आणि 'सेकंड हेल्पिंग' या दोन्ही पुस्तकांशी सार्धम्य असल्याचे उघडकीस आल्याने काव्याने आपली वाङ्मयचोरी कबूल केली. परंतु, ते योगायोगाने घडून आले, शाळेत असताना ही पुस्तके वाचल्याने लिहिताना त्यातील भाग अनवधानाने आला, अशी पुस्तीही तिने जोडली.
ही वर्ष २००६ ची घटना आहे.
दैनिक लोकसत्तामधली बातमी इथे वाचा (प्रथम फॊन्ट लोड करून घ्या):-
http://www.loksatta.com/old/daily/20060427/mp05.htm
चतुर गुन्हेगाराने नामवंत महिला पोलीस अधिकार्याला चकविले.
http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_22.html
बिकीनी किलर या नावाने कुप्रसिद्ध असणारा चार्ल्स शोभराज गुन्हेगारी पेक्षाही जास्त स्मरणात राहिला तो त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळेच. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी चार्ल्स दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता तेव्हा त्याच्या संभाषण कौशल्याने साक्षात किरण बेदी देखील अतिशय प्रभावित झाल्या. त्यांनी त्याला त्याच्या ज्ञानाचा (?) प्रसार करण्यासाठी इलेक्ट्रॊनिक टाईपरायटरसह इतर अनेक अद्ययावत सुविधा तुरूंगात पुरविण्याची व्यवस्था केली. तरी बरं त्याकाळी संगणक किंवा इंटरनेट नव्हता नाहीतर या गोष्टीदेखील त्याला सहज मिळाल्या असत्या. प्रत्यक्षात काहीही लिखाण वगैरे न करता या महाभागाने तुरूंगातील आपलं वास्तव्य फक्त आरामदायी करून घेतलं. आपल्याला चार्ल्सने बनविले हे किरण बेदींच्या फारच उशिरा लक्षात आले.
आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली
http://beftiac.blogspot.com/2010/10/blog-post_26.html
२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?
अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले.
नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनी सवंगपणाची पातळी ओलांडली. जे नेते कायमच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून अधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला. सतरा पोलिसांचे बळी घेणार्या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही. विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने परिस्थितीमुळेच ते नक्षलवादी झाले आहेत. असे वक्तव्य करून पंतप्रधानांना नेमके काय सूचित करायचे होते? ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा सार्यांनीच शस्त्रे हाती घ्यावीत का, म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होईल? शिवाय नक्षलवाद्यांशी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढणार्या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय? पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा कॊंग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून राज्याला भरघोस मदत दिली जाईल. (वाचा लोकसत्ता दि. १२ ऒक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी) म्हणजे मतदारांनी दुसर्या पक्षाला मत देऊन सत्तेवर बसविले असते तर केन्द्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार होते असाच अर्थ या विधानातून निघत नाही का? आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजुला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॆकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे होते काय?
अर्थात १३ ऒक्टोंबर २००९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधानांच्या या वक्तव्याने आपली जादु दाखवलीच आणि कॊंग्रेस आघाडी पुन्हा एकदा जोमाने राज्यात सत्तेवर आली.
वाचने
13685
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनेकदा आपल्याला एखाद्या
तुमच्या सोयीप्रमाणे द्या.
In reply to अनेकदा आपल्याला एखाद्या by सुहास झेले
मारलंत बुच त्याला..... अहो,
In reply to तुमच्या सोयीप्रमाणे द्या. by चेतन सुभाष गुगळे
अहो, पुन्हा तुम्ही त्यांचं
या लेखाचे प्रेरणास्थान
In reply to अहो, पुन्हा तुम्ही त्यांचं by वपाडाव
ह्म्म! माहिती नसली किस्से
ह्म्म! माहिती नसली किस्से
छान लेख
HInt
In reply to छान लेख by समीरसूर
इतर किस्से
In reply to HInt by चेतन सुभाष गुगळे
मग उत्तर लक्षात आले असेलच.
In reply to इतर किस्से by समीरसूर
उत्तम
उत्तम
अजून थोडे स्पष्टीकरण
In reply to उत्तम by जाई.
सीए विद्यार्थिनीच स्पष्टीकरण
In reply to अजून थोडे स्पष्टीकरण by चेतन सुभाष गुगळे
घोटाळा झालेला आहे म्याडम....
In reply to सीए विद्यार्थिनीच स्पष्टीकरण by जाई.
त्या मुलीला दंड झाला नाही हे
In reply to घोटाळा झालेला आहे म्याडम.... by वपाडाव
वप्या, मुलींना कॉपी करताना
In reply to घोटाळा झालेला आहे म्याडम.... by वपाडाव
पुढे नेमकं काय घडलं असेल ते सांगता येणं कठीण
In reply to सीए विद्यार्थिनीच स्पष्टीकरण by जाई.
फॉर्च्युन म्हटले की मोठाले
तुमचा मुद्दा चूकीचा नाही.
In reply to फॉर्च्युन म्हटले की मोठाले by रेवती
>>निदान आता खरे कारण
In reply to तुमचा मुद्दा चूकीचा नाही. by चेतन सुभाष गुगळे
<< मुळात त्या SB न्नी
In reply to >>निदान आता खरे कारण by विश्वनाथ मेहेंदळे
म्हणुन आंतरजालावर असं लिहुन
In reply to << मुळात त्या SB न्नी by चेतन सुभाष गुगळे
एकदम बरोबर. त्यातूनही मी जर य
In reply to म्हणुन आंतरजालावर असं लिहुन by शिल्पा ब
वृथा चिंता करू नये
In reply to एकदम बरोबर. त्यातूनही मी जर य by सिद्धार्थ ४
ते तुम्हालाच ठाऊक
In reply to म्हणुन आंतरजालावर असं लिहुन by शिल्पा ब
तुम्ही कोणत्या पातळीचे लेखक
In reply to ते तुम्हालाच ठाऊक by चेतन सुभाष गुगळे
लायकी आधी स्वत:ची पाहा
In reply to तुम्ही कोणत्या पातळीचे लेखक by शिल्पा ब
माझ्या वर्गाची चिंता करायला
In reply to लायकी आधी स्वत:ची पाहा by चेतन सुभाष गुगळे
हो का?
In reply to माझ्या वर्गाची चिंता करायला by शिल्पा ब
निर्णय कोण घेतय? प्रतिक्रिया
In reply to हो का? by चेतन सुभाष गुगळे
प्रतिसादाला प्रत्युत्तर...
In reply to निर्णय कोण घेतय? प्रतिक्रिया by शिल्पा ब
छान किस्से आहेत. किस्से आणि
काव्या विश्वनाथन ही झेरॉक्स
किस्से रंगतदार!
अर्रर्रर्रर्र.....
अजून एक आठवडा थांबा
In reply to अर्रर्रर्रर्र..... by प्रदीप
(येत्या बुधवारी २८ सप्टेंबर
In reply to अजून एक आठवडा थांबा by चेतन सुभाष गुगळे
दोन धाग्यांच्या प्रकाशन
In reply to (येत्या बुधवारी २८ सप्टेंबर by वपाडाव
एव्हरी
आणि "ग्रेट" हा शब्द वगळला आहे
In reply to एव्हरी by नितिन थत्ते
ही पाहा..
In reply to एव्हरी by नितिन थत्ते
त्यामुळे लताजींसारख्या
धन्यवाद
In reply to त्यामुळे लताजींसारख्या by मराठी_माणूस
गॉसिप
व्वा: !
+१
In reply to व्वा: ! by परिकथेतील राजकुमार
कीप स्पेस
In reply to +१ by नितिन थत्ते
ब्रिटीश की बोर्ड
In reply to कीप स्पेस by प्रियाली
=)))))))))))
In reply to ब्रिटीश की बोर्ड by ३_१४ विक्षिप्त अदिती
आंग्ल कळफलक नेमका कसा ते दाखवा
In reply to ब्रिटीश की बोर्ड by ३_१४ विक्षिप्त अदिती
जवळजवळ असाच आहे
In reply to आंग्ल कळफलक नेमका कसा ते दाखवा by चेतन सुभाष गुगळे
बै बै!! कीत्ती कीत्ती
In reply to आंग्ल कळफलक नेमका कसा ते दाखवा by चेतन सुभाष गुगळे
मराठी भाषेतील शब्दांचे अर्थ माहीत करून घ्या.
In reply to बै बै!! कीत्ती कीत्ती by शिल्पा ब
लिखाण रंजकच.
प्रशंसेमुळे जबाबदारी अधिकच वाढली.
In reply to लिखाण रंजकच. by अप्पा जोगळेकर