Skip to main content

संस्कृत भाषा

लेखक महेश काळे यांनी शुक्रवार, 11/02/2011 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत. हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा

वाचने 23130
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

संस्कृत भाषा हा आपला पुरातन ठेवा आहे तो नष्ट होऊ नये असे मनापासून वाटते. मात्र अवगत नसूनही अवगत असल्याचे लिहिल्यास भाषा संवर्धनासाठी सरकारकडून कदाचित पुरेसे प्रयत्न होणार नाहीत असेही वाटते.

In reply to by आजानुकर्ण

सहमत. आपल्या सर्वच अमूल्य ऐतिहासिक ठेव्यांप्रमाणे संस्कृतचे संवर्धन हे एक इष्ट ध्येय आहे याबद्दल वाद नाही. मात्र त्यासाठी असली गिमिक्स वापरली जाऊ नयेत - ते योग्यही नाही, इष्टही नाही आणि त्याचा फायदाही नाही - असे मनापासून वाटते.

"ह्या प्रश्नाखाली दोन पेक्षा जास्त भाषा नोंदवू नयेत.त्या व्यक्तीच्या मातृभाशे व्यतिरिक्त इतर दोन च भाषा नोंदवायच्या आहेत. त्या अशा रीतीने नोंदवायच्या आहेत कि सर्वात चांगली बोलता येणारी व समजू शकणारी भाषा तसेच दुसर्याशी चांगल्या प्रकारे बोलता येणारी भाषा नोंदवावी. त्या व्यक्तीला त्या भाषा लिहिता अगर वाचता आल्या पाहिजेत असे नाही. त्या भाषे मध्ये ती समजुतीने आणि सहजतेने संभाषण करू शकला तरी पुरेसे आहे." हे प्रगाणाकांच्या सूचना पुस्तिकेत लिहिले आहे........

In reply to by पिलीयन रायडर

त्या व्यक्तीच्या मातृभाशे व्यतिरिक्त इतर दोन च भाषा नोंदवायच्या आहेत. हा अन्याय आहे. मला आणि माझ्या लहान मुलाना देखील किमान चार भाषा लिहिता बोलता वाचता येतात. ( मराठी , गुजराथी , इंग्लीश , हिंदी ) उर्दू समजते/बोलता येते. बांगला , मारवाडी , हरयानवी , पंजाबी , या भाषा बोलता येतात समजतात . माझ्या पत्नीला कच्छा , सिम्धी भाषा समजतात बोलता येतात. वरील सर्व भारतीय भाषा आहेत. भारतात अरबी कुठे बोलली जाते हे कोणी सांगेल का? अर्धमागधी पाली प्राकृत या भाषा मृत समजल्या गेल्या आहेत. संस्कृत मॄत घोषीत झाली म्हणून असा किती फरक पडेल?

भारताच्या घटनेप्रमाणे संस्कृत हीदेखिल एक राष्ट्रभाषा आहे. तेव्हा जर तिचे हे स्थान काढायचे असेल तर, घटनादुरुस्ती करावी लागेल, शिरगणतीच्या निष्कर्षावर हे अवलंबून नाही! तेव्हा शिरगणतीत उगाच कैच्या काहीच सांगायची गरज नाही. बाकी सहजरावांचे संस्कृत आवडले!

धन्यवाद, महेश-जी! मला आणि माझ्या वयाच्या अनेक लोकांना शाळेत शिकलेली खूप संस्कृत सुभाषिते आठवतात आणि त्यांचा प्रसंगानुरूप केलेला उपयोग संभाषणात खूप मजा आणतो. मी सध्या जिथे काम करतो त्या देशाची आणि मलेशियाची भाषा जवळ-जवळ २० टक्के संस्कृत शब्दांनी सजली-नटली आहे. त्यावर मी इथे एक धागाही लिहिला होता. (त्यात भर घालण्यासाठी आणखी आठवलेले शब्दही आहेत, पण स्वसंपादनाची सोय बरखास्त केल्याने ते माझ्याकडे पडून आहेत!) असो. मला तर या 'गीर्वाणवाणी'चा (देवांच्या भाषेचा) अभिमान आहे आणि मी माझ्या सार्‍या मित्रांना याबद्दल नक्कीच सांगेन. परदेशस्थ लोकांना ही सोय आहे काय? मी इथल्या दूतावासात विचारून पहातो. आपल्यापैकी कुणाला माहिती असल्यास जरूर द्यावी. माझे आणखी एक आडनावबंधू (आपण महेश काळे) इथे आले याचा आनंद आहे. सुस्वागतम्.

इतर किंवा हिंदी भाषिक मित्र मंडळींना पाठवण्यासाठी हे हिंदी आवाहन वापरा. त्या खालीच ऋचाने दिलेले संस्कृत आवाहनही चिकटवले आहे. त्याखाली चुका काढलेले मराठीतले आवाहन आहे. तुम्हाला माहिती असलेल्या इतर भाषिकांना आपापल्या भाषेत याचे भाषांतर करण्यासाठी उद्युक्त करा! सर्व भाषेतील आवाहने पाठवू शकता! ------- एक अत्यधिक महत्त्वपूर्ण बात पर आपका ध्यान लाना चाहता हूं| भारतकी जनगणना आज महत्त्वपूर्ण अंतिम घड़ी मे आ चूकि है| कुछ्ही दिनों मे जनगणना स्वयंसेवक आपके पास आकर आपकी और आपके कुटूंब की जानकारी लेने के लिए पधारेंगे| आपकी मातृभाषा आपको इसमे दर्ज करानी होगी. यह तो आप कराएँगे. किंतु अवगत भाषाएं इस तालिकामे 'संस्कृत' लिखना न भुलाए| हम सब यह भाषा किसी न किसी रूप मे उपयोग मे लाते है| सुबह की पूजा हो या संध्याक़ालीन स्तोत्र पाठ. आप संस्कृत भाषा उपयोग करते है| आप किसी व्यक्तिसे मिलने पर जब 'नमस्ते' कहते हो तब आप संस्कृत का उपयोग करते हो| हर शादी और अन्य सारे पूजा-पाठोंमे इसी से व्यवहार होता है| भारत की सभी भाषाओं मे इसी से शब्द आते है| इन सब मे हम सहयोगी, है इसीलिए हमे संस्कृत अवगत है| इस भाषा को जीवित रखना अब आपके हातों मे है| पिछली जनगणना मे इसे अवगत रखने वाले सिर्फ चंद लोग ही थे| इसलिए उसे इस जनगणना मे 'मृत भाषा' घोषीत किया जा सकता है| संस्कृत मृत घोषित होने के बाद इस भाषा के उत्कर्षके लिये किसी सरकारी निधि का उपयोग नही होगा| अगली पीढ़ी के लिए ना ये प्राचीन भाषा होगी ना इसे प्राप्त करने के कोई साधन बचेंगे| इस पवित्र भाषा की आज की स्थिति हम ही ने बनाई है. आईये हम सब मिलकर इसे सुधारे| अगर यह आवाहन आपके सही लगता है तो कृपया आपके मित्रोंको भी भेजिए| --- अगर आप खुद आपके बच्चों को संस्कृत कथा पढ़कर सुनाना चाहते हो, तो यह देखिये http://seit.unsw.adfa.edu.au/staff/sites/hrp/personal/sanskrit/ यहां आपको संस्कृत शब्दकोश सहित संस्कृत 'वेतालपञ्चविंशति' मिलेगी| पढने लगेंगे तो जान जाओगे आपको संस्कृत अवगत है| ---- संस्कृत आवाहन एके अतीव महत्वपूर्णविषये युवानां लक्षवेधं कर्तुं इच्छामि। भारतस्य जनगणनाकार्यस्य अंतिमचरणं एते मासे अस्ति। तथा स्वयंसेवका: पुनः तव द्वारं आगमिष्यन्ति। युवानां एवं युवानां परिवारजनानां विज्ञप्ति पुनश्च एकवारं याचितव्या न्यसितव्या च। तदा यूयं विज्ञप्तिदानसमये युवानां मातृभाषा लिखध्वं किन्तु "अवगत भाषा" स्थाने संस्कृत भाषा अवश्य लिखध्वं। वयं अद्य अपि तां भाषां प्रयोज्यामः न पूर्णरूपमपि तु। सायंकाले पठितानि स्तोत्राणि वा गणेशोत्सवे वर्तितानि सहस्रावर्तनानि तथा विवाहेषु उक्तानि मंगलश्लोकानि वयं जानामः क्वचित कण्ठस्थानि अपि सन्ति। अस्या: भाषाया: अवस्थानं अस्माकं हस्ते एव अस्ति। गत सर्वेक्षणे संस्कृतज्ञानां संख्या केवलं क्वचित्सहस्रा अस्ति स्म। अतः एता भाषा मृता इति घोषितव्या। विपरिते, अरबी, फारसी ज्ञातानां सन्ख्या विपुलास्ति। अस्य कारणं इति अस्ति भारतदेशे केषु राज्येषु निर्णयपूर्वकं ता: भाषा: न्यसिता:। यदि एका भाषा मृता इति घोषिता तर्हि तस्या: उत्कर्षार्थं क्वापि निधी न देयं। तदा अस्माकं एता पुराभाषा कालपटले लुप्ता भविष्यति। युवानां निर्णयपूर्वकानि प्रयत्नानि एतां भाषां जीवयितुं शक्नुवन्ति। - ॠचा --- मराठी आवाहन एक महत्त्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा. पूर्ण जरी नाही, तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत. तुम्ही कुणी भेटल्यावर 'नमस्ते' म्हणता तेव्हा संस्कृत वापरता. ही भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवून ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. भाषा मृत घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा! --- जर तुमच्या मुलांच्या कानावर संस्कृत पडावे असे वाटत असेल तर हे पाहा http://seit.unsw.adfa.edu.au/staff/sites/hrp/personal/sanskrit/ येथे संस्कृत शब्दकोशा सहीत संस्कृत 'वेतालपञ्चविंशति' मिळेल. वाचू लागा, तुमच्या लक्षात येईलच की तुम्हाला संस्कृत येते! एका दिवशी फक्त एकच गोष्ट.

In reply to by गुंडोपंत

नुस्ती ढकलपत्रे पाठवण्यापेक्षा, त्यातील भावनांशी किमान प्रामाणीक राहून मनापासुन प्रयत्न करणे चांगले. अर्थात जाणकारांकडून ही पत्रे तपासणे महत्चाचे आहे. तरीही अवगत भाषांच्या माहीतीवरुन संस्कृत भाषेला सरकार अडगळीत टाकणार आहे हे पटत नाही. तसे असेल तर संस्कृत भाषा संबधी सरकारी विभाग व इतर संस्थांनी याबाबत कायदेशीर प्रक्रिया करावी. असो हे पत्र, अजुनही टाईमपास ढकलपत्र वाटते आहे. ह्या धाग्यातुन संस्कृत भाषा थोड्या लोकांपर्यत अजुनही आहे, मृत नाही हेही कळले. शालेय शिक्षणामधे संस्कृत विषय बाद अजुन झाल्याचे कळले नाही त्यामुळे आता हा विषय (निदान माझ्यापुरता) पुरे.

In reply to by सहज

>>अर्थात जाणकारांकडून ही पत्रे तपासणे महत्चाचे आहे. अगदी सहमत. जास्तीत जास्त बिनचुक आवृत्ती लोकंपर्यन्त पोहचणे आवश्यक आहे.

In reply to by सहज

तरीही अवगत भाषांच्या माहीतीवरुन संस्कृत भाषेला सरकार अडगळीत टाकणार आहे हे पटत नाही. सहमत आहे. मलाही पटत नाहीये. तसेच या ढकलपत्रातून फार काही साध्य होईल असेही वाटत नाही. :( संस्कृत येण्यासाठी - वाचल्याने येत आहे रे आधी वाचलेची पाहिजे!! असे वाटते.

संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.
सध्या एक-दोन आठवडे घाईत आहे, पुढील उत्तराचे मराठी भाषांतर दिले नाही. येथील कित्येक सदस्यांना संस्कृत भाषा अवगत आहे, त्यांनी मराठीत भाषांतर करून येथेच द्यावे, ही विनंती. म्हणजे येथील थोड्या सदस्यांना अरबी-फारसी वगैरे अवगत असून संस्कृत अवगत नाही, त्यांना मराठीत वाचायला सोयीचे जाईल. (नाहीतरी यात मराठी शब्दांची भरणा आहे. संस्कृत-स्वभाषकाने लिहिलेली ही वाक्ये नव्हेत, मराठीभाषकाने "सम्प्रतिवार्ता: श्रूयन्ताम्" धर्तीवर लिहिलेले परिच्छेद आहेत. मराठीभाषक नसेल, भारतातल्या दुसर्‍या कुठल्या मातृभाषेचा संस्कृत जाणकार असेल, त्याला समजायला जडच जाईल.) - - - न मर्यादितुम् इच्छामि कस्यचिदपि वाक्स्वातंत्र्यम् । तथापि । जनगणनाप्रसङ्गे उत्तराणि सत्यानि एव ददातु, तानि रम्याणि भवेयु: न वा भवेयु: | अवगच्छामि यावदहं "[प्रथमभाषाभिन्ने] के भाषे अन्यतरे सुतरां ज्ञाते?" इति पृच्छन्ति । ये के ते भाषे, ते एव लिखितव्ये, इति प्रार्थना मे भवतश् चरणयो: । भारतशासनं करोति जनगणनां, तस्या अभिप्रायः सत्यपरिस्थितिज्ञानम् - ध्येयानि न । यानि ध्येयानि शिरोधार्याणि, न तु वर्तमानानि, तानि लिखितव्यानि ध्येयकल्प-आलेखेषु, गन्तव्यमार्गदर्शक-आलेखेषु । संस्कृतभाषाया: पठनपाठने भूयेयाताम् इत्येव धारणा मे । तथापि ज्ञातुम् इच्छामि "_अधुना_ सा भाषा सुतरां कतिपयानि जनानि जानन्ति?" इति । यथा : कुटुम्बेषु बालका: सुनियंत्रिता: सुदृढाश् च इति मम दृढा कामना । तथापि प्रार्थये - "सर्वम् व्यवस्थितं कुशलं कुटुम्बे" इति न लिखितव्यं ईप्सिततमम् । लिखितव्यं सत्यं यथा कथं वा भवेद् भवतः कुटुम्बम् _अधुना_ । ईमेल-पत्राणि पठामि कानि कानि दिने दिने - तत्र रुदन्ति केऽपि - न कुर्यात् चेत् तत्र संस्कृतभाषाया: उपसंख्यानम्, "मृता संस्कृतभाषा" इति घोषणां कुर्येयु: । अस्ति भो: कोऽपि भारतस्य शासने "मृतभाषाघोषणाविभागः" नामा? सविनयो, धनञ्जयः । - - -

In reply to by धनंजय

अतिशय सुरेख, टू-द-पॉइंट आणि साध्यासोप्या, सहज समजण्यासारख्या संस्कृतातील प्रतिसाद. आवडला. महाशय, आपले मराठीतले - आपल्या आणि माझ्याही स्वभाषेतले - लेखन बहुतप्रसंगी डोक्यावरून जाते, असा अनुभव आहे. मात्र यावेळचा आपला संस्कृतातील प्रत्युत्तरवजा प्रतिसाद - मला शालेय संस्कृत विसरून य वर्षे होऊन गेली असूनही - चटकन समजला. सबब, यापुढे आपण आपले लेखन संस्कृतातच करावे आणि संस्कृतापुरतेच मर्यादित ठेवावे, तसेच मराठीतून लेखन करण्याचे कटाक्षाने टाळावे, जेणेकरून आपण काय लिहिता ते समजणे सुकर होईल, अशी आपणांस कळकळीची विनंती. कृपाभिलाषी,