Skip to main content

आरक्षण!

लेखक अजिंक्य यांनी शुक्रवार, 02/05/2008 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षण! अतिशय ज्वलंत विषय!! तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं. पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर..... माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली. त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही. माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. पण, हे कितपत योग्य आहे? शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं. आरक्षण असायला काहीच हरकत नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा असावी. आरक्षण हे मुख्य शिक्षण पूर्ण करण्यासाठी असावं. उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा. नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक जागा बळकावून बसतील. कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण ....... मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे. यावर इतरांची मते आणि विचार जाणून घ्यायला आवडेल.

वाचने 43540
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by अजिंक्य

जर आरक्षणा चा लाभ मिळणारा आणि एखादा विना-आरक्षण अशा दोघांन समान गुण असतील, तर आरक्षणाचा मुद्दा यावा. नाहीतर, फक्त गुणांवर आधारित प्रवेश मिळावा. या विषयावर कधी फार विचार केला नव्हता. पण हे सर्वात जास्त पटणारे वाटते.

आरक्षण ही समस्या नाही, असूच शकत नाही. कारण, आरक्षण हा समस्या सोडवण्यासाठी काढलेला तोडगा आहे. खरी समस्या ही आहे की - १) ज्या लोकांना आरक्षणाची खरी गरज आहे, त्यांच्या ऐवजी ते इतरांनाच मिळते. कारण, आरक्षित यादीमध्येदेखील गुणांवर आधारित उप-यादी काढतात. त्यामुळे, ज्यांना आरक्षण मिळते, ते बव्हंशी जास्त गुण मिळवणारे असतात. (यावरूनच हे सिद्ध होते की, मागास जातीतील विद्यार्थ्यांमधेही गुणवत्ता असतेच. खरं म्हणजे, तथाकथित उच्चवर्णियांइतकीच असते.) २) आरक्षणामुळे, बर्‍याच वेळा (सर्व वेळेस नव्हे) गुणवत्ता नसणारी मुले प्रवेश मिळवतात, आणि इतरांचे, जे गुणवत्तावान असतात(यांत, मागासवर्गीयसुद्धा येतात) ते मागे पडतात. ३) ज्या जागी गुणवत्तेची खर्‍या अर्थाने गरज असते, अशा जागी तर आरक्षणामुळे जास्तच नुकसान होते. तात्पर्य :- आरक्षणाची गरज तर अजूनही आहेच. पण त्याचा ढाचा बदलणे आवश्यक आहे. (ताजा कलम :- गुण आणि गुणवत्ता यात, तसं बघायला गेलं तर बराच फरक आहे. पण आपल्याकडील शिक्षणव्यवस्थेप्रमाणे, गुणांवरूनच गुणवत्तेची पारख केली जाते. त्यामुळे, गुण आणि गुणवत्ता समानच समजणे आवश्यक आहे. अर्थात, माझ्या मते, त्यात फरक राहतोच. यासंदर्भात 'विकि'चे म्हणणे बरोबर आहे - एखाद्याची गुणवत्ता परस्पर गुणांवरून ठरवणे चूक आहे. पण त्यासाठी मूळ शिक्षणव्यवस्थेतच बदल होणे गरजेचे आहे. अर्थात, तसे आपल्या शिक्षणव्यवस्थेत आणखी बरेच बदल होणे गरजेचे आहे म्हणा!!) - अजिंक्य.

काय तर म्हणे स्वतःला प्रश्न विचारून पहा. कुठले प्रश्न . मागास जातीतील लोकांकडे गुणवत्त्ता नसते हे तुमच्या लिखाणावरून स्पष्ट होत आहे. आमच्या लिखाणावरून नाही. समजले का? आपला कॉ.विकि

आरक्षण हा विषय विविधांगी आहे. लिखाणात गोबेल्स तंत्र प्रणालीचा उपयोग करुन विद्रोह जागृत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने काही स्तरात होत असतो. विवेक जागृत ठेवण्यासाठी स्वतःशी अंतर्गत संघर्ष करावा लागतो. विद्रोह जागृत ठेवण्यासाठी इतरांच्यातील विवेक नष्ट करावा लागतो. मह्तप्रयासाने अनेक विवेकी लोकांनी फुगवलेला प्रबोधनाचा फुगा हा एक विद्रोही टाचणी लावून नष्ट करु शकतो. काही लोक व्यक्तिगत मानापमानाचा बदला घेण्यासाठी संपुर्ण समाजाला वेठीस धरतात. तसे करण्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा वापर ते करत असतात. शाळेतला एक किस्सा आठवतो . पेटवण्यासाठी काही वर्गबंधु याच नितीचा वापर करीत." अयौ बाळ्या . त्यो सक्या लई घान घान श्या देत व्हता तुपल्याला. आपन त नस्त ऐकुन घेतल बॉ." कि बाळ्याचा मित्र असलेल्या सक्याविषयी 'मित्रत्वा'ऐवजी 'शत्रुत्वा'ची भावना तयार झालीच समजा. तात्पर्य- विद्रोहाचा सकारात्मक वापर हा आत्मपरिक्षणासाठी होतो तर दुरुपयोग हा स्वार्थी लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी करतात. यासाठी वाहक म्हणुन अर्थातच तरुणांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आरक्षणावर मत मतांतरे होत राहतील . पण आपण आपल्या विवेकाचे रक्षण केले पाहिजे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

अतिशय संतुलित, वैचारिक आणि अभ्यासपुर्ण अशी प्रतिक्रिया! प्रकाशराव, हॅट्स ऑफ टू यू! आरक्षणाच्या बाबतीत दोन्ही बाजूनी (समर्थनिय आणी विरोधी) टोकाचे विचार समाजात हेतुपुर:सर पसरवले जातात. कारण...स्वतःची पोळी भाजुन घेणे! आपणच ठरवायचं नक्की काय योग्य आणि काय अयोग्य...भावनेच्या भरात नव्हे तर नीट विचार करुन!

आजच्या सुधारक चे अतिथी संपादक श्री टी बी खिलारे यांनी मिसळ पाव ला भेट दिली. त्यांचे मते इथे कुणी आजचा सुधारकचा जात आरक्षण विशेषांक वाचलेला दिसत नाही. सदर अंक रु. ७५ ला उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी इथे पहा प्रकाश घाटपांडे

एक डायालिसिस वर दुसर्याला आण़खी काही. भर्पुर जगा रे बाबानो . अजुन खुप जागा आहेत तुमच्यासाठि आरक्श्णाचे शिंग खुपसायला. घोडा पळाला. आता कसली चर्चा कर्ताय. आता ह्यात बदल होणे नाही. परिस्थितिला सामोरे जाय्चे. कडवट्पणा न बाळ्गता. तुमचे दुख्तेय. तुम्चे मलम तुम्ही शोधा की.एका चाकाने दुसर्या चाकाशी दुश्मनी करु नये. मेल ओपन साठि मलमाचे कोठार विनायक प्रभु

एक डायालिसिस वर तर दुसरा आणखी कशाने. दोन चाकात मारामारी लावुन तुम्ही मोकळे. भरपुर जगा रे बाबानो. अजुन बर्याच जागा शिल्लक आहेत आरक्श्णाचे शिंग घुस्वायला. उदा. सुलभ शॉचालय. ओपनवाल्यानो- घोडा पळाला. चर्चा करुन उपयोग नाही. आता ह्यात बदल होणे नाही. तुम्चे दुखतय ना? शोधा की मलम. कडवट्पणा न बाळ्ग्ता. मेल ओपन करिता मलमाचे कोठार, विनायक प्रभु

फक्त ऐकच गोष्ट सांगाविशी वाट्ते कि अमेरिकेत आरक्षण नाही म्हणुन ती ऐक सुपर पॉवर आहे, आणि जो पर्यंत भारतात आरक्षण आहे तो पर्यंत भारत सुद्धा कधीही सुपर पॉवर होऊ शकत नाही. निर्सगात कुठेही आरक्षण नाही, हे सगळ्यांना समजतो, पण ऊमजत नाही. Survival of the fittest....

अजिंक्य, एक उदा- एक गुजराती मुलगा , अजुन शुभ्-मंगल झालेले नाही..पण जेव्हा त्याची चर्चा होते, तेव्हा उदार मनाने ब्राम्हण समाजातील मुलीसाठी परवानगी दिली जाते. पण इतर समाजाचे नाव जरी घेतले तरी विविध पध्दतीने ब्लॅकमेल केले जाते आता मला सांगा : घरातील सुसंस्कृत, सुविद्य, लोक जातीवर अडुन बसतात, हट्ट करतात, मग हा जातियवाद हद्दपार कधी होणार? मग राजकारणी लोक त्याचे भांडवल करणारच की जो पर्यंत जातियवाद अस्तित्वात आहे, आरक्षण होणार!! [तो सतत पेटलेला तवा आहे, कोणीही पोळी भाजुन घेणारच की राव] खरी गरज शिकलेल्यांना शहाणे करण्याची आहे बाकी सर्व आपोआपच येईल.

आरक्षण विषया वरील बर्याच विरोधी प्रतिक्रीया वाचुन वाइट वाटले. बहुतेक जणाना आरक्षण या वीषयावर जास्त माहिती नाही. बहुतेकानी आरक्षणाच्या (त्याना भोगाव्या लागलेल्या) परीणामा विषयी लिहीले आहे. फक्त शैक्षणीकच नाही तर सर्व प्रकारच्या आरक्षणाची गरज सामाजीक समतोलासाठी निर्माण करण्यासाठी आवश्यक असुन जो समाज इतक्या टोकाच्या सामाजीक असमतोला साठि जबाबदार आहे, त्या समजाला, त्यातील प्रत्येक घटकाला, आरक्षणाचे परीणाम भोगावे लागतील. माझ्या कॉलेज प्रवेशा वेळी माझ्या भावना तीव्रपणे आरक्षणाच्या विरोधात होत्या, जश्या बर्याच जणानी दिल्या आहेत. त्यावेळी मलाही वाटले होते कि माझी सन्धी / जागा कुणा दुसर्याला, त्याची लायकी नसताना मीळत आहे. पण आज मला पटते की त्यावेळी मीच कमी पडलो होतो. आज थोड्या त्या विषया वरील वाचन व थोडा विचार केल्यावर मला आरक्षणाची आवश्यकता पटली आहे. आरक्षणाचा मला व माझ्या कुटुम्बाला कधीही फायदा होणार नसुनही मी पुर्ण पणे आरक्षणाच्या बाजुने आहे. आरक्षणाचा अप्रत्यक्ष फायदा आरक्षण नसलेल्या लोकाना सुद्धा खुप होतो. त्याना नवीन, चन्गल्या सन्धि शोधाव्या लागतात/ मिळतात. त्यान्चिही प्रगती होते. उदा. परदेशी शिक्षण, नोकरी. अथवा स्वदेशातच धन्दा, उद्योग. थोडे मागे पडलेल्याना अधीक कष्ट करण्याची इछया होते. आणी शेवटी, ज्याची जी लायकी असते, तो तसे जीवन जगतो. (फुटपाथ वरील फेरीवाल्याकडुन खरेदी करणार्याला, फुटपाथ वर चालायला जागा नाही अशी तक्रार करयचा अधीकार नाही. तसेच रस्त्यावर कागद, कचरा, पिचकारी टाकणार्याला परदेशाच्या तुलनेत भारतात कीती घाण आहे असे बोलायचा अधीकार नाही.) - विशयान्तरा पद्दल क्षमस्व. - नेत्रेश

जर कुणाला वारंवार अभ्यास (वाचन) करुन ९०-१००% गुण मिळाले तर तो हुशार असता तर काँम्प्युटर इंजिनीअरिंग शिकत असलेला तो/ती स्वतःचे प्रोजेक्ट स्वतः तयार करता, कुणा १०-१२ वी शिकलेल्यांकडुन करुन घ्यायला गेला नसता. माझा स्वतःचा अनुभव एक उच्च वर्णिय मुलगी V.B. चा प्रोजेक्ट शिक्षीकेने सांगीतल्या प्रमाणे पुर्ण केला, परंतू त्यामध्ये शिक्षीकेने मुद्दाम ठेवलेली "डेटाबेस कनेक्टीव्हिटि" करु शकली नव्हती. तिला तिच्या प्रोजेक्ट मधल्या प्रोजे़क्टचा उद्देश विचारला तर त्र सुद्धा तिला माहित नव्हते. असो... आरक्षण माझ्या मते सुद्धा नको, कारण आरक्षणाचा फायदा ज्यांच्या हातात पैसा व सत्ता आहे तेचे उकळत आहेत. ज्यांना गरज आहे ते आहेत तिथेच राहतात. आरक्षणाचा फी माफिचा फायदा राजकारन्याचे मुल, श्रीमंताचे मुल उपटत आहेत. गरीब तो एस्.सी असो वा ब्राम्हण ह्यांना मिळावयास हवा. मी स्वतः एस्.सी . आहे पण मला मनापासुन वाटते कि आरक्षण पुर्ण बंद करुन फक्त ज्याची शिक्षण घेण्याची ऐपत नाही त्याला सवलत द्यावी.

आरक्षण हटवा मोहिम राबवा

मित्रानो, एक इतिहास. अनेक शतके उच्च वणीयानी आरक्षण उपभोगले. सामाजिक "ऍडमिशन" मधे कमी गुण असूनही, त्यांना जागा मिळाली, पण इतरांना मिळू शकली नाही. उच्च वणीयांवर राग अजिबात नाही. पण, हे कितपत योग्य आहे? गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं. कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण ....... मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे.

अगदी बरोबर.... मला असे वाट्ते आरक्षणची गरजच नाही. अशाने खूप हुशार लोक मागे पडतात.. आरक्षणा साठी जात, आड्नाव बद्ललेले लोक ही आम्ही पाहीली आहेत..... असा भेदभाव असायलाच नको असे वाटते.

"आरक्षण" हे जातीय निकषांवर आधारित न राहता, आर्थिक निकषांवर आधारित असायला हवे. आजच्या जातिनिहाय समाजव्यवस्थेत, अनारक्षित म्हणुन गणला गेलेला ( की गंडला गेलेला ! :-? ) समाज तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करत आहे. :( . आजकाल तर, समाजातील एका मूलत: अनारक्षित प्रवर्गाला, "आरक्षित" करवुन घेण्यासाठी काही (देशद्रोही ! ? !)संघटना म्हणे "आत्मघातकी पथके" ही उभारत आहेत!!!! कुठवर चालणार हे ? सर्वसामान्य जनतेला भडकवुन, जातीय दंगली घडवुन आणणे, रस्ते अडवुन दगडफेक करणे, महापुरुषांच्या-संतांच्या मिरवणुकी अडवुन जाळपोळ करणे, ""आमच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुम्हाला सुरक्षित राहू देणार नाही"" अश्या धमक्या देणे, इ. इ. इ. "आरक्षण" तर केवळ एक कारण आहे. धूर्त राजकारणी मात्र त्याचा व्यवस्थित वापर करुन बहुसंख्य लोकांचे मत आपल्या बाजुने वळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण यात भरडला जाणार आहे तो "सर्वसामान्य समाज"च. मग भले तो आरक्षित असो किन्वा अनारक्षित! ""जातीय निकषांवर आधारित आरक्षण"" हे ६० वर्षांपूर्वी योग्य होते, असे म्हणता येइल. कारण तेव्हाचा समाज शिक्षणाच्या बाबतीत तितकासा जागरुक नव्हता. "निरक्षरता आणि गरीबी" यांनी ग्रासलेल्या विशिष्ट समाजाला तेव्हा "आरक्षणा"ची खरोखर आवश्यकता होती. त्यामुळे पण ६० वर्षांपासून साक्षरतेसाठी जागृत झालेल्या समाजाला, आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या समजाला.....जर आजही २१व्या शतकात आरक्षणाच्या कुबड्या लागत असतील तर खरोखर शरमेची गोष्ट आहे. आजच्या घडीला देशात आर्थिकदृष्ट्या मागासलेला आणि तरीही अनारक्षित असलेला समाज बर्‍याच प्रमाणात आहे, आणि तो वाढतो आहे. कित्येक वर्षांपासुन, "समता आणि प्रेम" या तत्वांचा पुरस्कार करणार्‍या समाजाची "समता" अशावेळी का बरे दिसत नाही? :-? शिकून , संघटित होउन,(आणि पैसा कमवून) जर पुन्हा पुन्हा आरक्षणासाठीच "संघर्ष" होणार असेल, तर तो समाज केवळ ""शिक्षित"" होईल, पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुळीच नाही. कारण या समाजात साहजिकच नीतिमत्तेचा अभाव असेल. पण हे कुठेतरी थाम्बवायलाच पाहिजे. समाजाला स्वार्थी बनण्यापासुन वाचवायला हवे. त्यामुळेच आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे, जातीय निकषांवर आधारित नको. जय हिन्द ! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||