Skip to main content

शार्दूल विक्रिडीत

शार्दूल विक्रिडीत

Published on शुक्रवार, 28/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
सिंहांची मदत घ्या तोल साधण्यासाठी. भारत सरकारचे केन्द्रातील माननीय मंत्री महोदय श्री जयराम रमेश यांच्या मते गुजरात मधले गीर अभयारण्यातील सिंह सुरक्षीत नाहीत. या मता मगची काही कारणे सापडू शकतील का? माझ्यामते खालील १) लवासा आणि आदर्श मध्ये स्वत:च्या आणि मित्र पक्षाची गोची केल्यानंतर आता बॅलन्सींग करण्यासाठी ही आगळीक झाली असेल. २) इतर कुठल्याही गोष्टींवर चतूर मोदी सापडत नसल्यामुळे टीका करण्यासाठी काही तरी कारण हवेच होते. ३) मोदी गीर चे सिन्ह हे गुजरात राज्याचे म्हणून प्रोजेक्ट करतात, आणि त्याला अमिताभसारख्या दिग्ग्जांची मदत घेतात. कुणी कडून तरी नरेंद्र मोदींना बदनाम केले की झाले.

याद्या 2308
प्रतिक्रिया 9

चुकुन लिन्क चिकटवण्याची राहून गेली. http://economictimes.indiatimes.com/environment/flora--fauna/ramesh-asks-modi-govt-to-part-with-some-gir-lions/articleshow/7373090.cms http://www.financialexpress.com/news/lions-fuel-tussle-between-jairam-ramesh-and-narendra-modi/742761/0

मोठ्या अपेक्षेने धागा उघडला.. आपण तर शाप गंडलो भाव.. बाकी जाणकारांच्या प्रतिसादांची वाट पाहतो.

अर्र! वेगळाच धागा निघाला. बाकी, जाणकार काय म्हणतात ते बघू. विकासदादा, कॉलिंग विकास दादा.

In reply to by प्राजु

बाकी, जाणकार काय म्हणतात ते बघू. विकासदादा, कॉलिंग विकास दादा. हा हा! माझा आणि गीरीच्या सिंहांचा अथवा तेथील राज्यकर्त्यांचा काही संबंध नाही! मला वाटते जयराम रमेश यांनी मोदींना आव्हान दिल्यावर मोदी काहीसे म्हणाले असावेत असे दिसतयं ;)
आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही जरी दोडके, जनतेने पुन्हपुन्हा निवडले सरकार चालवायला ||
कदाचीत मोदींना मराठी चांगले येत असावे, पण जयराम रमेशना येते का माहीत नाही, त्यामुळे अजून एक सोपे उत्तर त्यांच्याकडे आहेच ;)
नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने । विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेंद्रता ॥
:-)

In reply to by प्राजु

बाकी, जाणकार काय म्हणतात ते बघू. विकासदादा, कॉलिंग विकास दादा
असेच म्हणतो .. एकंच वादा .. विकास दादा !!!

दुवा पुनः पुन: वाचला. त्यात धागाकर्त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ कुठेही आढळला नाही! गीरमधील सिंहांची संख्या फक्त ४०० एवढी उरली असून त्यांच्यात आता (पारशांप्रमाणे) नजिकच्या नातेसंबंधात समागम होऊ लागले आहे. ज्याचे विपरीत परिणाम पुढील पिढीतील सिंहांवर होतात. हे टाळण्यासाठी गीरमधील काही सिंहांना मध्यप्रदेशातील (अन्य जातीतील सिंहांबरोबर) मिसळू द्यावे, असे जयराम रमेश यांचे म्हणणे दिसते. आता ह्या म्हणण्यात वैज्ञानिक तथ्य आहे किंवा नाही हे ठाऊक नाही. पण धागाकर्त्यांनी कैच्याकैच निष्कर्ष काढले आहेत, हे मात्र निश्चित!! चालू द्या....

गीरमधील काही सिंहांना मध्यप्रदेशातील (अन्य जातीतील सिंहांबरोबर) मिसळू द्यावे मध्यप्रदेशात सिंह आहेत असे कधी ऐकले नाही. त्यामुळे ही शक्यता दिसत नाही. गीरमधल्या चारशे सिंहांपैकी काही सिंहांना आणि सिंहिणींना मध्यप्रदेशात नेऊन ठेवले तर त्यांच्या आपसामधील इन्ब्रीडिंग जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे हा मुद्दासुद्धा तर्काला धरून नाही. सिंहांसाठी दुसरे घर (सेकंड होम) केल्यामुळे कदाचित साथीच्या रोगांपासून निदान एका भागातले सिंह वाचतील असा विचार असणे शक्य आहे. जयराम रमेशांच्या वक्तव्यात कुठेच मोदी किंवा गुजरात सरकारवर कसलाही आरोप केलेला नाही.

लवासा आणि आदर्श मध्ये स्वत:च्या आणि मित्र पक्षाची गोची केल्यानंतर आता बॅलन्सींग करण्यासाठी ही आगळीक झाली असेल
अशी गोची रमेश ह्यांनी चुकून करण्याची शक्यता जवळपास शून्य. तेव्हा बॅलंसिंग करण्याची त्यांना गरज आहे असे वाटत नाही.वाचलेल्या महितीनुसार रमेश (पंतप्रधान आणि काही मोजके लोक सोडले) तर सर्वांना फाट्यावर मारतात. मोदी ह्यांना अडचणीत आणण्यासाठी ही खेळी(जर असेल तर) केली असेल असे वाटत नाही. दोघांमध्ये ईगो प्रॉब्लेम मात्र असू शकतो.