Skip to main content

सहकार्य, मदत, सूचना, मार्गदर्शन हवे आहे...

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 14/09/2010 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी त्यात मानवी मृत्युचा दर वाढतो का तसाच राहतो हे जाणून घ्यायचे कुतुहल मला निर्माण झाले आहे. मला निर्माण झालेल्या कुतुहलाला सांख्यिकीचे असंख्य पदर आहेत (आणि या त्याविषयात मी कच्चा आहे). असा अभ्यास करण्यासाठी वैकुंठ आणि तत्सम स्मशाने इथे विदा गोळा करावा की रुग्णालयात हा देखिल माझ्या मनात संभम आहे. तसेच असा अभ्यास कोणत्या बॅनर खाली करावा हा एक प्रश्न आहेच ( ज्योतिषाची चाचणी आयुका आणि अनिसच्या बॅनर खाली झाली होती). आपण या संदर्भात जर काही सूचना (तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत ) करू शकलात तर मला आनंद होईल. कळावे युयुत्सु

वाचने 2856
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी
मला वाटतं की यात सणांनाच सगळा दोष देता येणार नाही..उन्माद वाढवायला काय हो, काहीही पुरतं.. कुणाकुणाला अगदी एखाद् क्वार्टरही पुरते..! :) प्रत्यक्षात किंवा टीव्हीवर, चित्रपटात इत्यादी अनेक ठिकाणी तंग कपडे घातलेल्या किंवा मादक/उन्मादक हालचाली काणार्‍या अनेक स्त्रिया आपल्या नजरेस पडतात.. माझ्यासारख्या इसमांचा त्या स्त्रियादेखील उन्माद वाढवतात.. मग मी सणांना का दोष द्यायचा बरे? :) उदाहरणच द्यायचं झालं तर 'चल छैय्या छैय्या' गाण्यातली मलायका अरोरा, किंवा 'अप्सरा आली..' मधली सोनाली कुलकर्णी यांसारख्या उन्मादक स्त्रिया पाहून अंमळ चाळवायला होतं.. हा काय सणांचा दोष? गणपतीबाप्पा किंवा दसरा-दिवाळी या सणांचा यात काय दोष?! :)
तसेच असा अभ्यास कोणत्या बॅनर खाली करावा हा एक प्रश्न आहेच
माझं ऐका उपाध्ये, नका करू असले काही विचार..! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या मी आत्ता फक्त माझी उत्सूकता व्यक्त केली आहे कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सणांना पण दोष दिलेला नाही.
चित्रपटात इत्यादी अनेक ठिकाणी तंग कपडे घातलेल्या किंवा मादक/उन्मादक हालचाली काणार्‍या अनेक स्त्रिया आपल्या नजरेस पडतात.. माझ्यासारख्या इसमांचा त्या स्त्रियादेखील उन्माद वाढवतात..
काही जणाना चित्रवाणी वरचा 'उन्माद' वैफल्य आणू शकतो.

In reply to by विसोबा खेचर

तात्या मी आत्ता फक्त माझी उत्सूकता व्यक्त केली आहे कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सणांना पण दोष दिलेला नाही.
चित्रपटात इत्यादी अनेक ठिकाणी तंग कपडे घातलेल्या किंवा मादक/उन्मादक हालचाली काणार्‍या अनेक स्त्रिया आपल्या नजरेस पडतात.. माझ्यासारख्या इसमांचा त्या स्त्रियादेखील उन्माद वाढवतात..
काही जणाना चित्रवाणी वरचा 'उन्माद' वैफल्य आणू शकतो.

आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी त्यात मानवी मृत्युचा दर वाढतो, का? मानवी मृत्युचा दर का तसाच राहतो ? यावर आपन विचार करावा. धन्यवाद.

मृत्युचा दर माहित नाही पण रक्तदाब वाढणे,कानाने कमी ऐकू येणे असले प्रकार निश्च्नितच वाढत असावेत.

In reply to by चिरोटा

हम्म.. ढोलताश्यांचे असह्य आवाज हा जर मुद्दा असेल तर ठीक. त्यावर चर्चा करता येईल. परंतु उपाध्यांनी 'ध्वनिप्रदुषण' हा शब्द न लिहिता 'उन्माद' ह शब्द लिहिला त्यामुळे मी माझ्या प्रतिसादात 'उन्मादा' विषयीचा एक पदर उलगडून दाखवला.. ;) तात्या.

व्वा तात्या.. उन्मदाचा पदर आणि पदराचा उन्माद, दोन्हीही दाखवले तुम्ही...

In reply to by चिगो

जियो चिगोजी/तै, अगदी मुंह की बात छीन ली आपने!

नाइट क्लब, रेव्ह पार्टी वगैरेला प्रोत्साहन द्यायला हवे. त्या साठी गावकुसाबाहेर खास व्यवस्था करायला हवी. निष्पाप लोकाना त्रास न देता उन्माद बाहेर पडेल. (उत्सवाने उन्माद वाढत नसून, तो त्या निमित्ताने बाहेर पडतो असा आमचा अनुभव आहे.)

नाइट क्लब, रेव्ह पार्टी वगैरेला प्रोत्साहन द्यायला हवे. त्या साठी गावकुसाबाहेर खास व्यवस्था करायला हवी. निष्पाप लोकाना त्रास न देता उन्माद बाहेर पडेल. >>>> =))=))=))=)) एक नंबर प्रतिसाद रे भौ !!

झाड वडाचे आहे का?

कदाचित आमची अप्रत्यक्ष मदत होईल. गणेशोत्सवात एखाद्याला तातडीची वैद्यकिय मदत लागली तर रुग्णवाहिका तिथे पोचु शकत नाही अशी शहरातील दाटवस्तीत परिस्थिती आहे. आग लागल्यास अग्निशामकदलाचे बंब तिथे तातडीने पोचु शकणार नाहीत. दिवाळीत फटाक्यामुळे होणार्‍या दुर्घटना आपण तर नेहमीच वाचतो. त्या मुळे या काळात मृत्यु दर थोडासा तरी जास्त असणार.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सहमत आहे. पण संकटाच्या वेळी बाप्पा धावून आले नाहीत तर काय उपयोग? भक्तीप्रेम ओसंडून वाहत असते.अशावेळी यमदूतांना ट्रॅफिक जॅममध्ये फसवून कदाचित गणराय मृत्यूदर कमीपण करत असतील!!

In reply to by प्रकाश घाटपांडे

गणेशोत्सवात एखाद्याला तातडीची वैद्यकिय मदत लागली तर रुग्णवाहिका तिथे पोचु शकत नाही अशी शहरातील दाटवस्तीत परिस्थिती आहे. इतर वेळची त्यांची तत्परता (असणे अथवा नसणे) देखील या संदर्भात लक्षात घेणे महत्वाचे ठरेल. बाकी गणेशोत्सव, दिवाळी वगैरे वर्षातून एकदाच येतात... पण उन्माद वाढवणार्‍या चर्चा-कौलांचे काय करायचे, हा प्रश्न, खरं तर अखिल मिसळपाव महासंघाला पडला पाहीजे. ;)

धागा काढण्याचा हेतू व विषय समजला नाही.