रुचिका गिऱ्होत्रा प्रकरण हे सर्वश्रुत आणि सर्वज्ञात आहे.
रुचिका गिऱ्होत्राचा विनयभंग करून नंतर तिला आत्महत्येला प्रवृत्त करणारे हरयाणाचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. एस. राठोड याला दिड वर्षाची शिक्षा झाली परंतु या प्रकरणात त्याला फक्त विनयभंग केल्या प्रकरणीच शिक्षा झाली आहे.
तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्या प्रकरणात एस. पी. एस. राठोडला शिक्षा होणे गरजेचे आहे, असे मला वाटते.
खटल्याचा सारांश :
हे प्रकरण घडलं तेव्हा रुचिका होती १४ वर्षांची आणि आराधना १३. दोघी शेजारणी आणि मैत्रिणी. रुचिकाला आई नसल्याने आराधनाची आई, मधू यांचा तिच्यावर खास जीव. दोघी मैत्रिणी टेनिस खेळायच्या. तासन्तास टीव्हीवर स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेसचे सामने बघत हरवून जायच्या. तेव्हा हरयाणा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष होते एसपीएस राठोड. रुचिकाचा खेळ बघून भारावल्याचे दाखवत त्यांनी तिला ऑफिसात बोलावलं. दोघी तिथे गेल्या तेव्हा आराधनाला त्यांनी कोचला बोलवायचं निमित्त करून बाहेर पाठवलं. ती बाहेर जाताच राठोड यांनी अश्लील चाळे सुरू केले. त्यांचे हे निर्लज्ज वागणे चालू असतानाच आराधना परतली. रुचिका सुटली खरी, पण दोन्ही मुली प्रचंड घाबरल्या. घाबरून त्या शांत बसल्या पण बेमुर्वत राठोड यांनी रुचिकाला पुन्हा भेटायला बोलावलं. आता मात्र दोघींनी घरी सांगायचं ठरवलं. सार्मथ्यवान अधिकाऱ्याशी गाठ आहे याची मनोमन जाणीव ठेवत दोन्ही कुटुंबांनी तक्रार केली आणि एक लढाई सुरू झाली.
त्यानंतर सुरू झालं ते रुचिकाचं छळपर्व. घरी गुंड यायचे, दमदाटी, अचकट शिव्या, शेरे, पाठलाग, धमक्या, रात्री घरावर येणारे दगड...यामुळे काही फरक पडेना म्हटल्यावर रुचिकाच्या भावाला गाड्या चोरल्याच्या गुन्ह्यांमध्ये गोवलं गेलं. त्याला असह्य मारहाण.. हे कमी म्हणून रुचिकाचं वर्तन धड नाही म्हणून तिला शाळेनं काढून टाकलं. या दिवसांत आराधनाने तिला खूप आधार दिला. जमेल तेवढी ती रुचिकाच्या सोबत असायची. आराधनाची परीक्षा असल्यानं चार दिवस ती रुचिकाला भेटू शकली नाही आणि नेमकं त्याच काळात रुचिकानं स्वत:ला संपवलं. आपण रुचिकाला वाचवू शकलो नाही, या अपराधी जाणिवेनं आराधनाचा न्यायाची लढाई लढण्याचा निर्धार आणखी पक्का झाला.
राठोड याच्या छळाला कंटाळून रुचिकाच्या कुटुंबाने शेवटी पंचकुला सोडलं. मग ही लढाई आराधना आणि तिच्या पालकांच्या खांद्यावर आली. राठोडच्या गुंडांनी या कुटुंबाकडे मोर्चा वळवला. दमबाजी, धमक्यांचे फोन सुरू झाले. स्वच्छ रेकॉर्ड असलेल्या आनंद प्रकाश यांच्यावर भ्रष्टाचाराचे डझनभर आरोप लावले गेले. त्यांची बदली झाली. आराधना घराबाहेर पडली की फोन सुरू व्हायचे, तुमच्या मुलीचं अपहरण झालंय...ती पळून गेलीय. शाळा-कॉलेजात गेलेली मुलगी परतणार का हा रोजचा घोर. मात्र, दिवसागणिक आराधनाचा लढण्याचा निश्चय दुणावला. आराधना पुढे कुरुक्षेत्रला गेली. एमबीए झाली. तिथंही गुंड यायचे. केस मागे घे, म्हणून दम द्यायचे. आराधनाचे वडील या प्रकरणात तब्बल साडेचारशे वेळा वेगवेगळ्या कोर्टांत उभे राहिले.
वर्षांमागून वर्षं गेली. राठोड प्रमोशन मिळवून खांद्यावरचे स्टार्स वाढवत गेला . मेडल्स मिळाली. तो महासंचालक म्हणून निवृत्तही झाला. दरम्यान आराधनानं अमन गुप्ता या आयटी इंजिनीअरशी ऑस्ट्रेलियात संसार थाटला. २००३ मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्या प्रकरणाची एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार असलेली आराधना त्यावेळी भारतात येऊन गेली.
अमनही आराधनाला साथ देतोय. लग्नापूवीर् आपली पत्नी यात असल्याचं अवघडलेपण त्याला होतं. पण त्यांच्या मुलीचा, आश्रयाचा जन्म झाला आणि चित्रच पालटलं. 'मी आमच्या आश्रयाला कुशीत घेतलं आणि रुचिकाच्या वडिलांच्या वेदना मला लख्ख जाणवल्या. त्याच क्षणी मी आराधनाला पूर्ण साथ देण्याचं ठरवलं.. अमन सांगतो. तोही दोन मुलांसह सध्या भारतात आले.
इथेही आराधना शांत नव्हती. ही केस पुन्हा उघडावी म्हणून तिनं सह्या आणि इंटरनेटवर मोहीम सुरू केली. गरज पडली तर ही केस वरच्या कोर्टात लढवायची तिची तयारी होती.
अखेर १९ वर्षांच्या प्रदीर्घ लढाई नंतर रुचिका ला थोड्या का प्रमाणात न्याय मिळाला, आणि एस. पी. एस. राठोड याला दिड वर्षाची शिक्षा झाली .
पण खरच रुचिकाला न्याय मिळाला ? नाही अजुन तरी नाहीच!!
या विषयावर मला येथील सुज्ञ मिपाकरांची मते जाणून घ्यायची आहेत त्या साठीच हा धागा...
रुचिका खटल्याच्या अधिक माहिती साठी या लिंक चा वापर करा. http://en.wikipedia.org/wiki/Ruchika_Girhotra_Case
-भाग्येश
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ||
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः ||
वाचने
5771
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
जे झाले ते
Manoj Katwe
In reply to जे झाले ते by Manoj Katwe
नाही म्हटल
दिल्ली
तिरशिंगराव माणूसघाणे
In reply to दिल्ली by तिमा
वरती काटवे
पूर्ण
सहमत
In reply to पूर्ण by बिपिन कार्यकर्ते
न्याय की चेष्टा?
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे.
In reply to पूर्ण by बिपिन कार्यकर्ते
महिला संघटनांचा आवाज कुठे गेला ...
In reply to पूर्ण by बिपिन कार्यकर्ते
तिस्ता
In reply to महिला संघटनांचा आवाज कुठे गेला ... by sagarparadkar
काही कल्पना नाही
In reply to तिस्ता by शिल्पा ब
माझा रोख
In reply to काही कल्पना नाही by वेताळ
बिका नि
In reply to पूर्ण by बिपिन कार्यकर्ते
ती मॉडेल
In reply to बिका नि by मस्त कलंदर
दारुण आणि
+१
In reply to दारुण आणि by शुचि
कायदे कडक
In reply to दारुण आणि by शुचि
माझ तर
असहमत
In reply to माझ तर by गणपा
गाग्या
In reply to असहमत by पंगा
गणपा शेठशी सहमत.....
In reply to माझ तर by गणपा
प्रतिसाद
इथे
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
मनाचा दाह
भारद्वाज
भारताची न्यायव्यवस्था सर्वोत्तम
भारताची
रुचिकाबद्
चर्चा बहु जाहल्या..