स्वयंसुधारणा
आपण जसे आहोत त्यापेक्षा आपल्यात सुधारणा व्हावी असे अनेक जणांना वाटते. अपवाद फक्त, ' मी आहे हा/ही असा/अशी आहे तुला जे समजायचे ते समज' असे म्हणणार्यांचा! तर सुरवात कुठून करावी ? उत्तम मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण.
आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग, वाद, भांडणे, रुसवेफुगवे झालेले असतात. ते एकेक आठवून बघावे. रागाच्या भरात आपण कसे वागलो/बोललो ते आठवावे. तो प्रसंग एकदा डोळ्यासमोर आणला की आपले वागणे तपासून बघावे. निपक्षपातीपणाने स्वता:स प्रश्न विचारावेत.
१. चूक नक्की कोणाची होती ?
२. समोरच्याची असल्यास ती आपण सभ्यपणाने निदर्शनास आणून दिली की त्याच्या वर्मावर बोट ठेवले ?
३. आपली असल्यास चूक प्रांजळपणाने मान्य केली की 'तुमचा काहीतरी गैरसमज होतोय' अशा टाईपच्या वाक्क्यांनी सारवासारव केली ?
४. वाद घालताना आपण आवाजावर ताबा ठेवला होता का ?
५. वाद मुद्याला धरुन चालला होता की भरकटला होता? आणि त्याभरात आपण समोरच्याची इतर उणीदुणी काढली होती ?
६. भांडण झाले असल्यास आपण शिवीगाळ केली होती का ?
७. नंतर त्या व्यक्तिशी आपण अबोला चालू ठेवला की पुढाकार घेऊन वाद मिटवला ?
८. जुनी भांडणे/वाद आपण विसरता की मनांत डूख धरुन ठेवता ?
९. आपल्याशी न पटणार्याचे वाईट झाले तर मनातून आनंद होतो का ?
१०. यापुढील जीवनात असे प्रसंग आले तर आधीच्या अनुभवावरुन शहाणे होऊन आपण वेगळे वागू का ?
यांत कुठेही आपण कायम पडते घ्यावे असे मला सुचवायचे नाही पण आपले मत ठामपणे पण समोरच्याचा अवमान न करता शांतपणे सांगता येते एवढेच मला सुचवायचे आहे.
वरील १० मुद्दे आत्ता शांत मन असताना मला योग्य वाटत आहेत पण प्रक्षुब्ध मनस्थितीत यातले किती मला आठवेल व मी आचरणात आणीन याची अजूनही खात्री वाटत नाही. पण कमीतकमी त्या दिशेने प्रवास करण्याची मानसिक तयारी झाली आहे.
वाचने
1574
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
बहुतेक
आपण जसे
स्वप्रयोग अतिउत्तम!
शांतपणे ?
अपवाद