“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.” भारताच्या केंद्र सरकारने श्री० सलील कुळकर्णी ह्यांच्या हस्ते ही एक नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे.
आता यापुढे महाराष्ट्रात कुठेही “हिंदी राष्ट्रभाषा आहे” या सबबीखाली मराठीची उपेक्षा, गळचेपी होत असेल तर या पुराव्याचा उपयोग करून त्याला खंबीर विरोध करायलाच पाहिजे.
स्वभाषाभिमान या मालिकेतील श्री० सलील कुळकर्णी यांचा हा पुढला लेख खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन-०_ हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा_010110
वरील लेखात उल्लेख केलेले केंद्र सरकारचे मूळ पत्र व त्याची मराठी आणि इंग्रजी भाषांतरे खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.
१. केंद्रसरकारच्या राजभाषा विभागाचे मूळ हिंदी पत्र (धारिणी उघडण्यास थोडा विलंब लागेल):
अमृतमंथन-१_हिंदी राष्ट्रभाषा नहीं_भारत सरकारको कबूल_मूल पत्र_291209
२. मूळ हिंदी पत्राचे मराठी भाषांतर: अमृतमंथन-२_हिंदी राष्ट्रभाषा नाही_केंद्र सरकारचा निर्वाळा_पत्राचे मराठी भाषांतर_291209
३. मूळ हिंदी पत्राचे इंग्रजी भाषांतर: अमृतमंथन-३_Hindi is not the National Language_Admission by Central Govt_English Translation of the Letter_291209 .
मुळ लेखः http://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/
------------------
लेख वाचून झाल्यावर त्यातील मते पटल्यास सर्व मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह ’मराठी+एकजुट’ कृतिगटात भाग घेण्यासाठी शक्यतो marathi.ekajoot@gmail.com या पत्त्यावर ई-मेल पाठवून आपले नाव नोंदवावे.
.
वाचने
4037
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
विकास
चांगली माहिती
हिंदीच राजभाषा