बजाजने स्कुटर उत्पादन बंद केल्याची बातमी टिव्ही.वर पाहिली आणि आठवणींनी मन हेलावून गेले.येथे प्रश्न स्कुटर पूरता मर्यादित नव्हता.काळाच्या ओघात प्रत्येक नवी गोष्ट इतिहास बनून जाते.विकासाच्या लाटेत या गोष्टींच्या उरतात त्या फक्त आठवणी.काँलेजला स्कुटर वरुन येणारे सर,, त्याकाळची तरूंण पोरं... पाच पाच दिवस रेडिओवर ऐकली जाणारी काँमेंट्री..बिनाका गीतमाला आणि अमिन आयानीचा आवाज ऐकण्यासाठी बुधवारची वाट पाहाणारे अनेक जण, अँन्टीना फिरवून फिरवून टिव्ही.वरचा सिनेमा पाहाण्यासाठी चाललेली धडपड.. परदेशातून येणार्याकडे सोनिचि कँसेट ,नँशनलचा रेडिओ नाहितर सिटिझनचे घड्याळ आणण्यासाठी घातली जाणारी गळ..ती लिमलेटची गोळी... रावळगावचे चाँकलेट. फळीची बँट बनवून क्रिकेट खेळणे..खांद्यावर लटकणारे कापडी पिशवीचे दप्तर..दप्तरात लपवलेले जादुची लहान पुस्तकं ...दगडी पाटी आणि दगडी पेन्सिल ..त्यावर गुरुंजीचा मार खाऊन गिरवलेला श्रीगणेशा..
या सार्या आठवणी थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या आयुष्यातील.बजाजची स्कुटरही अशाच प्रकारची आठवण बनून राहणार आहे. आपल्याही जवळ असतील अशा काही गोड-कटु आठवणी.चला त्या एकमेकांजवळ शेअर करु या.....
वाचने
2251
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
गेले ते दिन गेले
सुखद धक्का
In reply to गेले ते दिन गेले by chipatakhdumdum
चालायचच
जुनं
आजची
चान्दोबा...