"ने मजसी ने" ची शताब्दी
आज लोकसत्तेतील लताच्या मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे उद्या उद्या (१० डिसेंबर, २००९) ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहीलेल्या "ने मजसी ने परत मातृभूमीला" या काव्यास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हे वाचकांपर्यंत पोचवल्याबद्दल लोकसत्तेचे आभार!
याबाबत कधीच ऐकलेले नव्हते तसेच जालावर देखील माहीती मिळाली नाही. कुणास अधिक माहीती असल्यास अवश्य सांगा.
तर्काने विचार केल्यावर इतके नक्की लक्षात आले की ही कविता १९०९ मधे लिहीली असावी. सावरकरांना १९१० मधे अटक करण्यात आली. त्याच्या थोडे आधी म्हणजे ऑगस्ट १९०९ मधे मदललाल धिंग्राला फाशी झाली. त्याच्या आधी टिळकांची (१९०८) मंडलेला रवानगी झाली...त्या सुमाराचा आणि नंतरचा काळ हा विशेषकरून ब्रिटनमधील भारतीय क्रांतिकारकांसाठी त्रासदायक (frustration आणणारा) ठरला. कधीकाळी वाचलेल्या भा.द.खेर आणि शैलजा राजे यांच्या "यज्ञ" कादंबरीत असा उल्लेख होता की एका ब्रिटीश युवतीने, जी त्यांच्या मागावर गुप्तहेर म्हणून होती पण त्यांची हितचिंतकही नंतर झाली, तीने त्यांना सांगितले की इथून निघून जा वगैरे... पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत सावरकर नव्हते. त्याच सुमारास त्यांना ब्रायटनच्या किनार्यावर घराच्या आणि देशाच्या आठवणीने तसेच असहाय्य भावनेत हे काव्य सुचले. जितके हृदयनाथांनी दिलेले संगीत हे ह्या गाण्यातील आर्तभाव श्रोत्यांपर्यंत पोहचवतात (जालावर पटकन दुवा मिळाला नाही), तितकेच बाबुजींनी स्वरबद्ध केलेले पण...
वाचने
2609
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो
हे गाणं
हृदयनाथ मंगेशकर - ने मजसी
काव्य
‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे विवरण
व्याकुळ...
धन्यवाद!