गेले बरेच दिवस मी मिपावर मराठी-भय्या ही चर्चा वाचतो आहे. त्यानिमित्ताने काही लिहावेसे वाटले.
ऑस्ट्रेलियामधे किन्वा इतर ठिकाणी भारतिय विद्यार्थ्याना मारहाण झाली म्हणून आपण त्यान्चा लगेच निषेध करतो. भारत सरकारने त्या त्या सरकारना याचा जाब विचारावा अस आपण म्हणतो. अमेरिकेत सिलिकॉन व्हलीत बहुसन्ख्य भारतिय असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर भय्या किन्वा परप्रान्तियानी मुम्बैमधे येउन जॉब करु नयेत असही आम्हाला वाटत.
आपण म्हणतो कि भय्या लोकान्ची लायकी दूध विकण्याची आहे, मग अस असेल तर आपले जॉब ते पळवतील अशी भिती आपल्याला का वाटते? याचा अर्थ आपल्यामधे काहीतरी कमी आहे. उलट आपण जर त्यान्च्यापेक्षा जास्त चान्गले(लायक या अर्थी) आहोत तर मग त्याना खुशाल येउदे जॉब आम्हालाच मिळायला हवा. जर अस होत नसेल तर अशा गोश्टीमधे काहीतरी राजकीय मतलब किवा भ्रष्टाचार असेल. म्हणजे जॉब मिळवला म्हणून त्यात त्यान्चा काही दोष नाही आणि त्यात त्यान्च काही कर्तुत्वही नाही. मूळ मुद्दा हा पुर्णपणे राजकिय आहे. मराठी माणूस आणि त्यान्च भल होण यामधे कोणत्याही पक्षाला काहीही घेण देण नाही. कुणी अगदी बेम्बीच्या देठापासून ओरडून सान्गितल तरीही त्यात आपली पोळी भाजून घेण्यापलिकडे कोणाला काहीही कर्तव्य नाही.
ही राजकारणी माणस(मग तो कोणताही पक्ष असूदे) आपल्याला गन्डवतात आणि आपण इमाने इतबारे आयुष्यभर गन्डत असतो
'माझा पती छत्रपती' ह्या नावावरुन बोम्बाबोम्ब करणार्याना 'सम्भाजी बिडी' मात्र चालते. का सम्भाजी राजे काय आम्हाला वन्दनीय नाहीत? का त्यान्ची बदनामी केली तरी काही हरकत नाही, कारण आधीच आमच्या कादम्बरी कारानी त्याना व्यसनी, बदफीली ठरवलेलच आहे, त्यामुळे काय फरक पडतो. याच लोकाना 'शिव वडा' ही चालतो, त्यात काय शिवाजीराजान्ची बदनामी होत नाही का? पण हे नाव; जे लोक स्वत:ला थेट शिवाजी राजान्चे वन्शज समजतात, त्यानीच ठेवल्यामुळे कोण काय म्हणणार? आज मनसे किन्वा शिवसैनिक म्हणवणार्यानी स्वत:ला हा प्रश्ण विचारावा कि आज कल्य्याणच्या सुभेदाराची सून समोर आली तर ती अब्रूनिशी परत जाइल का? उगीच शिवाजी महाराजान्च नाव उठसूठ घेण्याआधी आपली लायकी बघावी.
सध्याच्या परिस्थितीत जागोजागी बोकाळलेला भ्रष्टाचार, अन्नधान्यान्चे चढे भाव, दुष्काळासारखी परिस्थिती, बेरोजगार यासारखे असन्ख्य प्र्श्न आहेत आणि त्यावर मात कशी करावी याचा आराखडा दुर्देवाने कोणत्याही राजकिय पक्षाकडे नसल्याने ते अशा कोणत्या तरी विषयाच्या मागे आम जनतेला गुन्तवून ठेवतात. मग कोणी कुणाच्या कानाखाली काढत तर कुणी आणखी काही.
आणि हा भय्या लोकान्चा प्रॉब्लेम काय फ़क्त मुम्बैतच आहे? मग ही सर्व आन्दोलने एखाद्या खेडेगावात का होत नाहीत?
वाचने
6482
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण म्हणतो
हॅ हॅ हॅ
सहमत
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
प्रटाना. पु
+१
In reply to प्रटाना. पु by llपुण्याचे पेशवेll
भय्यांच्य
-१
In reply to भय्यांच्य by टारझन
+२
In reply to -१ by टारझन
-३
In reply to +२ by टारझन
+/- ३/४
In reply to -३ by टारझन
+४
In reply to -३ by टारझन
+५
In reply to +४ by टारझन
- पॉर्नल
In reply to +५ by टारझन
-
In reply to - पॉर्नल by टारझन
+१००
In reply to - by टारझन
टारझन
In reply to +१०० by टारझन
हलकट
In reply to - पॉर्नल by टारझन
बा
In reply to हलकट by पर्नल नेने मराठे
धन्यवाद
In reply to बा by प्रिया देशपांडे
टार्याशी
In reply to धन्यवाद by टारझन
एका मराठी
In reply to +४ by टारझन
...
In reply to एका मराठी by परिकथेतील राजकुमार
शिळ्या
फक्त भैये
--मधु
मस्त्च चुच
In reply to --मधु by मधु मलुष्टे ज्…
आणि हा
वडाचे साल पिंपळाला
मराठीपण
वरील लेख एका विचारवंताची वैचारिक दिवाळखोरी दाखवतो
आर्र्र्र्
599 वाचने
नावाप्रमाणे....
मस्तच विनोदी लेख आहे
_/\_
In reply to मस्तच विनोदी लेख आहे by सुमीत
मिपावरचा एक आदरणीय लेख.
मिपावरचा एक आदरणीय लेख.
>>अमेरिकेत सिलिकॉन व्हलीत