Skip to main content

मराठी आणि भय्या

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी गुरुवार, 19/11/2009 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेले बरेच दिवस मी मिपावर मराठी-भय्या ही चर्चा वाचतो आहे. त्यानिमित्ताने काही लिहावेसे वाटले. ऑस्ट्रेलियामधे किन्वा इतर ठिकाणी भारतिय विद्यार्थ्याना मारहाण झाली म्हणून आपण त्यान्चा लगेच निषेध करतो. भारत सरकारने त्या त्या सरकारना याचा जाब विचारावा अस आपण म्हणतो. अमेरिकेत सिलिकॉन व्हलीत बहुसन्ख्य भारतिय असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर भय्या किन्वा परप्रान्तियानी मुम्बैमधे येउन जॉब करु नयेत असही आम्हाला वाटत. आपण म्हणतो कि भय्या लोकान्ची लायकी दूध विकण्याची आहे, मग अस असेल तर आपले जॉब ते पळवतील अशी भिती आपल्याला का वाटते? याचा अर्थ आपल्यामधे काहीतरी कमी आहे. उलट आपण जर त्यान्च्यापेक्षा जास्त चान्गले(लायक या अर्थी) आहोत तर मग त्याना खुशाल येउदे जॉब आम्हालाच मिळायला हवा. जर अस होत नसेल तर अशा गोश्टीमधे काहीतरी राजकीय मतलब किवा भ्रष्टाचार असेल. म्हणजे जॉब मिळवला म्हणून त्यात त्यान्चा काही दोष नाही आणि त्यात त्यान्च काही कर्तुत्वही नाही. मूळ मुद्दा हा पुर्णपणे राजकिय आहे. मराठी माणूस आणि त्यान्च भल होण यामधे कोणत्याही पक्षाला काहीही घेण देण नाही. कुणी अगदी बेम्बीच्या देठापासून ओरडून सान्गितल तरीही त्यात आपली पोळी भाजून घेण्यापलिकडे कोणाला काहीही कर्तव्य नाही. ही राजकारणी माणस(मग तो कोणताही पक्ष असूदे) आपल्याला गन्डवतात आणि आपण इमाने इतबारे आयुष्यभर गन्डत असतो 'माझा पती छत्रपती' ह्या नावावरुन बोम्बाबोम्ब करणार्‍याना 'सम्भाजी बिडी' मात्र चालते. का सम्भाजी राजे काय आम्हाला वन्दनीय नाहीत? का त्यान्ची बदनामी केली तरी काही हरकत नाही, कारण आधीच आमच्या कादम्बरी कारानी त्याना व्यसनी, बदफीली ठरवलेलच आहे, त्यामुळे काय फरक पडतो. याच लोकाना 'शिव वडा' ही चालतो, त्यात काय शिवाजीराजान्ची बदनामी होत नाही का? पण हे नाव; जे लोक स्वत:ला थेट शिवाजी राजान्चे वन्शज समजतात, त्यानीच ठेवल्यामुळे कोण काय म्हणणार? आज मनसे किन्वा शिवसैनिक म्हणवणार्‍यानी स्वत:ला हा प्रश्ण विचारावा कि आज कल्य्याणच्या सुभेदाराची सून समोर आली तर ती अब्रूनिशी परत जाइल का? उगीच शिवाजी महाराजान्च नाव उठसूठ घेण्याआधी आपली लायकी बघावी. सध्याच्या परिस्थितीत जागोजागी बोकाळलेला भ्रष्टाचार, अन्नधान्यान्चे चढे भाव, दुष्काळासारखी परिस्थिती, बेरोजगार यासारखे असन्ख्य प्र्श्न आहेत आणि त्यावर मात कशी करावी याचा आराखडा दुर्देवाने कोणत्याही राजकिय पक्षाकडे नसल्याने ते अशा कोणत्या तरी विषयाच्या मागे आम जनतेला गुन्तवून ठेवतात. मग कोणी कुणाच्या कानाखाली काढत तर कुणी आणखी काही. आणि हा भय्या लोकान्चा प्रॉब्लेम काय फ़क्त मुम्बैतच आहे? मग ही सर्व आन्दोलने एखाद्या खेडेगावात का होत नाहीत?

वाचने 6482
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

आपण म्हणतो कि भय्या लोकान्ची लायकी दूध विकण्याची आहे, मग अस असेल तर आपले जॉब ते पळवतील अशी भिती आपल्याला का वाटते? अहो प्रश्न दुधापर्यन्त मर्यादित नाहिये. रेल्वे,इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स अश्या व इतर अनेक govt dept. मध्धेहि त्यानी घुसखोरी केलेली आहे. चुचु

एकदम विनोदी लेख..तेच तेच ..आणि परत.. परत... पण त्याचबरोबर भय्या किन्वा परप्रान्तियानी मुम्बैमधे येउन जॉब करु नयेत असही आम्हाला वाटत. आपण म्हणतो कि भय्या लोकान्ची लायकी दूध विकण्याची आहे, मग अस असेल तर आपले जॉब ते पळवतील अशी भिती आपल्याला का वाटते? याचा अर्थ आपल्यामधे काहीतरी कमी आहे. आम्हाला बिलकूल असे वाटत नाही. प्रश्न हा आहे की भय्या लोकं येथे येऊन मुजोरी करतात याचा. आपण लोकं परदेशात (किंवा महाराष्ट्राबाहेर जाऊन )अशी मुजोरी करतो का...? माझ्या माहितीतले बरेचसे मराठी (आणि इतर सुद्धा), चेन्नाईला किंवा इतर ठिकाणी जाऊन तेथल्या भाषेशी, लोकांशी समरस झाले आहेत. जरा कुर्ला टर्मिनसवर जाऊन लाईनीत उभे राहून नाशिकचे टिकीट काढायचा प्रयत्न करा. मग समजेल भय्यागिरी म्हणजे काय असती ते... 'माझा पती छत्रपती' ह्या नावावरुन बोम्बाबोम्ब करणार्‍याना 'सम्भाजी बिडी' मात्र चालते. का सम्भाजी राजे काय आम्हाला वन्दनीय नाहीत? का त्यान्ची बदनामी केली तरी काही हरकत नाही......उगीच शिवाजी महाराजान्च नाव उठसूठ घेण्याआधी आपली लायकी बघावी. नक्की मुद्दा कोणता आहे..? भय्या लोकं की शिवसेना/मनसेचे शिवप्रेम..? आणि हा भय्या लोकान्चा प्रॉब्लेम काय फ़क्त मुम्बैतच आहे? मग ही सर्व आन्दोलने एखाद्या खेडेगावात का होत नाहीत? हॅ हॅ हॅ... एखाद्या खेडेगावात नोकरीच्या संधी उपलब्ध करा आणि पहा..पुण्यात काय हेच होते आहे..आपण सुखवस्तू आहोत आपल्याला या गोष्टीचा त्रास होत नाही याचा अर्थ असा नाही की हा मुद्दा तितका महत्वाचा नाही. मग कोणी कुणाच्या कानाखाली काढत तर कुणी आणखी काही. ही मात्र चुकच होती.. खरं म्हणजे लाथा किंवा चपलेने बदडायचे होते. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

खादाडमाऊंच्या सर्व मुद्यांशी सहमत

प्रटाना. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रटाईना.

=)) =)) =)) =)) =)) भय्यांच्यी तुलना अनिवासींशी ? मला माहितंच नव्हतं आपले भारतीय लोक तिकडे बाहेर जाऊन शक्तीप्रदर्शन करतात .. किंवा तिकडे आपली वोट बँक वाढवून तिकडे राजकिय घुसकोरी करू पहात आहेत ते =)) शिवाय सगळेच जण गाठोडी पॅक बिक करून तिकडे कुटूंबंच्या कुटुंबं शिफ्ट करून मायग्रेट होत आहेत ते .. अफाट विनोदी लेख !! - चरभाट आणि थिल्लर

In reply to by टारझन

चरभाट आणि थिल्लर शी असहमत ... लेखकाचा मुद्दा बरोबर आहे .. अत्यंत अभ्यासूपणे , सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मुद्देसुद स्टॅटिस्टिकल लेख लिहीलेला आहे .. अभिनंदन - कंजारभाट आणि भिल्लर

In reply to by टारझन

मस्त टोला हाणलाय "श्री. कंजारभाट आणि भिल्लर" राव ... अत्यंत मोजक्या शब्दांत आमच्या मनातली प्रतिक्रिया "खास" शब्दासह मांडली आहे. अनिवासी आणि भय्ये लोकं एकाच तराजूत आहेत. - डाळभात आणि चिल्लाळ

In reply to by टारझन

"श्री. कंजारभाट आणि भिल्लर" आणि "श्री डाळभात आणि चिल्लाळ" ह्यांची माफी मागुन , आपण इथले आदरणिय आणि भादरनिय आणि माननिय आणि अतुलनिय आणि अनाकलनिय सभासद आहात .. मला आपला आदर पण आहे ... परंतु मी आपल्या मुद्द्यांशी मी असहमत आहे. ही तुलना मला तरी मला हस्यास्पद वाटते .... बेसलेस विधाने करून वाद निर्माण करून लाईमलाईट मधे येण्याचा हा प्रयत्न म्हणजे लेखकाच्या अकलेची दिवाळखोरी आहे असं म्हणावं लागेल. आरभाट आणि चिल्लर ह्यांचा "रामदास आठवले" होणार असे त्यांशी शनी-मंगळ युती सांगते - फाटामार आणि अवांत्र

In reply to by टारझन

वरील सर्वांशी अंशतः असहमत आणि कदाचित सहमत. तुर्तास ही पोच समजावी. सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे. एकदा भय्यांना हाकलुन झाले की मग निवांत खरडतो. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by टारझन

मला व्यक्तिश: "फाटामार-जी आणि अवांत्र-जी" ह्यांचे विचार पटलेले आहेत. कारण, मी माझ्या जिवनाच्या कारकिर्दीत पाहिलेल्या अनुभवांवरून मी सांगतो.. लेखकाला हे म्हणायचे आहे काय ? १. अनिवासी लोक भय्यांसारखी घाण आपण रहातो तिथे पसरवतात ? २. अनिवासी लोक भय्या लोकांसारखी भाईगिरी रहात्या ठिकाणी करतात ? ३. अनिवासी लोक त्या देशात भय्यांसारखी आपल्या पार्टीची वोट बँक वाढवतात ? ४. अनिवासी लोक त्या देशात भय्यांप्रमाणे माज दाखवून आपल्याच भाषेची री ओढतात ? ५. अनिवासी लोक लोकल ठिकाणी छेडाछाडीचे प्रकार करतात .. ६. अनिवासी लोक तिथे छटपुजा घालून शक्तीप्रदर्शन करतात -- टारंजय

In reply to by टारझन

टारंजयच्या शब्दा-शब्दाशी सहमत ... बाय डिफॉल्ट .. :) - चंदन

In reply to by टारझन

=)) =)) =)) - ||मोजे|| ********* मराठी माणूस बिहार्‍यांसारखा विचार जोपर्यंत करत आहे तो पर्यंत मी अवांतरपणा सोडणार नाही

In reply to by टारझन

असेच म्हणतो ! -- संकरिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला लावुन हायब्रिड करून मिळेल. ब्रिटीश बुल्डॉग आणि शिट्झू जातीचं नवीन हायब्रिड आलंय .. "बुलशीट" .. अधिक माहिती व्यनितुन

In reply to by टारझन

कुमार टारझन ह्यांच्याशी सहमत. प्रतिसाद वाचून टारझन ईश्टाईल मध्ये अंमळ हळवी झाले. -वेडझन

In reply to by पर्नल नेने मराठे

बाझवला तिच्यायला, काय लावलय रे फोकलिच्यांनो. आताच १५ सेकंदापूर्वी परत एकदा अमंळ हळवी झाले. तात्या आले बहुतेक, आता पळ काढते. -येडझन MH12+बारा अंडी+चिकन तंदूरी+१२ पराठे= गुडघ्यात मेंदू

In reply to by प्रिया देशपांडे

=)) =)) =)) =)) =)) =)) धन्यवाद प्रिया-जी , आपल्या प्रतिक्रियेने आनंद झाला :) -- येंडू गेंडू .. तळव्यात मेंदू :)

In reply to by टारझन

टार्‍याशी १००००% सहमत. आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by टारझन

एका मराठी वाचकाने, मराठी माणसाच्या लेखावर प्रतिक्रीयारुपी मारलेले दगड पाहुन एक विचारवंत म्हणुन शरम वाटली. मिपावरही राडेबाजी सुरु झालेली पाहुन खेद वाटला. कुठे चाललो आहोत आपण ? आज आम्ही दारु न पिता झोपणार आणी अवलियाचा लेख वाचणार. टारश्री आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)) =))

शिळ्या कढीला किती वेळा ऊत आणताय राव! ऑस्ट्रेलिया,अमेरिकेचे उदाहरण देताय.पण त्या देशात कोणीही चला जाऊया अमेरिकेत /ऑस्ट्रेलियात असे म्हणुन सहजासहजी जाऊ शकत नाही.त्या देशांच्या गरजेनुसारच बाहेरून किती परदेशी तंत्रज्ञ/अभियंते/डॉक्टर वगैरे वगैरे बोलवायचे हे ठरवले जाते. मुंबईत मात्र तसे नाही.इथे कुणीही चला मुंबईत जाऊन नोकरी मिळवुया म्हणुन येऊ शकतो. महाराष्ट्राची मुख्य अडचण ही देशपातळीवरील महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व करेल अश्या कणखर राजकिय नेतृत्वाची उणीव असणे ही आहे.ज्या पध्दतीने दाक्षिणात्य नेते पक्षीय मतभेद विसरुन वेळोवेळी एकत्र येतात वा ज्या पध्दतीने लालु/नितीशकुमारांनी रेल्वे मध्ये स्वप्रांतीयांनाच घुसवले तसा प्रांतिय अभिमान मराठी नेते दिल्लिश्वरांपुढे का दाखवित नाहीत हाच कळीचा प्रश्न आहे. मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे. ypj@indiatimes.com.

हि एकच समस्या नाही. अरभाट आणि चिल्लर मनोवृत्तीचे महाराष्ट्रात राहणारे लोक हि देखील एक मोठी समस्या आहे. ह्या अशा (स)माजवादी लोकांमुळे अबू सारखे भामटे सर्वत्र पसरले आहेत.

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

In reply to by मधु मलुष्टे ज्…

=)) मस्त्च चुचु मराठे बि.एस्.सी :D

आणि हा भय्या लोकान्चा प्रॉब्लेम काय फ़क्त मुम्बैतच आहे? मग ही सर्व आन्दोलने एखाद्या खेडेगावात का होत नाहीत? ओ काका, गपा ना आता.. तुम्हाला वेगळे सोल्युशन सांगायचे असेल तर सांगा..! तुम्ही कोणत्या गावात रहाता, किती मराठी लोकांना नोकर्‍या मिळवून दिल्या, व्यवसाय सुचवले ते सांगा.. कशाला उगीच "सगळे राजकारणी नालायक असतात" हे उगाळत बसलाय..? तुमच्या भावना समजतात मला, पण नुसतेच राजकारणी नालायक आहेत म्हणून घोकत बसण्यात काय पाईंट आहे काय? --सुहास

ऑस्ट्रेलिया आणि मुंबईतील ह्या प्रश्नांची सांगड घालणे म्हणजे वडाचे साल पिंपळाला लावण्यासारखेच असे वाटतेय.

प्रश्न भय्या मुम्बै मधे येण्याचा नाहिच आहे मुळी. मुम्बै च मराठीपण कमी होत चाललं आहे. मराठी माणसाने अक्ख्या महाराष्ट्रात मराठी सोडुन हिंदीतुन का बोलावे ? मुम्बैच्या कोणत्याही खाजगी अथवा सरकारी ओफीस मधे हिंदीत बोर्ड का पाहिजेत ? मुम्बै भारतची नंतर..... आधी महाराष्ट्राची..... जय महाराष्ट्र

कशात काय अन फाटक्यात पाय.... ह्या म्हणीचा अर्थ वरील लेख वाचुन कळतो. एका ठिकाणी लेखक भय्या व मराठी लोकाच्या वादा विषयी बोलत असताना ताची तुलना परदेशात गेलेल्या उच्चविभुषित भारतियांशी करतो हे नक्कीच हास्यास्पद आहे.भय्या फक्त दुध विकतात हा एक लेखकाचा गैरसमज आहे.भय्या व बिहारींना विरोध फक्त महाराष्ट्रात होतो आहे ,हा दुसरा गैरसमज लेखकाचा झाला आहे. मग आसाम मध्ये,कर्नाटक,तामिळनाडु व आंध्रमध्ये स्थानिक लोक कोणाला विरोध करतात? संभाजी बिडी काय आणि सिगारेट काय दोन्ही ओढल्या नंतर कर्करोगच होतो. म्हणुन अशा पदार्थाना महान व्यक्तींची नावे देणे चुकीचे आहे. पण शिववडा खाल्ल्याने कुणाला कर्करोग होतो हे अजुन एकण्यात आलेले नाही.त्याची तुलना कशाबद्दल केली हे लेखकाच ठाऊक. जे लोक स्वत:ला थेट शिवाजी राजान्चे वन्शज समजतात, त्यानीच ठेवल्यामुळे कोण काय म्हणणार? शिववडा हे नाव उध्दव ठाकरेनी ठेवले आहे.त्याचा दुरान्वये शिवाजी महाराजाशी कोणतेच थेट नाते नाही. शिवाजी महाराजाचे थेट वंशज उदयनराजे भोसले हे आहेत.त्यानी अजुनतरी कशालाच आक्षेप घेतलेला नाही. बाकी टारझनशी सर्व प्रतिसादात सहमत. वेताळ

आर्र्र्र्र्र्र भट्ट्ट आणि न्हाव्याचा उकीरडाच की वो हे सगळ, उकरुन फकस्त क्यासच निघत्याल बघा(कुठल? कुठल? आनी कुना? कुनाच? कसं सांगायच?म्हंजी बघा म्हाता-याची डुई त्योच करनार आम्ची म्हसरं बी त्योच बोडनार. अम्ची बिन पान्यन त्योच खरडनार) तुमच म्हंजी कसं बघा "रीकामा न्हावि कुडाला तुंबड्या लावी." टार्झन आनी प्रिया देशपांडे तुमी म्हंजी ४२० वोल्ट *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अन तीस प्रतिसाद एव्हढ्या थोड्या वेळात! सुप्पर डुप्पर हिट शो केलात की राव. चालु दे. पक्का राडेबाज असल्यानंच निवासी राहिलेला घाटी पुनेरी

नावाप्रमाणे चिल्लर लेख... बाकि टारझन आणी प्रिया समोर साक्षात दंडवत.... --------------------------------------------------- मनसेची माणसे

आणी टार्‍या ने खूपच सभ्य भाषेत प्रतिसाद दिला, मजा आली यार. लेख आणि प्रतिसाद वाचून, वाचून हसायचे थांबत नाही आहे. धम्या, तू वाचला असशील तर दे रे एक प्रतिसाद.

In reply to by सुमीत

नको रे बाबा! सध्या मी विचारजंतांमुळे गंभीर आजारी आहे. भैय्ये-बिहारी-मराठी विषयावर चर्चा करु नकोस असं कडक पथ्य सांगितलंय आमच्या वैद्यबुवांनी ;) (ज्या दिवशी पथ्य संपेल त्यादिवशी परत आम्ही सुरु ;) )

>>अमेरिकेत सिलिकॉन व्हलीत बहुसन्ख्य भारतिय असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्हाला अभिमान तर दूर, खरेतर लाज वाटते, अभिमान तेव्हा वाटेल, जेव्हा ते इथे परत येऊन इथेच सिलिकॉन व्हॅली चालू करतील. पोटासाठी देश सोडून गेले त्यांच्या काय आणि कसला आलाय अभिमान. ते काय सर्वसाधारण माणसेच ना. अजूनही इथे असलेल्या कितीतरी भारतीयांना केवळ चान्स / संधी मिळत नाही म्हणून ते इथे आहेत. संधी मिळाली कि एका रात्रीत चंबू गबाळे बांधून तयार असलेले किती दाखवू. (इथे मी दहा मिनिटांत निदान १०/१२ जन तर नक्कीच दाखवू शकतो). गेले आहेत ते पोटासाठी गेले आहेत, ते ठीक आहे, पण अभिमान वगेरे जरा बाजूला असू द्या. >>मराठी माणूस आणि त्यान्च भल होण यामधे कोणत्याही पक्षाला काहीही घेण देण नाही. असहमत. एक अनाहूत सल्ला. तुम्ही कोणत्याही पक्षाचे अगोदर कार्यकर्ते व्हा, पक्षातून समाजासाठी काहीतरी काम करा, मग हे विधान करा. >> कुणी अगदी बेम्बीच्या देठापासून ओरडून सान्गितल तरीही त्यात आपली पोळी भाजून घेण्यापलिकडे कोणाला काहीही कर्तव्य नाही. प्रत्यके वेळी असेच असते असे नाही. >>ही राजकारणी माणस(मग तो कोणताही पक्ष असूदे) आपल्याला गन्डवतात आणि आपण इमाने इतबारे आयुष्यभर गन्डत असतो गन्डणे , न गन्डणे आपल्या हातात आहे. >>कारण आधीच आमच्या कादम्बरी कारानी त्याना व्यसनी, बदफीली ठरवलेलच आहे, वाचन कमी पडत आहे. >>आज कल्य्याणच्या सुभेदाराची सून समोर आली तर ती अब्रूनिशी परत जाइल का? हो नक्कीच. का नाही ? कोणाची हिम्मत होईल त्यांची इज्जत अब्रू लुटण्याची ? त्यांची इज्जत अब्रू तुम्ही/आम्ही वाचवू शकत नाही का ? आपले माहित नाही, पण निदान आम्ही तरी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत.