शाकाहारी जेवणाच्या थाळीत हवाच असा हा पदार्थ.अगदी कमी साहित्यात आणि वेळात होणारा,आणि म्हणूनच मला करायला,खायला आणि खिलवायला आवडणारा.फक्त या भावनगरी मिरच्या गावल्या की,झालं.बाकीचं साहित्य असतंच घरात.साध्या वरणभात किंवा आमतटीभातासोबत;भाजी असली,नसली;तरी या मिरच्या बहार आणतात.खरं नाही वाटत?करूनच पहा.
साहित्य:-
१. १०/१२ भावनगरी मिरच्या.
२. एका वाटी ओले खोबरे.
३. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.
४. एक चहाचा चमचा भरून जिरे.
५. मीठ चवीनुसार.
६. एक पळी तेल.
कृती:-
१. मिरच्या धुवून पुसून त्यांना सुरीने एक चीर द्यावी.
२. ओले खोबरे ,हळदपूड,जिरे, मीठ शक्यतो पाणी न वापरता मिक्सरमधून वाटून घ्यावे.
३. हे वाटण मिरच्यांमध्ये दाबून भरावे.
४. पॅनमध्ये तेल घालून गरम झाल्यावर मिरच्या लावाव्यात.
५. आंच मंद करून एका बाजूने झाल्यावर परतून दुसऱ्या बाजूने होऊ द्याव्यात.जास्तीत जास्त ५ ते ७ मिनिटांत या छान खरपूस होतात.
वाचने
8994
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती साधा सोपा पदार्थ आहे.
वाळवलेल्या मिरच्या कशा करतात
मस्त सुर्गीताई
जबरा दिसतायत मिरच्या!
खूपच छान पाककृती. फोटो फारच
पा.कृ. आवडली...
वाह्ह... :)
वा! ह्या मिरच्यांचे सारण अनेक
वा!छान आहे पाकृ.
करायला अतिशय सोपी ! आम्ही तर
वावा..
अहाहा!! मस्तं दिसतायेत