अटॅक

तसे ते फार स्वाभिमानी. उभ्या आयुष्यात कधी कुणाकडे हात पसरायची वेळ त्यांच्यावर आली नव्हती.अतिशय प्रामाणिकपणे व रक्ताचा घाम करुन त्यांनी एक एक पै जोडला असतो.आपल्या एकुलत्या मुलीचे लग्न ही त्यांनी अगदी थाटात करुन दिलेल असत.त्याच पुंजीच्या साहाय्याने ते दोघ आपल उर्वरीत आयुष्य समाधानाने जगत असतात.
आज ते दोघ खुप आनंदात असतात कारण त्यांचा नातु भेटायला येणार असतो.त्याच्या साठी गोड-धोड करायच म्हणुन आजी त्यांना सामान आणायसाठी बाजारात पाठवतात. सामान आणि औषध घेउन येत असताना खुप लोक जामा झालेली व संतापलेली दिसतात.
काय झालं? ....आजोबा
ती व्यक्ती........ बँक बुडाली.......आपले पैसे गेले.
काययय???...... आजोबा छातीवर हात ठेवत कोसळतात.

वाचने
1967
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
कमल कमळ घे , ई १ लो लेखन
सहमत
In reply to कमल कमळ घे , ई १ लो लेखन by काकामामा