एक उद्वीग्न करणारा अनुभव !
गेल्या आठवड्यात तळेगांव -दाभाडे , जिल्हा पुणे येथील एका शासकीय कार्यालयात जाण्याचा (कु) योग आला. निमित्त होते आमच्या नव्या सदनिकेचे नोंदणीकरण ! अस्मादिकांबरोबर विटूकाकु , बिल्डर आणि त्याच्या वकीलीण बाई !
दिवस मे महिन्यातला अस्ल्याने सकाळी दहा वाजता तळेगांवात सुद्धा प्रचंड उकडत होते.आभाळ आल्याने आणि आदल्यादिवशी चार शिंतोडे पड्ले असल्याने वातावरण प्रचंड दमट होते. पण नव्या घराची खरेदीचा आमचा उत्साह आणि "कसा पटवला" याचा बिल्डरचा आनंद यामुळे आम्ही सारे जण तसे खुषीत होतो.
ठरल्याप्रमाणे अगोदर महामार्गावर भेटून बरोब्बर १० वाजता मध्यवर्ती तळेगांवात त्या खास शासकीय इमारतीत पोहोचलो.ही इमारत थेट जी.ए.च्या कथेतल्या प्रमाणे बनवून घेण्यात आली असावी. खाली पोष्ट आणि वर रजिष्ट्रीचे हाफीस अशी योजना होती. गाडी लावयला जागा शोधतानाच पहिला अनुभव आला."हिथं गाडी लावायची नायं" रस्त्यावर कपडे धुणार्या माता-भगिनीनीं खास मावळी हेल काढून स्वागत केले. बिल्डरचा माणूस हुषार ( तो असतोच ) , त्याला तिथली सवय होती , त्याने बरोबर नेमकी जागा शोधून दिली.
घाम पुसत इमारतीच्या आत प्रवेश केला. समोर जळ्मटं लागलेली उद्घाटनाची फरशी .. तेच ते .. आपले दादा. त्यांनी हुद्घाट्न केले होते .. म्हणजे इमारत ह्या ८-१० वर्षातील असावी , पण कळा मोगल-कालीन होती. अमोनियाच्या भपकार्याने आमचे स्वागत केले. सबंध इमारतभर तो भपकारा भरुन राहीला होता. सार्या इमारतीला कोळेष्टके लागली होती.दादा येऊन गेल्यानंतर पुन्हा तिथे केर्सुणी फिरली नसावी.
वास्तविक या इमारतीत रोज ( हो रोज )करोडोंची उलाढाल होते. रोजचे (हो रोजचे) इथले सरकारी उत्पन्न काही लाखांच्या घरात असेल,(तिथला कारकूनच लाखभर कमवत असेल!) असे म्हणतात लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागा अतिशय स्वच्छ असावी लागते पण आपले शासन धर्मनिरपेक्ष असल्याने असल्या फुटकळ धार्मिक बाबींना थारा नाही.
आपल्या घराचे नोंदणीकरण करायचे म्हणून आम्ही पंच पंच उषः काली सुस्नात होऊन ठेवणीतले कपडे घालून पुण्यनगरीतील ग्राम दैवताचे स्मरण करुन आलो होतो.. पण त्या इमारतीत पाय ठेववेना !
आमच्या चेहर्यावरचा तिरस्कार वाचून बिल्डरचा माणूस अजीजीच्या स्वरात म्हणाला .. झालेच .. आपले पेपर रात्रीच तयार केलेत आपला नंबर लगेच येईल.!
वरच्या मजल्यावर उजव्या हाताल एक अंदाजे २० बाय २० चा हॉल ! तिथे एका कडेला रांगेने सरकारी माणसे आपले कळकट अवतार आणि त्याहून कळ्कट फाय्ली रचलेल्या टेबलामागे बसली होती. पंखे फक्त त्यांच्याच डोक्यावर गरगरत होते !
बाकी पब्लिक उरलेल्या जागेत ! विरुद्ध बाजूला पब्लिक्साठी खुर्च्या ठेवल्या होत्या.. वातावरणात प्रचंड उकाडा होता.. आणि भरुन राहीलेला घाणेरडा वास.. ..! पंखे नाहीत , पाणी पिण्याची सोय नाही .. एका स्टील च्या पिंपात पाणी भरुन ठेवले होते पण तसले पाणी प्यायला हिम्मत होत नव्हती . स्वच्छता गृहाकडे तर पाहण्याची देखील माझी हिंमत झाली नाही. हॉलला एक बाल्कनी होती, तीच्या दोन्ही बाजूना थुंकून घाण केली होती . त्यात अंग चोरुन उभे रहावे तर मोबाईलवर बोलणारी जन्ता आपल्या कानात कोकलु लागे ! (मोदींना विनंती की ताबडतोब मोबाईलचे दर १० पट वाढवावेत!)
खुर्च्यांचे पाय एकेमेकांला बांधले होते त्यामुळे खुर्ची ओढून थोडे मोकळे बसावे तर ते ही शक्य नव्हते ! त्यातच आज वडगांवचा काम्प्युटर बंद असल्याने ती गर्दी इकडेच येते आहे असे शुभवर्तमान कळाले ! बातमीबरोबरच लोक ही धडकले ! आता त्या हॉलला स्वारगेटच्या फलाटाची कळा आली. त्या तसल्या गर्दीत आमच्या सारखे सुस्नात होऊन आलेले अनेक उत्साही चेहरे होते, लेकुरवाळ्या होत्या , आजी - आजोबा होते. त्यांचे चेहरे आमच्यासारखेच " चिरुन टाक ही मान " अशा अवस्थेत ! कधी एकदा आमचं होतेय हीच चिंता ! त्या जागेवरून अक्षर: उचलून टाकल्यासारखे होत होते . आपले काम कधी एकदा होतयं याचीच सर्वजण वाट पहात होते... स्नशानात पूर्वी कवटी फुटीपर्यन्त थांबावे लागे , तिथेही लोक इतके व्याकुळ होत नसावेत.
आमचा लंबर लागेल म्हणून आम्ही उभयतांही व्याकूळ होऊन उठत बसत होतो. बरं नंबर कधी लागणार हे ही कळत नव्हते ! वाट पहाणे हा नरकच ! पण अनिश्चित काळासाठी वाट पाह्णे म्हणजे कुंभीपाक + रौरव, असा डबल ट्रबल ! सरकारी कारकून आणि बिल्डरची माणसे यांची लगबग सुरु होती. आम्ही आपले वाट पहतोय .. तरी बिल्डरचा माणूस सारख्री अपडेट देत होता. आता पेपेर तयार झाले . आता साहेब येतीलच .. आता शिक्के मारू .. वगैरे वगैरे .. मध्येच दोन - चार तालेवर माण्से आली सह्या केल्या आणि निघून पण गेली... खाली मर्सिडीज लावली होती .. त्यावरुनच लक्षात आले.. आम्ही आपले तिथेच .. दीन .पतित !
साडेबाराच्या सुमारास एकदाचे आमचे नशिब उघडले .. आम्हांला दोघांनाही उत्तम सही करता येते पण आमचे सहिशिवाय फोटो आणि अंगठे ही घेतले. सौ. नी ती अंगठ्याची शाई थोडीशी आपल्या कपड्यानाही लावून घेतली. ( त्याचे झाले असे की तिथे बसलेला एक कळकट माणूस ज्याचा / जिचा अंगठा उठ्वायचा आहे त्याचा अंगठा हातात घेऊन जोराने प्याडवर दाबे .. आणि मग कागदावर उमटवे ..का तर म्हणे ठसा चांगला यावा ... त्याला हिने बाणेदारपणे नकार दिला. थोडी चीड-चीड झाली ..त्या नादात शाई - कपडे ..पर्स.. मोबाईल.. जाउ द्या ) वास्तविक आम्हां दोघानांही उत्तम लिहिता -वाचता येते तरी ही अंगठा का घेतला म्हणून विचारायची सोय नाही ... चुपचाप बिलडरचा माणूस सांगेल तिथे सह्या करत होतो.. साहेबाच्या उघड्या ड्रावर मधल्या नोटा मला दिसल्या नाहीत..पण प्रश्न विचारण्याची सोय नाही... लांडग्याच्या मागे शेळ्या जाव्यात तश्या अवस्थेत आम्ही तो कार्यक्रम एकदाचा पार पाडला. हुश्श !
उपचार म्हणून खाली उतरल्यावर बिल्डरला म्हटले , चला चहा घेऊ ! विटुकाकूने तो प्रस्ताव ताबडतोब फेटाळला , म्हणाली .. मी आता घरी जाऊन अंघोळ केल्याशिवाय काहीही खाणार -पिणार नाही !
चुप-चाप गाडीत बसलो ( बिळ्डर त्याच्या आणि मी माझ्या ) एसी फुल्ल केला आणि गाडी पुण्याकडे भरधाव सोडली ! महामार्गावर आल्यावर खिडकी उघडून छाती भरुन मोकळा श्वास घेतला ......
यानिमित्ताने मला पडलेले काही प्रश्न !
१. लोकांशी व्यवहार करणार्या सरकारी लोकांसाठी काही नियम आहेत की नाही ? रोज दाढी करावी , अंघोळ करावी आणि धुतलेले स्वच्छ कपडे घालावेत अशी किमान अपेक्षा लोकांनी करु नये का ?
२. जिथे पैशाचे व्यवहार होतात, जनता ग्राहक असते तिथे तरी किमान काही सुविधा असायला नकोत का ?
३. शासकीय इमारतींचे लेखा -परिक्षण होते का ?
४. इतक्या मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी ऑन - लाइन करणे अशक्य आहे का ?
५. शासकीय कामाचा काही प्रोसेस फ्लो अथवा टाईम स्टडी असतो का ? ( आमचे कागदपत्र "ब्राऊनियन मूवमेंट" प्रमाणे एका टेबलावरुन दुसर्या टेबलावर फिरत होते . दर वेळी वाटे .. आता झाले बहुतेक ! )
६. काही टोकन सिस्टीम करता येणार नाही का ? लोकांना ( कस्ट्मर ) अनंत काळापर्यन्त ताटकळत ठेवण्याचे विकृत समाधान घेण्यात सरकारी कर्मचार्यांना काय आनंद मिळतो?
७. इतरत्र ही असाच अनुभव आहे का ?
८. आमचा पुण्याचा बिल्डर पोचलेला होता , त्याने संध्याकाळी सह्या करायला बोलावले. १० मिनिटांत मोकळे केले. बायको म्हणाली " नया है वह " असा बिल्डर गणिक सरकार भेदभाव का करते ?
९. मला या सबंध अत्याचाराची तक्रार करायची आहे. एक ग्राह़क म्हणून माझ्यावर अन्याय झाला आहे अशी माझी भावना आहे . अशी तक्रार कोठे करता येईल ? ग्राहक न्यायालयात ?
प्रतिक्रिया
ऑफिसमध्ये कुत्रे नव्हते का?
उद्वेगजनक अनुभव आहे खरा.
हल्ली ब-याच सरकारी खात्यांची संकेतस्थळं असतात......
आता या नोंदणी व मुद्रांक
आयजीआर म्हणुन श्रीकर परदेशी आले आहेत.....
आता बहूत अच्छे दिन आनेवाले है
अहो
ह्म्म्म !!
विटुकाका नविन घर घेतल्याबद्दल
धन्यवाद !
ह्यावरून एक निश्चित, रामदास
उद्विग्नतेच्या नादात 'अभिनंदन
पूर्वी तळेगावात घर करण्याची
तळेगाव?
नाय वो ..
ग्रामदैवत
ठाण्यात तरी बरा अनुभव आलाय.
किळस
हम्म्म्.....खरच वैताग आहे राव
आपण किती क्षुद्र आहोत हे
हम्म...
वाईट वाटले
अभिनंदन!
पैसा
सर्कारी कचेर्यांच्या
माफ करा पण लेख वाचून
लेख वाचून अपेक्षाभंग झाला,
तळेगाव ? एक सोपी गंमत सांगतो
यावर एकच उपाय, लांब
मला तर त्या रजीस्ट्रेशन ऑफीस
तिकडे काम करणार्यांना गरज
३०० शिक्के???? बाब्बौ!!!
अशा कार्यालयांत काम कराव्या
नविन घराबद्दल
धन्यवाद
विटेकर तुम्ही बरेच सुदैवी
पॉप अप.
अभिनंदन!
सेम अनुभव
अत्याचार +१
office office चा मुसद्दीलाल आठवला...
हा फ्लॅटक मी विकला मागच्या महिन्यात
हा फ्लॅटक मी विकला मागच्या महिन्यात