अस्मितेच्या मुद्द्या वरुन राजकारण होतेच. धार्मिक, प्रांतिक, भाषिक अस्मिता हे मुद्दे अनेकदा चघळुन झाले आहेत. पुढेही होत राहतील. यातुनच विचारप्रक्रिया तयार होत असते. अभिमान ,गर्व ,अस्मिता यातुन जर संकुचित विचार प्रसारित होत असतील तर ते वैश्विक विचारांना हानीकारक ठरतात. आता विश्वात्मके देवे ॥ ..वगैरे फक्त फक्त कर्मकांडासारख बनत!
अवांतर- साहित्यिक =साहित्तिक असे वाचतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
".... यातुनच विचारप्रक्रिया तयार होत असते"
तुमच्याशी सहमतच आहेच.
जगात वैचारीक क्रांतीत साहित्यिकांची भुमीका महत्वाची ठरलेली आहे. तेच चांगल्या वाईट विचारांची पायाभरणी करत असतात. ईतर समाज मग त्यावर विचार करून अंमलबजावणी करतो.
"अभिमान ,गर्व ,अस्मिता यातुन जर संकुचित विचार प्रसारित होत असतील तर ते वैश्विक विचारांना हानीकारक ठरतात."
साहित्यिकांनी आपल्याच भाषेच्या प्रचार/ प्रसार केला हा मुद्दा गर्वाचा व संकुचित विचारांचा कसा काय ठरू शकतो? आणि वैश्विक विचार मराठीला अस्मितेला संकुचीत समजणार्यांनाही त्यांच्या भाषेपुरता सिमीत करत नाही काय?
"साहित्यिक =साहित्तिक असे वाचतो"
सुचनेबद्दल धन्यवाद. बदल केला आहे.
अवांतर: (काका, तुमची नेहमीची भाषा आठवून माला वाटलं की कोनी दुसराच मान्सांन लिवलय की काय? कोन्या साहित्यिकानं परतिक्रिया द्येली की काय आस वाटून ग्येलं पगा.)
:-)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
मुत्तेल्वार म्हणतात..आम्हि हिंदि भाषी आहोत....विदर्भात हिंदि बोलतात...हि चळवळ बहुजन समाजापर्यंत पोहोचली आहे का?....तेलंगणाचा प्रश्ण काय वळण घेतो आहे त्यावर अखंड महाराष्ट्र्चे काय होणार हे अवलंबुन आहे...... व मराठी अस्मितेचे पण..असे वाटते..
सहमत आहे. भाषा,संस्कृतीपेक्षा अर्थकारणाला जास्त महत्व आहे हे तेलंगण प्रकरणातून दिसत आहे.तेलुगु चॅनलवर बोलताना काही तरुणांनी 'तेलुगु अस्मिता गेली चुलीत्,आम्हाला नोकर्या द्या,आमच्या मतदारसंघाचा विकास करा' असे उद्गार काढले.
अशोक चव्हाणांनी विदर्भासाठी कितीतरी हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे असे वाचले.
P = NP
आपल्या मराठीचा मुद्दा का मांडत नाही? की हे साहित्यिक कोणी बडा लेखक, कवी काय मुद्दा मांडतो आहे त्याची वाट पाहत आहे?
मराठी साहित्यिकांनी नक्की काय मांडणे अभिप्रेत आहे? साहित्यिकांनी मराठीचा मुद्दा मांडायचा म्हणजे नक्की काय करायचे? ते मराठीत लिहितात्(बरेच लेखक्/कवी पूर्ण वेळ मराठीत लिहीत असतात) म्हणजे मराठीचा प्रसार करतातच की!
भेंडी
P = NP
सदर लेख म्हणजे उचलली बोटे बडवला कळफलक ह्याचा उत्तम नमुना आहे.
मराठी अस्मितेच्या मुद्याला धरून वेळोवेळी होणार्या वेगवेगळ्या प्रश्नांबाबतीत मराठी साहित्यिक नेहमी मलूल, बोटचेपी भुमीका का घेतात?
नेमके कुठले प्रश्न आहेत ? साहित्तिकांची भुमिका बोटचेपी कशी? जरा उदाहरण द्याल का?
मराठी साहित्य संमेलने देखील आपली भुमीका व्यवस्थीत मांडत नाही. आपल्या मराठीचा मुद्दा का मांडत नाही?
आपण किती साहित्य संमेलने उपस्थित राहून हा निश्कर्ष काढलात ? किमान पक्षी कार्यक्रम पत्रीका तरी चाळलीत काय ? तमाम मराठी साहित्तिकांवर आरोप करताना आपला ह्या विषयावर काय अभ्यास आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
सर्व मराठी साहित्यिकांनी मराठी अस्मितेच्या मुद्याला उचलूनच धरले पाहिजे.
म्हणजे नक्की काय केले पाहिजे? मनसेची तळी उचलून धरायला पाहिजे का?
-
अफाट जगातील एक अडाणि.
प्रतिक्रिया
राजकारण
".... यातुनच
मुत्तेल्व
सहमत
मराठी
कै च्या कै...
सदर लेख