हॅहॅहॅ!!! छानच लिहिलंय रे भौ... तुझे टोलनाक्याचे सटल टोले, पुजार्यावरची टिप्पणी वगैरे छानच. तुला बरे सगळीकडे भूभ्भे भेटतात. सध्या आमच्याकडे पण डिमांड चालू झालीये...
अवांतर: पाय पूर्ण बरा झालेला दिसतोय....
बिपिन कार्यकर्ते
हॅहॅहॅ
भुभुंशी 'जवळीक' आपोआप होते. थोडस भॉ केल कि झाल. त्याच त्यांनी केलेले डिकोडिंग मला अभिप्रेत असलेल्या अर्थाशी सुसंगत असत.माणसांबाबत ती गणित बदलतात. कारण डिकोडिंग बदलत. अनिल अवचट आपल्या 'सृष्टीत....गोष्टीत ' या पुस्तकात दगडधोंडे, झाडे फुले पाने यांच्याशी पण बोलतात. त्यांचा हा इतरांना वाटणारा विक्षिप्तपणा त्यांच्या प्रकृतीशी सुसंगत आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
एवढ्या उन्हात चहा..., सदस्याचा सहअस्तित्वाचा कालावधी..., नोंद म्हणुन अथवा पुरावा म्हणुन...,वैचारिक उवांनी डोके खाजु लागले...,आपल्या मेंदुतील विचार व भावना हेच आपल विश्व..,भविष्यात खाद्यालय व रुग्णालय ही परस्पर संगनमताने...
मस्तच!!
बायकोने चरणकमलांना गुदगुल्या केल्यावर श्रमपरिहार झाला. यासारख सुख नाही.
+१
एक प्रौढ प्रवासवृत्तांत खूप आवडला. :-)
'मी अमुक, मी तमुक' ' तो/ ती स्वत:ला काय समजतो/ते' 'एकेकाला बघुन घेईन' 'याला/ हिला फाट्यावर मारीन, त्याला/ तिला फाट्यावर मारीन' 'असशील तू मोठा/ठी आम्हाला काय घेण आहे?' 'तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी' 'याल तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय' ' तुम्ही अक्कल शिकवायची गरज नाही' वगैरे वगैरे हे सगळ कुठुन येत?
वा... तारे पाहून आलेले विचार मस्तच...
भुभीचे फोटोही छान...
आणि अत्र्यांच्या तो मी नव्हेच मधले " अनंतकोटी ब्रह्मांडनायक भगवान श्रीकृष्णावतार श्री राधेश्याम महाराज " यांचे माहुलीचे मंदिर बघायला मिळाल ..आनंद वाटला...
... मात्र फूडमॉलमधल्या बटररोटी खाणार्या म्हातार्या पाहून तुम्हाला इतके का वाईट वाट्ले? :).. हॅहॅहॅ.... अगदी अध्यात्मिक झालात ते.. !
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
प्रवासवर्णन अतिशय सुंदर लिहिले आहे. आपली लिहिण्याची हतोटी पण छानच. प्रवासवर्णन करता करता मनुष्य स्वभावावर केलेल्या भाष्यांमुळे या लेखाचा दर्जा उंचवला गेला आहे . या लेखासाठी आपले खास अभिनंदन !!
पाडत, टिपत, चाखत केलेले लेखन आवाल्डे (तुमचाच शव्द तुम्हाला ;) )!
त्यात नळ होते. लागणा-या कड्या होत्या. बादली, मग होते.
हे निरीक्षण मार्मिक आहे! (नाहीतर दरवा़ज्याला टेकून गाणं म्हणत म्हणत आंघोळ करावी लागते! :T )
भूभीप्रेम हे तुमचे अविभाज्य अंग आहे त्यामुळे त्याला पर्याय नाही!
मॉलमधल्या बटररोटीधारी म्हातार्यांनी तुमच्या डोळ्यांवर अंमळ गुटगुटीत आघात केलेला दिसतोय! :P )
प्रवासवर्णन आवडले.
चतुरंग
(नाहीतर दरवा़ज्याला टेकून गाणं म्हणत म्हणत आंघोळ करावी लागते!
एकाने राष्ट्र गीत म्हणणे चालू केल्याने शेजारी नुकताच 'आत' गेलेल्या सदारजीचे वांदे झाले. राष्ट्रगीताला मान दिलाच पाहिजे ना! (होस्टेलवर ऐकलेला किस्सा) :O
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रकाशराव,
वर्णन मस्त आहे. कॉलेजच्या काळात कोयना धरण बघण्याचा योग आला होता. मात्र नंतर काही तेथे गेलेलो नाही. पण आपल्या लेखामुळे त्याची परत आठवण झाली...
फोटोंवर एक प्रश्न: अभयारण्य असून फोटोत मनुष्यप्राणीच का दिसतात बरं? ;)
बाकी चाफळच्या मंदीराबाबत (पुसट आठवणीप्रमाणे): त्या मंदीरातील मूळ मुर्ती ह्या समर्थ रामदासांना नदीत मिळाल्या होत्या आणि त्यांची त्यांनी प्रतिष्ठापना केली. स्वातंत्र्यानंतर ते मंदीर बिर्ला ट्रस्टने घेतले आणि तेथील श्रीराम-सीता-लक्ष्मण आणि हनुमानाची मुर्ती बदलून "बिर्ला स्टाईल" मुर्ती आणायच्या होत्या. त्यावर विरोध झाला आणि केस कोर्टात गेली. नंतर तडजोड निघून बिर्लांकडच्या मुर्ती आणि मूळ मुर्ती अशा दोन्ही तेथे ठेवण्यात आल्या.
एकटेच अथवा समानशील-व्यसन असणार्या व्यक्तींबरोबर रहायला/भटकायला आदर्श जागा.
सर्वसामान्य मध्यममार्गी विचारधारेतील लोकांबरोबर वावरताना वेगळ्या धाटणीचे विचार असणार्या व्यक्तीची कुचंबणा लिखाणातून जाणवते.
अनेक ठिकाणी मुडपून घ्यावे लागते असे दिसते.
एकंदर तुम्ही हा प्रवास तुमच्या पद्धतीने जास्तीतजास्त 'एंजॉय' केलात हेही नसे थोडके.
मस्त प्रवासवर्णन... पाहुणालय हा शब्द झकास वाटला...
बटररोटी चापणार्या म्हातार्या बघून विचित्र वाटतं . मनाला त्रास होतो
भूक लागल्यावर काही चविष्ट खाता पिताना 'ज्यांना दोनवेळच अन्नदेखील धड मिळत नाही असे लोक आपल्या भारतात/ जगात आहेत' हा विचार नेहमीच अस्वस्थ करुन जातो...
मग लाखो रुपयांच्या शाही घरात, गरजेपेक्षा जास्त सोयी घेऊन, उच्चभ्रू वस्तीत अजूनच उच्चभ्रू सोसायटी निर्माण करून जागेचे वाढलेले भाव अजून कृत्रिम वाढवून ते पैसे बिल्डरला देउन राहताना -- कच्च्या घरात, पडक्या जागेत, राहणारे, दहा बाय दहाच्या खोलीत सहा पासून दहा किंवा मुंबइच्या चाळीप्रमाणे कितीही संख्येने राहणारे, स्वतःचं हक्काचं छप्पर असावं अशा आशेत आयुष्य घालवणारे लोक आठवतात का? बहुसंख्य जनतेला जगण्यापुरता धड निवारा मिळत नाही हे आठवतं का? तसं नसेल तर त्या बटररोटी खाणार्यांबद्दल काही वाटणं निरर्थक आहे.
शेजार नसलेल्या भिंती, तीन बाजूंनी ओपन घर असे जागेचा अपव्यय करणारे आणि अत्याधुनिक सोयींसकट असलेले घर घेताना, झोपण्यापुरती जागा मिळाली तर आनंद होणारी जनता आठवते का?
ओबेसिटी बरोबर ही विलक्षण विषमता आणि डोळ्यांवर आलेली ऐश्वर्याची गुंगी आणि उच्च वर्गीय वृत्तीची तुपकट चरबी हा तितकाच मोठा प्रॉब्लेम आहे.
ही विषमता सर्वत्र आहे. फूडमॉल पाहूनच जाणवली पाहिजे असे नाही. शोधायला लागलो तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यात पण ती पदो पदी दिसेल. यात फूड मॉल संस्कृतीचं समर्थन नाही. पण त्याकडे बोट दाखवताना स्वतःकडची चार बोटं नजरे आड करण्याचा विरोधाभास जाणवला इतकंच.
ब-याच वेळा मनाला विषमतेचा त्रास झाला कि आपण जगण्यातील विविधता म्हणुन सुसह्य करुन घेतो. काय करणार मित्रा? विकासरावांच्या उपक्रमावरील 'उदर भरण नोहे' धाग्याची आठवण आली. भुकेल्या नारायण चा प्रसंग कुठतरी मनावर कोरला गेला होता. त्यामुळे ते अधिक संवेदनशील पणे जाणवत असावे. आज घरातले उरलेले चांगले अन्न कोणा भुकेल्या जीवाला द्यायची सोय/उपलब्धता नाही म्हणुन संडासात टाकुन फ्लश करतानाही त्रास होतो. हे अन्न गावी असताना गाई -म्हंशीच्या दाण्यात (आंबोवण) टाकले जायचे. त्यामुळे वाया जात नव्हते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
घाटपांडे काका,सहजसुंदर लेख.
ह्यावेळी परीक्षेमुळे गावी जायला अंमळ उशीर होतोय.तुमचा लेख वाचला,फोटो बघितले,मन गावाची सैर करून आले.धन्यवाद काका.
अवांतरःशिवाजी महाराज आणि समर्थांची पहिली भेट जिथे झाली,ते ठिकाण चाफळपासून जवळच आहे.चाफळच्या पुजार्यांना विचारल्यावर ते रस्ता सांगतात.हे ठिकाणही अतिशय शांत असं आहे.चाफळपासून काही अंतरावर एक घळ आहे.समर्थांचं वास्तव्य तेथे होतं.त्या घळीच्या बाजूला एक कुबडी तीर्थ आहे.त्याची चाफळच्या पुजार्यांनी सांगितलेली आख्यायिका:शिवाजी महाराजांना तहान लागली तेव्हा तेथे पाण्याचा एकही स्त्रोत नव्हता,तेव्हा समर्थांनी तेथील दगडावर आपल्या कुबडीने प्रहार केला आणि तेथून पाण्याचा अखंड झरा येऊ लागला.म्हणून त्याला कुबडीतीर्थ असे नाव पडले.तो झरा उन्हाळ्यातही आटत नाही आणि उन्हाळ्यातही त्याचे पाणी अगदी थंडगार आणि गोड असते.
प्रतिक्रिया
हॅ हॅ
मस्त सफर !
छान लिहिले
वृत्तांत आवडला
+१ सहमत
हॅहॅहॅ!!!
भॉ
सचित्र वर्णन आवडल.
फनस छान हाय
फार छान
मस्त प्रवासवर्णन...
मस्त
छान
मस्त
थंड पर्यटन
वाचनीय
हॅ हॅ हॅ...
छान
बोरं, करवंद, जांभळं
राष्ट्र गीत
भयानक कुचंबणा...
वा..
वाह वाह!
चांगले वर्णन...
कुचंबणा
लै भारी
कालच
एक शंका
सहमत आहे
सहलीच्या वर्णनाची
घाटपांडे