वणवा
असा पेटतो वणवा
उरी घर्षती झाडे,
आणि भणानून उठती
दु:खाचे धूसर वाडे.
रात्र वेशीला अडली
अंधारच इथे सजलेला,
अग्नीच्या तप्त तमांतून
मोगरा कसा भिजलेला?
कुणी हाक देऊनी स्वर्गी
वणवा असा रोखावा,
वनमेघ दाटूनी विवर्त
वळीवाचा पाऊस यावा.
-कौस्तुभ
असा पेटतो वणवा
उरी घर्षती झाडे,
आणि भणानून उठती
दु:खाचे धूसर वाडे.
रात्र वेशीला अडली
अंधारच इथे सजलेला,
अग्नीच्या तप्त तमांतून
मोगरा कसा भिजलेला?
कुणी हाक देऊनी स्वर्गी
वणवा असा रोखावा,
वनमेघ दाटूनी विवर्त
वळीवाचा पाऊस यावा.
-कौस्तुभ
आठवांच्या काळवेळा पाहिल्या.
हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या.
मालवेणा चंद्र भोळा कालचा.
कालच्या या चांदण्याही राहिल्या.
सोसली मी ही तमांची अंतरे.
रात्र काळी झाडपाने मंतरे.
गारव्याने जाग आली या फुला.
पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या.
प्राण झाले कातिलांचे सोबती.
सांग हे का माणसाला शोभती ?
वाचण्याचे मार्ग सारे संपले.
शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या.
-कौस्तुभ
वृत्त - मालीबाला
नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही
गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही
शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली
नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही
अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता
संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना?
हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती
झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती?
देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी
अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ?
भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती
मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो
रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो
ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो
नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो
आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो
सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो
सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी
बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शिवकन्या
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला
पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला
दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला
बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला
देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते
त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते
समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती
मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती
हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो
मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो....
-शिवकन्या
नकळत ओढून नेतो
मिचकावत सोडून देतो
स्वतःशीच खिन्न हसतो
हा संभ्रम माझा
स्वप्नांच्या झुळूकी मनाला
तप्त पाऊलवाटा पायाला
अनवाणी चालू पाहतो
हा संभ्रम माझा
अवखळ विचारांच्या वाऱ्यात
दात-ओठांच्या माऱ्यात
क्षणासाठी मलम होतो
हा संभ्रम माझा
- संदीप चांदणे
स्वामी चरणी समर्पित
...
डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....
तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???
पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.
माणसे कविता होऊन येतात
एकएक हट्टी कडवे
लाडाकोडाने घालून ठेवतात,
दोन कडव्यांमध्ये
एक जीवघेणी कळ
विसावा म्हणून ठेवून जातात...
माणसे कविता होऊन येतात
अलंकार भिरकावून
केवळ अर्थ होऊन
रात्रभर उशाशी बसतात
उजाडताना परत
पुस्तकाच्या अंधारात
गुडूप होतात......
माणसे कविता होऊन येतात....
-शिवकन्या