अलखपैंजणी परखडमोती

सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

हाणा रे हाणा , या विडंबकांना.. हे चावताती, हळव्या कवींना.. टांगून उलटे, माळावरी अन.. नवकवितांची धुरी द्या हो त्यांना.. जशी कोवळ्या कवितांची, पिसे हे उपटती.. यांच्या बोडक्याचे, केस केस उपटा.. तरीही जर उरले, अतृप्त अस्वस्थ आत्मे, हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका.. (अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

<गोवरी>

खोपडीच्या मुळाशी किती जोर देशी उगाच्या उगाची किती कुंथीशी मानवाची नसे कोणतीही स्थिती चूर्णे खा जराशी ठेवी ती उशीशी जात जातीत भेदे अशी ती कशी जळेना कळेना मढी जाळीशी बाबारे कोरडे तरी तेच आहे लिहिशी कविता तू ती कशाने अशी यात ना काही तरी तू तोच आहे पिसारा कशाला उगा दाविशी करावे भरावे उणे तूच पाहे खपावे मरावे गोवरी जाळताहे (कविवर्यांशी ओळख नसल्याने धार मुद्दाम थोडीशी कमी केली आहे. ओळख असती तर लोकशिक्षण, मुक्त अभिव्यक्ती आणि लोकरंजन वगैरै वगैरै वगैरे सर्वव्यापी फालतूपणासाठी काही शब्द बदलता आले असते )

निराश तरुणाईचे मनोगत......

लेखनविषय:
काव्यरस
प्रेम, स्पर्धा नि व्यसनान, झालाय आयुष्याचा बेरंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रेमभंगात होऊनी निराश विचलित झाल अभ्यासातील लक्ष सावरण्यासाठी नाही अजूनही दक्ष जगण्याची आस मारुनी, टाकितो हा प्रेमभंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे धाव जलद यशाची लागली हाव कष्ट करण्याचा न राहिला ठाव अपयशाच्या भीतीने, जाहलो मी निसंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... करिअरची वाट खूप अवघड जीवघेण्या स्पर्धेत चालू धडपड प्रत्येक वेळी नवीन गडबड जिद्द अन चिकाटी विकुनी, लावितो आयुष्याला सुरुंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दं

!!...'मानवी भूकंप'...!!

लेखनविषय:
!!...'मानवी भूकंप'...!! गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले.. मानवी भूकंपामुळे जरी झाली हो

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना..

तुम्ही पी एम बनणारच ..

लेखनविषय:
काव्यरस
एकदा आमचे युवराज वदून गेलेत .......त्याला कोणीही रोखू शकणार नाही तेव्हा आम्हा झाला साक्षात्कार खरेच..... चोऱ्या, दरोडे, खून, बलत्कार, जुगार या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भेसळ, साठेबाजी, नफेखोरी, कर बुडविणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भ्रष्टाचार, स्वीस बँकेतील काळा पैसा, पैसे, दारू वाटून निवडून येणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही गावात अमंळ लोड शेडींग कचरा, घाण,रस्त्याचे कडे वरील ....विधी या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही शहरात चार दिवसाआड पाणी, पुतळ्यांची गर्दी रस्त्यांवरील खड्डे,....निष्पापा

<<<<आज बसावे उद्या बसावे >>>

लेखनविषय:
काव्यरस
कच्चा माल : http://www.misalpav.com/node/20177 (सोनलताईंची माफी मागुन ) आज बसावे उद्या बसावे दोन थेंब सांडुन देणे डोक्यामध्यल्या शॉटालाही सोडुन द्यावे जमवुन प्यावे दोन पेयपांनांच्या मधले अंतर आहे केवळ झुरत राहणे कसे कळावे खुळ्या जगाला सांजकाळीचे बहकुन येणे ग्लास मद्याचे असेच ताटवे त्यात बुडावे दिसावे काजवे.. ओठांवरचे शब्द गरिबडे श्वासागणती बरळत जाणे सिगारेटीचे वलय खेळावे नको मेंदुशी फाटे फोडणे तंदुरीचे चिकन घेउनी संध्या काळी आपले बसणे

सावली

लेखनविषय:
काव्यरस
आता ठरवलय की वेडं व्हायचं नाही, पण तरीही येतो एक झटका जस जशी संध्याकाळ होत जाते, निष्पर्ण वृक्षाखाली बसलेला वेचत असतो वाळलेल पान अन् पान, सोबतीला असतात घुबडे, वटवाघळे, करत असतात सोबत अमावस्येच्या रात्री पौणिमेच्या चंद्रासोबत चांदण्याच्या साक्षीने, आणि लिहीत असतो त्या वाळलेल्या पानांवर नक्षत्रांचे देणे, सोबतीला असते सावली उगवत्या सुर्याची वाट पाहात..... बेहेरे मकरंद ११०२२१७१
Subscribe to भयानक