अजूनही... अजूनही...

लेखनविषय:
काव्यरस
अल्लड तुझे ते वागणे करते गुन्हा... मुग्ध मुग्ध रे सावध कटाक्ष टाकणे करते पुन्हा... लुब्ध लुब्ध रे अजूनही... अजूनही.... कधी गंध देती वार्‍यासही तुझ्या मोकळ्या केसांच्या बटा कधी कुंद करती तार्‍यासही तुझ्या बोलक्या डोळ्यांच्या छटा मकरंद अधरी तोलती सखये तुझे... शब्द शब्द रे अजूनही... अजूनही.... तुझी कंकणे झंकारती सप्तसुरांच्या अलवार ताना तुझी पैंजणे नादावती अधीर मनाच्या स्पंदनाना प्राजक्तापरी हासणे झुलती सुखे... बद्ध बद्ध रे अजूनही... अजूनही.... ही देहबोली वेडावते वना श्रावणी पिपासा जणू अस्तित्वाचे नभ व्यापते इंद्रधनुचा उसासा जणू फिरत्या जगाचे पाळणे होती मुके... स्तब्ध स्तब्ध रे अजूनही...

श्रावणातला पाऊस

लेखनविषय:
काव्यरस
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा क्षणात हसणारा, क्षणात रुसणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा खट्याळ, खोडकर, उगाचच छेडणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा दु:खावर हळुवार फुंकर घालणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा अवेळी अडवून चिंब भिजवणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा कणाकणात हिरवी स्वप्नं रुजवणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा अवचित येणारा, अचानक जाणारा

कधी एके काळी..

लेखनविषय:
काव्यरस
============================= कधी एक काळी असा काळ होता, जिथे स्वप्न सारे पुरे व्हायचे.. मनातून वारा तरारून येता कसे फूल प्रत्येक नाचायचे ! कधी ते पहाटे दिशाकोन सारेच आदित्य रंगात रंगायचे कधी रात्रीचे गोड अंधार सारे सुखाच्याच स्वप्नात संपायचे ! असो भोवतालात गर्दी कितीही, तुझे चोरटे नेत्र भेटायचे मनाचे मनी गूज यावे कळोनी, असे काहीसे छान बोलायचे ! कधी एकदा नीट एकांत येता, हातामधे हात गुंफायचे.. असा स्पर्श स्पर्शास स्पर्शून जाता, रोमांच रोमांच फुलवायचे ! कधी शांतता खूप बोलायची ..अन कधी शब्द सारे मुके व्हायचे, कधी पावसाळाच डोळ्यात येता, चारी दिशांना धुके व्हायचे.. कधी एवढा काळ भांडायचो की

थांब राजसा..

लेखनविषय:
काव्यरस
रात मधुमती, चांद संगती थांब राजसा जाऊ नको.. स्पर्श अमृती, रे तुझी मिठी दूर उभा तू राहू नको.. धरेस बिलगुन, गगन झोपले गळा चांदण्-मणी गुंफले दूधाळ होई , अकाश गंगा क्षितिज माखले , जांभूळ रंगा रंग मिलनी पुसटू नको.. थांब राजसा जाऊ नको.. रूणझुण वाजे पुन्हा पाऊल नव्या उषेची नवी चाहूल आर्त स्वरांनी रात पुकारे मनी मिलनी, नवे धुमारे स्वप्न टिपेला नेऊ नको.. थांब राजसा जाऊ नको.. मिठीत ओल्या, मला राहु दे मधुमिलनी, मला न्हाऊ दे कुशित तुझा गंध घेऊ दे उरांत तुझा छंद लेऊ दे रात सुनी ही ठेऊ नको थांब राजसा जाऊ नको.. - प्राजु

पाहिजे एकांत थोडा--

लेखनविषय:
काव्यरस
पाहिजे एकांत थोडा पाहिजे थोडा अबोला पाहिजे पहाट थोडी पाहिजे निशब्द वारा होउनी मग एक तेव्हा अंतरी मिसळून जाउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ मिटूनी तू डोळे तुझे ग काहीशी हरवून जासी स्पर्शता लाभे दिलासा तू मला बिलगून जासी छेडूनी तारा मनाच्या शब्द तू मी सुर होउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही त्रुप्ताता देहात ही त्रुप्ताता विश्वास सार्‍या त्रुप्ताता श्वासास ही संपता पहाट थोडी काहीशी हुरहुर व्हावी धुसरत्या तारकांना भेटीचे संकेत देउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ -पुष्कराज

प्रपोजल्

काव्यरस
आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी, पण टपोर्‍या आषाढी थेंबांचा सर घातलाय पावसाने आधीच तुझ्या गळ्यात ओल्या मातीच्या ठिपक्यांचे घातलेस मेंदीसारखे पैंजण तुझे तूच पायात डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं, ढग वाजवून सांगेन म्हटलं, वार्‍याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं, तर स्वत:भवतीच गिरक्या घेत डोळे चिंब मिटून तू पावसाच्या मिठीत आणि माझे शब्द, सूर सगळे चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत या भिजल्या-थिजल्या कवितेचं प्रपोजल् व्हायची वाट बघत

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा

लेखनविषय:
काव्यरस
आज बे-एरियात अत्युतम हवा पडली होती.७०-७२ डि.-म्हणजे २१-२२ डि.सेंटीग्रेड- तापमान भर दुपारच्या उन्हात वाटायचं. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.
Subscribe to शृंगार