मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०१५

सक्सेसफुल फेल्युअर: अपोलो-१३चा थरार

लाल टोपी ·
. . 1 "ह्युस्टन, वुई हॅव अ प्रॉब्लेम.." नासाच्या ह्युस्टन येथील नियंत्रण कक्षात मिळालेला हा संदेश पृथ्वीपासून दोन लाख पाच हजार मैल दूर पोहोचलेल्या, मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या नासाच्या तिसर्‍या मोहिमेतील अपोलो-१३ या चांद्रयानातून आला होता.

In reply to by हरीहर

लाल टोपी 12/11/2015 - 22:24
जिम लॉवेलच्या 'दि लॉस्ट मून' या पुस्तकावर आधारीत 'अपोलो-१३' याच नावाने चित्रपट निघाला आहे.

फेरफटका 12/11/2015 - 01:59
लेखात अनेक ठिकाणी यानातले चार जण असा उल्लेख आला आहे. यानात तीनच अ‍ॅस्टोनॉट्स होते. तेव्हढी दुरुस्ती कराल का?

In reply to by फेरफटका

लाल टोपी 12/11/2015 - 22:22
तुम्ही म्हणता तशी चूक दोन ठिकाणी राहून गेली आहे. पहातो काही करता येते का? सुचनेबद्दल धन्यवाद.

एस 12/11/2015 - 23:29
तांत्रिकदृष्ट्या हे किती किचकट आणि तणावाचे काम असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो!

साध्या विमानप्रवासात देखिल विमानाने जमिन सोडून आकाशात उड्डाण केले की आता आपले भवितव्य नशिबाच्या हवाली असा विचार मनांत येऊन, विमान पुन्हा सुखरूप जमिनीवर उतरेपर्यंत, जीवाला धाकधूक असतेच. इथे तर इतक्या दूरचा प्रवास आणि तोही तकनिकी समस्याग्रस्त यानातून होता. प्राप्त परीस्थितीचे वर्णन करण्यास 'थरार' हा शब्दही तोकडा पडावा अशी भयंकर परीस्थिती. इतक्या दूरच्या यानावर जमिनीवरून संपर्कात राहून घडामोडींना आपल्या नियंत्रणात ठेवणार्‍या शास्त्रज्ञांना साष्टांग नमस्कार. (घरच्या रिमोटला टिव्ही दाद देत नाहिये. उद्याच दुरुस्त करून आणला पाहिजे.)

शब्दबम्बाळ 19/11/2015 - 03:54
तुम्ही खूप चांगली माहिती संकलित केली आहे आणि मांडणीही उत्तम! पण शेवटी एक दोन चुका झाल्या आहेत त्या निदर्शनास आणू इच्छितो. ओपोलो-१३चे दोन भाग होते - ओडिसी आणि अॅक्वेरिअस. ओडिसी म्हणजे कमांड मॉड्युल आणि अॅक्वेरिअस म्हणजे ल्युनार मॉड्युल. ओडिसीला हिट शिल्ड होते कारण त्याला पृथ्वीच्या वातावरणामुळे होणारे घर्षण आणि त्यामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता याचा सामना करायचा होता. पण अॅक्वेरिअस मात्र चंद्रावर उतरणार असल्याने त्याला हिट शिल्ड नव्हते. हिट शिल्ड शिवाय पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश म्हणजे मृत्यू अटळ. त्यामुळे मोहिमेच्या शेवटच्या भागात ओडिसीला 'जिवंत' करण्यात आले आणि सगळे अंतराळवीर अॅक्वेरिअस सोडून ओडिसी मध्ये आले. अॅक्वेरिअसने त्यांना ४ दिवस जगवले होते त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात(पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश) त्याला वेगळे करताना त्याचे आभार मानण्यासाठी ज्यो केर्वीनने "फेअरवेल अॅक्वेरिअस, वुई थेंक यू" हे उद्गार काढले.

In reply to by शब्दबम्बाळ

लाल टोपी 19/11/2015 - 21:38
होय परतीचा प्रवास ल्युनार मॉड्यूल मधून केला आणि पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करायला ७० मिनीटे राहीली असता पुन्हा कमांड मॉड्युलमध्ये येवून प्रवासाचा शेवट कमांड मॉड्युल मधून केल्याचे माहीत होते मूळ लेखात ही माहिती समाविष्ट केली नव्हती मात्र ती नावांची आलटा पालट ही त्रुटी राहून गेली. श.ब.जी आभार,

In reply to by लाल टोपी

शब्दबम्बाळ 20/11/2015 - 01:15
विज्ञानावर आधीच कमी लेख येतात, त्यात इतक्या उत्तमपणे मांडणी केलेल्या लेखात काही त्रुटी राहू नये म्हणून सांगावस वाटल! :) संपादकांना सांगून बदल झाले तर उत्तमच... त्यात दिवाळी अंक लेखांना वाचनखुण पर्याय देखील नाहीये...

बोका-ए-आझम 25/11/2015 - 18:58
टाॅम हँक्सचा अपोलो १३ याच शीर्षकाचा मस्त चित्रपट आहे पण त्यातून नीट समजलं नव्हतं की प्रत्यक्षात प्राॅब्लेम काय झाला होता. पण या लेखातून एकदम व्यवस्थित स्पष्टीकरण मिळालं.

मित्रहो 27/11/2015 - 16:35
मस्त मांडलाय. छान माहीती संकलीत केली आहे. माझ्या माहीतीप्रमाणे अपोलो १३ नंतर नासामधे एकंदरीतच सुरक्षेच्या दृष्टीने बऱ्याच सुधारणा झाल्या. त्याला कारण होते अपोलो १३ चे अपयश त्याचमुळे नासामधे अपोलो १३ हे सर्वात यशस्वी समजले जाते. अपोलो १३ हा चित्रपट सुद्धा जबरदस्त आहे.

In reply to by हरीहर

लाल टोपी 12/11/2015 - 22:24
जिम लॉवेलच्या 'दि लॉस्ट मून' या पुस्तकावर आधारीत 'अपोलो-१३' याच नावाने चित्रपट निघाला आहे.

फेरफटका 12/11/2015 - 01:59
लेखात अनेक ठिकाणी यानातले चार जण असा उल्लेख आला आहे. यानात तीनच अ‍ॅस्टोनॉट्स होते. तेव्हढी दुरुस्ती कराल का?

In reply to by फेरफटका

लाल टोपी 12/11/2015 - 22:22
तुम्ही म्हणता तशी चूक दोन ठिकाणी राहून गेली आहे. पहातो काही करता येते का? सुचनेबद्दल धन्यवाद.

एस 12/11/2015 - 23:29
तांत्रिकदृष्ट्या हे किती किचकट आणि तणावाचे काम असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो!

साध्या विमानप्रवासात देखिल विमानाने जमिन सोडून आकाशात उड्डाण केले की आता आपले भवितव्य नशिबाच्या हवाली असा विचार मनांत येऊन, विमान पुन्हा सुखरूप जमिनीवर उतरेपर्यंत, जीवाला धाकधूक असतेच. इथे तर इतक्या दूरचा प्रवास आणि तोही तकनिकी समस्याग्रस्त यानातून होता. प्राप्त परीस्थितीचे वर्णन करण्यास 'थरार' हा शब्दही तोकडा पडावा अशी भयंकर परीस्थिती. इतक्या दूरच्या यानावर जमिनीवरून संपर्कात राहून घडामोडींना आपल्या नियंत्रणात ठेवणार्‍या शास्त्रज्ञांना साष्टांग नमस्कार. (घरच्या रिमोटला टिव्ही दाद देत नाहिये. उद्याच दुरुस्त करून आणला पाहिजे.)

शब्दबम्बाळ 19/11/2015 - 03:54
तुम्ही खूप चांगली माहिती संकलित केली आहे आणि मांडणीही उत्तम! पण शेवटी एक दोन चुका झाल्या आहेत त्या निदर्शनास आणू इच्छितो. ओपोलो-१३चे दोन भाग होते - ओडिसी आणि अॅक्वेरिअस. ओडिसी म्हणजे कमांड मॉड्युल आणि अॅक्वेरिअस म्हणजे ल्युनार मॉड्युल. ओडिसीला हिट शिल्ड होते कारण त्याला पृथ्वीच्या वातावरणामुळे होणारे घर्षण आणि त्यामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता याचा सामना करायचा होता. पण अॅक्वेरिअस मात्र चंद्रावर उतरणार असल्याने त्याला हिट शिल्ड नव्हते. हिट शिल्ड शिवाय पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश म्हणजे मृत्यू अटळ. त्यामुळे मोहिमेच्या शेवटच्या भागात ओडिसीला 'जिवंत' करण्यात आले आणि सगळे अंतराळवीर अॅक्वेरिअस सोडून ओडिसी मध्ये आले. अॅक्वेरिअसने त्यांना ४ दिवस जगवले होते त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात(पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश) त्याला वेगळे करताना त्याचे आभार मानण्यासाठी ज्यो केर्वीनने "फेअरवेल अॅक्वेरिअस, वुई थेंक यू" हे उद्गार काढले.

In reply to by शब्दबम्बाळ

लाल टोपी 19/11/2015 - 21:38
होय परतीचा प्रवास ल्युनार मॉड्यूल मधून केला आणि पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करायला ७० मिनीटे राहीली असता पुन्हा कमांड मॉड्युलमध्ये येवून प्रवासाचा शेवट कमांड मॉड्युल मधून केल्याचे माहीत होते मूळ लेखात ही माहिती समाविष्ट केली नव्हती मात्र ती नावांची आलटा पालट ही त्रुटी राहून गेली. श.ब.जी आभार,

In reply to by लाल टोपी

शब्दबम्बाळ 20/11/2015 - 01:15
विज्ञानावर आधीच कमी लेख येतात, त्यात इतक्या उत्तमपणे मांडणी केलेल्या लेखात काही त्रुटी राहू नये म्हणून सांगावस वाटल! :) संपादकांना सांगून बदल झाले तर उत्तमच... त्यात दिवाळी अंक लेखांना वाचनखुण पर्याय देखील नाहीये...

बोका-ए-आझम 25/11/2015 - 18:58
टाॅम हँक्सचा अपोलो १३ याच शीर्षकाचा मस्त चित्रपट आहे पण त्यातून नीट समजलं नव्हतं की प्रत्यक्षात प्राॅब्लेम काय झाला होता. पण या लेखातून एकदम व्यवस्थित स्पष्टीकरण मिळालं.

मित्रहो 27/11/2015 - 16:35
मस्त मांडलाय. छान माहीती संकलीत केली आहे. माझ्या माहीतीप्रमाणे अपोलो १३ नंतर नासामधे एकंदरीतच सुरक्षेच्या दृष्टीने बऱ्याच सुधारणा झाल्या. त्याला कारण होते अपोलो १३ चे अपयश त्याचमुळे नासामधे अपोलो १३ हे सर्वात यशस्वी समजले जाते. अपोलो १३ हा चित्रपट सुद्धा जबरदस्त आहे.

सुपरस्पाय

अजया ·
सुपरस्पाय-बोका ए आझम “ त्याने हेरगिरीच्या इतिहासात अतुलनीय काम केलेलं आहे” – जनरल डग्लस मॅकॉर्थर; दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रशांत महासागर क्षेत्रातल्या अमेरिकन सैन्यदलाचे प्रमुख. “ त्याच्या हेरगिरीला तोड नाही.” – हॅरॉल्ड ‘किम’ फिल्बी; ब्रिटीश गुप्तचर संघटना एम.आय.६ मध्ये रशियाच्या के.जी.बी.ने यशस्वीरीत्या घुसवलेला दुहेरी हेर. “ हेरगिरीच्या इतिहासातला सर्वात जबरदस्त हेर” – ईअन फ्लेमिंग; जेम्स बाँडचा जनक. “त्याच्या हेरगिरीने जगाला वाचवलं.” – लान्स मॉरो; जगद्विख्यात इतिहासकार आणि स्तंभलेखक. “त्याने इतिहास घडवला पण आपण दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.” – कार्ल बर्नस्टाईन; जग

रातराणी : [कथा] : कळते रे!

सस्नेह ·
वेणू कधी कधी स्वप्नात येते माझ्या. मोठ्या घेराचा फ्रॉक घातलेली. लांबसडक केसांच्या चापूनचुपून तेल लावून दोन वेण्या बांधलेली. हातात हात घालून आम्ही नदीकाठी जातो. मी पाण्यात डुंबत असतो आणि ती किनाऱ्यावर बसून शंखशिंपले असं काहीतरी गोळा करत बसते. पाण्यात खेळून झालं की मी काठावर येतो. तिच्या अंगावर पाणी उडवतो. ते तिला अजिबात आवडत नाही. पण ती चिडत नाही. मग मीच थांबतो. ती शांतपणे गोळा केलेल्या शंखशिंपल्यांच्या दोन वाटण्या करते. एक हिस्सा मला देते आणि म्हणते, "हे घे. हे तुझ्यासाठी. " "मला कशाला, मला नको हे मुलींचे खेळ. ठेव तुलाच." असं मी म्हणतो आणि स्वप्नातून जागा होतो.

कोण कोण आलंय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
कोण कोण आलंय. हजेरी द्या. :)