✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तिखट विषय, बोथट शब्द

ध
धनंजय यांनी
Sat, 08/29/2009 - 08:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4465 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

रोचक

मुक्तसुनीत
Sat, 08/29/2009 - 08:37 नवीन
धनंजयचा लेख रोचक वाटला. मात्र एक प्रश्न आहे. आपण अनेकदा असल्या बोथट , उथळ , बटबटीत गोष्टी पाहातो , वाचतो, ऐकतो. मग प्रस्तुत प्रसंगाचाच उल्लेख का करावासा वाटला असावा ? (अर्थात एक गोष्ट नमूद करायला हवीच : बोथट किंवा तीव्र , उथळ किंवा खोल , बटबटीत किंवा तरल या संज्ञा व्यक्तिसापेक्ष आहेत. एखाद्याला जे बटबटीत वाटते दुसर्‍याला तेच प्यार असते.) बाकी आपल्यापुढे जे प्रश्न आहेत त्यांची परिणामकारक मांडणी कशी करता येईल हा मुद्दा सुद्धा विचार करण्यासारखाच. प्रत्येक काळात प्रत्येक समाजापुढे प्रश्न हे आहेतच. रोजच्या बातम्यांमधून त्यांची झलक आलटून पालटून पहायला ऐकायला मिळते. तर मग कुठल्याही प्रश्नाबद्दल जनजागृती नक्की कशामुळे परिणामकारक होईल असा प्रश्न पडणे समजण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Sat, 08/29/2009 - 09:00 नवीन
लेख. लेखाचा विषय आणि मांडणी आवडली. नित्याच्या परिचयामुळे, अतिवापरामुळे घासून गुळगुळीत झालेले; अर्थहीन वाटू शकणारे शब्द आणि हे शब्द योजणार्‍या व्यक्तीबद्दलची किंवा तिच्या व्यवसायामुळे (राजकारणी, व्यावसायिक गायक, नट, आयटी प्रोफेशनल इ.) आपल्या मनात तयार झालेली एक प्रतिमा यामुळे तुम्ही म्हणता तशी भाषेची धार बोथट होत असावी. ह्या दोन कारणांबरोबरच शब्दांचा सैलपणे, व्यापारी किंवा स्वार्थी हेतूसाठी करण्यात येतो अशा आजवरच्या बव्हंशी अनुभवामुळे एकंदरीतच 'हे खोटे, बेगडीच आहे', असं धरून चालण्याकडे कल बनत असावा. असे असले तरी काय सच्चे आहे आणि काय बेगडी याचा निवाडा प्रत्येकजण आपापल्या मगदुराप्रमाणे, पूर्वग्रहांप्रमाणे आणि पिंडाप्रमाणे करत असतो. बटाट्याच्या चाळीचे चिंतन काहींना बेगडी, दिखाऊ वाटतं तर काहींना काळजाला हात घालणारं. तेव्हा शक्यतो सरसकट सामान्यीकरण करण्यात करू नये, असं वाटतं. 'तू न पहचाने तो है ये, तेरी नजरों का कसूर'चे धोरण बर्‍याचदा (अर्थात कायम नव्हे) याबाबत उपयुक्त ठरावं; हे माझं वैयक्तिक मत. वरील धोरणाला अनुसरून ते सार्‍यांनाच पटावे याचा आग्रह नाही. इतर एका चर्चेत दिलेला 'मादाम बॉव्हरी'तला हा उताराही याच गोष्टीवर भाष्य करतो - रॉडॉल्फ या परपुरूषाच्या प्रेमात पडलेली कथानायिका आपल्या भावनांची कबुली त्याला देते, तेव्हा बाहेरख्याली स्वभावाच्या त्या जमीनदाराच्या डोक्यात आलेले विचार आणि त्या निमित्ताने फ्लॉबर्टने भाषेच्या दुबळेपणाविषयी केलेलं चिंतन असं - He could not see - this man of such broad experience - the difference of feeling, beneath the similarity of expression. Because wanton or venal lips had murmured the same words to him, he only half believed in the sincerity of those he was hearing now; to a large extent they should be disregarded, he believed, because such exaggerated language must surely mask commonplace feelings: as if the soul in its fullness did not sometimes overflow into the most barren metaphors, since no one can ever tell the precise measure of his own needs, of his own ideas, of his own pain, and human language is like a cracked kettledrum on which we beat out tunes for bears to dance to, when what we long to do is make music that will move the stars to pity.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

स्वप्न साकार झाले!

सुनील
Sat, 08/29/2009 - 12:02 नवीन
वेगळ्या विषयावरील लेख आवडला. वि. द. घाट्यांनी त्यांच्या एका निबंधात फार सुंदर उदाहरण दिले होते - "स्वप्न साकार झाले", ह्या शब्दप्रयोगाचे! ज्याने हे शब्द प्रथम वापरले त्याची अनुभूती, आनंद, तृप्तता काही वेगळीच असावी. वर्षानुवर्षे एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावा, परीश्रम करावे आणि नंतर त्याचे गोड फळ मिळावे, तेव्हा असा सुंदर शब्दप्रयोग जन्माला आला असावा. नंतर नंतर तो शब्दप्रयोग इतका घासून घासून गुळगुळीत झाला, सवंग झाला की, कुणालाही रात्री एखादे फडतूस स्वप्न पडते आणि दुसर्‍या दिवशी ते साकारदेखिल होते! कीट्स म्हणतो - O sweet Fancy! let her loose; Summer's joys are spoilt by use Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

छान

स्वाती दिनेश
Sat, 08/29/2009 - 12:23 नवीन
वेगळ्या विषयावरचा लेख आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

दत्ता काळे
Sat, 08/29/2009 - 13:01 नवीन
नंदन म्हणतात, त्याप्रमाणे : असे असले तरी काय सच्चे आहे आणि काय बेगडी याचा निवाडा प्रत्येकजण आपापल्या मगदुराप्रमाणे, पूर्वग्रहांप्रमाणे आणि पिंडाप्रमाणे करत असतो. तसेच गाठीशी असलेल्या अनुभवांवरसुध्दा -काय सच्चे आहे आणि काय बेगडी - हे मापले जाते. उदा. खरोखरीच अतिगरीब आर्थिक स्थिती असलेल्या लोकांसाठी काम करणार्‍या संस्थामधले व्रती संस्थाचालक जे काही बोलतात / सुचवतात त्यामागे आख्खे लाभार्थी ( इथे - अतिगरीब लोक )उभे असतात. त्यांचा 'हो' / 'नाही' अगदी ठाम असतो. तात्पर्य कुठल्याही क्षेत्रात त्याचे महत्व जाणून घेऊन अगदी सच्चेपणाने काम करणार्‍यांचा शब्द निर्वाणीचा असतो. त्यात जास्त बोलण्याची गरजच रहात नाही.
  • Log in or register to post comments

कविता आणि कित्ता

विसुनाना
Sat, 08/29/2009 - 14:17 नवीन
'कविता' हा विषय बराच गुंतागुंतीचा आहे. जॅकी स्मिथ बाईंच्या कविता कदाचित खरोखरीच्या तळमळीतून जन्मल्या असतील किंवा कदाचित जनसामान्यांच्या त्या विषयांवरच्या भावनांना हात घालून त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी असतील. (इंग्रजीत 'र्‍हेटोरिक' )किंवा कदाचित दोहोंच्या मिश्रणातून जन्मलेल्या असतील. 'अनुभवाची कळकळ' ही थेट अनुभवांतून गेल्याबिगर येत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. म्हणूनच आपल्या मराठी भाषेतही "'दलित साहित्य' हा केवळ दलितांनीच लिहीण्याचा साहित्यप्रकार आहे कारण दलितांचे अनुभव इतरांना येणे शक्य नाही "-असे मत अनेक दलित लेखक हिरीरीने मांडत असतात. त्यावर साहित्यिकाचा 'परकायाप्रवेश' हा किती खरा - किती खोटा असतो यावर चर्चा होऊ शकते. संवेदनशीलता आणि सहृदयता या दोन गुणांची प्रत्येक साहित्यिकाला मूलभूत गरज असते. त्याबरोबरच प्रत्यक्ष अनुभवांची शिदोरी असल्यास त्याला कमीतकमी बेगडी / कृत्रिम साहित्यनिर्मिती करता येते. अन्यथा निर्माण झालेले साहित्य 'कित्ता गिरवणे' या सदरात मोडते. हे झाले साहित्यनिर्मितीबाबत. समस्यांबाबत बोलायचे झाल्यास समस्यांची मांडणी त्या समस्येशी प्रत्यक्ष झगडणार्‍या व्यक्तीने केल्यास त्या मांडणीच्या 'अनघड'पणातच त्या समस्येचे कापणारे कंगोरे, घुसमटवणारे कानेकोपरे, ठेचकाळवणारे खाचखळगे (हुश्श! :)) बारकाईने मांडणे शक्य आहे. त्या झगड्याचा अनुभव नसलेल्यांपर्यंत ते अनुभव सामाजिक, आर्थिक, वैचारिक गाळ्ण्यांमधून पोचतात आणि मग त्यांची मांडणी घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांमधून होते. समस्या प्रत्यक्ष अनुभवणार्‍या व्यक्तीस समस्या मांडण्यास उद्युक्त केले तर त्या मांडणीची धार बोथट होणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments

हमे देखना है

सहज
Sat, 08/29/2009 - 17:49 नवीन
चांगला विषय, उत्तम लेख, सुंदर प्रतिसाद. डू द राईट थिंग ! :-)
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
Sat, 08/29/2009 - 18:09 नवीन
सहमत... 'हमे देखना है' या वाक्याची इतकी खिल्ली नंतर झाली होती की, विकास यांनी दुसऱ्या एका धाग्यात दिलेला ट्रेडमिलचा किस्सा अगदी भविष्यवादी ठरला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हाच तर कळीचा मुद्दा

प्रकाश घाटपांडे
Sat, 08/29/2009 - 18:31 नवीन
त्यावर साहित्यिकाचा 'परकायाप्रवेश' हा किती खरा - किती खोटा असतो यावर चर्चा होऊ शकते
विद्रोही साहित्यात शब्दांची धार बोथट होउ नये याची पुरेपुर काळजी घेतली जाते. जेधे-जवळकरांच्या साहित्यात धारे ने टिळकांना कापले होते. देशाचे दुष्मन हे जवळकरांचे पुस्तक आठवते प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

छान लेख.

कालिन्दि मुधोळ्कर
Sat, 08/29/2009 - 20:28 नवीन
छान लेख. कवितांमधून ही बोथटता अधीक जाणवते. कवितेचा भाषिक अवकाश खूप छोटा असल्याने शब्द-गुंफण हा अत्यंत महत्वाचा भाग बनत असेल कदाचित. कधी शब्दांचे रिसायकल केल्याने बोथटता तर कधी तोच-तोच अर्थ्/संदेश दिल्याने. घाटपांडे म्हणतात त्याप्रमाणे साचेबद्ध झालेल्या शब्दांची/अर्थाची मोडतोड करणे आणि नवी धार तयार करणे हे चांगल्या कवींच्या अभ्यासात मोडते.
  • Log in or register to post comments

_____________________________

भडकमकर मास्तर
Sun, 08/30/2009 - 01:35 नवीन
_____________________________ तरीसुद्धा तेच ते शब्द ऐकून ऐकून त्यांच्याविषयी भाषा माझ्या हृदयाला भिडेनाशी झालेली आहे. _ वरील वाक्य वाचताना मिस इन्डिया आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत दिली जाणारी उत्तरं आठवली... वर्ल्ड पीस, मदर टेरेसा, दैन्य दारिद्र्य, भूक, पाणी प्रश्न... हुशार कमनीय बाहुल्यांची पाठांतरित बडबड... ____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजीजय बालाजी
  • Log in or register to post comments

डॉमिनो

चित्रा
Mon, 08/31/2009 - 19:20 नवीन
जे विषय तुमच्यापर्यंत "पोचत" नाहीत, किंवा ज्या विषयांवर बोलूनही काही फायदा होत नाही आहे असे वाटू लागले की ते पोकळ, फोफसे वाटू लागतात. त्यातील रस निघून जातो. उ. अमेरिकेतील अनेक वर्तमानपत्रे पानांमागून पाने बातम्या देत असतात. उदा. ही बातमी पहा - परवाच एका १९ वर्षांच्या मुलाला एका नृत्याच्या कार्यक्रमाला गेला असताना मारले गेले. आता बातमीत याबद्दल असे म्हटले आहे - (यात राईस ही नृत्यकार्यक्रम जेथे आयोजित केला होता त्यांची प्रवक्ती). Rice called Brown’s death a tragic event. “We’re heartbroken. Our thoughts are with this young man’s family and friends.’’ (हे विचार खरे नसतील का? असतीलही, हे सर्व लोक, ही प्रवक्ती स्त्री या मुलाच्या "वेक"साठी जातील, तिथे अश्रूही ढाळतील इ. विचार मनात आले). The Dorchester YMCA has canceled all scheduled events until Boston police clear them to continue. (हे बरोबर आहे). Rice had no word whether security policies would change. “Today we’re dealing with the human loss,’’ she said. (असे कसे? म्हणजे ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना "अशा वेळी" प्रश्न कसा काय विचारला असे वाटावे अशी व्यवस्था केली जात आहे असा विचार मनात आला). Still, she said, it is important for a community like Dorchester to continue to offer teens and children a place to feel safe off the streets. (म्हणजे तरीही आमचे अस्तित्व टिकवणे हे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे). आता खरे प्रश्न असे दिसतात की त्या पार्टीला आलेल्या सर्वांना सुरक्षा-यंत्रणेने तपासून आत पाठवलेले असतानाही या मुलाला कसे मारले, त्याला मारावे असे त्याने काय केले होते, मुलांच्या हाती बंदूका कशा येतात, त्यांना शिक्षण का मिळत नाही इ.. आणि मग प्रश्न पडले आणि त्यासंबंधाने सहानुभूती वाटली तरी त्यात वेळ घालवण्याची इच्छा नाहीशी होते. हे होऊ नये. आणि ज्यांना हे मुद्दे तरीही वेळ घालवण्यासारखे वाटतात अशांच्या प्रयत्नांनी थोडी-थोडी सुधारणा होत राहते किंवा निदान त्यांना काही केल्याचा आनंद मिळत राहतो. खरे तर बाकीच्यांचीही सहानुभूती नसते असे नाही, पण एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर उपाय सापडत नसल्याने किंवा उपाययोजना नीट अंमलात येत नसल्याचे, लक्षात आल्याने त्यातला रस कमी होतो. आणि एक प्रकारचा डोमिनो इफेक्ट होतो की काय असे काही वाटते. असे होऊ नये यासाठी उपाय काय, तर कळीच्या दुव्यांना प्रश्नावर स्थिर करणे. हे छोटे बदल कसे घडतील हे नियंत्रित करणे.
  • Log in or register to post comments

एकदम अंतर्मुख करणारा विषय आहे.

चतुरंग
Tue, 09/01/2009 - 05:22 नवीन
राजकारणी कवियत्री जॅकीबाईंच्या कवितेचा संदर्भ हा फक्त विषयाकडे जाण्यासाठी वापरलेला धागा आहे. खरा ठसठसणारा सवाल हा 'तीव्र प्रश्नांकडे समाज हळूहळू निश्चितपणाने पाठ फिरवताना दिसतो ते का?' हा आहे. (सविस्तर प्रतिसादा जरा वेळ देऊन लिहितो.) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा