खरे तर कुणाचेच काही चुकत नसते....
काळ चालत असतो ....
जखमा भरुन येतच असतात.
पण कधी कधी वाटते की काही काही जखमा न भरलेल्याच चांगल्या असतात...
अशा जखमा भळभळत्या रहाण्यासाठी "माझे काय चुकले ? " हा प्रश्न चांगला असतो :)
--अवलिया
पण, असं खरंच तुमच्या बाबतीत घडलं होतं कां ?
का, हि कल्पनेतली ष्टोरी आहे ?
- कारण, आमचे शाळेतले दिवस ढुं. . वर ठिगळं लावलेल्या खाकी हाफ चड्ड्या आणि सुरवातीला पांढरे असणारे सदरे घालून संपले, आणि कॉलेजचे दिवस तर जेमतेम दोन शर्टस्, तेवढ्याच विजारी आणि हिरो सायकल हाणणे एवढ्यावरच चाललेले असल्याने, आमच्या प्रेमभावना उमलण्याआधीच किड लागलेल्या कळी प्रमाणे निर्माल्ल्या होत्या, त्यामुळे मुलींकडे बघण्याची आमची भावना कायम ओशाळवाणी आणि शरमेची असायची . प्रेम हा दुर्मिळ प्रकार आम्हाला क्वचित, इतरांच्या बाबतीत आणि मुबलकपणे हिंदी चित्रपटात, अगदी तुमच्या कवितेतल्या प्रमाणे- म्हणजे आपली गरीबी आणि प्रियेचा धनिक आणि गर्विष्ठ बाप इ., बघायला मिळत असे. तेव्हा असल्या उत्तम प्रेमप्रकरणाची मला, अगदी माझ्या स्वप्नातली ,तुमची कविता भासली.
परंतु काहीहि असो, तुमची कविता मला आवडली.
वा..!!
अरेरे
सुरेख कविता
पोटापाण्य
खरे तर
चुचु
छान आहे कविता
सहमत!
कविता आवडली