✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक्सपायरी डेट.

प — प्राची अश्विनी, Tue, 10/31/2017 - 17:56
रेशमी साड्यांच्या बासनात मोरपिशी साडीच्या घडीत अलगद ठेवलेलं, ते पत्र.. तिथून बाहेर नाही काढत कधी हलकेच चाचपडते अधूनमधून त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे... त्यातला शब्दंशब्द पाठ आहे लिहून खोडलेला , पाण्याने पुसटलेला... किती मिनतवा-या. हट्ट, रुसवे फुगवे काय अन् काय हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी.. आपल्यामधे जे काही होतं नव्हतं, (नव्हतं तेच जास्त खरंतर) ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र... तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव (ते तेव्हांही खटकलेलं थोडं) एका अधमु-या नात्याची एकमेव खूण.. का कोण जाणे पण आज अचानक वाटलं, हर रिश्ते की एक उमर होती है तशी, पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?

प्रतिक्रिया द्या
5289 वाचन

💬 प्रतिसाद (26)

खूपच छान. 'मेरा कुछ सामान...'

एस
Tue, 10/31/2017 - 23:01 नवीन
खूपच छान. 'मेरा कुछ सामान...' ची आठवण करून देणारी कविता. जी कधी रुजू शकली नाहीत अशा नात्यांच्या वाळलेल्या रोपांची कलेवरं किती काळ पुस्तकाच्या पानात जपून ठेवायची, असा प्रश्न एक दिवस पडतोच कधी ना कधी. आठवणींना एक्सपायरी डेट नसेल कदाचित, पण विस्मृतीचा अभिशापतरी असावाच.
  • Log in or register to post comments

विस्मृतीचा अभिशाप....

प्राची अश्विनी
Wed, 11/01/2017 - 22:57 नवीन
विस्मृतीचा अभिशाप.... वा! क्या बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

विस्मृतीचा उःशाप....

पगला गजोधर
Fri, 11/03/2017 - 20:56 नवीन
विस्मृतीचा उःशाप.... असं हवं होतं नं ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

पत्राला पण एक्सपायरी डेट असते

पद्मावति
Tue, 10/31/2017 - 23:06 नवीन
पत्राला पण एक्सपायरी डेट असते का? असायला हवी खरतर. लेट गो करणं सोपं नसतं पण आवश्यक असतं. कविता आवडलीच.
  • Log in or register to post comments

अहाहाच!

सत्यजित...
Wed, 11/01/2017 - 00:45 नवीन
अतिशय मार्मीक,मर्मभेदीच झाली आहे कविता!
  • Log in or register to post comments

सुरेख!

रुपी
Wed, 11/01/2017 - 03:19 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

रुपी,सत्यजित, पद्मावति, एस,_/

प्राची अश्विनी
Wed, 11/01/2017 - 22:56 नवीन
रुपी,सत्यजित, पद्मावति, एस,_/\_
  • Log in or register to post comments

सुंदर!

पैसा
Fri, 11/03/2017 - 11:33 नवीन
एक्सपायरी डेट हवीच तर प्रत्येक गोष्टीला. रेणुका शहाणेने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल लिहिले होते की,"it died it's natural death" तेव्हा अंगावर चरचरून काटा आला होता, पण गोष्ट, नाते संपणे आणि पुढे चालू लागणे अपरिहार्य असते. अपरिहार्यतेच्या दु:खासाठी विस्मरण हा अभिशाप नव्हे तर वरदान आहे. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन उसे इक खूबसुरत मोड देकर छोडना अच्छा।
  • Log in or register to post comments

पैताई, खरंच.

प्राची अश्विनी
Sat, 11/04/2017 - 11:02 नवीन
पैताई, खरंच. रच्याकने, Bridges of Madison County पाहिलायस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बरी आठवण केलीस

पैसा
Sat, 11/04/2017 - 17:17 नवीन
राहून गेलाय तो बघायचा. यावरून brief encounter चीही आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

+1111

बाजीप्रभू
Sat, 11/04/2017 - 17:59 नवीन
+1111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपल्यामधे जे काही होतं नव्हतं

शब्दबम्बाळ
Fri, 11/03/2017 - 11:58 नवीन
आपल्यामधे जे काही होतं नव्हतं, (नव्हतं तेच जास्त खरंतर) ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र...
आवडलं लिहिलेलं... कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये नसतेच ती गम्मत किंवा तो आपलेपणा जो माणूस शोधत असतो अशावेळी ती गोष्ट संपणेच योग्य असते. तरच एखाद्या नव्या गोष्टीला सुरुवात करता येते. नाहीतर ती रखडलेली नाती ना पुढे जाऊन देतात ना जवळ असल्याचा आनंद देतात... नातं संपले कधी हे माहित असणे तसे भाग्याचे म्हटले पाहिजे, नाहीतर काही नात्यांचे धागे इतके विरत जातात कि ते कधी तुटून गेले हे देखील कळत नाही... ज्या व्यक्तीबरोबर आपण कुठल्या तरी नात्यात होतो ते नाते कधी संपून गेले याची काहीच आठवण नसणे जास्त त्रास देते!
  • Log in or register to post comments

खरंय.

प्राची अश्विनी
Sat, 11/04/2017 - 10:56 नवीन
खरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

छानच हं !

sayali
Fri, 11/03/2017 - 15:27 नवीन
छानच हं ! एकदम पटलं. आपल्यामध्ये काही नव्हतं हे वेळीच ध्यानात येणं हे महत्वाचं. तरीही ते जपून ठेवणं हा कुठला तरी नाजूक धागा मोरपिशी साडीच्या धाग्यासारखाच नाही का ?
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Sat, 11/04/2017 - 10:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sayali

क्या बात है !

सस्नेह
Fri, 11/03/2017 - 17:02 नवीन
खोलवरचा सल आणखी खोल गेला !
  • Log in or register to post comments

रुते कुणाला

तिमा
Fri, 11/03/2017 - 17:47 नवीन
काही ओळी अगदी मर्मभेदी! ज्यांना फुलही रुतून जखमा झालेल्या असतात, त्यांनाच कळेल या ओळींचे मर्म. जुन्या जखमा जाग्या झाल्या!
  • Log in or register to post comments

खुपच चटका लावून जाणारी कविता.

दुर्गविहारी
Fri, 11/03/2017 - 18:14 नवीन
खुपच चटका लावून जाणारी कविता. छान. एकच म्हणेन " उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या" पत्राला एक्पायरी डेट असेल, पण ठसठसत्या जाणीवेचे काय ?
  • Log in or register to post comments

Time is the best remedy.

प्राची अश्विनी
Sat, 11/04/2017 - 10:59 नवीन
Time is the best remedy.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

छान कविता.

अभिजीत अवलिया
Fri, 11/03/2017 - 20:18 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

सर्वांनाच धन्यवाद!

प्राची अश्विनी
Sat, 11/04/2017 - 11:03 नवीन
सर्वांनाच धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सुंदर...

बाजीप्रभू
Sat, 11/04/2017 - 18:05 नवीन
साहिर लुधियानवींची चलो "इक बार फिर से अज़नबी बन जाएँ हम दोनों" कविता आठवली..
  • Log in or register to post comments

वेळ झाली भर माध्यान्ह... :-)

चलत मुसाफिर
Sun, 11/05/2017 - 00:38 नवीन
वेळ झाली भर माध्यान्ह... :-)
  • Log in or register to post comments

प्रॅक्टीकल आणि थेअरी - माझे (जरासे वेगळे) मत

माहितगार
Tue, 11/07/2017 - 15:38 नवीन
गदीमांच्या गीतरामायणातल "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे एक उल्लेखनीय गीत आहे. त्यात सागरातल्या दोन ओंडक्यांची कल्पना कोणतीही दोन नाती एका अर्थाने क्षणिकच असतात हे सांगते. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा - 6 नको आसू ढाळू आता, पूस लोचानास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास... प्रॅक्टीकली माणसे अशीच वागत असावीत. व्यक्तीशः मीही असाच वागतो -तुकारामांच्या गाथेतील "तेलणीशी रुसला वेडा" प्रमाणे - अहं ही फार स्ट्राँग गोष्ट असते , पण तरीही माणसांच्या पुन्हा भेटण्याची शक्यता थेरॉटीकली शिल्लक असते. सांगरातील लाटेने दुरावलेली ओंडकी पुन्हा एखाद्या लाटेने पुन्हा भेटणारच नाहीत हेही कसे सांगावे. मानवाचा पुत्र पराधीन असल्याचे सांगणार्‍या गदींचा राम भरताशी वनवासानंतर पुन्हा भेटतोच. रोज कितीतरी माणसे भेटून विस्मृतीत जातात , त्या सर्वांबद्दल केवळ दोन ओंडकी जवळ आली म्हणून तुम्ही कविता लिहिता का ? समजा की पाण्याचा ग्लास पूर्ण रिकामा झाला आहे पण कुठेतरी ओल असल्या शिवाय तो रिकामा ग्लासही आठवतो का ? प्रॅक्टिकली माणसे दुरावतात हे मान्य पण थेअरॉटीकली समहाऊ व्यक्तिशः हि शक्यता शिल्लक राहते हे स्विकारणे अधिक रास्त वाटते. (अर्थात हे लिहिताना नात्यांच्या एकाच प्रकारचा मी विचार करत नाही तर विभीन्न नात्यांचा विचार करतो आहे)
  • Log in or register to post comments

बापरे, तुम्ही फारच

प्राची अश्विनी
Wed, 11/08/2017 - 08:33 नवीन
बापरे, तुम्ही फारच philosophical झालात. अर्थात तुमचा मुद्दा पण बरोबर आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

बापरे, तुम्ही फारच

माहितगार
Wed, 11/08/2017 - 12:18 नवीन
बापरे, तुम्ही फारच philosophical झालात. अर्थात तुमचा मुद्दा पण बरोबर आहे म्हणा.
तसं नाही मगच्या एका मिपाधागा चर्चेतला एक मुद्दा कदाचित खूप लिहूनही मला नीट कव्हर करता आला नव्हता तो यावेळी आपल्या कवितेला प्रतिसादाच्या निमीत्ताने कमी शब्दात आधीपेक्षा बरासा जमतोय असे वाटते ;). एका मुलीने एका बापाला सर्व हेवेदावे सोडून भेटले पाहीजे अशी माझी भूमिका मिपाकराम्च्या कोण टिकेचा भाग झाली होती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा