Skip to main content

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

लेखक साहना यांनी रविवार, 18/09/2016 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

वाचने 219374
प्रतिक्रिया 456

प्रतिक्रिया

हमीद दाभोळकरला कोणीच गुरुस्थानी मानलेले नाही. बाकी वरील उद्गारावरून त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला.

केवळ त्यांच्या आडनावामुळे नव्हे तर निव्वळ त्यांच्या उज्ज्वल स्वकर्तृत्वामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सध्याचे सर्वेसर्वा बनलेले थोर विचारवंत श्री हमीद दाभोळकर (कोण रे तो घराणेशाही, घराणेशाही म्हणून ओरडतोय? गप्प करा त्याला. लोकशाहीविरोधी फाशीष्ट कुठला! ). तर असे थोर्थोर विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले. सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले. हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या!

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI खालील प्रतिक्रिया जरूर वाचा ! 'मातीची बकरी' ही खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम - - सकाळ वृत्तसेवा बुधवार, 14 सप्टेंबर 2016 - 06:32 PM IST Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI Tags: #dr hamid dabholkar, eid, religious, social networking, pune नेटिझन्सच्या ‘ट्रोलिंग‘ला हमीद दाभोलकरांचे उत्तर, विवेक जपण्याचे केले आवाहन पुणे- "सध्या केवळ कुणालातरी टोमणा मारावा आणि धर्मधर्मात तेढ वाढवावी, अशा नकारात्मक उद्देशाने काही समाजमाध्यमांतून बकरी ईद निमित्त खऱ्याखुऱ्या जिवंत बकरीऐवजी ‘मातीची बकरी‘ कुर्बान करावी, अशी खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम राबवली जात आहे. मात्र, असे अपप्रचार करणाऱ्यांचा उद्देश पुरेसा स्वच्छ नाही, हे लगेच लक्षात येते. चुकीच्या प्रथेला विधायक पर्याय देण्याचा विचार आणि विरोधासाठी विरोध यात फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवे," अशा शब्दांत डॉ. हमीद दाभोलकर यांनी समाजमाध्यमांवरील चर्चांना उत्तर दिले. याचवेळी त्यांनी ‘भिन्न भिन्न धर्माचे सहअस्तित्व हे त्यांच्या वेगळेपणासह आणि विवेक जपत मान्य करायला हवे. धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा,‘ असे आवाहनही केले. बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना डॉ. दाभोलकर यांनी आपली ही मतं व्यक्त केली. ते म्हणाले, " खरंतर, धर्माधर्मात वितुष्ट न निर्माण करता त्यांच्या असणारा संवाद कसा उन्नत होईल, हे समाजमाध्यमांनी पाहायला हवे. आज ‘मातीची बकरी‘ करण्याचे सल्ले जेही कुणी देताहेत, त्यांनी एका अर्थाने कधीकाळी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात‘ ही आमच्याप्रमाणे अनेकांनी दिलेली हाक आज मान्य केली आहे आणि तिला त्यांचा आजवर असणारा विरोधही अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. एका अर्थाने त्यांनी धर्म चिकित्साच तर मान्य केली आहे." ... हे समाजबदलाचे द्योतक डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, " ‘विसर्जित गणपती दान करा‘, या आमच्या मोहिमेला वीस वर्षांपूर्वी प्रचंड विरोध झाला होता. आज मात्र हाच विचार न्यायालय, शासन-प्रशासन आणि अगदी नागरिकांच्या पातळीवरही स्वीकारला गेला असल्याचे दिसून येईल. आज आम्ही गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक करू, असे जेव्हा पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती म्हणतात, तेव्हा ते बदलत्या समाज मानसाचे द्योतक असते."

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI खालील प्रतिक्रिया जरूर वाचा ! 'मातीची बकरी' ही खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम - - सकाळ वृत्तसेवा बुधवार, 14 सप्टेंबर 2016 - 06:32 PM IST Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI Tags: #dr hamid dabholkar, eid, religious, social networking, pune नेटिझन्सच्या ‘ट्रोलिंग‘ला हमीद दाभोलकरांचे उत्तर, विवेक जपण्याचे केले आवाहन पुणे- "सध्या केवळ कुणालातरी टोमणा मारावा आणि धर्मधर्मात तेढ वाढवावी, अशा नकारात्मक उद्देशाने काही समाजमाध्यमांतून बकरी ईद निमित्त खऱ्याखुऱ्या जिवंत बकरीऐवजी ‘मातीची बकरी‘ कुर्बान करावी, अशी खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम राबवली जात आहे. मात्र, असे अपप्रचार करणाऱ्यांचा उद्देश पुरेसा स्वच्छ नाही, हे लगेच लक्षात येते. चुकीच्या प्रथेला विधायक पर्याय देण्याचा विचार आणि विरोधासाठी विरोध यात फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवे," अशा शब्दांत डॉ. हमीद दाभोलकर यांनी समाजमाध्यमांवरील चर्चांना उत्तर दिले. याचवेळी त्यांनी ‘भिन्न भिन्न धर्माचे सहअस्तित्व हे त्यांच्या वेगळेपणासह आणि विवेक जपत मान्य करायला हवे. धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा,‘ असे आवाहनही केले. बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना डॉ. दाभोलकर यांनी आपली ही मतं व्यक्त केली. ते म्हणाले, " खरंतर, धर्माधर्मात वितुष्ट न निर्माण करता त्यांच्या असणारा संवाद कसा उन्नत होईल, हे समाजमाध्यमांनी पाहायला हवे. आज ‘मातीची बकरी‘ करण्याचे सल्ले जेही कुणी देताहेत, त्यांनी एका अर्थाने कधीकाळी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात‘ ही आमच्याप्रमाणे अनेकांनी दिलेली हाक आज मान्य केली आहे आणि तिला त्यांचा आजवर असणारा विरोधही अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. एका अर्थाने त्यांनी धर्म चिकित्साच तर मान्य केली आहे." ... हे समाजबदलाचे द्योतक डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, " ‘विसर्जित गणपती दान करा‘, या आमच्या मोहिमेला वीस वर्षांपूर्वी प्रचंड विरोध झाला होता. आज मात्र हाच विचार न्यायालय, शासन-प्रशासन आणि अगदी नागरिकांच्या पातळीवरही स्वीकारला गेला असल्याचे दिसून येईल. आज आम्ही गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक करू, असे जेव्हा पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती म्हणतात, तेव्हा ते बदलत्या समाज मानसाचे द्योतक असते."

ते ठिकाय आहे पण तुम्ही डॉल्बीला सपोर्ट करता त्यामुळे तुम्हाला दुसऱयांकडे बोट दाखवायचा नैतिक अधिकार नाही

रोज खारा नैवेद्य खाणारे हिंदु देव - देव्याही मातीच्या बकरी/कोंबडीवर समाधान मानतील का?

In reply to by चंपाबाई

ते ठिक आहे चम्पक राव पन एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ह्यांनिच(अनीस किंवा त्यांचे प्रोप्रायटर दाभोळकर ह्यांनी) सत्यनारायण का ठेवावा हे कळले नाही आणी त्यांचे उपदेश हे फक्त हिन्दुंना का असतात हे सुद्धा नाही उमगले.नाही म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या वापरु नका,नवसाला बळी देउ नका ई ई उपदेश फक्त हिंदुना का देतात्, सैतानाला दगड मारतांना किति मुस्लिम मरतात (मागे तिथल्या चेंगराचेंगरीत मेलेल्या मुस्लिमांचे मृतदेह तिथल्या सरकारने जे सि बी ने साफ केले होते)त्यांनाही सांगावे कि बाबांनो हे असे दगड मारने चांगले नव्हे.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

त्यांनाही सांगावे कि बाबांनो हे असे सैतानाला दगड मारने चांगले नव्हे. असे सल्ले दिले तर अत्यंत दयाळू धर्माचे अनुयायी फतवा काढतील ना ईश्वर निंदा(blasphemi) केली. याची शिक्षा फाशी आहे. मग हमीद साहेबाना टोंगा किंवा सॉलोमन बेटे अशा कुठल्या तरी देशात आश्रय घ्यावा लागेल किंवा उत्तर ध्रुवावरील "अस्वलाच्या उवां"वर संशीधन करायला रशियन शिष्यवृत्ती घेऊन सैबेरियाच्या उत्तरेला जायला लागेल ना. तुम्ही काय पण बोलता राव.

In reply to by चंपाबाई

चम्पूताई, रोज खारा नैवेद्य खाणार्या हिन्दु देव देव्या ची नावे सान्गशील का?

कठपुतल्या नाचविनार्याच्या तालावर नाचतात. ताल जर सेकुलर असेल तर फक्त एका विशिष्ट धर्म परंपरांचा विरोध करतील बाकींचा नाही. हमीद साहेब हि एक कठपुतली आहेत. नुकतीच बातमी वाचली मुस्लीम राष्ट्रीय मंचाने जनावरांना आपल्या हाताने चारा खाऊ घालून बैतुल मध्ये ईद साजरी केलील. खरे अंधश्रद्धा विरोधी कोण आणि खोटे कोण सहज कळते.

In reply to by टवाळ कार्टा

बहुदा तै फक्त मनात साठलेले गरळ ओकायला मिपावर येतात हे कबूल करीत असाव्यात असे वाटते (घाबरलेला) ढेल्या

याविषयीच ३-४ दिवसांपूर्वी फेसबुकवर आणि मिपाच्या खरडफळ्यावर लिहिले होते ते इथे पेस्ट करत आहे: "ऐशी की तैशी या बुबुडाविपुमाधविंची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंतांची).हे बुबुडाविपुमाधवि असले काहीतरी बरळतात ना म्हणून जाम डोक्याला शॉट लागतो. जर का मानवता हाच धर्म असेल तर कुठल्याही कारणामुळे कुणाही जीवाची हत्या करणे हे कधीच समर्थनीय होणार नाही.मग ते देवळांमध्ये कापल्या जाणार्‍या कोंबड्या बकर्‍यांप्रमाणेच बकरी ईदच्या दिवशी 'कुर्बान' केल्या जाणार्‍या बकर्‍यांनाही तितकेच लागू होते.मी शाळेत असताना नेपाळला गेलो होतो.तिथे एका देवळात शिरत असताना समोरच कोंबडा कापताना बघावा लागण्याचे दुर्भाग्य आले होते.त्या प्रकाराचा भयंकर संताप आला आणि असल्या ठिकाणी देव असूच शकत नाही हे लगेचच समजले.कुठले देऊळ होते हे आता लक्षात नाही पण बहुदा पोखर्‍यामधले बर्‍यापैकी महत्वाचे देऊळ असावे.त्या मूर्तीचे दर्शन न घेताच ताबडतोब तिथून बाहेर पडलो होतो हे स्पष्ट आठवते. आता वळू या श्री.रा.रा हमीद दाभोळ(ल)कर काय म्हणतात त्याकडे.जर का मी ज्या कारणासाठी देवळांमध्ये बकरे कापू नयेत ही मागणी करतो त्याच कारणासाठी बकरी ईदलाही बकरे 'कुर्बान' करू नयेत ही मागणी केली तर ती टोमणा मारायला किंवा धर्माधर्मात तेढ वाढावी या उद्देशाने हा जावईशोध त्यांनी कुठून लावला? आणि वर 'हा अपप्रचार करणार्‍यांचा हेतू पुरेसा शुद्ध नाही हे लगेच लक्षात येते' ही मखलाशी हे करणार.म्हणजे कुणाचा हेतू शुध्द आणि कुणाचा अशुध्द हे हे दीडशहाणे ठरविणार का? अटरली युजलेस!!जर का आमचा हेतू पुरेसा शुध्द नाही हे कुणाच्या लक्षात येतच असेल तर ते असल्या गुडघ्यातल्या बिनडोक बुबुडाविपुमाधविंच्याच. दाभोळ(क)र पुढे म्हणतात की धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवे तसे अर्थ न लावता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. वा.वा.वा. टाळ्या. हजारो टाळ्या वाजवाव्यात, इतक्या टाळ्या वाजवाव्यात की हात दुखायला लागावा अशी इच्छा होत आहे.काही दिवसांपूर्वीच मी इथेच फेसबुकवर लिहिले होते की आपल्या जुन्या परंपरांमध्ये विज्ञान कसे आहे याचा ओढूनताणून बादरायण संबंध जोडणार्‍या संस्कृतीवाद्यांची बकवास ऐकून डोक्याला शॉट जातो.आता हे दाभोळ(ल)कर साहेब बकर्‍याच्या मानेवरून सुरा फिरवून त्याच्या नसांमधून जास्तीत जास्त रक्त वाहून जास्तीत जास्त काळ जिवंत ठेऊन आणि त्याचे कसे हालहाल होत आहेत हे बघायच्या (साध्या शब्दात 'हलाल' करायच्या) नृशंस परंपरेचा भावार्थ समजावून घेतला पाहिजे असे म्हणतात? अरे एका मुक्या निरपराध जीवाला हालहाल करून मारायचा कसला भावार्थ आला आहे?आणि हे असले ढोंगी लोक वर मोठ्या तोंडाने मानवता मानवता ही जपमाळ ओढताना दिसले की तळपायाची आग मस्तकात नाही तर अस्मानात जाते. अटरली डिजगस्टींग!! या दाभोळ(ल)करांची बडबड पुढे चालूच आहे. मातीचा बकरी कापा हे सल्ले देणार्‍यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरीस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात ही भूमिका आणि तिला त्यांचा आजवर असलेला विरोध अप्रत्यक्षपणे मान्य केला आहे आणि एका अर्थी धर्मचिकित्सा मान्य केली आहे!! म्हणजे मातीची बकरी कापा हे सल्ले देणारे सगळेच प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींना विरोध करणारे असतात का?अशांमध्ये माझ्यासारखेही अनेक लोक आहेत जे म्हणतात की गणेशोत्सवच नको--अगदी कुठलीच मूर्ती नको. मातीची पण नको आणि प्लॅस्टर ऑफ पॅरीसची पण नको.आमच्यासारख्यांचे काय? या असल्या बुबुडाविपुमाधविंना नक्की काय म्हणावे?ढोंगी? पाताळयंत्री?दुटप्पी?आतल्या गाठीचे?की अन्य काही?"

In reply to by गॅरी ट्रुमन

सह्मत आहे या पार्श्वभूमीवर एका पुरोगाम्याचे आत्मपरिक्षण व त्यावरील चर्चा वाचावी न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की!

In reply to by प्रकाश घाटपांडे

न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की!
याविषयी असहमत असायचा प्रश्नच नाही. फक्त कधीकधी हे स्वयंघोषित पुरोगामी अनेक मुखवटे सादर करतात की त्यापैकी नक्की कोणत्या मुखवट्यावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नक्कीच पडतो.आणि होते असे की असे वेगवेगळे मुखवटे परिधान करणारे लोक स्वतःची विश्वासार्हता पूर्ण गमावून बसतात आणि त्यामुळे त्यांचे बोलणे गांभीर्याने घेणे बंद केले तर मग परत "उरलेल्या ६ मुद्द्यांवरही सकारात्मक काम होत नाही" म्हणून उलटी कोल्हेकुईही करतात. आमचा जातीपातीत विश्वास नाही हा यांचा दावा नेहमीच असतो.पण तो दावा किती फोल आहे हे काही गोष्टींवरून लक्षात आले. अंतर्नाद या नियतकालिकात लेख लिहिणारे एक विचारवंत आहेत.माझ्या माहितीप्रमाणे तिकडे दिवाळी अंकातही ते बहुदा (वेगळ्या विषयांवर) लिहितात. त्यांचा दावा असतो की ज्या परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली त्या परशुरामाला आपला आद्य पुरूष मानणार्‍या ब्राह्मणांची मला किव येते!!पूर्वीच्या काळी पुरोहितशाहीने माजविलेल्या कर्मकांडांच्या स्तोमाला माझा तरी अगदी प्रखर विरोध आहे आणि त्यावर मी मिपावर लिहिलेही आहे. पण या विचारवंतांचे लॉजिक अगदीच पूर्णच गंडलेले आहे. याविषयी मी त्यांच्याशी अगदी भिडलोही आहे. त्याचा काही उपयोग झाला नाही ही गोष्ट वेगळी. १. एक तर कोणी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय कशी करू शकेल? हे बोलणे म्हणजे "आमच्या घराण्यात ब्रह्मचर्याची परंपरा आहे. माझे आजोबा ब्रह्मचारी होते, माझे वडिल ब्रह्मचारी होते, मी ब्रह्मचारी आहे आणि माझा मुलगाही ब्रह्मचारी असेल" असे म्हणण्यासारखे झाले. एकदा पृथ्वी नि:क्षत्रिय केली की झाले. मग परत दुसर्‍यांदा, तिसर्‍यांदा नि:क्षत्रिय करण्यासाठी क्षत्रिय येतीलच कुठून? बरं असे म्हटले की या कत्तलीतून लहान मुले आणि स्त्रियांना सोडले आणि लहान मुले मोठी झाली मग त्यातून क्षत्रिय वाढले आणि मग परत दुसर्‍यांदा, तिसर्‍यांदा ती नि:क्षत्रिय केली तरी याचा अर्थ परशुराम २१ पिढ्या कापून काढू शकेल इतकी वर्षे असला पाहिजे. एक पिढी २५ वर्षांची धरली तरी किमान ५२५ वर्षे तो असायला हवा. म्हणजे अर्थातच २१ वेळा नि:क्षत्रिय करणे वगैरे बकवास आहे, थाप आहे हे समजून यायला हरकत नसावी. २. अगदी ही गोष्ट खरी आहे हे गृहित धरले तर मग मायथॉलॉजीमधील संदर्भ आपल्याला हवे तेव्हा घ्यायचे, हवे तेव्हा सोडायचे याला काय अर्थ आहे? म्हणजे मायथॉलॉजीमधील 'खुनी' परशुरामाला आपला आद्य पुरूष मानतात म्हणून हे ब्राह्मणांना झोडपणार पण मग मायथॉलॉजीमधीलच उल्लेखानुसार राम अयोध्येत जन्मला ही गोष्ट मात्र नाकारणार. हा ढोंगीपणा नाही का? ३. बरं परशुराम खरोखरच होऊन गेला, नाही गेला याचे कुठलेच पुरावे मिळणे शक्य नाही.म्हणजे एका काल्पनिक मनुष्याने केलेल्या काल्पनिक हिंसेसाठी हे सध्याच्या ब्राह्मणांना झोडपणार पण मग मध्यपूर्वेतल्या एका धर्माच्या संस्थापकांनी केलेल्या हिंसेचे काय?त्याविरूध्द हे मूग गिळून बसणार.बरं परशुरामाच्या नावावर २०१६ मध्ये दहशतवादी संघटना किती आहेत? जे.ई.एम मधील एम म्हणजे मधुसूदन नाही हे या पुरोगाम्यांना माहित असावे ही अपेक्षा. ४. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाही माणसाकडे त्याची जात/धर्म इत्यादी लेबले न वापरता एक माणूस म्हणून बघावे हे एकीकडे बोलणार आणि परत ब्राह्मण या लेबलचा वापर करण्यात काही विसंगती आहे हे यांच्या गावीही नसते. असल्या लोकांच्या १० पैकी ४ मुद्द्यांवर सहमती म्हणावी की ६ मुद्द्यांवर हे समजायचे कसे?कारण हे नक्की कुठला मुखवटा समोर ठेऊन बोलत आहेत हे समजायला लागणारी दिव्यदृष्टी माझ्याकडे तरी नाही. या पुरोगाम्यांची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे या असल्या गोष्टींमुळे. उठल्यासुटल्या थोडे काहीतरी लिहितो आणि स्वतःला डायरेक्ट आगरकर आणि महर्षी कर्व्यांच्या परंपरेतला समजायला लागतो.त्या खरोखरच्या पुरोगाम्यांच्या आचार- विचार आणि उच्चारात एकवाक्यता होती.तिथेच हे स्वयंघोषित पुरोगामी गंडतात.आणि हो. कोण बोलत आहे याकडे लक्ष न देता काय बोलले जात आहे याकडे लक्ष द्यावे असल्या गोष्टी अत्यंत भाबड्या असतात असे माझे तरी स्पष्ट मत आहे. उद्या पॉल पॉट, हिटलर किंवा माओ उठून मानवाधिकारांवर लेक्चर द्यायला लागला किंवा आकंठ दारूत बुडलेला जर दारूबंदीवर लेक्चर द्यायला लागला तर ते "कोण बोलतोय यापेक्षा काय बोलतोय" याकडे लक्ष देऊन शिरसावंद्य मानण्याइतका भाबडा मी तरी नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

आपले मुद्दे पटणारे आहेत. आचार विचार यातील विसंगती हा सर्वांच्या बाबतीत लागू आहे. बाकी पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका हा सदानंद मोरे यांचा साधना साप्ताहिकातील जुना लेख इथे नमूद करतो.वाचनीय आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आपले मुद्दे पटणारे आहेत.
धन्यवाद
आचार विचार यातील विसंगती हा सर्वांच्या बाबतीत लागू आहे.
सहमत आहे. पण होते कसे की स्वयंघोषित पुरोगामी इतरांना "तुम्ही मूर्ख आहात" अशा पध्दतीची भाषा वापरतात.त्यामुळे त्यांच्याविषयीच्या वर्तणुकीच्या अपेक्षा वाढतात.तू मूर्ख आहेस असे सांगितलेले कोणालाही आवडत नाही.हा मानवी स्वभाव झाला.अशी रोखठोक भाषा अगदी आगरकरांनीही वापरलेली आहे.पण गोपाळराव आगरकरांच्या आचार-विचार-उच्चारात एकवाक्यता होती त्यामुळे तत्कालीन समाजाच्या नसले तरी आजच्या समाजाच्या ते आदरास पात्र आहेत.पण अशी आचार-विचार-उच्चारात एकवाक्यता नसेल तर मात्र इतरांकडून कंबरड्यात लाथा पडणारच---तत्कालीन समाजाच्याच.भविष्यातील समाज अशा लोकांना लाथा घालायला जाणार नाही कारण 'एक ढोंगी' म्हणून अशांचा भविष्यात विसरही पडेल. तेव्हा स्वयंघोषित पुरोगामी ज्या वाटेने जातात ती वाट अगदीच निसरडी आहे.समाजातील अनेक गोष्टी अगदी कोरडे ओढण्यायोग्य आहेत हे मान्य केले तरीपण ते करताना जर गोपाळराव आगरकरांसारखी एकवाक्यता असेल तर समाजाने कितीही टिका केली तरी एक ना एक दिवस आपले म्हणणे समाजाला पटेल हे कन्व्हिक्शन असेल आणि कितीही टिका झाली तरी विचलित व्हायला होणार नाही.पण तशी एकवाक्यता नसतील तर मात्र तुम्ही इतरांवर जितके लत्तेप्रहार करत आहात त्याच्या दहापट लाथा परत मिळणारच आहेत आणि मग तक्रार करून अजिबात उपयोग नाही. एकेकाळी (म्हणजे फार जुनी गोष्ट नाही--५-६ वर्षांपूर्वी) मी पण बर्‍याच प्रमाणात स्वयंघोषित पुरोगाम्यांप्रमाणेच होतो.पण अजून आत्मपरिक्षण केल्यावर त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला.गोपाळराव आगरकरांप्रमाणे रोखठोक जरूर बोलावे पण त्यापूर्वी स्वतःला त्यांच्याइतक्या नैतिक उच्चतेच्या पातळीवर न्यावे आणि मगच बोलावे.त्या उच्च पेडेस्टलपासून मी कित्येक योजने दूर आहे हे समजले.असो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद पेस्ट करतो. मिपावर पण हा कुठेतरी दिला होता. "अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही."

In reply to by प्रकाश घाटपांडे

बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते.
अशा भूमिकेचे स्वागतच आहे. जर स्वतःला पुरोगामी म्हणणवणार्‍या सगळ्यांनाच हे भान असते तर या मेगाबायटी चर्चांची गरजच पडली नसती. असो. अजूनही हमीद दाभोलकरांच्या विधानाचा निषेध स्वयंघोषित पुरोगामी लोक अन्यथा जेवढा आवाज करतात त्या मानाने फिकाच आहे हे पण नमूद करावेसे वाटते.हे विधान येऊन २-४ दिवसच झाले आहेत.यापुढील काही दिवसात अशा ढोंगीपणाविरूध्द स्वयंघोषित पुरोगामी लोकच आवाज उठवतील अशी आशा आणि अपेक्षा आहे.तसे झाले आणि अशा प्रकारच्या आगळिकींविरूध प्रत्येकवेळी या स्वयंघोषित पुरोगामींनी आवाज उठवला तरच ही अविश्वासाची भावना कमी व्हायला मदत होणार आहे. अर्थातच अशांचा आजपर्यंतचा इतिहास लक्षात घेता असे काही व्हायची शक्यता फार नाही पण अपेक्षा करायला काही हरकत नसावी. उम्मीद पे दुनिया कायम है असे काहीसे म्हणतातच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>>>न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की! दोन चार चुकार घटकांसाठी हिंदू धर्मावर घाऊक टीका करताना हे विचार कुठे जात असावेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

या वाक्यामुळे हमिदरावान्ची मुस्लिम धर्म, रुढी इ वर टीका करायची म्हटली की xxते हे सिद्ध होते

दाभोलकरांचे विधान अतिशय दुर्दैवी आहे. विवेकवादाच्या चळवळीतील व्यक्तीच्या तोंडी ही "आमची" आणि "त्यांची" भाषा शोभत नाही.

हमीद दाभोळकरांचं मत चुकीचं आहे, दुट्टपी आहे, परंतु ह्यामुळं अंनिस न भूतकाळात केलेल्या कामच महत्व कमी होत नाही. मला नेहमी अस वाटत कि हिंदू धर्मातील खरे आणि खोटे सुधारक इतर धर्मातील चुकीच्या प्रवृत्तीबद्दल बोटचेपी भूमिका घेतात , हि लोक ह्या धर्मातील कट्टरवाद्यांना भितात कि काय असा प्रश्न पडतो. प्रकाशजी नि वर मांडलेल्या मताशी सहमत
न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की!
अवांतर: जेंव्हा मुस्लिम कायदा मंडळ सुप्रीम कोर्टाला ठणकावून सांगते की तलाक बद्दल निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही आणि आमच्या कायद्यात सर्वोच न्यायालयाने ढवळाढवळ करू नये! त्यावेळी एक हि पुरोगामी चकार शब्द उच्चारत नाही तेंव्हा डोक्यात तिडीक जाते.

In reply to by अमितदादा

न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की!
कुठलाही विचार जर युनिफॉर्म पद्धतीने वापरला नाही तर चांगल्या विचाराचा सुद्धा अतिशय वाईट परिणाम होतो. हिंदू धर्मियांनी होळी सुद्धा खेळू नये पण इतर धर्मियांनी वाट्टेल ते करावे न्यायाने आपण पुढे जात राहिलो तर हिंदू धर्म नामशेष होईल.

In reply to by साहना

तुम्हाला highlight केलेलं वाक्य नीट समजलेलं दिसत नाही. कोण होळी खेळू नका असं बोललं तर ते पटत नाही म्हणून तुम्ही नाकारू शकता. एखादा उत्सवावेळी कायदे पाळा असे बोलला, तर ह्यावर सहमती होऊन होऊन हे अमलात आणले जाऊ शकते, ह्यातून धर्म पुढचं जाईल. सध्या सध्या सकारात्मक गोष्टीत सहमती करून आपण धर्म वाढवूच, तो स्वर्वव्यापी बनवू.

In reply to by अमितदादा

@
अवांतर: जेंव्हा मुस्लिम कायदा मंडळ सुप्रीम कोर्टाला ठणकावून सांगते की तलाक बद्दल निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही आणि आमच्या कायद्यात सर्वोच न्यायालयाने ढवळाढवळ करू नये! त्यावेळी एक हि पुरोगामी चकार शब्द उच्चारत नाही तेंव्हा डोक्यात तिडीक जाते.
››› +++१११ फुर्रोगामी, फेक्युलर , खमुनिस्टांकडून गैरमुस्लिम समुदायाला दिली जाणारी अश्या हरेक प्रकारची वागणूक हाच भारतीय धर्मनिरपेक्षते मधला मोठ्ठा अडथळा आहे. टनाटनी मनुव्रुत्तीच्या लोकांचं यांच्यामुळेही भरपूर फावतं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

गुरुजी पक्षवात झालेल्या माणसाप्रमाणे काय बोलत आहात (आय मिन लिहीत) आहात? लईच लाडात आलंय वाटतं।।।

In reply to by अमितदादा

: जेंव्हा मुस्लिम कायदा मंडळ सुप्रीम कोर्टाला ठणकावून सांगते की तलाक बद्दल निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही आणि आमच्या कायद्यात सर्वोच न्यायालयाने ढवळाढवळ करू नये! त्यावेळी एक हि पुरोगामी चकार शब्द उच्चारत नाही तेंव्हा डोक्यात तिडीक जाते.
असं सरसकट बोलल्याने नक्की काय साध्य होतं ते कळलं नाही. तलाकबाबतच्या निर्णयाबद्दल उच्चारलेले हे चकार शब्द. (निव्वळ थोडं गूगल केल्याने सापडले). http://www.asianage.com/mumbai/secular-muslims-slam-aimplb-statement-779 http://www.indiaglitz.com/javed-akhtar-condemns-muslim-personal-law-boa… http://scroll.in/article/724902/ban-triple-talaq-and-abolish-muslim-per… http://www.financialexpress.com/india-news/shabana-azmi-speaks-up-again…

In reply to by आजानुकर्ण

धन्यवाद, हे वाचलं नव्हतं. इथे सरसकटी झालाय हे मान्य, परंतु हा मुद्दा सतत हिंदू धर्मातील चालीरीती यावरती बोलणारे बोलके पुरोगामी , leftis, आणि psudo-secular(काँग्रेस आणि आप) यांना उद्देशून होता. (ह्या लोकांच्या बाबत असणार माझं मत परत एकदा सरसकटी करण वाटेल, पण माझं ते ठाम आणि वैयक्तीक मत आहे). शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची मते नेहमी आधुनिक राहिली आहेत यात शंका नाही. पण हे सत्य आहे की बहुतांश हिंदू धर्मावरती बोलणारी लोक अश्यावेळी गप्प राहणं पसंत करतात. एक उदाहरण म्हणून पाहिलं तर न्यायालयाचा महिला प्रवेशाबाबत नमते घेणारी महाराष्ट्रातील मंदिरे आणि सक्त विरोध करणारे मुंबई मधील दर्गा यातील फरक लोकांना समजत नसेल तर आश्चर्य आहे हे नक्की.

ही प्रतिक्रिया मिळून सार्‍या जणी मासिकात २००१ म्ध्ये आलेल्या सुजाता देशमुख यांच्या पुरोगामी जमातवाद या लेखावर प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. त्याच वेळी ९/११ झाल्याने त्याची आठवण आली म्हणुन खाली ती देत आहे. मूळ लेखा मुळे सुजाता देशमुख "मिळून सार्‍या जणी" च्या संपादक मंडळातुन बाहेर पडाव लागलं. महाराष्ट्र फाउंडेशन चे सुनिल देशमुख या अमेरिका स्थित असलेल्या पुरोगामी आधारस्तंभाची नाराजी ओढवली होती. माझ्याकडे सुजाता देशमुख यांचा मूळ लेख नाही. त्यामुळे कदाचित थोडे सुसंगत वाटणार नाही. पण तरी स्वतंत्र्य रित्या पाहिले तरी चालेल. उपक्रमचे संकेतस्थळ रिड ओन्ली स्वरुपात देखील गंडते म्ह्णुन पेस्टवत आहे. पुरोगामी जमातवाद "पुरोगामी म्हटल्यावर सर्वसाधारणपणे 'डाव्या` असा शिक्का लोकांनी मारलेल्या सामाजिक, राजकीय, संघटना तसेच 'आम्ही डावं उजवं मानीत नाही. जात, धर्म पंथ वंश मानीत नाही. अशा विचारांचे लोक` असं चित्र डोळयासमोर येईल. तुमचा कुत्रा कुठल्या जातीचा आहे असा प्रश्न विचारल्यावर पामेरियन, अल्सेशियन असं काही उत्तर मिळाल्यावर त्याची अंगकाठी, रंगरूप बांधा वगैरे गोष्टी डोळयासमोर येतात. तसं माणूस कुठल्या जातीचा आहे असं विचारल्यावर तो हलकट, काळा, गोरा, उंच, विद्वान असं अभिप्रेत नसंत. त्याची जन्मानुसार असलेली मराठा, महार, मांग, चांभार, ब्राम्हण वगैरे अभिप्रेत असतं. निसर्गात अभिप्रेत असलेली जात ही गुणधर्मानुसार असते. एकटया गुलाबाच्या सुद्धा भरपूर जाती आहेत. सरकारी नोकरीत बायोडाटा देताना मला जात विचारली तर 'मी मनुष्य जातीचा प्राणी आहे' व 'मानवता हा माझा धर्म' असे सांगितल्यावर सगळे हॅ हॅ करुन हसले. तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते मी सांगणार नाही असे म्हटल्यावर त्याने नाही सांगितले तरी आम्हाला कळतं असे म्हणून स्वत:च तो कॉलम भरुन टाकला. एखादा वाद आला म्हणजे मध्यवर्ती मुद्दा आला तसं पुरोगामी जमातवादाला सुद्धा मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. तो म्हणजे जन्माधिष्ठित नसलेले पुरोगामित्व. हे पुरोगामित्व सुद्धा कुठल्यातरी बिंदूमुळेच मिळालेली एका रेषेवरील दिशा आहे. त्याच अनुषंगाने प्रतिगामित्व ठरते. या बिंदूच्या सापेक्षते मुळेच पुरोगामित्वाचे शिक्के बसत असतात. त्या मुळे पुरोगामी कुणाला म्हणायचं या प्रश्नात प्रसंगी कुत्सितता वाटली तरी सापेक्षता पण आहे. लेखात नमूद केलेला पुरोगामी जमातवाद हा धर्म निरपेक्षतेशी निगडीत आहे. या धर्म निरपेक्षतेची सापेक्षता ही जन्माधिष्ठित असलेल्या धर्माशी सापेक्ष आहे. पुरोगामित्वाचं सोवळं हे लोकांनीच नेसवलेलं आहे. त्याला मी धर्मविरहित आहे असे सांगण्याची सोय नाही. त्याने स्वत:ला काहीही म्हणवले तरी जन्माधिष्ठित धर्म हा त्याला चिकटला जाणारच. सर्वधर्मसमभाव हे तर रिंगमास्टर एकमेकाचे हाडवैर असणारं प्राणी जस एका रिंगणात 'प्रेमानं` बसवितो तसा बसवलेला भाव आहे. हिंदुत्ववाद हा तरी कुठे एक आहे? त्यातही अनेक छटा आहेत. विविध जाती- जमातींची उतरंड असलेला हा समाज एक असणं हे मानण सुद्धा त्या रिंगमास्टरची कमाल आहे. धर्मनिरपेक्षतेची चिकित्सा करताना कुठलाही धार्मिक मूलतत्ववाद आणि धर्मांधता वगळता येत नाही. धर्मांधता आणि धार्मिक मूलतत्ववाद याचे मूल्यमापन करताना धर्मचिकित्सा ही अपरिहार्य बनते कारण धर्म तत्वांची त्याला जोड असते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला एक प्रश्न नेहमी विचारला जातो काहो तुम्ही फक्त हिंदूच्याच अंधश्रद्धांवर झोड उठवता पण मुस्लिमांच्या अंधश्रद्धांविषयी फारसे बोलत नाही? हा पळपुटेपणा नाही काय? यात हिंदूंच्या अंधश्रद्धाविषयी बोलण्याचा अधिकार प्रश्नकर्त्याने मान्य केलेला आहे. किंबहुना हे काम तुम्ही चांगलच करता आहात असाही कधी कधी सूर असतो. पण तुम्ही पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहात तर मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांविषयी पण त्याच न्यायाने बोला ना! असे आवाहन अभिप्रेत असते. याची उत्तरे ही दिली जातात ती अशी की जवळजवळ ऐशी टक्के लोक हिंदू आहेत साहजिकच बहुसंख्य कार्यकर्ते हिंदूच असणार. त्यामुळे ऐशी टक्के अंधश्रद्धा हिंदूंबाबत असणार. दुसरं उत्तर दिलं जातं आम्ही हिंदू धर्मात जन्मलो साहजिकच संस्कार हिंदू झाले असल्याने आम्ही हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविषयी अधिक संवेदनाशिल असणं स्वाभाविक आहे. आपण आपलं घर साफ करायचं नाही तर शेजाऱ्याच करायचं काय? या उत्तरांमध्ये चूक नाही पण सर्वसमावेशकताही नाही. चळवळ ही प्रबोधनाशी निगडित असल्याने जवळीक हा महत्वाचा दुवा आहे. अंधश्रद्धा ही सापेक्ष आहे ही बाब जरी घटकाभर बाजूला ठेवली तरी अंधश्रद्धा ही हिंदू धर्मातील काय किंवा मुस्लिम धर्मातील काय तितकीच अंध आहे.चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा धर्मांधता व मूलतत्ववाद हा राष्ट्रहिताशी निगडीत असते त्यावेळी ही चिकित्सा सोयीनुसार करुन चालणार नाही ती कठोरपणेच झाली पाहिजे ही बाब नाकारुन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बळी ठरलेली ९/११ ही न्यूयार्क मधील घटना ही त्याची साक्ष आहे."

In reply to by प्रकाश घाटपांडे

थेट उत्तर द्या/ स्पष्ट मत नोंदवा: १. कुठल्याही धार्मिक कारणाने कोणत्याही प्राण्याचा हालहाल करून / हालहाल न करता बळी देणे योग्य आहे की अयोग्य? २. सदर बातमीतील हमीद दाभोलकरांच्या मताशी आपण सहमत आहात का?

हिंदु धर्म जरा जास्तीचा लवचिक आहे. कमीत कमी माणुस तोंड इचकुन काहीही बरळला तरी कोणी "चॉप-चॉप स्क्वेअर" नेवुन तलवार चालवत नाही की चामड्याच्या चाबकाने (कोडे़) फटकवत नाही.

यातल्या काही पुरोगाम्यांची विचार करायची पध्दत कशी असते हे बघा. मागच्या वर्षी बाबासाहेब पुरंदर्‍यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला गेला त्यावेळी या पुरोगाम्यांनी आकांडतांडव केलेच होते. त्यावेळी याच हमीद दाभोळ(ल)करांच्या भगिनी मुक्ता यांनी पेपरात पुढील पत्र लिहिले होते: M त्यावर मागच्या वर्षीच पुढील लिहिले होते. ते विषय निघालाच आहे म्हणून कॉपी-पेस्ट करतो. हे असले स्वयंघोषित पुरोगामी लिखाण बघितलं की खरोखरच तळपायाची आग मस्तकात जाते. १. बाबासाहेब पुरंदर्‍यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर करणे आणि त्यापूर्वी दीड-दोन महिने गोविंद पानसरेंचा खून होणे या दोन गोष्टी लोक का जोडतात हे समजत नाही.गोविंद पानसरेंचा दुर्दैवी खून झाला म्हणून बाबासाहेबांच्या कामाचे महत्व कमी होते का?आपण इतिहासकार आहोत असा दावा बाबासाहेबांनी कधीच केला नव्हता.इतकेच नव्हे तर आपण इतिहासकार नसून छत्रपतींचे शाहिर आहोत हेच बाबासाहेब अजूनही म्हणतात.शाहिरांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊ नये आणि केवळ इतिहासकारांनाच द्यावा असा काही नियम आहे का? महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्यांना बाबासाहेबांच्या शिवचरित्राने वेड लावले होते. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये शिवाजी पोहोचविण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्याचे महत्व पानसरेंचा खून झाला म्हणून कमी होते का? २. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचविण्याचा गोविंद पानसरेंनी प्रयत्न केला म्हणून त्यांचा खून झाला असे आम्हाला वाटते असे मुक्ता दाभोलकर म्हणतात.असे कोणालाही काहीही वाटू शकते.पण त्यामागे काही आधार नसेल तर तसे वाटण्यामध्ये आणि मलाही कधीतरी मी ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल मिळवायला पात्र आहे असे वाटले तर तसे वाटण्यामध्ये नक्की फरक काय? असे वाटण्याला काही आधार आहे का? असल्यास कोणता?"शिवाजी कोण होता" हे पुस्तक पानसरेंने किती वर्षांपूर्वी लिहिले होते?मग इतकी वर्षे त्यांच्या नखालाही धक्का लागला नव्हता तोच अचानक आताच लागायचे काय कारण? नक्की कारण काय हे मला माहित असायचा प्रश्नच नाही.पण म्हणून त्या खुनामागे अमुक एक हेच (आणि आम्हाला वाटते तेच) कारण होते हे ढोल जगभरात पिटण्याला काय अर्थ आहे? बरं त्याच्याच पुढचे वाक्य--"धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराजांची मांडणी केली म्हणून पानसरेंचा खून झाला आणि शासनाच्या बेपर्वाईमुळे खुनी अजूनही मोकाटच आहेत". म्हणजे आधीच्याच वाक्यात खुनामागे ते कारण आहे असे आम्हाला वाटते असे म्हणणार्‍या मुक्ता दाभोलकर लगेच पुढच्याच वाक्यात त्याच कारणामुळे त्यांचा खून झाला असा निवाडाही करून टाकतात? मजाच म्हणायची. ३. बाबासाहेबांनी लिहिलेले शिवाजी महाराजांचे चरित्र या बाईंनी वाचले आहे असे दिसत नाही. अन्यथा पानसरेंनी उभ्या केलेल्या शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेपेक्षा विपरीत अशी प्रतिमा बाबासाहेबांनी उभी केली आहे असे वाटायचे काहीच कारण नाही. मी बाबासाहेबांचे राजा शिवछत्रपती अक्षरशः हजारो वेळा वाचले आहे. आजही मी ते पुस्तक कुठलेही पान उघडून वाचायला सुरवात करू शकतो.त्यात हाच उल्लेख आहे की स्वराज्याच्या बाजूने उभा राहिल तो आपला आणि स्वराज्याच्या विरोधात उभा राहिल--मग तो कोणत्याही जातीधर्माचा असेना तो मोंगल. ही धर्मनिरपेक्षता नाहीतर काय आहे?शिवाजी महाराज धर्मांध होते अशा स्वरूपाचा नक्की कोणता उल्लेख या महान पुरोगाम्यांना त्या पुस्तकात मिळाला हे समजायला मार्ग नाही. आणि पानसरेंच्या खुनानंतर सर्वत्र "शिवाजी कोण होता" या पुस्तकाच्या प्रती पुरोगामी कार्यकर्ते वाटत होते.अशा वेळी पुरंदर्‍यांना दिलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचा वापर पानसरेंनी महाराजांची प्रतिमा मांडली होती त्याच्या विरूध्द प्रतिमा उभी करायला केला जाईल असे पुरोगामी कार्यकर्त्यांना वाटते!! म्हणजे यांना वाटेल ते वाटणे काही संपतच नाही.बरं लोकशाही आहे. कोणालाही काहीही वाटू शकते. पण म्हणून या पुरोगामी कार्यकर्त्यांना जे वाटते ते ब्रह्मवाक्य थोडीच आहे? तुम्हाला वाटायचे ते वाटू दे पण ते वाटणे इतरांवरही बंधनकारक थोडीच आहे? ४. बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार द्यायला विरोध जातीय भावनेतून होत असेल हे आमच्या आधी लक्षात आले नाही. वा वा वा. टाळ्या वाजवून हात दुखायला लागले. काय बोलता राव. हा विरोध करणार्‍यांमध्ये कोण होते/आहे हे यांना माहित नव्हते की मुद्दामून डोळेझाक करायचे ठरविले होते? जितेंद्र आव्हाड, अजित पवार असले गणंग बाबासाहेबांना पुरस्कार द्यायचा विरोध करत होते आणि या लोकांचा पूर्वेतिहास मुक्ता दाभोलकर यांना माहित नव्हता का? की झोपायचे सोंग लावले होते? हे असले काहीतरी वाचले की "पुरोगामी","विवेकवादी" इत्यादी मराठी भाषेतील सर्वात वाईट शिव्या आहेत असे वाटायला लागते. एकूणच काय या असल्या ढोंगी लोकांना पुरोगामी म्हणणे यापेक्षा खरोखरच्या पुरोगामीत्वाचा मोठा अपमान असूच शकत नाही. डिजगस्टींग!!

In reply to by गॅरी ट्रुमन

अगदी! यांचा जोर हिंदुविरोधीच आहे यात शंका नाही. अभिराम दिक्षीतांनी अशा ढोंगी लोकांवर सडेतोड टिका केली आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

एकूणच काय या असल्या ढोंगी लोकांना पुरोगामी म्हणणे यापेक्षा खरोखरच्या पुरोगामीत्वाचा मोठा अपमान असूच शकत नाही. डिजगस्टींग!! अगदि सहमत !

In reply to by गॅरी ट्रुमन

डाव्यांचे चालले तर शिवाजी महाराजांचा इतिहास हि पुसून टाकतील. अफजलखान धर्मनिरपेक्ष हिरो आणि शिवाजी खलनायक हि प्रतिमा स्थापित करायला हि कमी करणार नाही. पुढे कुणीतरी महान पुरोगामी इतिहासकार शिवाजी झालाच नव्हता असे हि म्हणू शकेल. सर्व काही मिथिक कथा आहे.

In reply to by विवेकपटाईत

अफजलखान धर्मनिरपेक्ष हिरो आणि शिवाजी खलनायक हि प्रतिमा स्थापित करायला हि कमी करणार नाही.
पटाईतकाका, अफझलखान धर्मनिरपेक्ष हिरो होता अशी प्रतिमा प्रस्थापित करायचा या मंडळींनी प्रयत्न केला आहे की नाही माहित नाही पण मागच्या वर्षी दिल्लीमधील औरंगजेब रोडचे नाव बदलून ए.पी.जे.अब्दुल कलाम रोड करायचा केंद्र सरकारने निर्णय घेतला त्याविरूध्द "औरंगजेब किती चांगला होता, किती धर्मनिरपेक्ष होता" इत्यादी अकलेचे तारे काही पुरोगामींनी तोडलेच होते. त्याला दीड-दोनशे लोकांनी लाईक केले होते. त्या लाईक करणार्‍यांमध्ये मिपावरचेही काही होतेच. हे तथाकथित पुरोगामी तिकडे दिवाळी अंकातही लिहितात.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरीसाहेबांशी अगदी सहमत. स्वयंघोषित पुरोगामी आणि स्वयंघोषित हिंदुत्त्ववादी हे नेहमीच त्यांच्या विचारसरणीच्या विपरीत काम करत असल्याने हे शब्द आता शिवीस्वरुप झाले आहेत.
फक्त कधीकधी हे स्वयंघोषित पुरोगामी अनेक मुखवटे सादर करतात की त्यापैकी नक्की कोणत्या मुखवट्यावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नक्कीच पडतो.आणि होते असे की असे वेगवेगळे मुखवटे परिधान करणारे लोक स्वतःची विश्वासार्हता पूर्ण गमावून बसतात आणि त्यामुळे त्यांचे बोलणे गांभीर्याने घेणे बंद केले तर मग परत "उरलेल्या ६ मुद्द्यांवरही सकारात्मक काम होत नाही" म्हणून उलटी कोल्हेकुईही करतात.
याच्याशीही सहमत. किंबहुना हाच परिच्छेद असाच्या असा एका बाबा चमत्कारी संघटनेला लागू होतो.

In reply to by गॅरी ट्रुमन

या पत्रावर मी दिलेली आणि यामागच्या राजकारणावर बोलणारी प्रतिक्रियाही लोकसत्तेने छापली होती. ती खालीलप्रमाणे आम्ही सारे राजकारणी माझ्या पत्रावर मात्र मुक्ताबाईंचे उत्तर आले नाही आणि 'या विषयावरचा पत्रव्यवहार आता इथेच थांबवित आहोत' असे लिहिण्याची संपांदकांची (आणि जाहीर वाद घालायची आमची) संधी मात्र हुकली. :)

ट्रुमन एक विनंती आहे, तुम्ही इतके नीट बोलला आहात की तुम्ही

सगळे प्रतिसाद नीट संकलित करून त्याचा एक मस्त लेख बनवा, सही होईल ते एकदम


गॅरी ट्रुमन ह्यांचे विचार मुद्देसूद आणि तर्कास धरून आहेत . फुरोगामी आणि तर्क ह्याचा संबंध असतोच असे नाही. ज्या प्रमाणे कम्युनिस्टांची नजर पूर्वी फादरलॅन्ड कडे असायची त्याप्रमाणे भारतीय फुरोगामी आपले विचार कदाचित पश्चिमेकडील फुरोगाम्या कडून इम्पोर्ट करत असावेत असे वाटते. त्यांत गैर काही काही नाही पण पश्चिमी फुरोगाम्यांनी त्यांच्या स्वतःच्या देशांत काय गोंधळ घातले आहेत हे पाहणे आवश्यक आहे. इस्लाम चे लांगुनचलन, सरकारी ताकद वापरून आपल्या विरोधकांची तोंडे बंद करणे, आपल्याच इतिहासाविषयी कमालीचा न्यूनगंड बाळगणे हे विदेशी पुरोगाम्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे आणि काही प्रमाणात भारतीय कॉपीकॅट्स सुद्धा हे विषय आयात करताहेत असे कधी कधी वाटते. अमेरिकेत कैद्यातील काळ्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे म्हणून फुरोगामी ओरडत असतात त्याच प्रमाणे मागे आपल्या फुरोगाम्यांनी सुद्धा भारतीय कैद्यांत मुस्लिम (आणि नंतर दलित) ह्यांचे प्रमाण जास्त का आहे असा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता पण कदाचित ते आकडे अंगावर आल्याने तो प्रकार बंद पडला. काही दिवस आधी अशीच एक ओळखीची फुरोगामी महिला, "महिलांना सार्वजनिक ठिकाणी बाळांना दूध पाजण्याचा हक्क असला पाहिजे" म्हणून मुंबईत काही तरी कार्यक्रम घडवू पाहत होती. विषयावर मत काहीही असो सध्या अमेरिकेत ह्या विषयाची फॅशन आहे म्हणून इथे हा विषय आणला जातो असे राहून राहून वाटले. आमच्या इथे लोक सर्रास संडास उघड्यावर करतात दूध पाजणे हि तर नगण्य (आणि बहुतेक करून समाजाला मान्य असेलेली) गोष्ट आहे. भारतीय परंपरांना विरोध आणि ख्रिस्ती/मुस्लिम परंपरांना समर्थन ह्यांत हिंदू द्वेषा पेक्षा पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव हे कारण आहे असे मला वाटते. पाश्चिमात्य देशांत हजारो वर्षांच्या ख्रिस्ती प्रभावाने नास्तिक लोकांच्या मनात सुद्धा निसर्गपूजक, अनेकेश्वरवादी इत्यादी आमच्या सारख्या पेगन लोकांच्या समजुती बद्दल कमालीचा द्वेष किंवा भयगंड असतो. "तुम्ही मृत्यूच्या देवतेला भजता ? तुम्हाला लाज नाही वाटत का ?" अश्या प्रकारचा प्रश्न विचारणारे नास्तिक लोक खूप भेटतात. कारण मृत्यू त्यांच्या दृष्टीने खूप वाईट गोष्ट असते आणि भारतीय संस्कृतीतील मृत्यू (पुनर्जन्म) ह्या संकल्पनेबद्दल आमच्या ज्या धारणा असतात त्या त्यांना सहज सहजी समजत नाहीत. ह्या उलट जपानी बौद्ध किंवा थाई लोकांना हे सगळे समजण्यास अजिबात कष्ट पडत नाहीत. भारतीय पुरोगामी सुद्धा दुर्दैवाने अश्या प्रकारच्या विचारांना बळी पडलेले दिसतात.

प्रकाश घाटपांडे,
हे अस काहीतरी होते अन अंनिस चा सहानुभूतीदार वर्ग वेगाने दुरावायला सुरुवात होते
वरील विधानाशी असहमत. थोरले दाभोलकर फ्रॉड होते/आहेत. त्यांचे साधना आणि परिवर्तन हे न्यासदेखील गैरव्यवहारात आकंठ बुडालेले आहेत. त्यामुळे अनिसचा सहानुभूतीदार वर्ग (जो काही उरलासुरला आहे तो) दुरावतो आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हा मुद्दा सनातनवाले दाभोलकरांच्या हयातीत सुद्धा मांडत होते.पण त्यात काही अर्थ नसावा. फार तर काही तांत्रिक अनियमितता असेल.परदेशी मदत स्विकारणे हा गैरव्यवहार नाही. मला वाटत की पुर्वी याची चर्चा आपण केली आहे.