Skip to main content

धर्मांतरे का होतात ?

लेखक सचीन यांनी बुधवार, 25/12/2013 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे? लोक धर्मांतर का करत असावेत? माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?. धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी सामान्य असणारा माणूस धर्माच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धर्म खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धर्मियावर तुटून पडतो परधर्मीय बद्दल द्वेष हा त्याला स्वधर्माचा अभिमान वाटतो. धर्मावर असे अनिर्बंध प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा?धार्मिक दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे धार्मिक लोक पाहिले तर त्यांच्या धर्मप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि धर्मावर निरतिशय प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा ? धर्मांतरे का होतात ???आपल्या भारतातही अनेक धर्मांतरे झालेली आहेत त्याचे काय कारण असावे?

वाचने 37000
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

आपल्याच धर्मात जर बाकीचे धर्मबांधव आपल्याला हीन व माणुसकीविहीन जगण जगायला लावत असतील तर त्यांनी धर्म का बदलू नये? हिंदु धर्मातील दलितांनी केलेली धर्मांतरे ही याच प्रकारात मोडतात. हाणुन मारुन मुसलमान हा शब्दप्रयोग सक्तीच्या धर्मांतरातून आला आहे. स्वेच्छेने केलेली धर्मांतरे देखील असतात. लाभापोटी केलेली पण असतात. धर्म बदलल्याने त्यांच्या जगण्यात फरक पडतोच असे नाही.

आंजाच्या इतिहासात अनेक धागे प्रसवले गेले. आपल्या मिपाभूमीत हि अनेकजण धागे प्रसवतत असतात ह्याचे काय कारण असावे? लोक धागे का प्रसवत असावेत? धागाकर्ता हा आपल्याच धाग्यावर प्रेम करतो. त्याचा टिआरपी वाढवतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपलाच धागा कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धागा कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धागे प्रसवले का जातात?. स्वत:च्या धाग्याबद्दल कुणी काही वाईट बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्याच्या धाग्यातील चुका दाखवतो. काहीना आपला धागा हा सर्वोत्कृष्ट वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी शांत असणारा आयडी धाग्यांच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धागा खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धाग्यांवर तुटून पडतो परकीयलेखना बद्दल द्वेष हा त्याला स्वलेखनाचा अभिमान वाटतो. स्वलेखनावर असे अनिर्बंध प्रेम करणारा आयडी धागे प्रसवत असावा का? जालिय दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे आयडी पाहिले तर त्यांच्या धागाप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि मिपावर निरतिशय प्रेम करणारा आयडी दंगा का करत असावा ? धागे का प्रवसतात ???आजही आपल्या मिपावरही अनेक धागे प्रवसले जात आहेत त्याचे काय कारण असावे?

संस्थळावर एखादी आयडी धागा-दंगा करते म्हणून इतरानी त्या आयडीला भरपूर प्रतिसादिक चोप दिला म्हणून त्या आयडीने आयड्यांतर केले (डूआयडी घेतली) किंवा संस्थळांतर केले तर ते धर्मांतरासारख्या शतकी धाग्याची जिल्बी पाडून चघळता येईल काय?

=)) =)) =))

धर्मांतरे का होतात ? तुम्हाला असे धागे काढायला मिळावेत म्हणुन !!!! टेन्शन इल्ला....

फारच अपेक्षेने लेख उघडलेला पण काहीच मजा आली नाही ! रामू सारखी उतरती कळा लागली कि काय तुमच्या लेखनाला? तुमच्या निरागस विनोदी विडंबन साहित्याचा शेकडो चाहत्यान पैकी एक --- बालक

धरर्मांतर का करतात : उत्तर अगदी सोप्पे आहे: लोकाना वेळ घालवायला नवे साधन मिळते म्हणून.

ए. आर. रेहमान या ख्यातनाम संगीत दिग्दर्शकाने धर्मांतर का केले असावे ? त्यांच्या धर्मांतराची कारणे काय ? माहितगारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by रमेश आठवले

नकी माहीत नाही पण त्याचे वडील हे ही संगीतकार होते. व त्यांच्या आजारात काही मद्त अन्य धर्माच्या लोकांकडून झाली असे वाचल्याचे आठवते.

In reply to by रमेश आठवले

रहमान (पूर्वीचा दिलीप, त्याचे संगीतक्षेत्रातले मित्र अजूनही त्याला दिलीप च म्हणतात) च्या लहानपणी त्याच्या बहिणीला काही गंभीर आजार झालेला होता, सर्व डॉक्टरी उपाय संपल्यावर पूजा, प्रार्थना, जप, इ. प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर इतर धर्मातील वैद्य, मौलवी इ. चा ही आधार घेण्यात आला. या सर्वांदरम्यान या कुटंबावर इस्लाम चा प्रभाव पडला, आणि त्यांनी इस्लाम स्वीकारला संदर्भ : "ए. आर. रहमान - संगीतातील वादळ", अनुवादित पुस्तक

हरयाणाच्या सरकारच्या एका विवाहित मंत्र्याने त्याच्याच धर्माच्या दुसर्या बाईशी लग्न करायचे ठरवले आणि त्यासाठी दोघांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

सगळ्या विषयांवर सांगोपांग चर्चा करणारे विद्वान धर्मांतरा सारख्या महत्वाच्या प्रश्नावर का टोलवा टोलवी करतायत ते कळत नाही ?

ए आर रहेमानच्या आजारात त्याच्या पालकानी कोणत्या तरी पिराला नवस केला होता. त्यामुळे नवसाची उतराई म्हणून त्यानी धर्म बदलला

म्ह्णजे काय त्ये माहिति पडू दे मग पुढचं बघू.. संदर्भ : प्यारेंचा "दत्त"धागा आनि "मंदार कात्रेंच्या धाग्यावरिल विचारव्(जं)त प्रतिसाद.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी बर झाले तुम्ही इथे आलात तुम्हीच सांगा धर्मांतर का होत? का लोक एखाद्या धर्माला विटून दुसऱ्या धर्मात जातात? गुरुजी हा धर्मावरचा धागा आहेत ते पवारांचं जावू द्या. आणि काय हो उठसूट पवार, मोदी करत बसता उद्या तुम्हाला कुत्रा चावला तरी बोलाल हा पवारांनीच सोडला होता.

In reply to by सचीन

का लोक एखाद्या पक्षाला विटून (पंतप्रधान न होता आल्याने) दुसऱ्या पक्षात जातात? आणि नंतर पाठींबा देवून "खाते" मिळवतात.

In reply to by सचीन

१)स्वतःच्या धर्मातल्या लोकांकडून होणारा छळ/पीडा/अपमान/पिळवणूक इ...इ.. २)दुसर्‍या धर्माबद्दल अंधळ आकर्षण/मिळणारी हरेक स्वरुपातली प्रलोभन ३)आपल्या दुबळ्या समाजावर अत्याचार पूर्वक धर्म लादला जाणे. ४)आणी शेवट(दुसर्‍या धर्मातल्या) वैयक्तिक कुतुहला पासून ते उपासनामार्ग अवडल्यामुळे. ५) तुमच्या सार्ख्यांना धागे काढायला विषय मिळावा म्हणून..

In reply to by सचीन

>>> तुम्हीच सांगा धर्मांतर का होत? का लोक एखाद्या धर्माला विटून दुसऱ्या धर्मात जातात? ज्या उच्च नीतिमूल्यांसाठी व तात्विक भूमिकेतून पवारसाहेबांनी १९७८ साली पक्षांतर केले त्याच कारणातून धर्मांतर होते. ज्या देशहिताच्या कारणांमुळे पवारसाहेब काँग्रेसला विटून दुसर्‍या पक्षात गेले त्याच कारणांमुळे लोक एखाद्या धर्माला विटून दुसर्‍या धर्मात जातात. >>> उद्या तुम्हाला कुत्रा चावला तरी बोलाल हा पवारांनीच सोडला होता. छे. आम्ही असं कशाला म्हणू. अहो, कुत्र्याचं पिल्लू गाडीखाली आम्हाला वाईट वाटतं. मग आम्ही असा आरोप कसा करणार?

In reply to by श्रीगुरुजी

ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी, रक्तपिपासु ,लोकांकडे धर्मसत्ता असते, असा धर्म लोक सोडून देतात अथवा असल्या फालतु धर्माचा अभिमान वगैरे बाळगत नाहीत.

In reply to by ग्रेटथिन्कर

त्याबराबर ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी, रक्तपिपासु ,लोकांकडे धर्मसत्ता असते त्यांचा धर्म दूसर्‍यांवर लादला जान्याचि जास्त उदाहारण जगात आहेत... आणि अश्या धरमाच्या कडे धर्मांध भाट-चरनान्ची मोठी फौजपन असते नायका?

In reply to by गब्रिएल

उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि. (मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू -ग्रेटथिन्कर )

In reply to by ग्रेटथिन्कर

आयला, ग्रेट थिंकर लोकान्लाबी "आब्यास वाडवा", "इतिहास वाचा" अगर "आजूबाजूला बगा, पेपरं वाचा, त्ये खांद्याव का मानेच्या वर काय असतय ते वापरा" असा सांगायच दिवस आले... लोकं नावालाबी जागायची बंद झाल्यावर अजून काय व्हनार !!! पन ईनोद बरा व्हता. लईच कर्म्णुक करून ह्राय्ले रावसाय्ब

In reply to by ग्रेटथिन्कर

(मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू -ग्रेटथिन्कर )
सम्यक बुद्धीने असे असेल तर फार चांगली गोष्ट आहे. हिंदू धर्मावर ३६० डिग्री द्वेष मात्र नसावा. हिंदू धर्मातही बरंच त्याज्य असं काही आहे, ते वजा जाता बाकी गोष्टींवर प्रेम असायला हवं. ते नसेल तर वाईट बापामुळे दुखावलेले मूल कूटूंबाचा तिरस्कार करू लागते त्यातला प्रकार होईल. लोकशाहीने ६०-७० वर्षांतच लोकांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्म त्यामानाने नवे आहेत. ते इतके भ्रष्ट झालेले नाहीत. हिंदू धर्म फारच जूना आहे आणि आज तर पूर्णतः रसातळाला गेला आहे. पण सरासरी काढली तर जुन्या एका काळात हिंदू धर्माने भारतीय उपमहाद्वीपात बरेच चांगले जीवनमान दिले होते हे नाकारू नये. बाय द वे, ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो तरी त्यांचे इतर धर्मांशी वर्तन हिंदूंपेक्षा खालच्या दर्जाचे होते हे वादातीत आहे.

In reply to by arunjoshi123

बाय द वे, ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो तरी त्यांचे इतर धर्मांशी वर्तन हिंदूंपेक्षा खालच्या दर्जाचे होते हे वादातीत आहे.
आता बघु काय उत्तर येते :)

In reply to by arunjoshi123

>> ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो शिया सुन्नी भाई भाई कॅथोलिक प्रोटेस्टंट हॅलो ब्रदर जावू द्या छप्परबंद मुस्लिमांचं काय? अरे कोण म्हण्तो तिक्डे त्यांच काढू नका.. तुमचं काय ते बोला... ओके अय माय स्वारी.... हिंदू तेव्ढे खराब बाकी सगळॅ छान... खुष ? अरे खुष? काय करावं या विचारवंतांना ... सदैव एरंडाचे तेल प्यायलेले.. हसत पण नाहीत.

In reply to by ग्रेटथिन्कर

उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि.
अरे बाबा दुसर्‍याला भीक घालण्यासाठी मुळात आप्ल्याकदे काहीतली ?? असावे लागते, ते जर मुळातच नसेल भीक कसली घाल्णार आपण ?? आपला सगळाच नन्नाचा पाढा दिसतोय, एकुणच सगळा आनन्दी आनन्द. यालाच म्हणतात 'आडातच नाही तर पोहर्‍यात कुठुन येणार' (मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू म्हणजेच एक ना धड.. असा धेडगुजरी- *fool* ग्रेटथिन्कर *fool* ) ( आपले मत अधर्मनिरपेक्ष, कुपुरोगामी, आदर्श देश-लुटारु व सर्वकालीन सर्वात महाभ्रष्ट पक्षालाच द्या - असा जीवाचा आटापिटा करून टाहो न फोडणारा ) विनोद१८

In reply to by ग्रेटथिन्कर

>>> उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि. गर्व से कहो हम हिंदू है! >>> आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्या ताकाला जाऊन भांडे कशाला लपविता? सरळ स्पष्ट शब्दात सांगा ना की आपले मत 'भाजप'लाच द्या म्हणून.

In reply to by श्रीगुरुजी

भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही. खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे.राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही ,तसे.. आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता...या उलट फेकू गुजरातमध्ये मुस्लिमांचे भले केले' असे सांगत फिरत आहे. उद्या हेच मुस्लिम हिंदूंच्या उरावर बसले तर पून्हा काँग्रेसकडे बोट दाखवायला आपण मोकळे ..कसे? जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते... आताही आप'ला Expose होताना आपण पहालच.खरी चाणक्यनिती काँग्रेसकडेच आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

प्रतिसाद आवडला. >>जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते... -- अगदी खरं. गेल्या दोन दशकात भाजप काँग्रेसकडुन बरेच राजकारण शिकला पण अजुनही मोठा पल्ला गाठायचा आहे. शिवाय आता काँग्रेसमधे जनमानसाचा ठाव घेणारे मुरलेले राजकारणी कमि झालेत... किंबहुना गांधी घराण्याच्या निष्ठेपायी त्यांना डेव्हलप होऊ दिलं गेलं नाहि. राहुल गांधी सध्या काँग्रेसची साफसफाई करण्यावर भर देताहेत. त्यांनी प्रस्थापीत नेत्यांच्या वारसदारांना भाव न देता जर पवारांसारखे सल्लागार निवडले तर काँग्रेस परत आपला बेस कमवेल.

In reply to by अर्धवटराव

नक्की कशावर चर्चा सुरु आहे? मी आपलं वेगवेगळ्या देवाधर्माचे काहितरी वाचायला मिळेल या आशेवर धागा उघडतेय तर प्रत्येकवेळेस वेगळंच काहितरी पेटतंय! :)

In reply to by कवितानागेश

तशी ही चर्चा देवाधर्मावरच चालू आहे. आजकाल राजकिय नेतेच देव (त्यांचे चेले त्यांच्या पाया पडताना, त्यांना दुधाने आंघोळ घालताना किंवा त्यांच्यावर ते बुडून जातिल इतपत खर्‍या सुमनांचा आणि शाब्दीक स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना बघितले नाहीत का? !) आणि हे देव म्हणतील तोच त्यांच्या चेल्यांचा धर्म. देवळातल्या देवाची आरती केली किंवा त्याला प्रसाद चढवला तर हाती काही लागायची शाश्वती नाही... त्यापेक्षा आताचे हे देव हक्काने मागून घेतात आणि तुमचं कामही करतात. सांगा आजकाल कोण जास्त पावर्फूल्ल ? :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तशी ही चर्चा देवाधर्मावरच चालू आहे. आजकाल राजकिय नेतेच देव (त्यांचे चेले त्यांच्या पाया पडताना, त्यांना दुधाने आंघोळ घालताना किंवा त्यांच्यावर ते बुडून जातिल इतपत खर्‍या सुमनांचा आणि शाब्दीक स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना बघितले नाहीत का? !) आणि हे देव म्हणतील तोच त्यांच्या चेल्यांचा धर्म.
हा हा हा, प्रचंड सहमत!!

In reply to by ग्रेटथिन्कर

भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही. खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे.राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही ,तसे..
म्हणजे तुमच्याच म्हणण्यानुसार काँग्रेस आणि भाजप दोन्हीही धर्मनिरपेक्ष पक्ष नाहीत. आणि तुम्ही तर म्हणताय, की
आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्या
याआधी काही धाग्यांवर तुमचे काँग्रेसच्या बाजुचे प्रतिसाद वाचल्येत. त्यांच्याच खाली तुमची हीच स्वाक्षरी तेव्हाही होती. प्रतिसाद आणि स्वाक्षरीत एवढा विरोधाभास का??

In reply to by ग्रेटथिन्कर

>>> भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही. धर्मनिरपेक्ष नाही आणि हिंदुत्ववादी पण नाही. तुमचा काहीतरी केमिकल लोचा झालेला दिसतोय. हिंदुत्ववादी नाही म्हणजेच धर्मनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष नाही म्हणजेच हिंदुत्ववादी अशी सोपी व्याख्या आहे. >>> खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे हा साक्षात्कार कधी झाला म्हणे? काहीतरी जोरदार केमिकल लोचा दिसतोय. गेट वेल सून (म्हणजे चांगली सून शोधू नका आणि लवकर बरे व्हा). >>> ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे. हिंदूंच्या म्हणजे कोणाच्या ताब्यात ठेवली आहे? सत्ता काँग्रेसने स्वपक्षाच्या ताब्यात ठेवली आहे आणि काँग्रेस हिंदूंचा नसून निधर्मांधांचा पक्ष आहे. >>> राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही , सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. >>> तसे.. आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता... याचा आणि हिंदुत्ववादी असण्याचा काय संबंध? >>> जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते... म्हणजे इतर पक्षांची भ्रष्टाचाराची उडी काही लाखांवर किंवा कोटीत जाऊन थांबते. काँग्रेसची उडी १७६००० कोटी (२ जी तरंगलहरी घोटाळा, ७०००० कोटी (राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा), १८६००० कोटी (कोळसा खाण घोटाळा) अशी खूप पुढे जाऊन पडते. >>> आताही आप'ला Expose होताना आपण पहालच.खरी चाणक्यनिती काँग्रेसकडेच आहे. जरा वाट बघा. केजरीवाल काँग्रेसचे कसे वस्त्रहरण करतील ते पहा आणि खरा चाणक्य कोण आहे ते कळेलच. >>> आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्या तुमच्या म्हणण्यानुसार काँग्रेस हिंदुत्ववादी आहे, म्हणजेच काँग्रेस प्रतिगामी आहे व धर्मनिरपेक्ष नाही. तुमच्या म्हणण्यानुसार भाजप हिंदुत्ववादी नाही, म्हणजेच भाजप पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहे. आपले मत "धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी" पक्षालाच द्या अशी तुमची कळकळीची इच्छा आहे. म्हणजेच "भाजपला" मत द्या असे तुम्हाला आडून सुचवायचे आहे. मग तसे स्पष्ट सांगा ना. उगाच ताकाला जाऊन भांडे कशाला लपविता?

In reply to by ग्रेटथिन्कर

>>>>आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता... अब्दुल रेहमान अंतुले - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२

In reply to by ग्रेटथिन्कर

>>>>राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही. सुशिलकुमार शिंदे - महाराष्ट्र मुख्यमंत्री - १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४

In reply to by ग्रेटथिन्कर

याला कोलांटीउडी म्हणतात
मान्य. परंतु मला आरपीआय व आंबेकडकरी मतांविषयी म्हणायचे होते.
असे आधीच लिहावयाला हवे होते

In reply to by ग्रेटथिन्कर

दलित आणि दलितेतर यात फरक समजतोय का? कुठून लोक प्रतिवाद करायला येतात देवजाणे! - असं आता मी म्हणायचं का?

In reply to by सचीन

@नाव तर अतृप्त दिसतया.म्हणून विचारल.>>> ती अतृप्ती इहलौकिक गोष्टींबद्दल आहे. धार्मिक गोष्टींबद्दलची नाही. :) तसेही आंम्ही कोणताच प्रस्थापित धर्म वापरत नाही. ती गरजच संपलिये. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तस असेल तर जावू द्या... गुरुजी तुम्हीच सांगा हो धर्मातर का करतात? (आणि ह्या धाग्यावर तो मोदिभी नको नि पवार भी नको मोदी राहल्या गुजरातेत पवार राहल्या बारामतीत.)

In reply to by सचीन

@गुरुजी तुम्हीच सांगा हो धर्मातर का करतात? >>> १)स्वतःच्या धर्मातल्या लोकांकडून होणारा छळ/पीडा/अपमान/पिळवणूक इ...इ.. २)दुसर्‍या धर्माबद्दल अंधळ आकर्षण/मिळणारी हरेक स्वरुपातली प्रलोभन ३)आपल्या दुबळ्या समाजावर अत्याचार पूर्वक धर्म लादला जाणे. ४)आणी शेवट(दुसर्‍या धर्मातल्या) वैयक्तिक कुतुहला पासून ते उपासनामार्ग अवडल्यामुळे. ..................................................................................................

In reply to by अत्रुप्त आत्मा

आणि यानं 'त्यांचा' आत्मा तृप्त होईल असं वाटतं तुम्हाला बुवा? धन्य आहे तुमचा आशावाद. बेस्ट लक. :) बादवे तुम्ही कापुस कोंड्याची गोष्ट ऐकली आहे का?