रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)
अधिक देखणे तरी निरंतर पाहणे
योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज)
फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता!
____________________________________
ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ.
मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य.
या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर, मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो.
______________________________
पाहणं आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा प्रभाग दृक स्मृतींनी व्यापला आहे.
आपल्याला वाटतं पाहतो तर आपण सदैव आहोतच, 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं विशेष काय साधणार आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण सक्रिय झालेल्या मनानं पाहतो.
त्यामुळे :
चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला
तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी ।
हा आपला अनुभव होत नाही.
आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते; सर्वव्यापी 'निराकार ' आपल्याला दिसत नाही.
_______________________
ट्राय टू अंडरस्टँड धिस,
एखाद्या निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला कळतं, 'सफरचंद'. पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली असते. मग सफरचंदावरनं अॅडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग > मग सखी बरोबर आपण गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं सफरचंद दिसेनासं होतं.
थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' असं पाहत नाही. आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक!
________________________
झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये संवाद सुरू होतो.
साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण बसलो तर केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं. त्या काही सेकंदभरापुरते आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं.
असे निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे.
_________________________________
देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी
तेणे समाधान मज जोडले ॐ मयी ।
त्या निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला लागेल.
___________________________
अनंगपण फिटले मायाछंदा साठविले
सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी ।
असा निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर, निराकारावर, नजर स्थिर होईल.
ज्या क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्या नजरेचं रिवर्सल होईल. तुमची नजर दुहेरी होईल. भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी ती एकावेळी पाहू लागेल.
तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य व्यापून आहे. तो सकळांचं आत्मस्वरुप आहे.
तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'.
जग माया आहे म्हणजे `ते नाही' असं नाही. तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल.
__________________________
पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी ।
हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही.
________________________________
ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु
विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी ।
हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे.
ओशो म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र महागीता)
असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' इतकंच करायचंय.
तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय.
__________________________
या काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर तिचा होणारा परिणाम आहे.
'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत . त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव तुम्ही लिहीलेत, की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
In reply to लंबूटांगजी - मी एक सुचवू का.. by मोदक
- येथे विचारले होते सर्व स्मृती निगडीत असणे तर कै च्या कै च. एक उदाहरण घ्या. एखाद्याची आपल्या वडिलांच्या अंतर्विधीची स्मृती ही त्याच्या विवाहाच्या पहिल्या रात्रीच्या/ जेव्हा केव्हा त्याने/ तिने पहिल्यांदा शरीर सुख अनुभवले त्या स्मृतीशी निगडीत असेल का? तिथेच विनंतीवजा सूचना केली होती तुम्ही एक टेबलच बनवा ना की मन म्हणजे CPU, मेंदू अथवा अजून काय जे स्मृती जतन करत असेल ते हार्ड-ड्राईव्ह.
- त्याच धाग्यात परत आठवण करून दिली होती
- ही दुसर्या धाग्यावरील प्रतिक्रीया
- तिसर्या धाग्यात परत एकदा आठवण.
In reply to फुटलो मी अक्षरशः by लंबूटांग
त्याचा संपूर्ण प्रतिसाद - केवळ ह्याच नाही तर इतरही धाग्यांवर- वाचूनआणि त्याला उत्तर म्हणून मी लिहीलंय >पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद वाचला तरी कुणाही मंदमतीला अर्थ कळेल! याचा अर्थ पहिल्या पोस्टवरचा त्याचा पहिला प्रतिसाद. असो, बाकी तुम्ही पहिल्या पोस्टवर जे दिव्य प्रतिसाद दिलेत ते वाचा. त्याबद्दल प्रथम तुम्हाला दिलगीरी व्यक्त करावी लागेल. नाही तर तुमचे प्रश्न आणि तुम्ही गोंधळ घाला.
In reply to तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही? by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही? by संजय क्षीरसागर
In reply to धन्या ने खाली लिहीलेच आहे. by लंबूटांग
संजय क्षीरसागर बस नाम हि काफी हे ;-) रंजक लेखमाला वाचतोयसंक्षी - थोडा शांतपणे विचार करा - तुम्हालाच सगळेजण का टारगेट करत आहेत..?? काहीही चुकत नसावे का तुमचे? तुमचा अभ्यास आहे.. तुमचे ज्ञान.. सर्व गोष्टी मान्य. परंतु फक्त तुम्हीच सर्वज्ञ आहात या थाटात लेखन करून तुम्ही तुमच्या ज्ञानाची चेष्टा मांडत नाहीये का..? थोडा तरी विचार करा राव. (चेष्टा करण्यात आणि टर उडवण्यात माझा सहभाग आहे हे मी बिनशर्त मान्य करत आहे परंतु वरचा प्रश्न कळकळीने विचारला आहे - बाकीच्या प्रश्नांप्रमाणे याही प्रश्नाला फाट्यावर मारणार असलात तरी मला फरक पडणार नाही)
In reply to थांबा राव. आणखी कन्फ्युजन नको by मोदक
तुमचा अभ्यास आहे.. तुमचे ज्ञान.. सर्व गोष्टी मान्य.अच्छा! त्याला ज्ञान आणि अभ्यास म्हणतात का? बॉरं....
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
In reply to समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर by मोदक
समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर आपण अनेक गणिते सोडवतो. तो क्ष प्रत्यक्षात नसतो पण त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो.वपुंची आठवण आली.
In reply to समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर by धन्या
In reply to समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर by मोदक
त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो.आज पर्यंतच्या अनेक धाग्यांवरील अनेक प्रतिसादकांनी अनंत प्रयत्न करूनही कोणी उत्तरापर्यंत पोहोचलेले दिसत नाही.
त्याचप्रमाणे हे गृहीतक त्यांना विचार करण्यास भाग पाडणार असेल तर "गृहीत धरायला" काय हरकत आहे..?तुम्ही ते गृहीत धरा किंवा नका धरू त्याने काय फरक पडणार आहे? त्यांनी सुरुवातीपासूनच ते गृहीत धरलेले आहे. तसेच, तुमचाच कांही अभ्यास नाही, तुम्हालाच कांही ज्ञान नाही हेही त्यांनीच गृहीत धरलेले आहे.
In reply to कोणी काय गृहीत धरायचे? by प्रभाकर पेठकर
In reply to माय गॉड! इतका इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स? by संजय क्षीरसागर
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
In reply to पूर्वी कंटाळा आला की मी काही by धन्या
In reply to तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल by मोदक
In reply to पूर्वी कंटाळा आला की मी काही by धन्या
In reply to आवडले ! by धर्मराजमुटके
परंतु फक्त तुम्हीच सर्वज्ञ आहात या थाटात लेखन करून तुम्ही तुमच्या ज्ञानाची चेष्टा मांडत नाहीये का..?सदस्यांना ज्ञान याचा अर्थ सच्चिदानंद बाबांची गोष्ट वाटते. अशा लेखनात काही त्रुटी दिसत नाहीत कारण त्यात समाजमान्य धारणांच दळण फक्त नव्या शब्दात काढलेलं असतं. लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे आणि माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. आणि सदस्यांना इतकी उघड गोष्ट उचलून धरता येत नाही. नाऊ सी, हा लेख देखिल त्याच ज्ञानेश्वर महाराजांवर आहे पण दोन ठिकाणी आलेल्या प्रतिसादात कमालीची तफावत आहे. याचा अर्थ तुमच्या मते, मी सर्वांना कमी लेखतो असा आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे : `टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही.
संक्षी, लेख बराच फिरतोय. हसायलाही आलं, काय विनोदी वाटलं हे सांगत नाही, तुम्हाला महित्येच.अप्रकाशित लेख सुद्धा योग्य ठिकाणी पोहोचतो याचं आश्चर्य आहे! आता इथे एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विडंबनाचा रोख नेहमी व्यक्तिगत असतो. माझ्यावर इतकी विडंबनं झालीयेत की बोलता सोय नाही. मधे मिपा बंद होतं तेव्हा सहज दुसर्या संकेतस्थळावर चक्कर टाकली तर माझ्यावरचं विडंबन तिथे प्रकाशित करून लोक मजा घेत होते! कॅन यू इमॅजिन? जिथे मी कधीही प्रतिसाद देण्याची शक्यता नाही तिथे माझ्यावर चिखलफेक! धिस इज दि हायेस्ट ऑनलाईन अब्युज. शुद्ध मराठीत याला भ्याडपणा म्हणतात. आता माझ्या विडंबनाला `फारच व्यक्तिगत रोख आहे' म्हणणं, आणि इतरांच्या माझ्यावर केलेल्या विडंबनाला `इट इज ओके, इतपत चालायचंच' म्हणणं याला काय अर्थ आहे? हे म्हणजे `एकाचा बलात्कार सौम्य आणि दुसर्याचा फोर्सफुल, तस्मात पहिला कायदेशीर आणि दुसरा बेकायदा' असा न्याय लावणं आहे .
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही.
"`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..??
तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?In reply to `टू रेज अप अ डेड' हेच by मोदक
आत्म्याचे परमात्म्याशी मिलन
इतकं अध्यात्म सोप्प आहे. माझा संक्षींवर आक्षेप आहे तो हा की , इतका सोप्पा विषय ते प्रचंड शब्दबंबाळ करून आडमार्गाला नेतात. आधीच अध्यात्माबद्द्ल प्रचंड गैरसमज आहेत त्यातून तुम्ही तत्वज्ञानाचा क्लास काढा ..मग लोक आणखी लांब जातात... नाहीतर फुका ट्पल्या मारून गंम्म्त बघत बसतात ! ( मी पण त्यातलाच , करतो कधी कधी गम्मत ,,.. काय करणार वो, अति झालं आणि हसू आलं )
दोन्ही प्रकारात अध्यात्माचेच नुकसान !
संक्षी - एक अनाहूत सल्ला -
नका लिहू अध्यात्मावर ! एरव्ही तुम्ही चांगले लिहू शकता. मागे एक परिक्रमेवर विडंबनात्मक लिहले होते, मजा आली होती वाचताना .. तस्ल कायतरी लिहा हो. लोकांचे मरू दे, ते होतील तेव्हा शहाणे होतील नायं तर नाय होतील. आपण आपल्या पावलांपुरते पहावे !!
In reply to आत्म्याचे परमात्म्याशी मिलन by विटेकर
लोकांचे मरू दे, ते होतील तेव्हा शहाणे होतील नायं तर नाय होतील. आपण आपल्या पावलांपुरते पहावे !!जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती... बालका, आपल्या पाऊलांपुरते तर सामान्यजन पाहतात.
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे आणि माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. आणि सदस्यांना इतकी उघड गोष्ट उचलून धरता येत नाही.आम्ही "ईलाईट" क्लासमधले नसल्यामुळे काल दुपारी बारा वाजल्यापासून आज पहाटे सहा वाजेपर्यंत कार्यालयात कळफलक बडवत होतो. जरा सबुरीनं घ्या. असे हातघाईवर येऊ नका. वेळ मिळाला की सार्या प्रश्नांची उत्तरे देईन.
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
समाजमान्य धारणांच दळणआपले ते सत्य आणि इतरांच्या त्या धारणा हे समीकरण आधीच पक्के जुळवले की मग चर्चा ही निव्वळ औपचारिकता उरते.
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
आता इथे एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विडंबनाचा रोख नेहमी व्यक्तिगत असतो.कैच्या कै लिहू नका. विडंबने लेखाची त्या लेखकाच्या विशीष्ट शैलीची होतात. त्याने व्यक्तिगत आयुष्यात काय केले आहे व किती संस्थळे काढली आहेत व त्यावर किती लोक येतात वगैरे असंबद्ध गोष्टी त्यात नसतात. मी काही विडंबन एक्स्पर्ट नाही पण मी मिपावर जे काही थोडे बहुत लेखन केले आहे ते बहुतांश विडंबन या प्रकारात केलेले आहे. विडंबन तुमच्या वर केलेले नसून तुमच्या लेखावर केलेले असेल तर ते ज्या लेखनावरून स्फुरलेले आहे त्याची लिंक दिली तरी पुरे असावे.
जिथे मी कधीही प्रतिसाद देण्याची शक्यता नाही तिथे माझ्यावर चिखलफेक!विडंबन म्हणजे चिखलफेक? आणि तुम्ही प्रतिसाद द्यावा म्हणून विडंबन करतात असे तुम्ही कोणाला सांगितले? बरं तुम्ही तिथे प्रतिसाद देत नाहीत तिथे तर मग तिथल्या काही सदस्यांना तुम्ही कोण हे माहितही नसेल. विषय संपला.
धिस इज दि हायेस्ट ऑनलाईन अब्युज. शुद्ध मराठीत याला भ्याडपणा म्हणतात.देअर यू गो अगेन. आक्रस्ताळेपणा. अब्युज काय आणि भ्याडपणा काय. दोन विडंबनांमधे जमीन अस्मानाचा फरक आहे. तुमच्या लेखनशैलीवरील विडंबना मधे तुम्ही वैयक्तिक जीवनात काय काम करता/ किती साईट्वर लिखाणकरता वा तत्सम उल्लेख नाही आहेत. जे तुमच्या विडंबनामधे होते. म्हणून ते उडाले असावे. नोटः
- मी काही संपादक नाही आणि लेखन उडवण्याला माझा कधीच सपोर्ट नव्हता पण असो तो वेगळा विषय आहे.
- ते दिलगीरीचे काय म्हणत होतात. चूक कळली तर दिलगीरी व्यक्त करायला काहीच हरकत नाहीये माझी.
- त्यानंतर माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार का? की ती द्यायला लागू नयेत म्हणून हे दिलगीरीचे कारण पुढे करताय?
टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..??इतकी उघड गोष्ट आहे. लेखकच पुरावे देतोय :
आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो. ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते.आणि प्रतिसाद तर एकसोएक आहेत : १) वा! धनाजीराव वा! छान लिहिलेय. २) आवडलं. ३) मस्त. भिंतीचं अप्रूप मलाही आहे ४) मस्त! आपुले मरण पाहिले म्या डोळां.. ५) आमच्या अण्णांना हा लेख वाचून दाखवतो आणि आलेला अनुभव तुला सांगतो ६) लेख आवडला. धन्स हो धन्याशेठ. काय निष्कर्श निघतो यावरनं? _________________________ आणि माझा प्रश्न फार साधा आहे: `इफ वन कॅन रेज अ डेड, वाय टू सर्च फॉर द अनडाइंग ? किमान बुद्धी सुद्धा साधा तर्क करू शकते, जर मृत्यूवर विजय मिळवला तर अध्यात्माची गरज काय? भारतीय मानसिकता किती बालीश आहे. आपण कुणाही पाश्चिमात्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि त्याला सांगितलं की `धिस इज वन ऑफ दि हायेस्ट ट्रिटाइज ऑन द ग्रेट भगवद्गीता, अँड यू नो? इट इज रिटन बाय अ डेड हू वॉज रेज्ड अलाइव टू राईट इट! तर तो सरळ म्हणेल, `मॅन, फर्गेट अबाऊट द ट्रिटाइज, वेअर इज दि फॉर्म्युला?' तुमच्या साधी गोष्ट लक्षात येत नाही. या भंपकपणानं तुम्ही ज्ञानेश्वरीचं मूल्य कमी करतायं. असो, साक्षात लेखक तिथे प्रतिसाद देणार आहेत, तेव्हा बघू. _____________________________
तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?नाही. माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत' अर्थात, यावर तुम्ही पुन्हा उपहास सुरू करण्याची आणि हे वाक्य विपर्यस्त करून जागोजागी वापरण्याची शक्यता आहेच. पण तसं करणं फक्त एकच गोष्ट दर्शवेल, मी माझ्या लेखनाशी प्रामाणिक राहून तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही मात्र, मला समजावून न घेता, पुन्हा बेईमानी केली! अँड दॅटस द होल थिंग, `तुम्ही स्वतः सत्य आहात', हे पुन्हा तुम्ही नाकारलं. आता यानं मला काय फरक पडतो? मी तर निश्चिंत आहे, तुमचं अस्वास्थ्य कायम राहिलं.
In reply to आता चर्चा बर्यापैकी लॉजिकल होण्याची शक्यता आहे by संजय क्षीरसागर
काय निष्कर्श निघतो यावरनं?
तो लेख आणि तेथे मिळालेले प्रतिसाद येथे उल्लेखून तुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा - हा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला आहे.
माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत'
ओके. माझी व्याख्या किती % चुकीची / बरोबर आहे..?
वरच्या प्रतिसादातील मधल्या भागावर मला विचार करण्यास वेळ मिळाला नाहीये - १९ ऑगस्टपर्यंत मिळणार नाहीये - तस्मात तो भाग सध्या बाजूला ठेवत आहे.
वरच्या प्रतिसादातील शेवटचा भाग वैयक्तीक वाटल्याने त्याला फाट्यावर मारण्यात आले आहे.
_____________________
सुटसुटीत तेच लिहीतोIn reply to काय निष्कर्श निघतो यावरनं? by मोदक
In reply to तुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा ? by संजय क्षीरसागर
इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही.
आलेला नाहीये का..?? तुमच्या प्रतिसादांचा टोन पहा.
१९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे.
धन्यवाद! तुम्हाला आलेले काही प्रतिसाद "मनापासून" लिहिलेले आहेत हे तुम्ही ज्या क्षणी कबूल केलेत त्याच क्षणी तुमची आकलनक्षमता कळाली.
असो. देव तुमचे भले करो.In reply to आता चर्चा बर्यापैकी लॉजिकल होण्याची शक्यता आहे by संजय क्षीरसागर
लेखकच पुरावे देतोय :आता हसावं की रडावं हेच मला कळत नाही.
In reply to लेखकच पुरावे देतोय : by धन्या
आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.तुमचा सर्व लेख या विधानाला दुजोरा देणारा आहे आणि तिथे बाळ सप्रे आणि मी दिलेल्या प्रतिसादांना उत्तर देण्याची जवाबदारी तुम्ही स्विकारली आहे.
`आता हसावं की रडावं हेच मला कळत नाही'तुम्हाला सोयीचं वाटेल ते करा, आता तो तुमचा प्रश्न आहे.
In reply to लेखकच पुरावे देतोय by संजय क्षीरसागर
तुमचा सर्व लेख या विधानाला दुजोरा देणारा आहे.माझा चमत्कारांवर विश्वास नाही. त्यामुळे ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर असूनही मला त्यांच्या नावावर सांगितले जाणारे सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात. अगदी त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी भगवदगीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिणं हा सुद्धा माझ्या दॄष्टीने चमत्कार नाही. तो त्यांच्या प्रगल्भ बुद्धीमत्तेचा, त्यांच्या आई-वडीलांच्या त्यांच्यावरील संस्कारांचा आविष्कार होता. मग मी ती सच्चिदानंद बाबांची गोष्ट का लिहिली? माझ्या वाचनाची रेंज खुप मोठी आहे. अध्यात्म, मानसशास्त्र आणि सजीवांची उत्क्रांती हे त्यातले प्रमुख विषय आणि त्या अनुषंगानं देव, धर्म, पुनर्जन्म, फलज्योतिष असं खुप काही मी वाचत असतो. नुकताच मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) या विषयावर वाचन झालं. मृत्यूसमीप अनुभव ही गोष्ट सर्वसामान्यांना जरी चमत्कार किंवा अतिंद्रीय वाटली किंवा तो स्वर्ग, नरक वगैरे बाबींचा पुरावा वाटली तरी विज्ञानाने या अनुभवांची उकल केली आहे. मानवी शरीरात काही विशिष्ट संप्रेरके टोचून कृतिमरीत्या असा अनुभव देण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले आहेत. मी या दोन बाबींची म्हणजेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट आणि मृत्यूसमीप अनुभव संगती लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असे असले तरीही त्या लेखात मी कसलाच दावा केलेला नाही. तुम्ही "कोट" केलेली वाक्ये ही मला माहिती असलेल्या किंवा मी येथे लिहिलेल्या सच्चिदानंद बाबांच्या गोष्टीमधील आहेत. ती वाक्ये म्हणजे माझे मत नाही. तसेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट हा नियर डेथ एक्स्पेरियन्स होता असंही माझं मत नाही. तसं काही असू शकेल असा माझा फक्त अंदाज आहे. विश्वाच्या अफाट पसार्याचं पुर्णतः आकलन होणं हे मानवी बुद्धीच्या कुवतीच्या पलिकडचं आहे. मला सर्व समजलंय असं कुणी म्हणत असेल तर तो त्या व्यक्तीचा भ्रम आहे.
In reply to मी प्रतिसादात काहीही लिहिलं by धन्या
In reply to आता चर्चा बर्यापैकी लॉजिकल होण्याची शक्यता आहे by संजय क्षीरसागर
भारतीय मानसिकता किती बालीश आहे.परदेशी परिपक्व मानसिकतेचे दर्शन झोम्बी, ओमेन, नॉन्स्ट्रडॅमस, एक्झॉर्सिस्ट वगैरे वगैरे अनेक चित्रपटांमधून, त्यांच्या सिक्वल्स मधून, कादंबर्यांमधून अनेकदा झाले आहे. येशूच्या कथेतही अशी कांही उदाहरणे असणारच. मी बायबल वाचलेले नाही त्यामुळे त्यावर अधिकारवाणीने भाष्य करू शकत नाही. पण मला खात्री आहे. जिथे भूतखेतांच्या कथा चविने वाचल्या-पाहिल्या जातात तिथे देवादिकांचे चमत्कार अस्तित्वात नाहीत असे म्हणणे भाबडेपणाचे ठरावे.
In reply to संक्षी - एक अनाहूत सल्ला देतो by मोदक
In reply to मस्त बॅटींग चाललीये ... by प्रसाद गोडबोले
In reply to यूअर टर्न नाऊ!! by मोदक
२) अध्यात्मातला संवाद हा नेहमी ऐकणाऱ्याच्या ओपननेस वर अवलंबून असतो, ज्या क्षणी तुम्हाला मला काही कळले नाही असे वाटेल त्या क्षणी माझ्यातला आणि तुमच्यातला दुवा निखळेल. त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे. आध्यात्मिक चर्चा हा दोघातला संवाद आहे त्यामुळे बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला समजले आहे की तो उगाच वाद घालतो आहे हे लगेच समजते. अर्थात सांगणाऱ्याचा आनंद हा ऐकणाऱ्याला समजल्यावर द्विगुणित होतो पण बोलणारा प्रतिसादांचा कौल पाहून बोलत नाही, नाहीतर ते न समजलेल्याने समजलेल्या शिकवण्या सारखे होईल. तुम्हाला ही चर्चा निरस वाटली तर तुम्ही बाजूला होऊ शकता पण एखाद्याला खरंच समजत असेल तर त्याला डायव्हर्ट करू नका. या लिखाणाचा उद्देश एक अतिशय सोपी गोष्ट अत्यंत सोप्या पद्धतीनं तुमच्या पर्यंत घर बसल्या आणि मोफत पोहोचवणे आहे, वाद निर्माण करणे, कुणाचाही अपमान करणे, कुणालाही कमी लेखणे हा नाही. तुम्हाला सत्यं समजले नाही तरी तुमच्यात कोणतेही न्युनत्व येत नाही त्यामुळे अश्या प्रकारचे गैरसमज करून घेऊन किंवा मी स्वतःला कोण समजतो अशी माझी संभावना करून काहीही साधणार नाही. काहीही करून तुम्हाला समजलेच पाहिजे किंवा मला समजले आहे हे सर्वमान्य झाले पाहिजे असा या लेखनाचा हेतू नाही.हा मेन भाग आहे
त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे.इथे आधी टाकायला हवा होता असं वाटुन गेलं. तरीही गोंधळ कमी झाला असता कि नाही हि श़ंकाच आहे ! बाय द वे , मी वाचतो आहेच. जसं पोहण्यात काय मजा आहे हे आधी पाण्यात उडी मारुन तरंगायला शिकल्याशिवाय कळत नाही तसं लेखांमधल्या गोष्टी पेशन्स ठेवुन करुन पाहील्याशीवाय , जे लिहिलंय ते अॅट लीस्ट पडताळुन पाहील्याशीवाय ( इच्छा/इंटरेस्ट असेल तर ) त्यातुन नेमका काय फायदा होईल किंवा खरोखरच फायदा होइल की नाही हे समजणार नाही. धन्यवाद आणि आभार उन्मेष
In reply to बापरे ! by उन्मेष दिक्षीत
लेखांमधल्या गोष्टी पेशन्स ठेवुन करुन पाहील्याशीवाय , जे लिहिलंय ते अॅट लीस्ट पडताळुन पाहील्याशीवाय ( इच्छा/इंटरेस्ट असेल तर ) त्यातुन नेमका काय फायदा होईल किंवा खरोखरच फायदा होइल की नाही हे समजणार नाही.जे लिहिलय ते आधी कळले तर पाहिजे नं! दुसर्याला कमी न लेखता, त्याची मानसिकता, आकलनशक्ती, त्याचा नुसत्या पाठांतरावर आधारीत व्यवसाय आदी गोष्टींवर नकारात्मक आणि अपमानकारक शेरेबाजी आणि शब्दप्रयोग टाळून आपल्याला जे म्हणायचे आहे ते स्वच्छ आणि सोप्या भाषेत मुद्देसुदपणे मांडले, शंका विचारणार्यांना शब्दांच्या घोळात न भरकटवता जर त्यांना समजेल अशा मोजक्या शब्दांत त्यांचे शंका निरसन केल्यास, आपला वरील मुद्दा विचारार्ह ठरू शकतो. आदर हा मागुन मिळत नसतो तो कृतीतून मिळवावा लागतो. मीच सर्वज्ञ आणि मीच दिपस्तंभ ही भूमिका सोडून वाचकाच्या पातळीवरून खेळीमेळीच्या वातावरणात, किमान दुसर्याला कमी न लेखता कांही बोधामृत पाजले तर त्याचा स्विकार नक्कीच होऊ शकतो. मिपावर ज्ञानामृताचे कण वेचता येतील असे अनेक धागे येतात. लोकं वाचतात सहमत/असहमत होतात पण ह्या 'भ्रमरा' इतके घाऊक पातळीवर नाकारले जात नाहीत. त्या चांगल्या लेखांचा अभ्यास करून नंतर सोप्या भाषेत आपले विचार मांडले तर मिपा सदस्य नक्कीच त्या विचारांकडे आदरयुक्त नजरेने पाहतील.
In reply to बापरे ! by उन्मेष दिक्षीत
त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे.@संजय सर, थँक्स. मला माहीत नाही हे मी लिहायला हवं होतं की नाही तुमच्या परवानगीशीवाय, पण मला गरजेचं वाटलं आणि लिहीलं धन्यवाद, उन्मेष
In reply to @ लंबूटांग, प्रभाकर पेठकर .. by उन्मेष दिक्षीत
In reply to @ लंबूटांग, प्रभाकर पेठकर .. by उन्मेष दिक्षीत
एक विचारतो, तुम्हाला तुम्ही सत्य आहात हे कळले आहे तर मग आजही त्यांचा गायडन्स कशाला लागतो?>> मी मला सत्य समजलंय असा दावा केलेला नाही. @लीमाउजेट थँक्स फॉर धीस :) -
तुमचा लिहिण्याचा टोन फार सभ्य आहे. बरं वाटतय वाचायला.>> मला काही लिहिता आलं असतं तर लीहिलं असतं आत्तापर्यंत. आणि मला काय अनुभव आलेत किंवा नाही हे मला क्लेम नाही करायचंय इथं. माझा उद्देश हे सांगणं होता , मला एखादा लेख जर कळाला, पटला, (अगदी संपुर्ण नाही तरी) तर लेखाच्या अनुशंगाने मला प्रश्न विचारता येतील. जर मला अगदी पुर्णच नाही कळाला किंवा पटला आणि लेख हा जर लेखकाचा अनुभव आहे पण मला याच्याबद्दल डाउट आहे तरीही मी लेख / लेखकावर टीका करुन माझं दुसरं मत अगदी हीरिरीने मांडलं तरीही कुणाला काय उपयोग त्याचा ? बर, माझ्या पद्धती या लेखातल्या पेक्षा वेगळ्या असतील (टेक फॉर इन्स्टन्स नामस्मरण) आणि माझ्यासाठी जर ती वर्क होत असेल तर वेल अँड गुड. इन दॅट केस आय डोन्ट नीड टु डिफेंड एनीथींग हीअर. माझी पद्धत तुच्छ लेखली गेली आहे असं मला वाटायचा प्रश्नच येणार नाही. मी मग लेखातल्या पद्धती एक तर काहीतरी नवीन आहे म्हणून ट्राय करुन वेरिफाय करू शकतो, किंवा मी माझ्या सध्याच्या पद्धतीने कधीही कंटीन्यु करुच शकतो, इथं कुणाला काय कंपल्शन आहे ? प्रत्येक जण ठरवू शकतोच की काय करायच काय नाही. पण जर माझ्याकडे नुसती माहीती आहे दोन्ही पद्धतींबद्दल आणि दोन्हीही मी करून नाहीत बघीतल्या (भलेही कुणीही सांगीतल्या असल्या तरीही )तर मग मी कसं ठरवु शकतो कि ही पद्धत चांगली कि ती ? अशावेळी लेख पटणं किंवा न पटणं याचासुद्धा प्रश्न रहात नाही. मग मला काय पर्याय उरतो ?
In reply to माझा उद्देश by उन्मेष दिक्षीत
In reply to यादी by Nile
मला तुमच्या लेखनावर काहीही प्रतिक्रीया देणे म्हणजे वेळ वाया घालवणे हे माहित आहे....जर काही लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे वगैरे असतील त्या सर्वांवर त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपाय शोधू देत कीदुसर्या मॅम (आक्षेप घेतला जातो लिहिण्याचा टोन आणि केलेले दावे याला) म्हणणार्या, किती सुरेख टोनमधे गर्भित अर्थ विचारतात हे देखिल वाचनीय आहे : निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे >... म्हणजे कोमा का? तिसरे सर का कावलेत ते तुला, माझा पैसा हा लेख वाचला की लगेच लक्षात येईल. प्रश्न माझ्या लेखनाचा किंवा प्रतिसादांचा नाही कारण कोणताही व्यक्तिगत, किंवा एखाद्या सदस्याला तुच्छ लेखणारा प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकत नाही. त्यामुळे त्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. शिवाय इंटरनेटवर कुणीकुणाचं ऐकून घेत नाही. लोकांच्या धारणा फार लवचिक आहेत आणि लेखन त्या प्रश्नांकित करतं, ही वस्तुस्थिती आहे.
In reply to माय गॉड, वॉट अ स्ट्रेट प्रूफ ! by संजय क्षीरसागर
`देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहेतुम्ही वर ज्या प्रतिसादाची लिंक दिलीये त्यालाच तुमचा प्रतिसाद
माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.
हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो. ... ... ... तुम्ही व्याख्येतच पराभूत झालात त्यामुळे पुढचा सर्व प्रतिसाद व्यर्थ आहे. अर्थात तुमचे आभार मानायलाच हवेत कारण `नामसाधनेचा' संपूर्ण भोंगळपणा तुम्ही (स्वतःच्या आकलनासहित) सविस्तर उलगडून दाखवला आहे.
तुम्ही आता विनोदी लिहायला लागलात! ... ... नका फंदात पडू दुरूस्तीच्या, तिथे दुरूस्ती लागतच नाहीहे सर्व तुमचे प्रतिसाद फक्त पहिल्या धाग्यावरच्या प्रतिसादातून वेचून काढले आहेत. बाकीचे ३ धागे शोधलेत तर एक लेख नक्कीच होईल.
In reply to आता तुमचे प्रतिसाद असे quote च करायचे झाले तर by लंबूटांग
`देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहेही वस्तुस्थिती आहे आणि त्यात व्यक्तिगत रोख (खरं तर, तुमच्यावर) नाही. तस्मात, उदाहरण रद्द.
माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.हे तुमच्या उपहासाला उत्तर आहे.
हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो.यात खरं तर तुमचा काहीही सबंध नाही. पण जे लिहीलंय ते मुद्देसूद आहे.
तुम्ही आता विनोदी लिहायला लागलात!इथेही तुमचा संबंध नाही पण सोयिस्करपणे, ज्या प्रतिसादाला ते उत्तर आहे त्यातला उपहास तुम्ही वगळला आहे. (त्यांचे स्वतःचे विपश्यनेवरचे लेख इथे प्रकाशित आहेत, त्यामुळे त्यांना अध्यात्मिक टर्म्सची पुरेशी कल्पना आहे. त्या स्वतः संपादिका आहेत त्यामुळे `गर्भित अर्थ' त्या बरोब्बर नियमात बसवतात. या गोष्टी लक्षात घेऊन ते प्रतिसाद वाचले तर नेमका अर्थ कळेल.) मला वाटतं `आता सुरूवात कोण करतं' हे एकदम स्वच्छ आहे. त्याविषयावर परत चर्चा करण्यात अर्थ नाही.
In reply to वॉट अ ज्योक! by संजय क्षीरसागर
- तिथे लिहीले आहे की तो तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून दिलेला आहे. फक्त त्याच लेखाला/ प्रतिसादाला नाही.
- मी जे वेळ वाया घालवणे लिहीले आहे तेही ह्या बॅक ट्रॅक करून आलेल्या अनुभुतीतून लिहीले आहे. तुम्ही माझ्या प्रश्नांना उत्तरे नं देऊन त्याला पुष्टीच दिलीत. "प्रूफ" हवा असेल तर हा घ्या. consolidated प्रूफ.
विचार केला होता देण्याचा