तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-९

खुशि's picture
खुशि in भटकंती
23 Jun 2012 - 6:18 pm

पन्च पन्च उषःकाली केदारेश्वर,पुष्पदन्तेश्वराचे दर्शन घेउन विनोबा एक्स्पप्रेस निघाली. निम्भोरा पार केले खान्डसरी आले, येथेच खान्डसरी साखर कारखाना आहे.खान्डसरी साखर पान्ढरीशुभ्र नसते,पुरळ म्हणजे अगदी बारीक आणि किन्चित तपकिरी रन्गाची असते पण पान्ढर्या साखरेपेक्षा ही साखर पॉष्टीक असते हिचे दुष्परिणाम नसतात.तर खान्डसरी या गावाच्या नावावरुन या साखरेला खान्डसरी हे नाव पडले. हिलाच गावाकडे गुळी साखर म्हणतात.चला पुढे;बरेच विषयान्तर झाले. ५कि.मि. चाललो होतो ८ वाजले होते,कारखान्याच्या बाहेरच टपरीवर पाववडा-चहा असा नास्ता केला.रोजच्यापेक्षा लवकर,कारण काल एकादशी असल्याने रात्री भोजन नव्हते.
खान्डसरी गुजराथ मध्ये आहे म्हणुन आम्हाला वाटले गुजराथ सुरु झाले पण काही वेळाने परत महाराष्ट्राची हद्द लागली. थोडावेळाने परत गुजराथ,अशी गम्मत बरेच कि.मि. आहे. टपरीवर नास्ता करताना कळले होते की १०/१२ कि.मि.वर अमलाड येथे श्री. काशिनाथ पटेल यान्च्या घरी परिक्रमावासीन्साठी भोजन-निवासाची व्यवस्था आहे. निघालो,अमलाडला पोहोचलो गावाबाहेरच पटेल भेटले त्यानी आग्रहाने घरी जाण्यास सान्गितले,त्यानी सान्गितल्याप्रमाणे आम्ही गेलो.अजुन ८/१० दुसरे परिक्रमावासीही तिथे होते.स्वतः काशिनाथ पटेल बरेच व्रुध्द आहेत. त्यान्च्या मुलान्ची बहुदा वेगवेगळी घरे होती.आम्ही एका घरी होतो आणि बाकी परिक्रमावासी दुसर्या घरी होते.त्याना सदाव्रत दिले होते आणि ते स्वयम्पाक करत होते. प्रथम आम्हाला चहा-पाणी दिले.भोजन तयार होत होते,तो पर्यन्त आम्ही प्रमाणपत्रावर शिक्का मारुन घेतला. भोजनासाठी बोलावणे आले म्हणून गेलो तर आम्हाला घराच्या मागील बाजुला धुणे-भान्डी करायच्या जागेजवळ बसण्यास सान्गितले,तिथे चुलीवर त्यान्चा घरगडी आमच्या साठी वरण-भात बनवत होता.त्यानेच आमच्यापुढे वरण-भाताची भान्डी ठेवली ताटल्या पाण्याचा गडवा ठेवला आणि तो निघुन गेला,आम्हाला समजेना असे काय आम्हीच वाढुन घ्यायचे की नाही? मोठा अपमान वाटला,उठून जावे असे वाटले पण अन्नाचा अनादर करु नये म्हणून वाढुन घेतले भात सम्पत होता तोच घरातुन एक मुलगी आली तिने आमच्यापुढे ठेपल्यान्ची ताटली अशा प्रकारे ठेवली कि,घ्या खा एकदाचे,कुठुन कुठुन येतात कोण जाणे,आणि ती आली तशी घरात निघुन गेली,अपमान सहन करण्याची हद्द झाली.आम्ही उठलो ताटल्या घासुन तिथे उपड्या घातल्या आणि येतो असे सान्गुन लगेच निघालो.
कुठे मध्यप्रदेशातिल आदरातिथ्य आणि कुठे महाराष्ट्रातील ही मानभावी सेवा. जमत नसेल तर करु नये,परिक्रमावासी भिकारी नसतात,काही व्रत म्हणुन ते स्वतःचे सुखाचे घर सोडून परिक्रमेसाठी निघालेले असतात. आणि पटेलतर आग्रह करकरुन परिक्रमावासीना घरी घेउन येतात,आणि मग त्यान्च्या घरच्या स्त्रियान्चे अतिथी बरोबर असे वर्तन? मैय्या जीवनाचे वेगवेगळे रन्ग दाखवत होती. नाहीतर असा अनुभव आम्हाला कधी आणि कसा आला असता?
ह्या सगळ्या प्रकारात खुप वेळ गेला होता.दुपारचे २ वाजले होते.रस्ता चान्गला होता दुतर्फा मोठी झाडे होती त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नव्हता पण गरममात्र खुप होत होते. वाटेत मनोज शहा भेटले त्यान्चा तळोदा येथे पेट्रोलपम्प आहे,त्याच्या मागे कनकेश्वराचे मन्दिर आहे त्याचे दर्शन घ्या असे सान्गितले,पम्पावर माझे वडील आहेत तुम्ही पुढे व्हा मी येतोच असे म्हणाले. नुकताच पटेलान्कडचा अनुभव चान्गला नव्हता त्यामुळे नुसते हो म्हणुन आम्ही पुढे चालु लागलो.
शहा यान्चा पेट्रोलपम्प आला.मनोजचे वडील बाहेर आमची वाट बघत उभे होते,मनोजने त्याना फोन केला होता. त्यानी आमचे स्वागत केले,मन्दिराचा रस्ता दाखवला आणि दर्शन घेउन या असे सान्गितले.आम्ही गेलो,दाट वनराईत कनकेश्वराचे शान्त मन्दिर आहे,सुबक बान्धकाम आहे.गाभार्यात स्वयम्भू शिवपिन्डी आहे. हात-पाय धुवुन दर्शन घेतले,अपमानाने झालेला मनाचा क्षोभ शान्त झाला.मन्दिराच्या प्रान्गणात बसलो,मनोज चहा-बिस्किटे घेउन आला.मोठ्या आदराने आम्हाला दिला. आज मुक्काम आमच्या घरी करा असे म्हणाला, आम्ही वाण्याविहिरला कन्हैयालाल परदेशी यान्च्या घरी जाणार आहोत असे म्हटले तर म्हणाला सर्वजण त्यान्च्याच घरी जातात,आम्हाला मैय्याची सेवा करण्याची सन्धी कधी मिळणार?आम्ही ठिक आहे तुमच्याकडे राहू असे म्हटले.त्याचे घर अक्कलकुवा येथे होते,म्हणजे जवळजवळ २५कि.मि.दुर.तो म्हणाला तळोदा येथुन बसने अक्कलकुवाला जा मी बस स्टन्डवर येतो.मग त्याप्रमाणे केले .
बसस्टन्डपासुन साधारण अर्धा कि.मि. अलीकडे मनोजचे घर होते.मनोज रस्त्यावर उभाच होता मग तिथेच उतरलो.मनोजचे घर म्हणजे बन्गला होता. मोठ्या आपुलकीने त्याच्या पत्नीने,आईने स्वागत केले. आमच्या सायम्प्रार्थनेतही सर्व कुटुम्बिय सहभागी झाले.रात्री भोजनप्रसादाला गुजराथी कढी-खिचडी होती,भोजनाला काय करु विचारले आम्ही सान्गितले म्हणून कढी खिचडी.चुरम्याचे लाडु मिष्ट्टान्न होते,आमच्या पन्गतीला मनोज त्याचे वडील बसले होते,आग्रह तर विचारुच नका. मनातील मैय्या म्हणाली मग आता कसे वाटते राग गेला ना? हो! तुझी क्रुपा आहे. झोपायची व्यवस्था राजेशाही होती. सारा थकवा शिणवटा छू मन्तर झाला. नर्मदे हर. क्रमशः

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

23 Jun 2012 - 7:26 pm | मुक्त विहारि

सध्या तरी इतकेच...

सविस्तर प्रतिसाद, लेखमाला संपली की देईन..

विलासराव's picture

23 Jun 2012 - 8:33 pm | विलासराव

मस्त चाललीये परीक्रमा.
मी कालच परीक्रमेवरून आलोय.
आत्ता एकाच बैठकीत तुमचे सर्व लेख वाचले.
छान लिहीताय.

पैसा's picture

24 Jun 2012 - 12:05 am | पैसा

छान लिहिताय! वाचत आहे.

प्रचेतस's picture

25 Jun 2012 - 8:33 am | प्रचेतस

असेच म्हणतोय.

पियुशा's picture

26 Jun 2012 - 11:52 am | पियुशा

छान लिहिताय ,चालु द्या :)