Skip to main content

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट?

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 13/07/2011 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :( ही बातमी खरी आहे काय? असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना! आपला, -(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.

वाचने 40417
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

मुंबईत नसतो.. मात्र घरचे सगळे सुखरुप आहेत. काळजी घ्या मित्रांनो

माझे सासरे काल गेले होते झवेरि बाजारात पण स्फोटच्या अर्ध्या तासापूर्वीच तिकडून निघाले होते.

लोक स्फोटबीट दोन दिवसात विसरून जाणार. सरकार लाख दोन लाख दरडोई वाटणार, निदान घोषणा तरी करणार. विरोधी लोक दोन दिवस बोंब मारणार आणि मग गपगार. पोलिस मिळतील तितक्या दोन, चार, सहा मुस्लिम लोकांना अटक करणार. आणि खटला झाला की पुराव्याअभावी सगळे सुटणार. हे एखाद्या फॉर्म्युल्याप्रमाणे होत आले आहे आणि होत रहाणार. असल्या षंढ, मुर्दाड समाजावर आपल्या अतिरेकी कारवायांचा काहीही परिणाम होत नाही असे जाणवून अतिरेकीच तो नाद सोडतील अशी आशा करु.

मंगळवारी रात्री उशीरा मुंबईहून परत आलो (खर तर काल दादरहून येणार होतो) आणि आज ही बातमी. कसाबला फाशी करून हे संपणार नाही, पण निदान स्फोटात मेलेल्यांची चेष्टा होतेय असे तरी वाटणार नाही. खरे तर लवकरात लवकर पाकिस्तानात 'कारवाई' करून ज्ञात अतिरेक्यांना मारले पाहीजे, थोडी तरी लाज राखली जाईल.

काल त्यावेळेस पार्ल्यात घरीच होतो. वडीलांचा गावाहून फोन आला.संभाळून रहा म्हणून........ पण सांभाळून रहायचे म्हणजे नक्की काय करायचे? घरातच बसायचे? आपले दुबळे राज्यकर्ते जनतेला वेठेस धरतात.( वेंगसरकराना विरोध करताना काहीजणाना अतीआदाणीय क्रिकेट्कृषीमंत्री सुरक्षीत क्रिकेट मॅचबद्दल बोलतात..... बहुतेक त्याना दंगेधोपे/बॉम्ब स्फोट करणारे माहीत असावेत)

काल रात्री उशीरा ही बातमी समजली, पहिल्यांदा आपल्या तेथे असलेल्या लोकांचा विचार मनात आला, सगळे नातेवाईक,मित्र, सुहृद सुखरुप आहेत हे समजल्यावर सुटकेचे हुश्श केले पण कोणाचे तरी मित्र, नातेवाईक.. आपल्यासारखेच सामान्य ह्या बाँबस्फोटात जखमी झाले, मृत्यूमुखी पडले हे वाचून, पाहून खिन्नही झाले.. हे असं किती दिवस चालायचं? स्वाती

काल काही चॅनेल्सवर उत्तेजित रिपोर्टर्स गळ्याच्या शिरा ताणताणून ओरडत होते, “ये खून जो रस्तेमें गिरा है वो आम आदमीका है. सरकार क्या कर रही है आम आदमी की सुरक्षा के लिये. आम आदमी का सरकारने विश्वासघात किया है.. उनका पर्दाफाश होगया है..” वगैरे भडकावणे चालू होते. आपण मुंबईसारख्या शहरात आणि फॉर दॅट मॅटर भारतासारख्या देशात कितीही सुरक्षितता ठेवायची म्हटले तरी प्रत्येकाची पिशवी, छत्री, खिसे चेक करणे चोवीस तास शक्य नाही. त्याउप्पर पोटात बाँब लपवून हाराकिरी करणारे दहशतवादीही आहेतच (नाईन इलेव्हन आठवा.. विमानासोबत स्वतःचाही जीव दिलाच की..) तेव्हा काय काय चेक करत बसणार. निराशाजनक आहे सगळं. आणी आता फोरेन्सिक तज्ञ येऊन त्यांनी म्हटलंय की या स्फोटांत काहीतरी आयईडी की तत्सम तंत्र वापरलंय.. मी म्हणतो की असले शोध लावून पुढे काय होणार? समजा अगदी सापडले आरडीएक्स.. किंवा कळले की १००% हे काम अल कायदाचे आहे, तरी आपण अफगाणिस्तान्-पाकिस्तानात शिरुन त्या अल कायदाची दाढी धरणार आहोत का? काय उखाडणार आपण. जाऊ दे. संताप आणि निराशा एकाचवेळी ओव्हरव्हेल्मिंग होत आहेत.

अजिबात घाबरु नका, पिएम नि कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आता काळजीचे कारण नाही. (अवांतरः सीएम म्हणतात अफवावर विश्वास ठेउ नका . आम्ही राजकारणी बोलतात त्याच अफवा समजतो)

सर्व प्रथम धमालराव तुमचे आणि मग माझे अभिनंदन करतो ! कारण तू हा धागा काढायला आणि मी हा धागा वाचायला जिवंत आहोत... आपला देश महासत्ता होतोय ! जीडीपी ग्रोथ होतोय... त्याचीच तर सुमधुर फळे आपण चाखत आहोत नाही का ? रस्त्यात खड्डे नव्हे तर देशच खड्यात गेला असुन राजकारणी मात्र आनंदात आहेत... ओहो पगारवाढ करुन मिळते ना त्यांना ! त्यासाठी सर्व लगेच एकत्र आले की नाही ? मग अशी देश सेवा करतात तर त्यांना पगार नको का वाढवुन द्यायला ! आपण आहोतच टॅक्स भरायला तयार... आता मॄतांचे आकडे कळतील,सरकार मॄत व्यक्तींच्या नातेवाईकांना "मदत" जाहीर करेल... "उच्च" स्तरीय बैठका / चौकश्या होतील आणि त्याचा अहवाल लवकारात लवकर जाहीर केला जाईल असे आपल्याला कळेल... चूकुन एखाधा अपराधी सापडलाच तर त्याची सुद्धा कसाब प्रमाणेच व्यवस्था होईल... सगळ कसं नेहमी घडतं तसचं. वेगळ काही घडेल याची शक्यता मात्र नाहीच नाही. जनता जनार्दन त्यांच्या नावाने फक्त बोटेच मोडु शकते त्यावर त्यांच्या हातात काहीच उरले नाही... कारण षंढपणा बरोबरच आपण या षंढपणात निर्ढावले देखील आहोत. कुत्र्या सारखे आयुष्य जगायचे आणि मग अशाच एखाद्या स्फोटात कुत्ते की मौत मरायचे हेच आपले "सुखी" जीवन. जाता जाता :---- धमालराव ते वाक्य विसरायच नाही बरं... कुठल ? तेच :--- बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है |

बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है | हेच लक्षात ठेवा आणि विसरुन जा........................ (बाकी सर्व)

ज्या क्षणी सरकार ताब्यात असलेल्या अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकत नाही तोपर्यंत वचक रहाणार नाही. आणि ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला तमाम मुंबईकर हा सोहळा शिवजयंती तसेच गणपती उत्सव सारखाच साजरा करेल. खालचे वाक्य अजून कितीदा लिहावे लागणार देव जाणे ! या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तिंच्या आत्म्याला शांती लाभो. माझी विनम्र आदरांजली !! अमोल केळकर

ठाकर्‍यांनी आपल्या स्टाईलने डायलॉगबाजी सुरु केली की लोकांनीच आता अतिरेक्यांचा निकाल लावावा वगैरे. पण जोवर ज्या सरकारच्या अधिकाराखाली बॉम्बस्फोट होतायत त्यांना त्या मुद्द्यावरून खुर्ची गमवावी लागेल अशी भीती वाटत नाही तोवर ते असेच निष्क्रिय रहाणार. विरोधी पक्षाला जर असला बॉम्बस्फोट म्हणजे सत्ता मिळवायची हमखास संधी वाटत नाही तोवर असेच होणार. उलट जर सत्ताधारी पक्षाला अशी भीती वाटली तर आपले गुप्तचर खाते, खबर्‍यांचे जाळे पणाला लावून अशा गोष्टी होण्यापासून वाचवेल वा झालेल्या गोष्टींचा छडा लावून लोकांना शासन करेल. खरे तर सामान्य जनतेला आपल्यापैकी डझन दोन डझन मेल्याचे फार वाईट वाटत नाही. त्यामुळे नेत्यांचे सोकावते आहे. उद्या जर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून कसाबच्या कोठडीवर चाल करुन गेले आणि असे पुन्हा पुन्हा होत रहिले तर झक मारत सरकारला फाशीची शिक्षा त्वरेने द्यावी लागेल. अजून एक गोष्ट म्हणजे तमाम मंत्री संत्री, आमदार खासदार भक्कम सुरक्षा कडे बाळगून असतात. त्यांना असल्या प्रकारापासून काहीही धोका नाही. कुणी अण्णा, अप्पा, दादा, मामा, रामदेव, नामदेव, कामदेव बाँबस्फोटचा तपास लागो, असल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशी मिळो म्हणून उपोषण का करत नाही? छ्या. पुढच्या स्फोटाची वाट बघावी हेच खरे!

In reply to by हुप्प्या

>>विरोधी पक्षाला जर असला बॉम्बस्फोट म्हणजे सत्ता मिळवायची हमखास संधी वाटत नाही तोवर.... म्हणून स्फोट घड(वले जा)त आहेत की काय ? [आम्ही यांनी सत्ता मिळवण्याची संधी साधावी म्हणून बॉम्बस्फोट घडवत आहोत पण यांना त्याचे काहीच नाही हे] गुपित असे उघडे करून येथे का बरे सांगितले ? [ते खाजगीत विरोधी पक्षाला नसते का सांगता आले?] असो. विरोधी पक्षाला ही सत्ता मिळवण्याची संधी कशी काय? लोक बहुधा विरोधी पक्षाच्या कारकीर्दीतल्या घटना जाणून असतीलच. काळेकाकांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधानांना सत्ता विरोधी पक्षाकडे सोपवण्यासाठी पत्र लिहावे म्हणतो. निदान विरोधी पक्षाला सत्ता मिळवण्यास मदत म्हणून जे स्फोट घडवले जात असतील ते तरी थांबतील.

In reply to by नितिन थत्ते

खरोखरंच, तोड नाही तुमच्या काँग्रेस भक्तीला. आत्ताही तुम्हाला "विरोधकांच्या कारकिर्दीतल्या घटनांबद्दल" गळा काढावासा वाटतो.... कमाल आहे.

In reply to by श्रीरंग

छे बुवा. मी तर उलट विरोधी पक्षाच्या काळात "कणखरपणे पाकिस्तानवर हल्ला न केल्याच्या/आर या पार की लदाई न केल्याच्या कृतीचं" वेळोवेळी समर्थनच केलंय. दुवे हवे असल्यास शोधून देईन. इथे हुप्प्या यांना असे बॉम्बस्फोट ही विरोधी पक्षांसाठी सत्ता मिळवण्याची संधी वाटते आहे म्हणून हा प्रतिसाद दिला. शिवाय मी तर काँग्रेसने सत्ता सोडून विरोधीपक्षांकडे सत्ता द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे याचे कारण "बॉम्बस्फोट ही सत्ता मिळवण्याची संधी आहे" असे काँग्रेसभक्त नसलेल्या सदस्याचे म्हणणे आहे. निदान त्यामुळे असे घडवले जाणारे बॉम्बस्फोट थांबतील अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

In reply to by नितिन थत्ते

"राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्वाच्या आघाडीवरही साफ अपयशी ठरून सुध्दा, आपल्याला सत्तेवरून कोणीही खाली खेचू शकत नाही, या आत्मविश्वासापोटी सरकार सुरक्षीततेच्या बाबतीत ढिलाई दाखवत आहे." या मताशी आपण सहमत आहात का थत्ते साहेब? का अजूनही "विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा तरी त्यांनी काय दिवे लावले होते!" असा टिपिकल पळपुटा युक्तिवाद आपल्याला समर्थनीय वाटतो?

In reply to by श्रीरंग

नाही. सहमत नाही. विरोधकांकडे सत्ता असताना काय दिवे लावले? असा माझा (पळपुटा ऑर अदरवाइज) युक्तिवाद नाही. त्याही वेळच्या सरकारने जे करणे आवश्यक आणि शक्य होते ते केलेच होते . आणि आजचेही सरकार जे करणे आवश्यक आणि शक्य आहे ते करीतच आहे इतकेच माझे म्हणणे आहे. सध्याचे सरकार कदाचित तुमच्या नावडत्या पक्षाचे असल्यामुळे माझ्या प्रतिसादात तुम्हाला बायस दिसत असावा. [काही तथाकथित कणखर देशांनी वेळोवेळी कठोर कारवाया केल्या होत्या पण दहशतवाद संपुष्टात आल्याचे ऐकिवात नाही. तसेच येथल्या परक्या आणि मतांची फिकीर आजिबात करावी लागत नसणार्‍या जुलमी वगैरे सरकारने अनेक लोकांना फाशी/जन्मठेप वगैरे शिक्षा सुनावल्या/अंमलात आणल्या. पण ती कृत्ये करणारे आणखी लोक तयार होतच राहिले]].

In reply to by नितिन थत्ते

>>काही तथाकथित कणखर देशांनी वेळोवेळी कठोर कारवाया केल्या होत्या पण दहशतवाद संपुष्टात आल्याचे ऐकिवात नाही. खरे आहे थत्ते काका, आपण त्यांनाही आपली गांधीगिरी शिकवुयात. आपण आजवर गांधीगिरीने दहशतवादाला जे सडेतोड उत्तर दिलेय त्याला तोड नाही, बघा ना या वेळेच चक्क त्यांनी आरडीएक्स वापरले नाही, अशीच हळुहळु सुधारणा होईल, मला दहशतवाद्यांचा त्यांच्या या मवाळ धोरणाबद्दल आदर वाटतो. मुंबई हा एक गाल झाला आता आपण मुजाहिदीनला दिल्लीत स्फोट करायला सांगु म्हणजे दुसर्‍या गालावर तोंडात मारुन घेतल्यासारखे होईल.

In reply to by नितिन थत्ते

बलात्कार, चोरी, दरोडे ह्याविरुद्ध कायदे आहेत. वेळोवेळी अशी कृत्ये करणार्‍यांना शिक्षाही झालेल्या आहेतच. म्हणून हे गुन्हेही संपल्याचे ऐकिवात नाही. म्हणून ह्या गुन्ह्यांविरुद्ध कायदे बनवणे, ते कठोर करणे, आधुनिक पद्धतीने पुरावे गोळा करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा प्रयत्न करणे बंद करावे की काय? कणखर देश उदा. इस्रायल हे दहशतवादाशी लढत आहेत. त्याने दहशतवाद कमी झाला आहे. आणि दहशतवाद संपण्याचे सोडा, जर हे लोक असे लढले नाहीत तर ते स्वतःच संपतील अशी जिवाची भीती असल्यावर ते कारवाया करणारच. आजचे सरकार दहशतवादाविरुद्ध जे काही करायचे आहे ते करतच आहे असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. ज्या पद्धतीचे वक्तव्ये काँग्रेसी नेते करत आहेत त्यावरुन त्यांचा राजकीय स्वार्थीपणा दिसतो आहे. हिंदूंचा दहशतवाद त्यांना बोचतो. त्याला ते स्वच्छ हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणतात. मात्र मुस्लिम अतिरेक्यांनी कारवाया केल्या की दहशतवादाला धर्म नसतो असा त्यांना साक्षात्कार होतो. निव्वळ आकडेवारी बघितली तरी कळेल की मुस्लिमांनी केलेला दहशतवाद कितीतरी जास्त आहे. असे असताना गृहमंत्री म्हणतात की भारताला सगळ्यात जास्त धोका भगव्या दहशतवादाचा. भाजपासारख्या बुळचट, निष्क्रिय, हतबल, हतवीर्य पक्षाचा हवाला देऊन त्यांनीही तसे केले म्हणून कॉंग्रेस तसेच करते हे म्हणणेही चूक आहे. भाजप नालायक होता म्हणून तो हरला. आता जे जिंकले आहेत त्यांनी काही तरी करून दाखवावे.

रागावु नको यार धम्या पण प्रतिक्रियापण द्यावीशी वाटत नाही राव आजकाल :( बाकी काल दादरच्या घटनास्थळावरच्या अधिकार्‍याला 'मिटरबॉक्स मध्ये शॉर्टसर्किटने स्फोट झाला आहे' हे सांगताना बघून इतके भरुन आले म्हणून सांगतो ना... ह्या अशा अधिकार्‍यांची सार्वजनीक दृष्ट वैग्रे का काढत नाहीत ?

हे असंच चालू राहणार. दोन दशकं होत आली मुंबईतील ९३ च्या स्फोटांना. आजवर आपण काहीही उपटू शकलो नाहिये पाकड्यांचं. ते मात्र हव्या त्या क्षणी भारतात हवे तिथे स्फोट घडवू शकतात. सैन्याचा उपयोग १५ ऑगस्ट ची परेड, आणी हवाईदलाचा वापर फक्त क्रिकेटपटू व सेलेब्रिटीजच्या हवाई सफरींसाठी असतो, एवढेच आम्हाला माहित आहे.

दादरला झालेल्या बाँबस्फोटातील मृत व्यक्तींना विनम्र आदरांजली!! आपण आणि आपले सर्व सहृदय सुरक्षीत आहेत अशी आशा करतो. ज्यांनी हे स्फोट घडवून आणले त्यांना उत्तम चिकन बिर्याणी आणि उत्तम प्रतिची दारु तिहारला कधी मिळेल याची वाट बघत बसण्यावाचून आपण काहीच करु शकत नाही याची लाज वाटते. जरी त्याचा काही उपयोग नसला तरी त्यांचा तिव्र निषेध नोंदवतो आणि गप कामाला लागतो. :(

आबा : झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे ..याचा तपास चालु आहे ..कोणाचीही गय केली जाणार नाही ..दोषी ना कडक कारवाइ ल सामोरे जावे लागेल..[ ( आणि बडे बडे देशो मे ऐसि छोती छोटी बाते होती है)] बाबा .(आपले सी. एम) : झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो..तथापि , जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी मुंबईकरांनी शांतता राखावी..मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल. तसेच जखमींवर उपचारांचासाठी होणारा सर्व वैद्यकीय खर्च सरकार करेल.[. (झाला माझा काम)]

आजच आलो गावावरुन परत . बोलण्यासारखे काही नाही ,बाकी गप्प रहाणेच बरे.

(भयभीत आणि काळजीत पडलेला) >>> .....काळजीत पडू नये....मुंबईकरांना या गोष्टींची नवलाई राहीलेली नाहीय आणि भिती सुद्धा नाही. अश्या घटना घडल्या नाहीत तर आम्हा मुंबईकरांना चुकल्या सारखं वाटतं. या उलट जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा सगळं जग आमचं कौतुक करतं (आमचं कार्याप्रती असलेल्या निष्ठेचं, आमच्या professionalism चं, दुसर्‍याच दिवशी कामावर धावत पळत जाण्याचं आणि मुंबईचा देशातील आर्थिक राजधानी म्हणून असलेला दबदबा कायम ठेवण्याचं, आमच्या सहनशक्तीचं वै. वै....) आता अशी कौतुकं करून घ्यायची तर अश्या घटना घडायलाच हव्यात. नाही का?

लहानपणच्या खूप आठवणी आहेत. मोठेपणच्याही आहेत. माझ्या भावी पत्नीला मी त्यांच्या घरी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो तेव्हा तिथल्याच २०१च्या बसस्टॉपवर उभा होतो. (तेव्हा अर्थातच ती भावी आहे हे माहीत नव्हतं...) आमचे सासुसासरे भवानीशंकर रोडवरच राहातात. त्यांचा ठाण्याहून ताबडतोब फोन आला तेव्हा बरं वाटलं. सर्व सुखरूप आहेत. मिपावर अगदी अगत्याने इतर मिपाबांधवांची चौकशी झालेली पाहूनही बरं वाटलं. सातासमुद्रापलिकडे राहणारे संकटकाळी एकमेकांना आपण सगळे व्यवस्थित आहोत याची हक्काने विचारपूस करतात. स्वतःचा हात वरून काळजी करू नका, मी ठीक आहे सांगतात... तरीही आंतरजालामुळे माणूस माणसापासून दूर गेलाय असं काहींना वाटतं.

मिपावर......एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही, की फार वाईट झाले. एरव्ही स्वतःला पुरोगामी दाखवणार्या मुसलमानाची रा. स्व. संघाबद्दल, या हिंदुसमाजाबद्दल थोडेसे ही काहि लिहीले तर फार तिखट प्रतिक्रिया येते. पण जेव्हा केव्हा बॉम्ब स्फोट होतात तर सगळे कुठे गायब होतात देव जाणे.

In reply to by खादाड_बोका

मिपावर......एकाही मुसलमानाची प्रतिक्रिया नाही, की फार वाईट झाले. एरव्ही स्वतःला पुरोगामी दाखवणार्या मुसलमानाची रा. स्व. संघाबद्दल, या हिंदुसमाजाबद्दल थोडेसे ही काहि लिहीले तर फार तिखट प्रतिक्रिया येते. पण जेव्हा केव्हा बॉम्ब स्फोट होतात तर सगळे कुठे गायब होतात देव जाणे.
दुर्देवी प्रतिक्रिया एव्हढंच म्हणेन. निषेध नोंदवतो. दहशतवादाला धर्म नसतो असे आमचे स्पष्ट मत आहे.

पुन्हा तेच??? . . . . . . . . . इथे मुसलमान वगैरे प्रश्न कुठे येतो? +१ . . . . . मृतांमध्ये मुसलमानही आहेत....आता पर्यंन्तची मृतांची संख्या १९ झाली आहे. . . . . . . . . . . किडा-मुंगी प्रमाणे मरणं, मरण स्वस्त होत आहे.... हे शब्द वाचले होते आता प्रत्यक्ष अनुभव येत आहे, आता बाहेर असलो की घर कधी गाठतोय असं होतं... :( हताशवाणं,विषण्ण आहे सगळं........ :(