जीवनाचं अगाध तत्त्वज्ञान आपल्या सहज सुंदर कविता ,गाणी ओवी,म्हणीतून मांडणारी ही महान कवियत्री आज आपल्यात नसली तरी तिची वाड:मय सम्रृध्दी पुढ्च्या काळातही अबाधित राहिल अशीच आहे.
अगदी खरं आहे. लेख आवडला !
बहिणाबाईंची एक म्हण: मानसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा.
-दिलीप बिरुटे
लेख आवडला
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
मळा, मोट,पाणी चूल, तवा शेतीची कामे,घरोटा या आपल्या नित्याच्या वापरात असलेल्या साधनांचे दाखले देत बहिणाबाईंनी सार्या विश्वाला मोठे तत्वज्ञान सांगितले आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच भांडार खूलं झालेलं आहे.तरिही अशी वाड:मय निर्मिती झाली नाही परन्तु जीवनात जे दिसलं,जे अनुभवलं ते सहज मांडलं आणि त्यातुन बहिणाबाईंनी जबरदस्त वाड:मयाची निर्मिती केली.
१००% सहमत. अतिशय मर्मग्राही लेख.
क्रान्ति
अग्निसखा
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर
सुंदर!!!!!!!!!!!!!!!!
लेख आवडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे ’' .. अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.
बहिणाबाईंच्या कवितेला एक खास रंग आहे. मातीचा, पानाफुलांचा, ग्रामीण जीवनाचा, खानदेशी वऱ्हाडी भाषेचा गंध आहे. कुठल्याही पढीकपणाचा तिला पुसटसाही स्पर्श नाही.
धरणी, वारा, आभाळ, पाऊस, ऊन यांच्या आधाराने वाढलेली बी, बियाणे, मोट, नाडा, शेत, खळे, बैल, नांगर, वखर, बोरी, बाभळी, निंबोणी, चूल, तवा, भाकरी, भाजी, विस्तव, फुंकणी, पाखरे, झाडे, वेली, देव... या साऱ्यांशी रक्ताच्या, हाडामांसाच्या नात्याने बांधलेली त्यांच्या अस्सल देशी कविता !!
आधुनिक जीवन जाणिवांचा, यंत्रादी साधनांचा तिला स्पर्शही नाही. बहिणाबाईंनी प्रेमकवितेची एक ओळही लिहिली नाही; पण जे लिहिले, ते अतिशय मौलिक लिहिले
लिहीता न येणार्या बहिणाबाई 'अहिराणी' बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.
पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली. "कष्टातच देव पाहिला पाहिजे,' हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांच्या कविता इतक्या श्रीमंत, आशयगर्भ, सफाईदार आणि मधुर आहेत, की भल्याभल्यांनी तोंडात बोट घालावी.
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!
मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना
अप्रतिम !!
बहिणाबाईंविषयी "पुलं'नी म्हटलं आहे, की "कवितेचं दळण अनेकांनी मांडलं; पण सुख- दुःखाच्या जात्यात स्वतःचं जीवन भरडलं जात असताना, त्या श्रमांचं सामवेद करून गाणारी बहिणाबाई एखादीच."
~ वाहीदा
वाहीदा छान प्रतिसाद दिलास ग :) .... केवढी मोलाची भर घातलीस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
बहिणाबाईंचे अभंग, गाणी पुढील साईटसवर उपलब्ध आहेत.
http://www.aathavanitli-gani.com/Lists/Sant%20Details/Bahinabai.htm
http://www.khapre.org/portal/url/keywords/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88.%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80.aspx
''अरे संसार संसार'' गाणे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात यूट्यूबवर ऐका :
http://www.youtube.com/watch?v=9Pr21rLr90o&feature=PlayList&p=B60ED1E6B738D418&playnext_from=PL&playnext=1&index=9
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
खूप सुंदर लेख. :)
मला वाटतं त्या काळी बर्याच माईंना जात्यावर ओव्या म्हणायची सवय होती. आणिकही काही बहिणाबाई असतील.. फक्त आपल्याला माहित नाहीत.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर
मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना
किती सहज, उत्स्फूर्त पण तेवढंच गहिरं लिहिलेलं.. खूप सुंदर. बहिणाबाईंना दंडवत!
राघव
सुरेख लेख ! खरोखर बहिणाबाई म्हणजे विदर्भाला पडलेलं एक नितांत सुंदर स्वप्न होतं.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
अतुल पेठेंचा बहिणाबाईंच्या जीवनावर दिग्दर्शित एक उत्त्तम लघुपट आहे. मला, मुक्त सुनीत व बिका ला त्यांनी त्याची प्रत भेट दिली होती
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
सुरेख लेख ! खरोखर बहिणाबाई म्हणजे विदर्भाला पडलेलं एक नितांत सुंदर स्वप्न होतं.
=)) :)] :T ~X( X(
इशाल्भौ काय हे???????????
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
प्रतिक्रिया
आवडले लेखन
लेख
प्रतिभावंत कवयित्री
सुरेख लेख.
उत्तम लेख.
मन जह्यरी
जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल
वाहीदा छान
सहमत...
छान!
बहिणाबाईं
खूप सुंदर
सुरेख लेख !
अतुल पेठे
सुरेख लेख !